गुरुवार, ९ जुलै, २०२६
विशेष वृत्त
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर कर्जमुक्ती योजनेने शेतकऱ्यांना दिलासा
नागपूर, ९ दि. :राज्य शासनाने सुरू केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. २ जून २०२६ रोजी या योजनेबाबतचा शासन निर्णय घेण्यात आला आहे.
कर्जमाफी, एकवेळ समझोता, प्रोत्साहनपर लाभ हे या योजनेचे तीन घटक आहेत. ज्यांनी १-४-२०१९ ते ३१-३-२०५ या काळात एक किंवा अधिक अल्पमुदती पीक कर्जे घेतली किंवा ज्यांच्या या कालावधीतील पीक कर्जाचे पुनर्गठन- फेरपुनर्गठन झाले असे शेतकरी या योजनेसाठी पात्र आहेत. परंतु कर्ज हप्ते ३०-९-२०२५ रोजी थकित असणे व ३१-३-२०२६ पर्यंत परतफेड न झालेली बाकी २ लाख रुपये किंवा त्यापेक्षा कमी असणे आवश्यक आहे. अशा शेतकऱ्यांना २ लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी मिळेल.
ज्या शेतकऱ्यांना महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ अंतर्गत लाभ मिळाला, अशा शेतकऱ्यांकडील अखेरची थकबाकी ५०,००० किंवा कमी असल्यास त्यांना ५०,००० रुपयांपर्यंत कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे.
एकवेळ समझोता
ज्या शेतकऱ्यांनी १-४-२०१९ ते ३१-३-२०५ या काळात एक किंवा अधिक अल्पमुदती पीक कर्जे घेतली किंवा ज्यांच्या या कालावधीतील कर्जाचे पुनर्गठन- फेरपुनर्गठन झाले असे शेतकरी या योजनेसाठी पात्र आहेत. परंतु कर्ज हप्ते थकबाकी ३०-९-२०२५ रोजी २ लाख रुपयापेक्षा अधिक असणे आवश्यक आहे.
ही थकबाकी ३१-३-२०२६ पर्यंत परतफेड झालेली नसावी. अशा शेतकऱ्यांना प्रथम २ लाखावरील रक्कम बँकेत भरणे आवश्यक आहे. त्यानंतर त्यांना २ लाख रुपये रकमेच्या कर्जमाफीचा लाभ मिळेल. ज्या शेतकऱ्यांना महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ अंतर्गत लाभ मिळाला आहे अशा शेतकऱ्यांकडील ५०,००० रुपयांवरील रक्कम बँकेत भरल्यास ५०,००० रुपये कर्जमाफी मिळेल.
प्रोत्साहन लाभ
२०२२-२३, २०२३- २४, २०२४- २५ या आर्थिक वर्षात पीककर्ज घेऊन त्याची किमान दोन वर्षे परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना ५०,००० रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ मिळेल. मात्र त्यासाठी २०२५-२६ व २०२६- २७ मधील पीककर्जाची मुदतीपूर्वी परकतफेड करणे आवश्यक आहे.
00000
विशेष वृत्त
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना : पात्र शेतकऱ्यांनी आवश्यक माहिती अद्ययावत ठेवावी
बुलढाणा दि. 9 (जिमाका): पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी पात्र लाभार्थ्यांनी आपल्या कृषी कर्जाशी संबंधित सर्व माहिती अचूक व अद्ययावत ठेवणे आवश्यक आहे. कर्ज खाते, आधार क्रमांक, बँकेतील तपशील आणि इतर आवश्यक माहितीमध्ये विसंगती असल्यास लाभ मिळण्यास अडचणी निर्माण होऊ शकतात.
योजनेत निश्चित करण्यात आलेल्या निकषांनुसार पात्र कृषी कर्जदारांचा समावेश करण्यात येणार असून, माहितीची विविध स्तरांवर पडताळणी केली जाणार आहे. त्यामुळे लाभार्थ्यांनी संबंधित बँक किंवा संस्थेकडे आवश्यक माहिती योग्य प्रकारे उपलब्ध असल्याची खात्री करून घेणे गरजेचे आहे.
योजनेची अंमलबजावणी पारदर्शक आणि अचूक पद्धतीने करण्यासाठी डिजिटल पडताळणीसह विविध प्रशासकीय प्रक्रिया राबविण्यात येणार आहेत. बँका आणि संबंधित संस्थांकडून प्राप्त होणाऱ्या माहितीच्या आधारे पात्रतेची खातरजमा केली जाईल.
पात्र शेतकऱ्यांनी आपल्या कर्ज खात्याशी संबंधित नोंदी वेळोवेळी तपासाव्यात. आवश्यक असल्यास संबंधित बँक किंवा सहकारी संस्थेशी संपर्क साधून माहिती अद्ययावत करून घ्यावी. योग्य माहिती आणि वेळेत आवश्यक पूर्तता केल्यास कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळण्याची प्रक्रिया अधिक सुलभ होईल.
राज्य शासनाची ही योजना पात्र शेतकऱ्यांना थकीत कृषी कर्जातून दिलासा देतानाच भविष्यातील आर्थिक व्यवहार अधिक सक्षम करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. त्यामुळे पात्र लाभार्थ्यांनी आवश्यक बाबींची पूर्तता करून योजनेचा लाभ घ्यावा.
प्रत्येक आस्थापनांनी ‘अंतर्गत
तक्रार निवारण समिती’ स्थापित करा
·
अंतर्गत समितीची नोंदणी 'SHE BOX' पोर्टलवर करावी.
·
माहिला व बालविकास विभागाकडून आदेश जारी.
अमरावती, दि. ९ : कामाच्या ठिकाणी नोकरी किंवा व्यवसाय करणाऱ्या महिलांच्या लैंगिक
छळास प्रतिबंध करण्यासाठी, तक्रारींची चौकशी करण्यासाठी आणि छळ करणाऱ्या व्यक्तीस
शिक्षा करण्यासाठी प्रत्येक शासकीय व खाजगी आस्थापनेत 'अंतर्गत तक्रार निवारण
समिती' (Internal Complaints Committee - ICC) स्थापन करणे कायद्याने बंधनकारक
करण्यात आले आहे. ज्या शासकीय किंवा खाजगी कार्यालयांमध्ये १० किंवा त्यापेक्षा
अधिक कर्मचारी कार्यरत आहेत, त्यांनी ही समिती त्वरित स्थापन करावी, असे आवाहन
अमरावतीच्या जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी संजय गट यांनी प्रसिध्दी
पत्रकाव्दारे केले आहे.
'कामाच्या
ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ (प्रतिबंध, मनाई आणि निवारण) अधिनियम २०१३' मधील तरतुदींनुसार
सर्व शासकीय कार्यालये, स्थानिक प्राधिकरणाची कार्यालये, खाजगी कार्यालये तसेच १०
किंवा त्यापेक्षा अधिक कर्मचारी कार्यरत असलेल्या संस्था, संघटना, मंडळ, कंपनी,
कारखाना, रुग्णालय, शाळा, महाविद्यालये, हॉटेल्स, दुकाने, बँका आदींच्या
प्रमुखांनी व मालकांनी आपापल्या ठिकाणी ही समिती स्थापन करण्याची कार्यवाही करणे
आवश्यक आहे. याबाबत सर्वोच्च न्यायालयाने देखील स्पष्ट निर्देश दिलेले आहेत.
नियमांनुसार
अंतर्गत तक्रार निवारण समिती स्थापन न करणाऱ्या संबंधित कार्यालय प्रमुख किंवा
मालकांना ५० हजार रुपयांपर्यंत दंड करण्याची तरतूद कायद्यामध्ये आहे. त्यामुळे
सर्व आस्थापनांनी या प्रक्रियेत तपासणीसाठी येणाऱ्या अधिकाऱ्यांना पूर्ण सहकार्य
करावे.
शासकीय
व खाजगी कार्यालयांनी अंतर्गत तक्रार निवारण समिती स्थापन केल्यानंतर, वर्ष
२०२५-२६ चा वार्षिक अहवाल 'जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, अमरावती'
येथे सादर करावा. तसेच यापुढील मासिक व त्रैमासिक अहवालही वेळेत सादर करणे आवश्यक
आहे. यासोबतच, स्थापन करण्यात आलेल्या अंतर्गत तक्रार समितीची नोंदणी 'SHE BOX' (SHe-Box) पोर्टलवर करावी, असे आवाहन अमरावतीचे
जिल्हा महिला व बाल विकास विभागाव्दारे करण्यात आले आहे.
00000
महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी महाराष्ट्र शासन सीमाभागातील मराठी बांधवांच्या पाठीशी ठामपणे उभे असून त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरूच राहतील.
#महाराष्ट्रकर्नाटकसीमाप्रश्न
#MaharashtraKarnatakaBorder
🌾 **शेतकऱ्यांच्या सन्मानासाठी... आर्थिक बळकटीसाठी!** 🌾
निसर्गाच्या लहरीपणाचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसतो. अतिवृष्टी, दुष्काळ, पूर, गारपीट आणि अनियमित पावसामुळे पिकांचे नुकसान होऊन अनेक शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली दबले जातात.
अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने **"पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना, २०२६"** सुरू केली आहे.
या योजनेद्वारे पात्र शेतकऱ्यांवरील कर्जाचा भार कमी करून त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे, शेतीला नवी उभारी देणे आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देणे हा शासनाचा उद्देश आहे.
**योजनेची संपूर्ण माहिती जाणून घ्या आणि प्रत्येक पात्र शेतकऱ्यापर्यंत ही माहिती पोहोचवा.**
#कर्जमुक्तीयोजना
#महाराष्ट्रशासन
#शेतकरीकर्जमुक्ती
#कर्जमुक्तीयोजना२०२६
#महाराष्ट्रशासन
#MahaDGIPR
#GovernmentScheme
#FarmerWelfare
#Maharashtra
🌾 **शेतकरी समृद्ध तर महाराष्ट्र समृद्ध!**
शेतकरी हा राज्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. ग्रामीण अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणावर शेती आणि शेतीपूरक व्यवसायांवर अवलंबून आहे. मात्र अतिवृष्टी, अनियमित पाऊस, पूर, दुष्काळ, गारपीट आणि इतर नैसर्गिक संकटांमुळे शेतीचे मोठे नुकसान होते. परिणामी अनेक शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागते आणि घेतलेल्या पीककर्जाची वेळेत परतफेड करणे कठीण होते.
याच पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने **"पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना, २०२६"** सुरू केली आहे.
✅ शेतकऱ्यांवरील कर्जाचा भार कमी करणे
✅ आर्थिक स्थैर्य प्रदान करणे
✅ नव्या उमेदीने शेतीसाठी सक्षम करणे
या योजनेविषयीची संपूर्ण माहिती जाणून घ्या आणि पात्र शेतकऱ्यांपर्यंत ही माहिती नक्की पोहोचवा.
#कर्जमुक्तीयोजना
#महाराष्ट्रशासन
#शेतकरीकर्जमुक्ती
#कर्जमुक्तीयोजना२०२६
#महाराष्ट्रशासन
#MahaDGIPR
#GovernmentScheme
#FarmerWelfare
#Maharashtra




.png)



