रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज
रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज हे लोककल्याणकारी राज्याची स्थापना करणारे लोकहितैषी सहिष्णू आदर्श राजे म्हणून जगभर वंदिले जातात. त्यांनी जनसामान्यांचे स्वराज्य स्थापन करत प्रजाहितदक्ष राज्यव्यवस्थेचे उदाहरण भावी राज्यकर्त्यांसमोर ठेवले आहे. छत्रपती शिवराय हे महान योद्धा असण्याबरोबरच सुजाण प्रशासक व द्रष्टे राष्ट्रनिर्माता होते. त्यामुळे त्यांचे जीवन केवळ महाराष्ट्र किंवा देशाच्याच नव्हे तर समस्त जगाच्या इतिहासात देदिप्यमान व अनन्यसाधारण ठरणारे आहे. ते ख-या अर्थाने रयतेचे राजे होते. त्यांच्या राज्यकारभारातील प्रत्येक कार्यवाही जनतेच्या हिताची काळजी घेणारी होती. एका आदर्श प्रशासकाला आवश्यक असणारे शिस्त, जोखीम स्वीकारण्याचे धाडस, न्याय, दूरदृष्टी, विवेक, अखंड परिश्रम हे सर्व गुण त्यांच्या ठायी होते. महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य म्हणून ओळखले जाते. शूरवीर, संत आणि महापुरुषांची भूमी असलेल्या महाराष्ट्राच्या जडणघडणीत छत्रपती शिवाजी महाराज यांचे अनन्यसाधारण योगदान आहे. त्यांची शेतीविषयक धोरणे त्यांच्या लोकहितकारी व्यक्तित्वाची ग्वाही देतात.