तंबाखू
नियंत्रण कायद्याची प्रभावीपणे अमंलबजावणी करा
- मोहन पातुरकर
* जिल्हास्तरीय समन्वय समितीची आढावा बैठक संपन्न
अमरावती,दि.9 : तंबाखू सेवन
हे जगामध्ये होणाऱ्या विविध आजारांचे व अकाली मृत्यू होण्याचे प्रमुख कारण आहे.
तंबाखू नियंत्रणासाठी तंबाखू नियंत्रण कायदा 2003 ची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी,
असे निर्देश निवासी उपजिल्हाधिकारी मोहन पातूरकर यांनी आज बैठकीत दिले. तंबाखू
नियंत्रण कायदा 2003 अंमलबजावणीचा आढावा श्री पातूरकर यांनी आज जिल्हाधिकारी
कार्यालयात घेतला. याप्रसंगी ते बोलत होते.
बैठकीला डेंटल कॉलेजचे प्राचार्य
डॉ.राम ठोंबरे, जिल्हा सामान्य रुग्णालयाचे डॉ.शंतनू राऊत, समन्वयक डॉ. रामदास
देवघरे, समुपदेशक विनोद साबळे, सहकामगार आयुक्त श्री बनाकर, उपायुक्त विक्रीकर,
उपायुक्त व्हि. के. पैजने, कृषि विभागाच्या अधिकारी कु.सुप्रीया शिळीमकर, माहिती
सहाय्यक विजय राऊत प्रामुख्याने उपस्थित होते.
श्री. पातूरकर म्हणाले की, महाराष्ट्र राज्यात केंद्र शासनाच्या juvenile
justice Act 2016 च्या कलम 77 नुसार 18 वर्षाखालील मुलांना तंबाखू विक्री करण्यावर
कायदेशीर कारवाई करण्याचे सुचविले आहे. या कायद्याच्या नुसार शाळा]
महाविद्यालयामध्ये शासकीय कार्यालये आदीच्या शंभर मिटरच्या परिसरात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ
खाण्यास व विक्री करण्यास प्रतिबंध लावण्यात आले आहे. प्रमुखांनी तंबाखु सेवनाने कॅन्सरसारखा भयकर
आजार होते. तबांखु सेवनावर प्रतिबंध करण्यासाठी सर्व कार्यालय प्रमुखांनी व शाळा
महाविद्यालयांनी याविषयी गंभीरतेने अंमलबजावणी
करावी. कोणीही व्यक्ती असे कृती करतांना आढळल्यास त्यावर तात्काळ पोलीस कारवाई करावी असेही त्यांनी आवाहन केले.
अन्ना व औषध तबांखु विक्री, साठवणून व सेवनावर प्रतिबंधात्मक कारवाई करुन येणाऱ्या
पीढीला या सवयीपासून वाचवावे असेही त्यांनी सांगितले.
तंबाखु नियंत्रण कायद्या 2003 (COPTA) या कायदया नुसार कलम 4, अन्वये सार्वजनिक स्थळी
धुम्रपान करण्यास मनाई, कलम -5 अन्वये तंबाखु पदार्थाच्या जाहिरात, करण्यासाठी
प्रतिबंध, कलम 6- अन्वये तंबाखुजन्य उत्पादने लहान बालकांना विक्री करण्यास
प्रतिबंध लावण्यात आले आहे. कलम 77 नुसार
जो कोणी एखाद्या मुलास लहान अन्वये हक्क
गुंगी आणणारे द्रव्ये, किंवा तंबाखु व तंबाखुजन्य पदार्थ किंवा मानसिक स्थिती
बदलणारी औषधे देईल किंवा देण्यास भाग पाडेल तो मान्यता प्राप्त वैधकीय व्यवसायीक
गुन्हेगार ठरेल.अशा गुन्ह्यास 5 वर्षेपर्यत कठोर कारावास व 1 लाख रुपयापर्यत दंड अशी
शिक्षा ठोठावण्यात येईल अशी माहिती डॉ.
शंतनु राऊत यांनी यावेळी दिली.
तंबाखूच व्यसन
सोडल्याने होणारे दीर्घ कालीन व तात्काळ फायदे
* 20 मिनिटे – रक्तदाब , नाडीची
गती आणि शरीराचं तापमान सामान्य स्थितीत येतं.
* 8 - तास रक्तातील कार्बन मोनॉक्साईडची
पातळी सामान्य स्थितीत खाली येते आणि ऑक्सीजनची
पातळी सामान्य होते.
* 24 तास - तुम्हाला ह्दयविकाराचा
झटका येण्याची शक्यता कमी होते.
* 48 तास - वास आणि चव घेण्याची
क्षमता वाढते.
* 72 तास- फुफ्फुसांची क्षमता वाढते, श्र्वसन अधिक सुलभ
होतं.
* 2 आठवडे ते 3 महिने- रक्तभिसरण
सुधारते चालणे अधिकसहज होते
* 1-9 महिने - फुफ्फुसं स्वच्छ करण्याची आणि संक्रमणं कमी करण्याची क्षमता
वाढते. खोकला, थकवा आणि
श्र्वास लागणे कमी होते आणि शरीराची ऊर्जा
पातळी वाढते.
* 5 वर्षे - फफ्फुसाच्या कर्करोगानं मृत्यू होण्याची जोखीम 50 टक्क्यांनी
कमी होते.
* 10 वर्षे – फफ्फुसाच्या कर्करोगानं मृतयू होण्याची जोखीम धुम्रपान न
करणाऱ्या व्यक्तीच्या समान होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा