बुधवार, १० जून, २०२६

 


सक्षम भारताची उभारणी भक्कम पायाभूत सुविधांवर होते. २०१४ मध्ये ७४ विमानतळांपासून २०२६ मध्ये १६४ विमानतळांपर्यंतचा प्रवास करत, हवाई संपर्क केवळ मोठ्या शहरांपुरता मर्यादित न राहता देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचला आहे. यामुळे देशभरातील विकासाला नवी गती मिळाली आहे.

.
.
A stronger India is built on stronger infrastructure. From 74 airports in 2014 to 164 in 2026, connectivity has expanded far beyond major cities, unlocking growth across the country.
.
.
आधुनिक भारत की बदलती तस्वीर यहाँ की कनेक्टिविटी में साफ दिखती है। साल 2014 में देश में सिर्फ 74 चालू हवाई अड्डे थे, जिनकी संख्या आज बढ़कर 164 हो चुकी है। इसने नए अवसरों को हर क्षेत्र के करीब ला दिया है।


 सरकार स्थापन झाल्यानंतर अवघ्या ४०१ दिवसांत 'डिजिटल इंडिया' अभियानाची सुरुवात करण्यात आली. आज १०२ कोटींहून अधिक इंटरनेट जोडण्या, डिजिटल पेमेंट्स आणि तंत्रज्ञानाधारित प्रशासनामुळे भारताची काम करण्याची, शिकण्याची आणि व्यवहार करण्याची पद्धत आमूलाग्र बदलली आहे.

.
.
401 days after taking office, Digital India was launched. Today, over 102 crore internet connections, digital payments and technology-led governance have transformed how India works, learns and transacts.
.
.
401 दिन! 'डिजिटल इंडिया' को जमीन पर उतारने में बस इतना ही समय लगा। आज इसी डिजिटल क्रांति के दम पर पेमेंट्स से लेकर सरकारी सेवाओं की डिलीवरी तक, यह टेक्नोलॉजी करोड़ों भारतीयों को सशक्त बना रही है।

 


२०१४ मध्ये मोजक्याच स्टार्टअप्सपासून सुरू झालेला प्रवास आज १.४ लाखांहून अधिक नोंदणीकृत स्टार्टअप्सपर्यंत पोहोचला आहे. नव्या पिढीतील नवोन्मेषकांच्या बळावर भारत आज जगातील तिसरी सर्वात मोठी स्टार्टअप परिसंस्था म्हणून उदयास आला आहे.
.
.
From a handful of startups in 2014 to more than 1.4 lakh registered startups today, India has emerged as the world's third-largest startup ecosystem, powered by a new generation of innovators.
.
.
भारत की स्टार्टअप क्रांति देश की युवा पीढ़ी के बढ़ते आत्मविश्वास की कहानी है। 1.4 लाख से ज्यादा रजिस्टर्ड स्टार्टअप्स के साथ भारत आज दुनिया का तीसरा सबसे बड़ा स्टार्टअप इकोसिस्टम है, जहाँ हमारे युवा देश को आगे बढ़ा रहे हैं।

 प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वामुळे भारताच्या स्वच्छ ऊर्जा प्रवासाला अभूतपूर्व गती मिळाली आहे. या काळात देशाने स्वच्छ, शाश्वत आणि हरित ऊर्जेच्या दिशेने उल्लेखनीय प्रगती साधली आहे.

.
.
In 4,399 days, PM Modi's vision accelerated India's clean energy journey.


 दरडोई उत्पन्नात २०१४ मधील ₹८६,६४७ वरून २०२६ मध्ये ₹२,४३,१८० पर्यंतचा प्रवास हा आर्थिक समावेशन, सर्वसमावेशक विकास आणि नागरिकांच्या आर्थिक सक्षमीकरणाचा पुरावा आहे.

.
.
From ₹86,647 in 2014 to ₹2,43,180 in 2026, India's journey reflects a strong commitment to financial inclusion, economic growth, and improved opportunities for every citizen.

 


सन २०१४ मध्ये २१,८०१ किमी असलेले रेल्वे विद्युतीकरण हे सन २०२६ मध्ये ६९,८७३+ किमीपर्यंत पोहोचले आहे. या अभूतपूर्व प्रगतीमुळे देशातील रेल्वे संपर्क अधिक मजबूत झाला असून, कार्बन उत्सर्जनात घट, कार्यक्षमतेत वाढ आणि शाश्वत विकासाला चालना मिळत आहे. वेगवान, हरित आणि आत्मनिर्भर भारताच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.

From 21,801 km of electrified railway tracks in 2014 to 69,873+ km in 2026, India’s rail network has witnessed a remarkable transformation.
This rapid expansion is enhancing connectivity, reducing carbon emissions, improving operational efficiency.

 सलग कार्यकाळात सर्वाधिक काळ निवडून आलेले पंतप्रधान होण्याचा मान मिळाल्याबद्दल केंद्रीय मंत्रिमंडळाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन करणारा ठराव मंजूर केला. यावेळी मंत्रिमंडळातील सदस्यांनी उभे राहून पंतप्रधान मोदी यांना शुभेच्छा दिल्या


#LongestServingElectedPMModi




        प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे भारतातील सर्वाधिक काळ पदभार सांभाळणारे निवडून आलेले प्रधानमंत्री बनले आहेत; हा टप्पा त्यांच्या एका दशकाहून अधिक काळातील नेतृत्व, सेवा आणि राष्ट्रनिर्मितीच्या कार्याचे प्रतिबिंब आहे.

         त्यांच्या नेतृत्वात भारतासह महाराष्ट्र राज्याने विविध क्षेत्रांमध्ये आमूलाग्र बदल अनुभवले आहेत. आर्थिक विकास आणि डिजिटल परिवर्तनापासून ते पायाभूत सुविधांचा विस्तार, सामाजिक सक्षमीकरण आणि जागतिक स्तरावर अधिक बळकट स्थान निर्माण करण्यापर्यंतचा हा प्रवास विकास आणि लोककल्याणावर सातत्याने दिलेला भर, यामुळे साकार झाला आहे.

          Prime Minister Narendra Modi has become India's longest-serving elected Prime Minister, a milestone that reflects over a decade of leadership, service and nation-building.
        Over the past 4,399 days, India and Maharashtra has witnessed transformation across sectors. From economic growth and digital transformation to infrastructure expansion, social empowerment and a stronger global presence, this journey has been shaped by a sustained focus on development and citizen welfare.

#LongestServingElectedPMModi

 

भूमिहीन शेतकरी पत्नीच्या खांद्यावरून उतरले जोखड...!

लातूर जिल्ह्यातील बोंबळीच्या गायकवाड कुटुंबीयांना दिलासा

-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

यांच्याकडून आर्थिक सहाय्यासह, शेतकऱ्याला मिळाला बैल


मुंबई, दि. १०:  वीज पडून बैल दगावल्याने जोखडाला पत्नीला जुंपण्याची वेळ आलेल्या लातूर जिल्ह्यातील भूमिहीन शेतकरी काशिनाथ गायकवाड यांच्या व्य़थेची दखल थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली, अन् या शेतकरी कुटुंबाला अवघ्या काही तासात बैल आणि दगावलेल्या बैलाच्या नुकसान भरपाई पोटीची रक्कम मिळाली. यात मुख्यमंत्री फडणवीस यांचे निर्देश आणि जिल्हा प्रशासनासोबतच, अन्य विभागांनी दाखवलेली संवेदनशीलता चर्चेची ठरली आहे. या संवेदनशीलतेमुळे आता काशिनाथ गायकवाड यांना पत्नीला बैलाच्या जागी जुंपावे लागणार नसल्याने, या कष्टकरी कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला आहे. 

लातूर जिल्ह्यातील देवणी तालुक्यातील बोंबळी खुर्दचे काशिनाथ गायकवाड भूमिहीन शेतकरी असून त्यांच्याकडे असलेल्या बैलजोडीच्या मदतीने गायकवाड व त्यांच्या पत्नी हौसाबाई परिसरातील शेतकऱ्यांची जमीन कसतात. मशागतीची, नांगरणी ते पेरणी, वखरणी अशी मिळेल ती कामे करतात, यावरच त्यांच्या कुटुंबांचा उदरनिर्वाह अवलंबून आहे. यातच त्यांच्याकडील एका बैलाचा शुक्रवारी (५ जून) झालेल्या वादळी पावसात वीज पडून मृत्यू झाला. त्यामुळे मिळालेली कामे पूर्ण करण्यासाठी, गायकवाड यांना पत्नी हौसाबाई यांना जोखडला जुंपावे लागल्याचे वृत्त मुख्यमंत्री फडणवीस यांच्यापर्यंत पोहचले. यावर त्यांनी मुख्यमंत्री सचिवालयाला तातडीने कार्यवाहीचे निर्देश दिले. त्यानुसार प्रधान सचिव डॉ. श्रीकर परदेशी यांच्या संपर्कात राहून, लातूरचे जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांना महसूलसह, सर्व यंत्रणांना गायकवाड यांना तत्काळ मदत करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार तहसील कार्यालयासह, पशूसंवर्धन, कृषी सर्व यंत्रणा गायकवाड यांच्यापर्यंत पोहचल्या. 

पशूसंवर्धन विभागाने एक बैल उपलब्ध करून घेतला आणि तो जिल्हाधिकारी डॉ. बास्टेवाड, तहसिलदार सोमनाथ वाडकर यांच्यासह पशूसंवर्धन विभागाचे अधिकारी आदींच्या उपस्थितीत थेट गायकवाड कुटुंबीयांकडे सुपूर्द केला. यामुळे काशिनाथ गायकवाड यांच्यासह, त्यांच्या कुटुंबीयांच्या चेहऱ्यावर समाधान पसरले. 

मुख्यमंत्री फडणवीस यांनी तातडीने दखल घेत, बैल मिळवून दिल्याने गायकवाड यांच्या पत्नी हौसाबाई आणि मुलगा पुंडलिक यांनी समाधान व्यक्त केले. त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह, जिल्हा प्रशासनाचेही आभार मानले. हौसाबाई म्हणाल्या, आमच्या एका बैलाचा वीज पडून मृत्यू झाल्याने दुर्दैवाने आमच्यावर अशी वेळ आली. पण आमच्या अडचणीची दखल घेऊन, लगेचच मदत मिळाल्याने बरे वाटले. आता पुढे येणाऱ्या खरीप हंगामासाठी मिळालेली कामे पूर्ण करण्याची चिंता दूर झाली. बैल पण चांगला मिळाला आहे. आता त्याची पण चांगली काळजी घेऊ आणि मिळालेली कामे देखील चांगली होतील असे बघू. 

नैसर्गिक आपत्तीमध्ये जनावरांचा मृत्यू झाल्यास राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून तातडीने अर्थसहाय्य उपलब्ध करून दिले जाते. गायकवाड यांच्या दगावलेल्या बैलाचा तातडीने पंचनामा आणि शवविच्छेदनाची प्रक्रिया पूर्ण करून नियमानुसार आर्थिक सहाय्य मंजूर करण्यात आले आहे. ही रक्कम गायकवाड यांच्या थेट बँक खात्यात जमा करण्यात येत आहे.

0000



 मानसिक आरोग्य क्षेत्रात करिअरची सुवर्णसंधी;

'अमृत मानसमित्र' समुपदेशक प्रशिक्षणासाठी अर्ज आमंत्रित

· १५ ते २२ जून दरम्यान ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

· महाराष्ट्र मानसिक आरोग्य संस्था (MIMH), पुणे यांचे तांत्रिक सहकार्य

 

            अमरावती, दि. ६ : आजच्या वेगाने बदलणाऱ्या शैक्षणिक आणि सामाजिक वातावरणामध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक ताणतणाव, भावनिक समस्या, वर्तनात्मक अडचणी, सोशल मीडिया व डिजिटल व्यसन आणि करिअरविषयक संभ्रम यांसारख्या अनेक गंभीर आव्हानांना सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर शाळा आणि महाविद्यालयांमध्ये प्रशिक्षित समुपदेशकांची गरज मोठ्या प्रमाणात वाढत आहे. हीच सामाजिक गरज ओळखून महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) संस्थेने पुढाकार घेतला असून, त्यांच्या वतीने "अमृत मानसमित्र समुपदेशक प्रशिक्षण कार्यक्रम" राबविण्यात येत आहे. या महत्त्वाकांक्षी कार्यक्रमासाठी पहिल्या बॅचकरिता येत्या १५ जून ते २२ जून २०२६ या कालावधीत इच्छुक युवक-युवतींकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत, अशी माहिती अमृतचे व्यवस्थापकीय संचालक विजय जोशी यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे दिली आहे.

          या विशेष उपक्रमासाठी महाराष्ट्र मानसिक आरोग्य संस्था (MIMH), पुणे ही महाराष्ट्र शासनाची मानसिक आरोग्य क्षेत्रातील अग्रगण्य संस्था तांत्रिक भागीदार म्हणून कार्यरत राहणार आहे. 'एमआयएमएच'कडे मानसशास्त्रज्ञ, समुपदेशक आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या प्रशिक्षणाचा दीर्घ अनुभव असून, या अनुभवाच्या आधारे प्रशिक्षणाचा अभ्यासक्रम, पद्धती, पर्यवेक्षण आणि गुणवत्ता नियंत्रणाची जबाबदारी त्यांच्यामार्फत पार पाडली जाईल. या प्रशिक्षणामध्ये विद्यार्थी समुपदेशनाची मूलतत्त्वे, बाल व किशोर मानसिक आरोग्य, संवाद कौशल्ये, तणाव व्यवस्थापन, जीवनकौशल्य शिक्षण, आत्महत्या प्रतिबंध, सायबर सुरक्षा आणि डिजिटल आरोग्य अशा विविध महत्त्वपूर्ण बाबींचा समावेश करण्यात आला आहे. हे प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या युवक-युवतींना स्वयंरोजगार आणि व्यावसायिक विकासाची मोठी संधी उपलब्ध होणार आहे.

          हे संपूर्ण प्रशिक्षण हायब्रीड म्हणजेच ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही स्वरूपात असेल. यामध्ये १५ दिवसांचे प्रत्यक्ष वर्ग प्रशिक्षण महाराष्ट्र मानसिक आरोग्य संस्था, पुणे येथे होणार असून, एक महिन्याची निरीक्षणाधारित क्षेत्रीय नियुक्ती, ऑनलाईन तज्ज्ञ सत्रे, केस चर्चा आणि सहा महिन्यांचे मार्गदर्शन समाविष्ट आहे. पुणे येथील १५ दिवसांच्या ऑफलाईन प्रशिक्षणादरम्यान निवास आणि भोजनाची व्यवस्था विद्यार्थ्यांनी स्वतः करायची आहे, मात्र अमृतच्या लक्षित गटातील पात्र उमेदवारांचा ६ महिन्यांचा संपूर्ण शैक्षणिक खर्च अमृत संस्थेमार्फत केला जाणार असल्याने हे प्रशिक्षण पूर्णपणे मोफत असेल. प्रत्येक जिल्ह्यातील गरज आणि विद्यार्थी संख्या विचारात घेऊन एका बॅचमध्ये किमान २० ते कमाल ३० उमेदवारांना प्रवेश दिला जाईल.

          या प्रशिक्षणासाठी एम.ए. किंवा एम.एस्सी. (मानसशास्त्र / समुपदेशन मानसशास्त्र) आणि मास्टर ऑफ सोशल वर्क (MSW) ही शैक्षणिक पात्रता असलेले अमृतच्या लक्षित गटातील उमेदवार अर्ज करू शकतात. अर्जासोबत डोमेसाईल, उत्पन्नाचा दाखला आणि जातीचा पुरावा जोडणे आवश्यक असून 'प्रथम येईल त्यास प्राधान्य' या तत्त्वावर प्रवेश दिला जाईल. प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण करणाऱ्यांना "अमृत मानसमित्र समुपदेशक" प्रमाणपत्र प्रदान केले जाईल, ज्याच्या आधारे शाळा-महाविद्यालयांमध्ये समुपदेशक, जीवनकौशल्य व मानसिक आरोग्य जनजागृती प्रशिक्षक, विद्यार्थी कल्याण अधिकारी म्हणून कार्य करण्याची किंवा खाजगी स्वरूपात स्वयंरोजगार सुरू करण्याची संधी मिळेल. इच्छुकांनी अमृत संस्थेच्या https://mahaamrut.org.in/ या अधिकृत संकेतस्थळावर मुदतीत ऑनलाईन अर्ज करावा, तसेच अधिक माहितीसाठी अमृतच्या जिल्हा व्यवस्थापक कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन ‘अमृत’व्दारे करण्यात आले आहे.

०००००