पोस्ट्स

ऑगस्ट, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान व राष्ट्रीय कृषि विकास योजनेंतर्गत द्राक्ष पिकासाठी प्लास्टिक कव्हर तंत्रज्ञान

  एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान व राष्ट्रीय कृषि विकास योजनेंतर्गत द्राक्ष पिकासाठी प्लास्टिक कव्हर तंत्रज्ञान   अमरावती दि. 28 :   द्राक्ष हे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आर्थिक बळ देणारे महत्वाचे फळपिक आहे. द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना अवकाळी पाऊस, गारपीट अशा नैसर्गिक आपत्तींपासून द्राक्ष बागांच्या संरक्षणासाठी प्लास्टिक कव्हर घटकाचा शासकीय योजनेंतर्गत समावेश करण्याबाबत शेतकरी तसेच लोकप्रतिनिधींद्वारे सातत्याने मागणी होती. त्यानुसार राष्ट्रीय कृषि विकास योजनेंतर्गत द्राक्ष पिकासाठी प्लास्टिक कव्हर हा शंभर हेक्टर क्षेत्राचा प्रकल्प प्रमुख द्राक्ष उत्पादक जिल्ह्यांमध्ये राबविण्याकरिता शासनाकडून 22 मे 2023 च्या शासन निर्णयानुसार प्रायोगिक तत्वावर राबविण्याकरिता प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली आहे. त्यानुसार महाडिबीटी प्रणालीवर सदर योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे. योजनेचा उद्देश : गारपीट व अवकाळी पाऊस यापासुन द्राक्ष बांगाचे संरक्षण करणे, शेतकऱ्यांना उच्च दर्जाच्या व उच्च प्रतिच्या निर्यातक्षम द्राक्ष पिकांच्या उत्पादनासाठी आर्थिक सहाय्य करणे, फळबागांकरीता आधुनिक तंत्रज्ञाना

पीक स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन

  पीक स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन अमरावती दि. 28 :    1 जून ते दि. 28 ऑगस्ट या कालावधीचे राज्याचे सरासरी पर्जन्यमान 796.8 मिमी असून या खरीप हंगामात दि.28 ऑगस्ट 2023 पर्यंत प्रत्यक्षात 675.4 मिमी   (दि. 28 ऑगस्ट पर्यंतच्या सरासरीच्या 85%) एवढा पाऊस पडलेला आहे.                खरीप हंगामातील राज्याचे सरासरी पेरणीचे क्षेत्र 142 लाख हेक्टर असून दि.28 ऑगस्ट 2023 अखेर प्रत्यक्षात 139.84 लाख हेक्टर (98 टक्के) क्षेत्रावर पेरणी झालेली आहे. राज्यात पेरणीची कामे पुर्ण झालेली आहेत. आज दि.28.08.2023 रोजीपर्यंत राज्यात सोयाबीन पिकाची 50.28 लाख हे. क्षेत्रावर, कापूस पिकाची 42.08 लाख हे. क्षेत्रावर, तूर पिकाची 11.15 लाख हे. मका पिकाची 9.00 लाख हे. क्षेत्रावर पेरणी झाली आहे. तसेच भात पिकाची 14.96 लाख हे. क्षेत्रावर पुर्नलागवड झाली आहे. राज्यामध्ये दि.25 जुलै-2023 ते आज दि.28.08.2023 अखेर 484 महसूल मंडळामध्ये 15 ते 21 दिवसांचा तर 376 महसूल मंडळामध्ये 21 दिवसापेक्षा जास्त पावसाचा खंड पडलेला आहे. खरीप हंगाम 2023 करीता 19.21 लाख क्विं.बियाणे गरजेच्या तुलनेत प्राथमिक अंदाजानुसार 21.78 लाख क्विं.

इयत्ता पाचवी व आठवीचा मुल्यमापनचा अहवाल जाहीर

  इयत्ता पाचवी व आठवीचा मुल्यमापनचा अहवाल जाहीर अमरावती दि. 29 :   जुन, 2023 मध्ये महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळामार्फत आयोजित करण्यात आलेल्या इयत्ता पाचवी (प्राथमिक स्तर) व इयत्ता आठवीच्या (उच्च प्राथमिक स्तर)   मुल्यमापनाचा ऑनलाईन निकाल गुरुवारी (ता. 24 ऑगस्ट) मंडळामार्फत जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार मुल्यमापनामध्ये इयत्ता पाचवी ते आठवीपर्यंतची अर्हता व विद्याविषयक कौशल्य प्राप्त केलेल्या सर्व विद्यार्थी, त्यांचे पालक व त्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षकांचे मनःपूर्वक अभिनंदन व पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा ! देण्यात आल्या आहेत. मुल्यमापन अहवालाची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत. मुल्यमापनाची वैशिष्टये : इयत्ता पाचवी (प्राथमिक स्तर) व इयत्ता आठवी ( उच्च प्राथमिक स्तर) साठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांकडून मूल्यमापन प्रक्रियेसाठी दि. 2 मे ते 9 मे 2023 या कालावधीत ऑनलाईन आवेदनपत्रे स्विकारण्यात आली होती. इयत्ता पाचवी (प्राथमिक स्तर) व इयत्ता आठवी (उच्च प्राथमिक स्तर) मुल्यमापन दि. 20 जून ते 30 जून 2023 या कालावधीत घेण्यात आलीत. सदर मुल्यमापनासाठी राज्यातील पुणे, और

इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षांचा कालावधी जाहीर सविस्तर वेळापत्रक मंडळाच्या अधिकृत www.mahahsscboard.in संकेतस्थळावर उपलब्ध

  इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षांचा कालावधी जाहीर सविस्तर वेळापत्रक मंडळाच्या अधिकृत   www.mahahsscboard.in   संकेतस्थळावर उपलब्ध   अमरावती दि. 28 : फेब्रुवारी व मार्च 2024 मध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या विभागीय मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता बारावी) व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.दहावी) च्या लेखी परीक्षांचा कालावधी शिक्षण मंडळाव्दारे जाहीर करण्यात आला आहे. उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (सर्वसाधारण व व्दिलक्षी विषय) व उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम बुधवार, दि. 21 फेब्रुवारी ते शनिवार, दि. 23 मार्च 2024 दरम्यान होणार आहे. तसेच   माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा शुक्रवार दि. 01 मार्च ते शुक्रवार दि. 22 मार्च 2024 दरम्यान होणार आहे. उपरोक्त कालावधीमध्ये आयोजित केलेले दिनांकनिहाय सविस्तर वेळापत्रक मंडळाच्या अधिकृत   www.mahahsscboard.in   संकेतस्थळावर दि. 28 ऑगस्ट 2023 पासून उपलब्ध करून देण्यात येत आहे. शाळा/कनिष्ठ महाविद्यालय

खरीप हंगाम पिकस्पर्धेत सहभागी होण्याची अंतिम मुदत 31 ऑगस्ट शेतकऱ्यांना सहभागी होण्याचे आवाहन

  खरीप हंगाम पिकस्पर्धेत सहभागी होण्याची अंतिम मुदत 31 ऑगस्ट शेतकऱ्यांना सहभागी होण्याचे आवाहन     अमरावती, दि. 28: जिल्ह्यात पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी शेतकऱ्यांकडून विविध प्रयोग करण्यात येतात. अशा प्रयोगशील शेतकऱ्यांना मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन विजेत्या शेतकऱ्यांचा गौरव व्हावा, यासाठी पिक स्पर्धा खरीप हंगाम 2023 मध्ये शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन आयुक्त कृषी सुनील चव्हाण यांनी केले आहे.   कृषी विभागामार्फत खरीप हंगाम सन 2023 मध्ये सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी), तूर, मूग, उडीद, सोयाबीन, भुईमुग, सुर्यफुल या 11 पिकांसाठी पिकस्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.            पिकस्पर्धेची ठळक वैशिष्टे व बाबी : •         पीकस्पर्धेसाठी भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी), तूर, सोयाबीन, भुईमुग व सुर्यफुल या पिकांसाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 31 ऑगस्ट आहे. •         स्पर्धेसाठी प्रवेश शुल्क प्रत्येक पिकासाठी स्वतंत्र सर्वसाधारण गटासाठी रक्कम रु.300 व आदिवासी गटासाठी रक्कम रु. 150 राहिल. •         स्पर्धेत भाग घेण्‍यासाठी  शेतक

इयत्ता पाचवी व आठवीच्या मुल्यमापनाचा निकाल जाहीर

इयत्ता पाचवी व आठवीच्या मुल्यमापनाचा निकाल जाहीर Ø   www.msbos.mh-ssc.ac.in अमरावती, दि. 24 : महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळ, पुणे मार्फत महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक व लातूर या सात विभागीय मंडळांमार्फत इयत्ता 5 वी (प्राथमिक स्तर) व इयत्ता 8 वी (उच्च प्राथमिक स्तर) मध्ये प्रविष्ठ विद्यार्थ्यांचे मूल्यमापन दि. 20 जून  ते 30 जून 2023 या कालावधीत आयोजित करण्यात आले होते. त्याअनुषंगाने मूल्यमापनाचा ऑनलाईन निकाल www.msbos.mh-ssc.ac.in या संकेतस्थळावर आजरोजी गुरुवार दि. 24 ऑगस्ट रोजी दुपारी 1.00 वाजता जाहीर करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांला सदर माहितीची प्रत घेता येईल. पात्र विद्यार्थ्यांना इयत्ता 5 वी/इयत्ता 8 वी पर्यंतची अर्हता व विद्याविषयक कौशल्य प्राप्त केल्याचे प्रमाणपत्र यथावकाश वितरीत करण्यात येईल, असे महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळ, पुणेचे प्र. सचिव माणिक बांगर प्रसिध्दी पत्रकाद्वारे यांनी कळविले आहे.  0000000          

विभागीय आयुक्तांकडून विविध विषयांचा आढावा, शेतकरी, दिव्यांगांच्या प्रलंबित प्रकरणांचा प्राधान्याने निपटारा करा - विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय

इमेज
  विभागीय आयुक्तांकडून विविध विषयांचा आढावा   शेतकरी, दिव्यांगांच्या प्रलंबित प्रकरणांचा प्राधान्याने निपटारा करा -          विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय                अमरावती, दि. 24 :   शेतकरी व दिव्यांगाकरीता शासनाव्दारे विविध योजना व उपक्रम राबविण्यात येतात. त्याचा प्रत्यक्ष लाभ शेतकरी व दिव्यांगांना देण्यासाठी शासकीय यंत्रणेने पुढाकार घेवून त्यांचे प्रलंबित प्रकरणे व समस्यांचा प्राधान्याने निपटारा कराव्यात, असे निर्देश विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय यांनी विभागातील सर्व जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी व विभाग प्रमुखांच्या आढावा बैठकीत दिले. विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात दूरदृश्य प्रणालीद्वारे विविध विषयांचा आढावा घेण्यात आला. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. उपायुक्त संजय पवार, गजेंद्र बावणे, सहायक आयुक्त श्यामकांत मस्के, विभागीय कृषी सहसंचालक किसन मुळे,   निवासी उपजिल्हाधिकारी विवेक घोडके, समाजकल्याण प्रादेशिक आयुक्त सुनिल वारे, जिल्हा नियोजन अधिकारी श्री. मस्के यांच्यासह अन्य अधिकारी-कर्मचारी आदी यावेळी उपस्थित होते.             डॉ. पाण्डेय म्हणाल्य

उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ पुरस्कारांसाठी मंडळांनी सहभाग नोंदवावा

  उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ पुरस्कारांसाठी मंडळांनी सहभाग नोंदवावा अमरावती, दि. 23 : राज्यातील उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना पुरस्कार देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्याअनुषंगाने अमरावती जिल्ह्यातील ग्रामीण व नागरी गणेशोत्सव मंडळांनी पुरस्कार स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा नियोजन अधिकारी तथा गणेशोत्सव समितीचे सदस्य सचिव अभिजित मस्के यांनी केले आहे. पुरस्काराकरीता आवश्यक बाबी : पर्यावरणपुरक मुर्ती व सजावट(थर्माकोल, प्लॅस्टीक विरहीत), ध्वनीप्रदुषण रहीत वातावरण असावे. पाणी वाचवा, मुलगी वाचवा, अंधश्रध्दा निर्मूलन, इ. समाज प्रबोधन, सामाजिक सलोखा संदर्भात सजावट देखावा अथवा स्वातंत्र्याच्या चळवळीसंदर्भात, छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350 व्या राज्यभिषेक वर्षानिमित्ताने सजावट/देखावा असावा. गणेशोत्सव मंडळाने रक्तदान शिबिर, वर्षभर गडकिल्ले संवर्धन, पर्यावरण रक्षण, सेंद्रीय शेती, सौर उर्जाबद्दल जागरूकता निर्माण करणे, ॲम्बुलन्स चालविणे, वैद्यकीय केंद्र चालविणे इत्यादी सामाजिक कार्य. शाळकरी व महाविद्यालयीन विद्यार्थी, विद्यार्थींनी यांच्या शैक्षणिक, आरोग्य, इत्याद

धार्मिक अल्पसंख्यांक बहुल शासनमान्य संस्थांकडून पायाभूत सुविधांसाठी अनुदान योजना

  धार्मिक अल्पसंख्यांक बहुल शासनमान्य संस्थांकडून पायाभूत सुविधांसाठी अनुदान योजना Ø   प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन Ø   31 ऑगस्ट अंतीम मूतद   अमरावती, दि. 23 :   धार्मिक अल्पसंख्यांक विद्यार्थी बहुल शासनमान्य खाजगी शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नगरपालिका/नगरपरिषद शाळा, अपंग शाळा यांच्याकडून पायाभूत सोयी-सुविधा पुरविण्यासाठी अनुदान योजनेंतर्गत 2 लाख अनुदानाचा लाभ घेण्यासाठी विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात आले आहेत. त्यानुसार संस्थांनी परिपूर्ण प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी केले आहे. योजनेच्या अटी व शर्ती: शासन मान्यता प्राप्त खाजगी शाळा/कनिष्ठ महाविद्यालय/नगरपालिका/नगरपरिषद शाळा/ औद्योगिक प्रशिक्षण संस्थामध्ये अल्पसंख्यांक समाजाचे (मुस्लिम, बौध्द, ख्रिश्चन, जैन, शिख, पारशी व ज्यू मिळून) किमान 70 टक्के विदयार्थी शिकत असणे आवश्यक आहे. अपंगाच्या शाळांमध्ये किमान 50 टक्के अल्पसंख्यांक विद्यार्थी शिकत असणे आवश्यक आहे. प्रत्येक शैक्षणिक संस्थेने DIES Code, औद्योगिक प्रशिक्षण संस्थांनी Institute Code तसेच अपंग शाळांनी Licence

शेतकरी आत्महत्याबाबतचा अहवाल सादर करण्याचे विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय यांचे जिल्हा प्रशासनाला आदेश

इमेज
  शेतकरी आत्महत्याबाबतचा अहवाल सादर करण्याचे विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय यांचे जिल्हा प्रशासनाला आदेश   अमरावती, दि. 23 :  अमरावती विभागातील यवतमाळ जिल्ह्यात 17 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे वृत्त विविध वृत्तपत्रांमध्ये प्रकाशित झाले आहे. त्यानुषंगाने आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना मदत व दिलासा देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने त्याबाबतचा विस्तृत अहवाल तीन आठवड्याच्या आत सादर करण्याचे निर्देश कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनच्या अध्यक्षा तथा विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय यांनी दिले. 22 ऑगस्ट 2023 ला ‘द टाईम्स ऑफ इंडिया’ या वर्तमानपत्रासह विविध वृत्तपत्रातून ‘यवतमाळ जिल्ह्यात 17 दिवसांत 17 शेतकऱ्यांची आत्महत्या’ या शिर्षकाच्या बातम्या प्रकाशित झाल्या आहेत. याची गंभीर दखल घेत विभागीय आयुक्तांनी यवतमाळ जिल्हाधिकारी पंकज आशिया व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मैनाक घोष यांची तातडीची बैठक घेऊन केलेल्या उपाययोजनांचा आढावा घेतला. यावेळी विभागीय आयुक्तांनी जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलेल्या विविध उपाययोजनांचा आढावा घेतला. जिल्हा प्रशासनाने आत्महत्याग्रस्त कुटुंबियांच्या घरी

मोझरी आयटीआय मध्ये शिल्पनिदेशक पदभरतीसाठी अर्ज आमंत्रित.

  मोझरी आयटीआय मध्ये शिल्पनिदेशक पदभरतीसाठी अर्ज आमंत्रित ऑनलानईन अर्ज करण्यासाठी  www.govtitimozari.org   संकेतस्थळ उपलब्ध अमरावती, दि. 22 : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मोझरी या संस्थेत ‘शिल्पनिदेशक’ पदे अत्यंत तात्पुरत्या स्वरुपात घड्याळी तत्वावर भरावयाची आहे. या पदभरतीबाबत सविस्तर तपशिल संस्थेच्या  www.govtitimozari.org  या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.      इच्छुक उमेदवारांनी नमूद संकेतस्थळावर भेट देऊन आवेदन अर्ज सादर करावे, असे संस्थेचे प्राचार्य अे. डी. वाळके यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे. ००००

“महाज्योतीच्या एमएच सेट परीक्षा प्रशिक्षण योजनेचे यश!” 92 विद्यार्थ्यांना घवघवीत यश

  “ महाज्योतीच्या एमएच सेट परीक्षा प्रशिक्षण योजनेचे यश! ” 92 विद्यार्थ्यांना घवघवीत यश अमरावती, दि. 17 : महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था महाज्योती ,  नागपूर व सीआरजी अकादमी फॉर सस्केस पुणे या संस्थेमार्फत   इतर मागास वर्ग ,  विमुक्त जाती-भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यासाठी युजीसी नेट/सीएसआयआर नेट/ एमएच सेट परीक्षापूर्व प्रशिक्षण योजना राबविण्यात येते. लक्षीत   प्रवर्गातील विद्यार्थ्यांना प्राध्यापक ,  सहायक प्राध्यापक पदाची संधी मिळावी या उद्देशाने   युजीसी नेट/सीएसआयआर नेट/ एमएच सेट परीक्षापूर्व प्रशिक्षण   योजना सुरु करण्यात आली. याकरीता दि. 1 5 सप्टेंबर 2022 रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती .   प्रशिक्षणास इच्छुक नॉनक्रिमीलेअर उत्पन्न गटातील उमेदवारांकडून महाज्योतीच्या संकेतस्थळावर अर्ज मागविण्यात आले होते. प्रशिक्षणासाठी एकूण 1556 विद्यार्थ्यांनी अर्ज केले. निवड प्रक्रियेत पात्र ठरलेल्या 1207 विद्यार्थ्यांना प्रशिक्षणाचा लाभ घेता आला. 1127 विद्यार्थ्यांना ऑफलाईन तर 80 विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात आले. यातील 92 विद्यार