विभागीय माहिती कार्यालय,अमरावती
सोमवार, २ मार्च, २०२६
मध्यपूर्व व आसपासच्या काही देशांमध्ये निर्माण झालेल्या तणावपूर्ण प्रादेशिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारत सरकार व महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार परदेशात वास्तव्यास असलेल्या भारतीय नागरिकांच्या सुरक्षेसाठी महत्त्वपूर्ण सूचना जारी करण्यात आल्या आहेत. अशा परिस्थितीत नागरिकांनी आवश्यक माहितीसाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष किंवा पोलीस नियंत्रण कक्षाशी संपर्क साधण्याचे आवाहन मुंबई शहर जिल्हाधिकारी व जिल्हा दंडाधिकारी कार्यालयाच्या नैसर्गिक आपत्ती शाखेमार्फत करण्यात आले आहे. पॅलेस्टाईन (रामल्लाह), कतार (दोहा), सौदी अरेबिया (रियाध), इस्रायल (तेल अवीव), इराण (तेहरान), इराक (बगदाद), कुवेत, बहारीन, मस्कत, जॉर्डन तसेच संयुक्त अरब अमिरात (अबू धाबी) येथे वास्तव्यास असलेल्या सर्व भारतीय नागरिकांनी अत्यंत सतर्क राहावे, अनावश्यक हालचाली टाळाव्यात व स्थानिक प्रशासन तसेच भारतीय दूतावासांनी दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन शासनाच्या वतीने वेळोवेळी करण्यात आले आहे. आपत्कालीन परिस्थितीत संबंधित देशांतील भारतीय दूतावासांच्या २४x७ हेल्पलाईन क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहनही करण्यात आले असून, दूतावासांकडून परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवले जात आहे. सविस्तर वृत्त : https://mahasamvad.in/192792/
महाराष्ट्र व गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी #होळी तसेच #धुलीवंदन निमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत. होलिकापूजन तसेच प्रेम, स्नेह व बंधुभावाचे प्रतिक असलेला रंगोत्सव सर्वांच्या जीवनात आनंदाचे रंग भरो व परस्परांमधील द्वेष भावना नष्ट करो, अशा शुभेच्छांसह राज्यपाल श्री. देवव्रत यांनी नागरीकांना होळी व रंगोत्सव साजरा करताना #पर्यावरण रक्षणाबद्दल जागरुक राहण्याचे आवाहनही केले आहे.
रविवार, १ मार्च, २०२६
द दी चादर शहिदी समागम कार्यक्रमात हजारो भाविकांनी घेतला आरोग्य सेवेचा लाभ
हिंद दी चादर शहिदी
समागम कार्यक्रमात
हजारो भाविकांनी घेतला आरोग्य सेवेचा लाभ
नवी मुंबई, (विमाका) दि.
०१ : हिंद दी चादर कार्यक्रमाच्या अनुषंगाने भाविकांना दोन दिवस वैद्यकीय सेवा
देण्यात आली. देशभरातून आलेल्या हजारो भाविकांनी या सेवेचा लाभ घेतला असल्याची
माहिती नवी मुंबईचे वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रशांत जवादे यांनी दिली.
यावेळी ६० पेक्षा जास्त लोकांनी
रक्तदान केले असून,
किरकोळ त्रास झाlलेल्या १७ रुग्णांना सेवा
देण्यात आली आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
श्री गुरु तेग बहादुर साहेब जी
दरबारमध्ये येणाऱ्या भाविकांसाठी आरोग्य तपासणी तसेच मोफत चष्मा वाटपाचे नियोजन
करण्यात आले असल्याची माहिती नवी मुंबईचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.प्रशांत
जवादे यांनी दिली.
श्री गुरु तेग बहादुर यांच्या
शहिदी समागमनिमित्त खारघर नवी मुंबई येथे २८ फेब्रुवारी व १ मार्च रोजी भव्य
कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून येणाऱ्या
भाविकांसाठी उत्तम आरोग्य व्यवस्था उपलब्ध करण्यात आली. यामध्ये ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांसाठी व्हील चेअर
तसेच ने-आण करण्यासाठी ई-व्हेहिकल उपलब्ध करण्यात आली. वातावरणात गारवा रहावा
म्हणून मिस्ट वेहिकलचा वापर करण्यात आला. येथे येणाऱ्या भाविकांसाठी ५० वैद्यकीय
तज्ज्ञ १०० पॅरामेडिकल स्टाफ सेवेसाठी उपलब्ध होता. येथे मोफत औषध पुरवठा करण्यात आला.
सर्जरी, दंत विशेष तज्ज्ञ, ऑर्थोपेडिक, ऑक्सिजनची उपलब्धता तसेच आपात्कालीन पथकाची स्थापना करण्यात आली. याठिकाणी
रक्तदान शिबिरही सुरू आहे. मधुमेह तपासणी, रक्तदाब तपासणी,
फिजिओथेरपी सेवा, हाडवैद्य विशेषतज्ज्ञ, कॅन्सर
स्क्रिनिंग, स्त्री रोग
विशेषतज्ज्ञ, कान नाक, घसा
तज्ज्ञ मेडिकल, पॅरामेडिकलचे १००
स्टाफ येथे उपलब्ध आहेत. थेलेसिमीया या आजाराबद्दल येथे प्रबोधन करण्यात
येत आहे.
गृहमंत्री अमित शाह यांनी दिली लंगरसेवा ‘हिंद-दी-चादर’ समागम कार्यक्रमात भक्तिभावाचा अनोखा संदेश
गृहमंत्री अमित शाह यांनी दिली लंगरसेवा
‘हिंद-दी-चादर’ समागम
कार्यक्रमात भक्तिभावाचा अनोखा संदेश
नवी
मुंबई, दि. २८ (विमाका):- गृहमंत्री अमित
शाह यांनी खारघर, नवी मुंबई येथे आयोजित ‘हिंद-दी-चादर’ समागम कार्यक्रम दरम्यान स्वतः
लंगरमध्ये संत महंताना भोजन वाढून सेवा दिली. ‘सेवा हीच खरी श्रद्धा’ या शीख परंपरेचा आदर्श त्यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिला. यावेळी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही भोजन वाढून लंगर सेवा दिली.
कार्यक्रमस्थळी
सकाळपासून रात्रीपर्यंत अखंड लंगर सुरू असून सर्वधर्मीय भाविकांसाठी विनामूल्य
भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. आठ ठिकाणी सुरू असलेल्या लंगरमध्ये हजारो
स्वयंसेवक सेवा बजावत आहेत. भाई जैताजी लंगर सेवा, राधास्वामी ब्यास लंगर सेवा,
बाबा मक्खन शाह लबाना लंगर सेवा, संत सेवालाल
महाराज लंगर सेवा, बाबा दीप सिंघा ब्यास लंगर सेवा, भगवान झुलेलालजी लंगर सेवा, भाई मतीदासजी लंगर सेवा
या आठ सेवादार लंगरमध्ये पहिल्या दिवशी लाखो भाविकांनी लंगरचा लाभ घेतला, तर दुसऱ्या दिवशी हा प्रतिसाद अधिक वाढला असल्याची माहिती आयोजकांनी दिली.
या समागम कार्यक्रमात गुरु ग्रंथ साहिब यांच्या
पावन उपस्थितीत कीर्तन व धार्मिक कार्यक्रम सुरू होते. “वाहे गुरु” आणि “बोले सो निहाल, सत श्री अकाल”च्या जयघोषात भाविकांनी
दर्शन व लंगर सेवेचा लाभ घेत घेतला.
लंगर ही केवळ भोजन व्यवस्था नसून समता, बंधुता आणि
मानवतेचा संदेश देणारी परंपरा आहे. गृहमंत्री आणि मुख्यमंत्री यांनी स्वतः
लंगर सेवा देत या परंपरेचा सन्मान केला.
‘हिंद-दी-चादर’ समागमातून सामाजिक ऐक्य आणि
एकात्मतेचा प्रभावी संदेश दिला.
.jpg)

