पोस्ट्स

जानेवारी, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
इमेज
विभागीय आयुक्त कार्यालयात मौन पाळून हुतात्म्यांना आदरांजली अमरावती, दि. ३० : देशाच्या स्वातंत्र्यासाठी हुतात्मे झालेल्यांच्या स्मरणार्थ आदर व्यक्त करण्यासाठी आज दरवर्षी संपूर्ण देशभर दोन मिनिटे मौन पाळून त्यांना आदरांजली वाहण्यात येते. त्यानुसार आज सकाळी ११ वाजता विभागीय आयुक्त कार्यालयात मौन पाळून हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यात आली. यावेळी विभागीय आयुक्त पीयूष सिंह, सहायक आयुक्त विवेकानंद काळकर, तहसिलदार वैशाली पाथरे, नाझर श्री. पेठे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. *****

राज्यमंत्र्यांकडून नांदगाव खंडेश्वर नगरपंचायतीचा आढावा- राज्यमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू यांनी दिले.

इमेज
  राज्यमंत्र्यांकडून नांदगाव खंडेश्वर नगरपंचायतीचा आढावा नगरपंचायतीमधील विकासकामांसाठी पुढाकार घ्यावा -          राज्यमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू यांनी दिले. अमरावती, दि. 28 : नव्याने निर्माण झालेल्या नगरपंचायतींचा विकास करणे आवश्यक आहे. यासाठी नगरपंचायतीचे पदाधिकारी आणि अधिकारी यांनी प्रयत्न करावा. नगरपंचायतीमधील विकासकामांसाठी पुढाकार घेऊन कामे करण्यात यावी, असे निर्देश राज्यमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू यांनी दिले. आज येथील विश्रामगृहात राज्यमंत्री श्री. कडू यांनी नांदगाव खंडेश्वर नगरपंचायतीचा आढावा घेतला. नगरपंचायतीच्या क्षेत्रात असणाऱ्या 258 पारधी कुटुंबाच्या घरापैकी 70 घरांचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. तसेच इतर घरांसाठी प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरे मिळविण्यासाठी प्रयत्न करावा. तसेच वस्तीसुधार योजनेतून निधी मिळविण्यासाठी प्रयत्न करावा. पाणी पुरवठ्यासाठी जीवन प्रधिकरणाकडे पाठपुरावा करावा. तसेच चौदाव्या वित्त योजनेतून पाणीपुरवठा योजना पूर्ण होण्यासाठी प्रयत्न करावा. वस्तीसुधार योजनेतून रस्ते, नाल्यांचा प्रस्ताव तयार करण्यात यावा. घरकुल पूर्ण करण्यासाठी रेतीचा प्रश

जिल्‍ह्यात कलम 37 (1) व (3) लागू

  जिल्‍ह्यात कलम 37 (1)   व (3) लागू   अमरावती , दि . 29   : जिल्‍ह्यात शांतता व सुव्‍यवस्‍था अबाधित राहावी यासाठी अपर जिल्‍हा दंडाधिकारी यांना प्रदान करण्यात आलेल्या अधिकारानुसार   मुंबई पोलिस कायदा 1951 चे कलम 37 (1) (3) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी केला आहे. जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी याकरिता पोलीस आयुक्तयालय परिक्षेत्र वगळून जिल्ह्यात दि. 29 जानेवारी   2021 ते 13 फेब्रुवारी 2021 पर्यत हा प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आला आहे. या कलमांचा भंग करणा-या व्‍यक्‍तीविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्‍यात येईल, असे अपर   जिल्हा दंडाधिकारी   यांनी कळविले आहे.                                          000000  

पुनर्वसनाची कामे नागरिकांच्या सोयीने व्हावीत - राज्यमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू

इमेज
  पुनर्वसनाची कामे नागरिकांच्या सोयीने व्हावीत -          राज्यमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू अमरावती, दि. 28 : जिल्ह्यातील चंद्रभागा, वर्धा, निम्न पेढी आदी महत्वाचे सिंचन प्रकल्पामुळे मोठ्या प्रमाणावर पुनर्वसन करावे लागले आहे. विविध प्रकल्पांमुळे बाधित गावांचे पुनर्वसन करताना पायाभूत सुविधांची कामे नागरिकांच्या सोयीने करावीत, प्रामुख्याने रस्ते, वीज, पाणी या सुविधा प्राधान्याने देण्यात याव्यात, असे निर्देश राज्यमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू यांनी दिले. जिल्ह्यातील विविध प्रकल्पांमुळे बाधित झालेल्या नागरिकांच्या तक्रारी आज येथील सिंचन भवनात श्री. कडू यांनी जाणून घेतल्या. यावेळी त्यांनी प्रकल्पनिहाय तक्रारी ऐकून घेतल्या. तसेच नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी निर्देश दिले. श्री. कडू म्हणाले, जिल्ह्यातील पुनर्वसन झालेल्या गावांना येत्या काळात भेटी देण्यात येणार आहे. त्यामुळे अधिकारी यांनी वस्तुस्थिती मांडावी. वस्तुस्थिती आणि अधिकारी यांच्या अहवालात विसंगती आढळू नये. धरणाच्या बुडीत क्षेत्रामुळे दुसऱ्या बाजुला असलेल्या शेतीमध्ये जाणे शेतकऱ्यांना शक्य नाही. तसेच नदीतील रस्तेही नाही

वनक्षेत्रातील गावांसाठी एकत्रित प्रस्ताव सादर करावा - राज्यमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू

इमेज
  वनक्षेत्रातील गावांसाठी एकत्रित प्रस्ताव सादर करावा -          राज्यमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू अमरावती, दि. 28 : मेळघाटातील 24 गावांमध्ये वीज पोहोचविण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. वीज पोहोचवितानाच याठिकाणी रस्ते, पाणी आदी पायाभूत सुविधा निर्माण होण्यासाठी या गावाचा एकत्रित प्रस्ताव सादर करावा, असे निर्देश राज्यमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू यांनी दिले. आज येथील विभागीय आयुक्त कार्यालयात मेळघाटातील 26 गावांच्या मुलभूत समस्यांविषयी बैठक घेण्यात आली. यावेळी आमदार राजकुमार पटेल, विभागीय आयुक्त पीयूष सिंह, जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. श्री. कडू म्हणाले, मेळघाटातील वन्य क्षेत्रातील 26 गावापैकी दोन गावांचा विजेचा प्रश्न सुटला आहे. उर्वरीत 20 गावांचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. यापैकी चार गावांत वीज पोहोचणे शक्य होईल. इतर गावांत वीज पोहोचविण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे. यासाठी या गावांमध्ये सोलार प्रकल्प देण्यासाठी विचार होणे गरजेचे आहे. गावात वीज आल्यास ही गावे आर्थिकदृष्ट्या सशक्त होण्यास मदत मिळेल. वीज पोहोचविण्यासाठी 32 कोटींचा प्रकल्प तयार आ
इमेज
विभागीय आयुक्त कार्यालयात ध्वजवंदन अमरावती, दि. 26 : विभागीय आयुक्त कार्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त विभागीय आयुक्त पियूष सिंह यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी उपायुक्त गजेंद्र बावणे, विजय भाकरे, प्रमोद देशमुख, अजय लहाने, सहायक आयुक्त विवेकांनद काळकर, श्यामकांत मस्के, तहसिलदार वैशाली पाथरे, नायब तहसिलदार निकिता जावरकर, मधुकर धुळे तसेच अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. ध्वजवंदनानंतर पोलिस पथकाने मानवंदना दिली. 00000  

राष्ट्रीय मतदार दिन निर्भयपणे मतदान करुन लोकशाही बलशाली करु - जिल्हाधिकारी शैलेश नवाल

इमेज
  राष्ट्रीय मतदार दिन निर्भयपणे मतदान करुन लोकशाही बलशाली करु -           जिल्हाधिकारी शैलेश नवाल अमरावती, दि. 25 : मजबूत लोकशाही असलेले राष्ट्र म्हणून भारताची संपूर्ण जगात ओळख आहे. लोकशाहीवर निष्ठा व्यक्त करणारी कृती म्हणजे मतदारांनी मतदानाचा हक्क बजावणे होय. निर्भयपणे मतदान प्रक्रियेत सहभागी होऊन आपण लोकशाही अधिक बलशाली बनवू. त्यामुळे कुणाच्याही दबावाखाली न येता, आमिषाला बळी न पडता मतदान प्रक्रियेत सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी नवमतदार युवक-युवतींना केले.   आज 25 जानेवारी राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली उपस्थित सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांना लोकशाहीवर निष्ठा ठेवण्याची शपथ देण्यात आली.   यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. नितिन व्यवहारे, उपजिल्हाधिकारी निवडणूक श्रीमती वर्षा पवार, उपविभागीय अधिकारी उदयसिंह राजपूत, तहसिलदार संतोष काकडे, नायब तहसिलदार सुनिल रासेकर, संदीप टांक, प्रविण देशमुख, दिनेश बढीये यांच्यासह बडनेरा मतदार संघाचे मतदान केंद्र अधिकारी उपस्थित होते.   नवीन मतदारांना ओळखपत्राच

विभागीय आयुक्त कार्यालयात राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त शपथ

इमेज
  विभागीय आयुक्त कार्यालयात राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त शपथ अमरावती, दि. 25 : विभागीय आयुक्त कार्यालयात राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त लोकशाहीवर निष्ठा ठेवण्याची शपथ घेण्यात आली. विभागीय आयुक्त पियूष सिंह यांनी उपस्थित अधिकारी-कर्मचारी यांना शपथ दिली. या कार्यक्रमास महसूल उपायुक्त गजेंद्र बावणे, पुनर्वसन उपायुक्त प्रमोद देशमुख, करमणूक शुल्क उपायुक्त विजय भाकरे आदी अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. 00000