मंगळवार, १८ ऑगस्ट, २०२६

 

798 patients provided assistance so far

Through the Chief Minister’s Medical Assistance Fund, financial assistance was provided for kidney, liver, heart and lung transplants, helping patients access timely, life-saving treatment.
Financial Support. Timely Treatment. A New Lease of Life.
📞 Need medical assistance? Call 1800 123 2211
📲 Scan the QR code for more information.

 

#जलसंधारणदिन

#वॉकेथॉन२०२६

#MahaDGIPR See less See less
See less



 महा वॉकेथॉन २०२६’ मध्ये अभिनेते संजय दत्त यांचा सहभाग


मुंबई, दि. १८ : माती आणि जलसंधारणाचा संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या मृद व जलसंधारण विभागाच्या वतीने २१ ऑगस्ट २०२६ रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये
‘महा वॉकेथॉन २०२६-वॉक फॉर वॉटर’ हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. या राज्यव्यापी उपक्रमात सहभागी होण्यासाठी अभिनेते संजय दत्त यांना मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी निमंत्रित केले असून, त्यांनी हे निमंत्रण स्वीकारले आहे.

जलसंधारणाचा संदेश अधिक व्यापक स्तरावर पोहोचावा आणि हा उपक्रम लोकचळवळीचे स्वरूप धारण करावा, या उद्देशाने लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी कर्मचारी, विद्यार्थी, कलाकार, खेळाडू, स्वयंसेवी संस्था, विविध सामाजिक संघटना तसेच सर्वसामान्य नागरिकांना ‘महा वॉकेथॉन’मध्ये सहभागी करून घेण्यात येत आहे.

राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात कमाल ३ किलोमीटर अंतराची महा वॉकेथॉन आयोजित केली आहे. या वॉकेथॉननंतर सहभागींकडून मृद व जलसंधारणाची शपथ घेतली जाणार आहे. सहभागी नागरिकांना
ई-प्रमाणपत्र देण्यात येणार असून, उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सहभागींचा जिल्हास्तरावर गौरव करण्यात येणार आहे.

या उपक्रमाला प्रोत्साहन देण्यासाठी जिल्हास्तरावर प्रथम १० विजेत्यांचा गौरवचिन्ह देऊन सन्मान करण्यात येणार आहे. याशिवाय प्रायोजकांच्या माध्यमातून एकूण ७१ हजार रुपयांची रोख पारितोषिके देण्याचे प्रस्तावित आहे. त्यामध्ये प्रथम क्रमांकासाठी २५ हजार रुपये, द्वितीय क्रमांकासाठी १५ हजार रुपये आणि तृतीय क्रमांकासाठी १० हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे. तसेच सोडतीद्वारे सात सहभागींची निवड करून प्रत्येकी ३ हजार रुपयांचे विशेष पारितोषिक देण्यात येणार आहे.

‘Save Soil, Save Water, Secure Tomorrow’ तसेच ‘पाणी अडवा, पाणी जिरवा, जलयुक्त महाराष्ट्र घडवा’ हा संदेश घेऊन होणाऱ्या या उपक्रमातून जलसंधारणाबाबत जनजागृती करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. १५ ते २१ ऑगस्टदरम्यान जलसंधारण सप्ताह, तसेच १५ ऑगस्ट २०२६ ते
२६ जानेवारी २०२७ या कालावधीत जलसंधारण अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाचा एक महत्त्वाचा भाग म्हणून २१ ऑगस्ट रोजी होणारा ‘महा वॉकेथॉन’ जलसंधारणाला लोकचळवळीचे स्वरूप देण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

#जलसंधारणदिन
#वॉकेथॉन२०२६
#वॉकफॉरवॉटर
#रिलस्पर्धा
#महाराष्ट्रशासन
#MahaWalkathon
#WalkForWater
#SaveSoilSaveWater
#MahaDGIPR See less


 मुख्यमंत्री सचिवालय (जनसंपर्क कक्ष)

मंगळवार, दि. १८ ऑगस्ट, २०२६.

मंत्रिमंडळ निर्णय (संक्षिप्त)

श्री क्षेत्र पंढरपूर येथील विशेष पुनर्वसन धोरणास मंजुरी. श्री. विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसर व वाणिज्य संकुल आराखड्यातील ३ हजार ९९३ कोटी ९० लाख रुपयांच्या विकास कामांना गती लाभणार. पंढरपुरचे धार्मिक, पारंपरिक महत्व, वारकरी भाविकांची संख्या, स्थानिक परिस्थिती व प्रकल्पाची तातडीची गरज विचारात घेऊन विशेष पुनर्वसन धोरण. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सुचनेनुसार प्रकल्प बांधितासाठी विशेष पॅकेज देण्याच्या सुचनेला अनुसरून, जिल्हा प्रशासनाकडून धोरण सादर. (नगर विकास विभाग)

सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये ट्रेडस प्लॅटफॉर्म प्रणालीचा वापर होणार. सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योजक, कंत्राटदारांची प्रलंबित देयके वेळेत दिली जाण्यासाठी सुलभता येणार. (सार्वजनिक बांधकाम विभाग)

गडचिरोली येथील जिल्हा क्रीडा संकुलातील टप्पा – २ मधील विविध क्रीडा सुविधांच्या कामांना मंजुरी. क्रीडा संकुलाच्या सुमारे ८० कोटी १२ लाख रुपयांच्या अंदाजपत्रकातील कामांसाठी अनुदान मिळण्याचा मार्ग सुलभ. (क्रीडा विभाग)

सोलापूर शहरातील श्री. जांबुमनी मोची समाज सेवा मंडळास जागा देण्यास मंजुरी. शहर सोलापूर उत्तर सदर बझार येथील शैक्षणिक कारणासाठी आरक्षित असलेली ३ हजार ९१० चौ.मी. जागा सेवा मंडळाच्या शैक्षणिक उपक्रमाला देण्यात येणार. (महसूल विभाग)

पुणे जिल्ह्यातील मौजे मोशी ( ता. हवेली) येथील १५ हे. ०० आर. शासकीय जमीन क्रांतीवीर चापेकर समिती, क्रांतितीर्थ चापेकर बंधू राष्ट्रीय संग्रहालय चिंचवड गाव, पुनरुत्थान समरसता गुरकुलम अनुदानित आदिवासी आश्रम शाळा (चिंचवड) यांना देण्यात येणार. या याठिकाणी मागास वंचित आदिवासी समाजासाठी सर्वांगीण विकासाचे केंद्र स्थापन करण्यात येणार. (महसूल, नोंदणी व मुद्रांक शुल्क विभाग)

पुण्यातील युसीआय रोड वर्ल्ड चॅम्पियनशिप – २०३२ च्या आयोजनाला पाठबळ. पुणे ग्रँड टूर – २००६ स्पर्धेनंतर आता युसीआय रोड वर्ल्ड चॅम्पियनशिप – २०३२ चे यजमानपद पुण्याकडे येणार. पुणे जिल्हा प्रशासन, सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पुणे ग्रँड टूर – २०२६ च्या यशस्वी आयोजनामुळे मिळणार संधी. युसीआय वर्ल्ड चॅम्पिनयशिप, २०३२ च्या निमित्ताने आशियातील पहिले यजमान पद भारताकडे. स्पर्धेच्या माध्यमातून सुमारे ३३० कोटी रुपयांची आर्थिक उलाढाल अपेक्षित. याकरिता स्पर्धा संयोजनासाठी शासनाकडून समर्थनपत्र, आर्थिक हमी, पायाभूत सुविधा व कार्यान्वयन विषयक विविध बाबींना धोरणात्मक मान्यता. (क्रीडा विभाग)

जायकवाडी प्रकल्प टप्पा – २ च्या ६ हजार ४७७ कोटी ८८ लाख रुपयांच्या आर्थिक तरतुदीस मंजुरी. टप्पा दोन मुळे गोदावरी खोऱ्यातील सिंदफणा नदीवरील माजलगाव धरणाच्या कामास गती मिळणार. यातून छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, बीड, परभणी व नांदेड या पाच जिल्ह्यातील सुमारे १ लाख ३१ हजार ६५२ हेक्टरला सिंचनाचा लाभ मिळणार. तसेच औद्योगिक पाणी पुरवठा, मत्स्य व्यवसाय, व विद्युत निर्मितीस चालना मिळणार. (जलसंपदा विभाग)

महाराष्ट्र गौण खनिज उत्खनन (विकास व विनियमन) नियम २०१३ मध्ये सुधारणा करण्यास मान्यता. महाखनिज २.० या पोर्टलवर गौण खनिजाचे खाणक्षेत्रे, साठवणूक क्षेत्रे, वाहतूकीची अद्ययावत माहिती पारदर्शकपणे उपलब्ध होणार. गौण खनिजाचे अवैध उत्खनन व वाहतूक रोखणे प्रभावी होणार. परराज्यातून येणाऱ्या गौण खनिजाचे वाहतूकीचे नियमन होणार, वाहतूक पास घेणे बंधनकारक. (महसूल व वन विभाग)

वित्त व नियोजन विभागांची पूनर्रचना. दोन्ही विभागांची कार्यक्षमता वाढविण्याच्या दृष्टीने नियोजन विभागाकडील अर्थसंकल्पीय विषय व पदे वित्त विभागाकडे हस्तांतरित होणार. (नियोजन विभाग)

किमान आधारभूत किंमत योजनेत २०२४-२५ हंगामातील खरेदी करण्यात आलेल्या धान व भरडधान्य वाहतूक खर्चाकरिता ३२८ कोटी ४७ लाख रुपयांच्या तरतूदीस मंजुरी ( अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग)



 ‘महाराष्ट्र युवा जलदूत’ देणार जलसंधारणाचा संदेश

जन्मापासून प्रत्येकाची जडण-घडण ही माती व पाण्याच्या सानिध्याने होत असते. ती जशी माणसांची तशी पशु, पक्षी, प्राणी आणि वृक्षांची तसेच माती व पाण्यावर अवलंबून सर्वच जिवजंतूंची आहे. वर्षानुवर्ष ही पद्धत अशीच टिकून आहे. मात्र, बदलते हवामान व परिस्थितीमुळे ही नैसर्गीक देणगी धोक्यात येण्याची स्थिती निर्माण होत आहे. म्हणूनच शेती व पर्यावरणासह शाश्वत विकासासाठी जल संरक्षणाची नितांत गरज आहे आणि आवश्यकता आहे हा संदेश पुढच्या पिढीकरिता आजच्या युवा पिढीकडून आजच्या भाषेत पोहचण्याची. त्यासाठीच राज्य शासनाच्या मृद व जलसंधारण विभागाने तरुणांचा आवाज जास्तीत जास्त लोकांपर्यंत प्रभावीपणे पोहचविण्यासाठी इंस्टाग्राम रिल्स स्पर्धेच्या माध्यमातून कल्पकतेचा मार्ग प्रशस्थ करण्याचा निर्णय घेतला. जलसंधारणाच्या जागरूकतेत योगदान देत तरुणांना ‘महाराष्ट्र युवा जलदूत’ बनन्यासाठी रिल्सचे मोठे दालनच खुले झाले आहे.
राज्यातील विद्यापीठे , महाविद्यालये व शाळांमध्ये शिक्षण घेणारे विद्यार्थी, एनएसएस स्वयं सेवक,एनसीसी कॅडेट्स,नेहरु युवा केंद्र ,क्रीडा व युवक संस्था,स्वयंसेवी संस्था, पर्यावरण संस्थांमध्ये कार्यरत युवक-युवती,इंस्टाग्राम क्रिएटर्स,युटयूबर्स,सोशल मिडीया इन्फ्ल्युएंन्सर्सना या स्पर्धेत सहभागी होत “एक रिल…. मातीसाठी ! एक रिल …. पाण्यासाठी!,एक रिल…सुरक्षित भविष्यासाठी !” हा संदेश सर्वदूर पोहचवून मोलाचे योगदान देता येणार आहे.
मृद संधारण व जलसंधारण हा शाश्वत विकासाचा पाया आहेत. राज्यातील अनेक भागात खालावलेली भूजल पातळी लक्षात घेता पाणलोट विकास आणि भूजल पुर्नभरणावर भर देण्यासाठी राज्यात तत्कालीन मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांनी ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ हा मूलमंत्र देवून राज्यात जलसंधारणाची मोठी चळवळ उभारली. त्यांच्या या योगदानाचे कायम स्मरण रहावे म्हणूनच राज्यशासनाने ३ जुलै २०२६ रोजी शासन निर्णय निर्गमीत करून माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांचा जन्मदिन २१ ऑगस्ट हा जलसंधारण दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला. या औचित्याने जलसंधारणाविषयी व्यापक जागरुकता निर्माण करण्यासाठी शासनाने युवापिढीवर विश्वास टाकत एक जबाबदारीही दिली आहे. अर्थात त्यासाठीच या पिढीच्या कल्पकतेला साद घालत जलसंधारणाचा संदेश सर्वदूर पोचविण्यासाठी इंस्टाग्राम रिल्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
जलसंधारण दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्यभर १५ ते २१ ऑगस्ट दरम्यान ‘जलसंधारण सप्ताह’ तर १५ ऑगस्ट २०२६ ते२६ जानेवारी २०२७ या कालावधीत ‘जलसंधारण अभियान’ आयोजित करण्यात येत आहे. जलसंधारण सप्ताहाच्या निमित्ताने राज्यातील सर्वच ३६ जिल्ह्यांमध्ये विविध जनजागरुकता कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. या सप्ताहामध्ये आयोजित ‘मृद व जलसंवर्धन रिल्स स्पर्धा’ ही युवा पिढीच्या कल्पकतेसाठी मोठा मंच असणार आहे. राज्यातील १५ ते ३० वयोगटातील युवक-युवतींच्या कल्पकतेचा उपयोग करून इंस्टाग्राम या समाजमाध्यमाद्वारे राज्याच्या कानाकोपऱ्यात मृद व जलसंधारणाबाबत व्यापक जनजागृती निर्माण करण्यासाठी राज्यव्यापी ‘Reel for Soil and Water Conservation’ स्पर्धा घेण्यात येत आहे.
या स्पर्धेची संकल्पना ‘Save Soil, Save Water, Secure Tomorrow’ ठेवण्यात आली आहे. या सर्व स्पर्धेतील कल्पक संदेश एकाच ठिकाणी उपलब्ध होण्यासाठी #SaveSoilSaveWater हा हॅशटॅग वापरला जात आहे. राज्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये १५ ते ३० वयोगटातील युवक-युवतींसाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. प्रत्येक स्पर्धकाला ३० ते ६० सेकंद मर्यादेत इंस्टाग्राम रिल तयार करायची आहे. ही रिल तयार करताना सुरुवातीलाच रीलचा उद्देश, स्पर्धकाचे व जिल्ह्याचे नाव नमूद करावे लागणार आहे. तयार केलेली पब्लीक इंन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट करायची आहे. पोस्ट करताना मृद व जलसंधारण विभागाच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटला टॅग करणे आणि #SaveSoilSaveWater हा हॅशटॅग वापरणे अनिवार्य आहे. यासोबतच स्पर्धेसाठी तयार करण्यात आलेला क्युआर कोड स्कॅनकरून तिथे शासनाकडे सहभागाची नोंद करण्यासाठी रिलची लिंक जिल्ह्यानुसार पेस्ट करायची आहे.
प्रत्येक स्पर्धकाला १५ ते १९ ऑगस्ट दरम्यान जास्तीत-जास्त तीन रिल अपलोड करता येणार आहेत. मातीची धूप,पाणी बचत, पावसाच्या पाण्याचे संकलन, शेततळी, बंधारे, वृक्षारोपण, माती व पाणी वाचविण्याच्या नाविन्यपूर्ण कल्पना,गावातील यशस्वी मृद व जलसंधारण कामे, भूजल पुनर्भरण आणि पर्यावरण संवर्धन या विषयांवर रिलद्वारे संदेश देता येणार आहे. अभिनय, संगीत, विनोद, लघुपट, ॲनिमेशन, कृत्रिम बुद्धिमत्ता, ड्रोन दृश्ये किंवा अन्य नाविन्यपूर्ण माध्यमांचा वापर करून युवक -युवतींना आपली कल्पकता सादर करता येणार आहे. केवळ लाईक्स किंवा फॉलोअर्सवर विजेता निश्चित न करता विषय व संदेशासाठी ३० गुण, कल्पकतेसाठी २५ गुण,प्रभावी सामाजिक संदेशाकरिता २० गुण, सादरीकरण व तांत्रिक गुणवत्तेसाठी १५ तर इंस्टाग्राम एंगेजमेंटकरिता १० असे एकूण १०० गुण देण्यात येणार आहे.उत्तम गुणांकानुसार प्रत्येक जिल्हाधिकारी हे संबंधित जिल्ह्यातील सर्वोत्तम तीन रिल निवडतील व महाराष्ट्र युवा जलदूत नावाने त्यांना २५ हजारांचे प्रथम पारितोषिक ,१५ हजारांचे द्वितीय तर १० हजारांचे तृतिय पारितोषिक सन्मान चिन्ह व प्रशस्ती पत्रासहित प्रदान करणार आहेत. उत्कृष्ट सहभागींना ई-प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार आहे.
माती आणि पाणी ही नैसर्गीक संसाधने एकमेकांवर अवलंबून आहेत व भविष्यातील पिढीसाठी त्यांचे रक्षण करणे अत्यंत आवश्यक आहे. या संसाधन रक्षणाच्या जनजागृतीसाठी राज्यातील युवा पिढी विक्रमी डिजिटल लोकचळवळ उभारुन ही जबाबदारी स्वीकारतील आणि प्रत्येक युवकांची कल्पक रिल ही या चळवळीची ताकद ठरेल.
रितेश मो.भुयार,
माहिती अधिकारी,
जिल्हा माहिती कार्यालय, अमरावती.



आपला महाराष्ट्र समृद्ध आणि हिरवागार असावा, हे आपल्या सर्वांचे स्वप्न आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त २१ ऑगस्ट रोजी संपूर्ण राज्यात ‘जलसंधारण दिन’ साजरा करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील नागरिकांना जलसंधारणाच्या या जनजागृती अभियानात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

२१ ऑगस्ट रोजी सकाळी राज्यातील सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये ‘महा वॉकेथॉन- वॉक फॉर वॉटर’चे आयोजन करण्यात आले आहे. या वॉकेथॉनमध्ये तरुणांसह सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन जलसंधारणाचा संदेश जनतेपर्यंत पोहोचवावा. जलसंधारणाचा संदेश प्रभावीपणे युवा पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी रील्स स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत युवा पिढीने उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
या ऐतिहासिक जलसंधारण मोहिमेत सहभागी होण्यासाठी राज्य शासनाच्या जाहिराती तसेच समाजमाध्यमांवर उपलब्ध असलेला अधिकृत क्यूआर कोड स्कॅन करून नागरिकांनी आपला सहभाग नोंदवावा. “चला, एकत्र येऊया, जलदूत बनून पाण्यासाठी चालूया. ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ या मूलमंत्राला जगवूया,” असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले आहे.

सोमवार, १७ ऑगस्ट, २०२६

 




महाराष्ट्रातील पायाभूत सुविधा, औद्योगिक विकास आणि दळणवळण क्षेत्रातील महत्त्वपूर्ण प्रकल्पांना गती देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, केंद्रीय पर्यावरण, वन व हवामानबदल मंत्री भूपेंद्र यादव यांची नवी दिल्ली येथे भेट घेऊन महत्वपूर्ण चर्चा केली.

महाराष्ट्रातील विविध विकासकामे, प्रलंबित प्रकल्प आणि केंद्र सरकारकडून अपेक्षित सहकार्याबाबत सविस्तर चर्चा यावेळी करण्यात आली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी प्रधानमंत्री यांना राज्यातील प्रशासनाची सद्यस्थिती तसेच केंद्राच्या सहकार्याने राबविण्यात येत असलेल्या विविध प्रकल्पांची माहिती दिली.
राज्यातील विविध प्रकल्प वेगवेगळ्या टप्प्यांवर असून, त्यांना अधिक गती देण्यासाठी केंद्र सरकारकडून अपेक्षित असलेल्या सहकार्याबाबतचे पत्रही मुख्यमंत्र्यांनी प्रधानमंत्र्यांना दिले. महामार्ग, रेल्वे, मेट्रो, नदीजोड प्रकल्प तसेच उत्तन-विरार कॉरिडॉर यांसारख्या महत्त्वपूर्ण प्रकल्पांबाबत यावेळी चर्चा झाली.
पुणे मेट्रो-३ प्रकल्पाचे काम जवळपास पूर्ण झाले असून सध्या त्याची चाचणी सुरू आहे. टाटा समूहाच्या सहकार्याने उभारण्यात आलेली ही देशातील नवीन धोरणांतर्गत पहिली सार्वजनिक - खाजगी भागीदारी पद्धतीची मेट्रो आहे. चाचण्या पूर्ण झाल्यानंतर या प्रकल्पाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांना निमंत्रण दिले.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यासोबत झालेल्या बैठकीत मुंबई-वाढवण एक्स्प्रेसवे कनेक्टिव्हिटी अर्थात उत्तन-विरार कॉरिडॉर या महत्त्वाकांक्षी प्रकल्पावर विशेष चर्चा झाली. सुमारे ५५ हजार कोटींच्या या प्रकल्पासाठी जपान इंटरनॅशनल को-ऑपरेशन एजन्सीमार्फत (जायका) वित्तीय सहाय्य मिळविण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र शासनाने सादर केला आहे.
केंद्रीय पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांच्या भेटीत महाराष्ट्रातील विविध महत्त्वपूर्ण प्रकल्पांच्या पर्यावरण व वनविषयक प्रलंबित मंजुरींचा आढावा घेण्यात आला.