सत्यशोधक समाजाने दिला बहुजनांना विवेकी जगण्याचा मार्ग
सत्यशोधक समाजाने दिला बहुजनांना विवेकी जगण्याचा मार्ग Ø महाज्योती कार्यालयात सत्यशोधक समाजाचा शतकोत्तरी सुवर्ण महोत्सव उत्साहात साजरा Ø अधिकारी व कर्मचारी यांना सार्वजनिक सत्य धर्मपुस्तकाचे वाटप अमरावती दि. 25 : महात्मा जोतीराव फुले व सावित्रीबाई फुले यांनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाने बहुजन समाजाला विवेकी पद्धतीने जीवन जगण्याचा मार्ग दिला. मनुष्याला विषमता , अंधश्रद्धा , अनिष्ट रूढी यापासून परावृत्त करून उच्च मुल्यांवर आधारित पर्यायी संस्कृती तयार करून दिली. जन्म , मृत्यू , विवाह अश्या सर्व संस्कारांचे विवेकीकरण करणे , निर्मिकाला सर्व लोक समान असल्याचा संदेश देणे हे सत्यशोधक समाजाच्या कार्याचे महत्वाचे योगदान आहे. त्यामुळे बहुजन समाजाला शिक्षणाची प्रेरणा मिळत गेली , त्यामुळे आजही सत्यशोधक समाजाची तत्वे कालसुसंगत आहेत असे प्रतिपादन महाज्योतीचे प्रकल्प व्यवस्थापक कुणाल शिरसाठे यांनी केले. महाज्योती कार्यालयात सत्यशोधक समाजाला 150 वर्षे पूर्ण झाल्यामुळे “ आजच्या काळात सत्यशोधक समाजाचे महत्व ” या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आलेले होते , याव