गुरुवार, १२ फेब्रुवारी, २०२६

 राज्य सेवा हक्क आयुक्त कार्यालयाचे स्थलांतरण

विभागीय आयुक्त कार्यालय परिसर नवीन पत्ता

          अमरावती दि. 12 : राज्य सेवा हक्क आयुक्त कार्यालय, अमरावती विभाग अमरावती या कार्यालयाचे स्थलांतरण झाले आहे.

          या कार्यालयाचा नवीन पत्ता-‘‘राज्य सेवा हक्क आयुक्त कार्यालय, अमरावती विभाग, अमरावती, विभागीय आयुक्त कार्यालय परिसर, जुना बायपास रोड, कॅम्प, अमरावती             ४४४६०२’’ याप्रमाणे राहील. सदर कार्यालयाच्या पत्त्यात बदल झाल्याची नोंद नागरिकांनी घ्यावी, असे उपसचिव देवेंद्र चव्हाण यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.

 

०००००





स्वयंसेवी संस्थांच्या भागीदारीतून महाराष्ट्राचे होणार वेगाने परिवर्तन

-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

 टाटा ट्रस्ट व नाम फाउंडेशन सोबतच्या करारांमुळे वेगवेगळ्या क्षेत्रातील विकास महाराष्ट्रभर पोहोचविणार

 टाटा ट्रस्ट सोबत १२ व नाम फाउंडेशन सोबत एक सामंजस्य करार

 

मुंबई१२ : महाराष्ट्र विविध क्षेत्रांसह देशाच्या प्रगतीमध्ये वेगळा ठसा उमटवीत आहे. राज्याच्या प्रगतीचा वेग असाच कायम ठेवून राज्य शासनाच्या विविध स्वयंसेवी संस्थांच्या भागीदारीतून महाराष्ट्राचे वेगाने परिवर्तन होईल,असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सह्याद्री अतिथीगृह येथे टाटा ट्रस्ट व नाम फाउंडेशन सोबत करण्यात आलेल्या करारावेळी व्यक्त केला. टाटा ट्रस्ट व नाम फाउंडेशन सोबत झालेल्या करारामळे वेगवेगळ्या क्षेत्रातील विकास संपूर्ण महाराष्ट्रभर पोहचविणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

 

याप्रसंगी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेमृदा व जलसंधारण मंत्री संजय राठोडमहिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरेसार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर - साकोरे उपस्थित होत्या.

 

मुख्यमंत्री फडणवीस म्हणालेराज्यातील प्रत्येक कुटुंबासाठी आरोग्यपोषणपाणी सुरक्षा आणि उपजीविका सुधारणे याला शासनाचे प्राधान्य आहे. या  भागीदारींमुळे विविध कल्याणकारी शासकीय योजना अधिक लोकोपयोगी होण्यास मदत होणार आहे. शासनाच्या योजना  लोक चळवळीच्या स्वरूपात पुढे येत आहे. टाटा ट्रस्टचे सहकार्याने विविध विभागांच्या माध्यमातून सकारात्मक प्रभाव पाडण्यात  यशस्वी होऊ. समाजातील सर्व घटकात उत्पन्न वाढून जगण्याचा स्तर उंचावण्यास यामुळे निश्चितच मदत होईल. दुर्धर आजारांवर महागड्या उपचार पद्धतीमुळे सामान्य नागरिकांना मर्यादा येतात मात्र राज्यात यापुढे उपचाराविना कुणीही मृत्यू पावणार नाहीअशी परिस्थिती निर्माण करण्यात येत आहे. टाटांची मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये मोठी मदत असून यामुळे आपण गरजू रुग्णांना निश्चित स्वरूपाची मदत देऊ शकतो.

 

मुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणालेमागील दहा वर्षापासून टाटा ट्रस्ट सोबत शासन काम करीत आहे. केवळ निधी देऊन भागीदारी होत नाहीतर काम करून समाजात सकारात्मक प्रभाव पाडणारी भागीदारी टाटा करत असते. हे बहु-आयामी करार  मातानवजात बालकबाल आणि किशोरवयीन घटकांसाठी आरोग्य सेवा बळकट करणे,  खुंटलेली वाढ रोखून  कुपोषणावर उपाय शोधण्यासाठी मदतगार ठरतील. या सोबतच पोषणासाठी आहारात वैविध्य आणणे,  जलस्रोतांचे अधिक शाश्वतपणे जतन आणि व्यवस्थापन,  ग्रामीण महाराष्ट्रात हवामान आधारित कृषी आणि पशुधन विकासाला चालना देण्याची क्षमता या भागीदारीत आहे.

 

नाम फाउंडेशन राज्यात जलसंधारणामध्ये मोठे काम करीत आहे. मागील काळात जल स्त्रोतांमधील गाळ काढणे नाला,नदी खोलीकरण व रुंदीकरण आदी कामे करण्यात आली आहेत. राज्यात जलयुक्त शिवार योजना यशस्वीपणे राबविण्यात आली. ही योजना लोक चळवळीच्या स्वरूपात पुढे येत जनतेची योजना झाली. नाम फाउंडेशनच्या सहभागाने विदर्भ व मराठवाड्यातील कमी पर्जन्यमान असलेल्या भागात जलसंधारणाचे मोठे काम झाले. यासाठी टाटा ट्रस्टचीही मदत झाली असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

 

टाटा ट्रस्ट्सचे अध्यक्ष नोएल टाटा म्हणाले,   महाराष्ट्र शासनाशी भागीदारी करून आरोग्यशिक्षणपोषणउपजीविकापाणी आणि स्वच्छता कार्यक्रमांमध्ये सुसूत्रता आणणार आहे.  सर्व सामन्यांचे जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न राहणार आहे. शासनाचे विविध विभाग आणि समुदायांसोबत सकारात्मक परिणाम आणण्याचा हेतू असणार आहे.  शासन आणि टाटा ट्रस्ट्स यांनी आज राज्याच्या एकात्मिक विकासाला पाठबळ देण्यासाठी सामंजस्य करारांवर  स्वाक्षरी करून धोरणात्मक भागीदारी अधिकृत केली आहे. नाम फाउंडेशनचे नाना पाटेकर यांनीही शासनासोबत जलसंधारण क्षेत्रात काम करण्यास मदत मिळत असल्याबाबत समाधान व्यक्त केले.

 

बैठकीस मुख्य सचिव राजेश अग्रवालसचिव (आरोग्य) डॉ. निपुण विनायकसचिव (महिला व बालविकास) अनुपकुमार यादवटाटा ट्रस्टचे अध्यक्ष नोएल टाटानाम फाउंडेशनचे संस्थापक नाना पाटेकरमकरंद अनासपुरेटाटा ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी सिद्धार्थ शर्मा आदींसह टाटा ट्रस्ट व नाम फाउंडेशन च पदाधिकारी उपस्थित होते.

 

कराराचा उद्देश

सामंजस्य करार तंत्रज्ञानडिजिटल नवोपक्रम आणि 'लास्ट-माईल कनेक्टिव्हिटी'  याद्वारे आरोग्यपोषणजलसंधारण आणि ग्रामीण उपजीविका यांमधील शासकीय  प्राधान्यक्रमांना पाठबळ देणेसमुदायांपर्यंत प्रमुख कल्याणकारी योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करणेनागपूर येथील सहा मान्यताप्राप्त रुग्णालयांसोबत केलेल्या करारांद्वारेगरजू रुग्णांना आर्थिक सहाय्य देणेमुख्यमंत्री सहाय्यता निधी अंतर्गत दुर्धर गंभीर आजारांमध्ये सुलभ व कमी खर्चाचे उपचार उपलब्ध करून देणे आहे.

 

सामंजस्य करारांची व्याप्ती

मातानवजात बालकबालक आणि किशोरवयीन मुलांसाठी आरोग्य सेवा बळकट करणेटेलिमेडिसिनसह इतर माध्यमांतून उपचार सहज देणे,  शहरी आणि दुर्गम भागातील सर्वसमावेशक प्राथमिक आरोग्य सेवा वाढवणेएकात्मिक आपत्कालीन व्यवस्थापन सेवाद्वारे उत्तम आपत्कालीन प्रतिसादास पाठबळ देणे.  दोन वर्षांखालील मुलांमधील खुंटलेली वाढकमी वजन आणि कुपोषण रोखण्यास मदत करणेकिशोरवयीन कुपोषण आणि रक्तक्षय दूर करणेगडचिरोली सारख्या जिल्ह्यांवर विशेष लक्ष केंद्रित करून 'टेक-होम रेशनसारख्या योजनांचे वितरण मजबूत करणेतलावांचे पुनरुज्जीवनजलकुंभ आणि नद्यांमधील गाळ काढणेभूजल पुनर्भरण सुधारणेमराठवाडा आणि विदर्भासह पाणीटंचाईग्रस्त भागांवर विशेष भर देऊन मृद व जलसंधारण योजनांची अंमलबजावणी करणेहवामान बदलांचा अभ्यास करून शेतीला प्रोत्साहन देणेवन-आधारित आणि ग्रामीण बिगर-शेती उपजीविकेला पाठबळ देणेआरोग्यशिक्षणपोषणपाणीस्वच्छता आणि उपजीविका या सर्वांना एकत्र आणणारा एकात्मिक ग्राम विकास साधणे.

 

असे आहेत करार

टाटा ट्रस्टच्या सोबत शासनाने एकूण १२ करार केलेले आहेत. यामध्ये ग्रामविकासजलसंधारणसार्वजनिक आरोग्यमहिला व बालविकासगडचिरोली जिल्हा प्रशासनमुख्यमंत्री सहाय्यता निधीनागपूर येथील राष्ट्रीय कर्करोग संस्थाअखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थामध्य भारत आयुर्विज्ञान संस्थाकेअर हॉस्पिटलस्वामी विवेकानंद मेडिकल मिशनमिदास मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल सोबत सामंजस्य करारांचा समावेश आहे. तसेच नाम फाउंडेशनचा जलसंधारण विभागासोबत करार करण्यात आला आहे.

0000

 

बुधवार, ११ फेब्रुवारी, २०२६

 विशेष लेख :

मुंबई क्लायमेट वीक : हवामान कृतीसाठी भारताचा जागतिक मंच

 

मुंबईत होणारा भारतातील पहिला क्लायमेट वीक हा हवामान बदलावर केवळ चर्चा न करता प्रत्यक्ष कृतीकडे नेणारा मंच ठरणार आहे. शासनउद्योगतज्ज्ञयुवक आणि नागरिक यांना एकत्र आणत हा उपक्रम ग्लोबल साऊथ देशांसाठी हवामान नेतृत्वाचा नवा नमुना मांडणार आहे.

अन्नसुरक्षास्वच्छ ऊर्जा आणि शहरी शाश्वतता या तीन महत्त्वाच्या क्षेत्रांवर भर देत नवकल्पनायुवक सहभाग आणि लोकाभिमुख कार्यक्रमांद्वारे हवामान कृती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. हवामान बदलावर उपाय म्हणजे सामूहिक जबाबदारी आणि तातडीची कृती हा यानिमित्ताने मुंबईतून दिला जाणारा संदेश स्पष्ट आहे....

 

हवामान बदल ही  भविष्यातील किंवा केवळ वैज्ञानिक चर्चेची गोष्ट राहिलेली नाही. पूरउष्णतेच्या लाटाअनियमित पाऊसअन्नसुरक्षेची आव्हाने या सगळ्याचा थेट परिणाम आपल्या दैनंदिन आयुष्यावर होत आहे. अशा पार्श्वभूमीवर मुंबईत १७ ते १९ फेब्रुवारी २०२६ दरम्यान होणारा मुंबई क्लायमेट वीक (MCW) हा भारतासाठी आणि विशेषतः ग्लोबल साऊथ देशांसाठी महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.

 

हा केवळ परिषदांचा कार्यक्रम नाहीतर संवादातून प्रत्यक्ष कृतीकडे जाण्याचा प्रयत्न आहे आणि त्याचे वैशिष्ट्य म्हणजे शासनउद्योगतज्ज्ञयुवक आणि सामान्य नागरिक यांना एकाच मंचावर आणणे हे आहे.

 

प्रोजेक्ट मुंबई या संस्थेच्या वतीने हा उपक्रम आयोजित करण्यात आला असून महाराष्ट्र शासनाचा पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आणि बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्या सहकार्याने हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. या उपक्रमामुळे मुंबईला भारत तसेच इतर ग्लोबल साऊथमधील शहरांसाठी हवामान उपाययोजनांची प्रयोगशाळा होणार आहे.

 

 हवामान चर्चेपासून प्रत्यक्ष उपायांकडे

 

मुंबई क्लायमेट वीकचा उद्देश केवळ हवामान बदलावर चर्चा करणे नसूनप्रत्यक्ष अंमलात आणता येतील असे उपाय शोधणे आणि त्यांना गती देणे हा आहे. मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे तीन दिवस मुख्य कार्यक्रम होतीलतर मुंबई शहरभर महाविद्यालयेसमुदाय केंद्रे आणि सांस्कृतिक संस्थांमध्ये विविध उपक्रम राबवले जातील. त्यामध्ये नेतृत्व संवादविविध विषयांवरील ट्रॅक्स, MCW इनोव्हेशन चॅलेंजयूथ ग्रीन इनोव्हेशन चॅलेंज तसेच उपाययोजनांचे प्रदर्शन क्षेत्र आदींचा समावेश असणार आहे.

हब-अँड-स्पोक रचना म्हणजे एकाच वेळी धोरणात्मक चर्चा आणि लोकसहभाग दोन्ही गोष्टी साध्य करण्याचा प्रयत्न या निमित्ताने होणार आहे. हवामान कृती ही केवळ सरकारची जबाबदारी नसून समाजाच्या प्रत्येक घटकाचा सहभाग आवश्यक आहेहा संदेश यातून दिला जाणार आहे.


 

 

मुख्य केंद्रातील पहिल्या दिवशी अर्थशॉट प्राईज या आंतरराष्ट्रीय उपक्रमाचे विशेष सत्र होणार असूनया सत्रात निसर्गअन्न प्रणाली आणि मानव यांवर लक्ष केंद्रित केले जाईल. केन्सिंग्टन पॅलेस (यूके) येथील पथकाच्या मार्गदर्शनाखाली होणारा हा उपक्रम प्रिन्स विल्यम यांच्या संकल्पनेतून साकारलेला असूनमुंबई क्लायमेट वीकमध्ये तो प्रथमच आणि विशेष स्वरूपात सादर केला जाणार आहे. या कार्यक्रमात ग्लोबल साऊथमधील हवामान नवोन्मेषकप्रत्यक्ष उपाययोजना राबवणारे कार्यकर्ते तसेच भारतातील अग्रगण्य व्यक्ती सहभागी होणार असूनमोठ्या प्रमाणावर जनसहभाग वाढवण्याचा उद्देश आहे. याच कालावधीत विविध महाविद्यालयेवसाहती आणि सांस्कृतिक संस्थांमध्ये विविध कार्यक्रम होणार असूनत्यात रोड शोकला व माध्यम उपक्रम तसेच सस्टेनेबिलिटी मेला यांचा समावेश आहे. या उपक्रमांद्वारे हवामान कृती दैनंदिन जीवनाचा भाग बनवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

 

वातावरण हे मुंबई क्लायमेट विकचे नागरिक संवाद व्यासपीठ असूनयाद्वारे नागरिकांना त्यांच्या हवामानविषयक मतांची मुक्त आणि अनफिल्टर्ड मांडणी करता येणार आहे. भाषणेकविताकथागाणी आणि इतर सर्जनशील माध्यमांद्वारे हवामानाशी संबंधित दैनंदिन अनुभव आणि मते मुंबई क्लायमेट वीकच्या केंद्रस्थानी आणल्या जाणार आहेत.

 

ग्लोबल साऊथचा आवाज

 

हवामान बदलाचा सर्वाधिक परिणाम विकसनशील देशांवर होतोपरंतु उपाययोजनांच्या चर्चेत त्यांना कमी महत्त्व मिळते. मुंबई क्लायमेट वीक ग्लोबल साऊथ देशांसाठी एक नेतृत्व मंच उपलब्ध करून देणार आहे. मुंबई क्लायमेट वीक व्यापक भागीदारीच्या माध्यमातून राबवण्यात येत आहे. आयडीएफसी फर्स्ट बँक हा मुख्य भागीदार आहे. डेलॉईट ही धोरणात्मक ज्ञान भागीदार संस्था आहे. टाटा सामाजिक विज्ञान संस्था (टीआयएसएसआणि आयआयटी बॉम्बे हे शैक्षणिक भागीदार आहेत.

एव्हरसोर्स कॅपिटलइंडिया क्लायमेट कोलॅबोरेटिव्हशक्ती सस्टेनेबल एनर्जी फाउंडेशनवर्ल्ड रिसोर्सेस इन्स्टिट्यूट (WRI) इंडियाक्लायमेट ग्रुपसी 40, महिंद्रा ग्रुपइंडियन मर्चंट्स चेंबर यांसारख्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांचा सहभाग असणार आहे. युनिसेफच्या युवाह (YuWaah!) या उपक्रमाद्वारे  युवक सहभाग भागीदार असणार आहे.

 

या उपक्रमात 30 हून अधिक देशांतील प्रतिनिधीआंतरराष्ट्रीय संस्थावित्तीय संघटना आणि उद्योग क्षेत्रातील नेते सहभागी होणार आहेत. बिल गेट्सहिलरी क्लिंटन यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, उद्योगपती आणि नेते यांची उपस्थिती या कार्यक्रमाला जागतिक महत्त्व देते.

यातून भारत हवामान विषयक नेतृत्व केवळ धोरण पातळीवर नव्हेतर प्रत्यक्ष कृतीतून दाखवण्याचा प्रयत्न करत आहे.

 

तीन महत्त्वाचे केंद्रबिंदू

मुंबई क्लायमेट वीकची संकल्पना तीन प्रमुख क्षेत्रांवर आधारित आहे:

१. अन्नप्रणाली (Food Systems) -  हवामान बदलाचा शेती आणि अन्नसुरक्षेवर होणारा परिणाम लक्षात घेऊन टिकाऊ शेती आणि पोषण यावर भर.

२. ऊर्जा संक्रमण (Energy Transition) - पारंपरिक ऊर्जेऐवजी स्वच्छ आणि नवीकरणीय ऊर्जेकडे वाटचाल.

३. शहरी शाश्वतता (Urban Resilience) — शहरांना हवामान बदलाच्या परिणामांपासून सुरक्षित आणि सक्षम बनवणे.

हे तीनही घटक भारताच्या विकासाच्या केंद्रस्थानी आहेतत्यामुळे हा कार्यक्रम केवळ पर्यावरण विषयापुरता मर्यादित राहणार नाही.


 

 

नवकल्पना आणि युवकांची भूमिका

मुंबई क्लायमेट वीकमध्ये नवोन्मेष हा केंद्रस्थानी असणार आहे. हवामान समस्यांवर नवे उपाय शोधण्यासाठी नॅशनल स्टॉक एक्स्चेंजच्या सहकार्याने इनोव्हेशन चॅलेंज आयोजित करण्यात येणार आहे. स्टार्टअपसंशोधक आणि सामाजिक संस्था हे यामध्ये सहभागी होऊन आपले उपाय सादर करणार आहेत.

युवकांसाठी स्वतंत्र हरित नवकल्पना स्पर्धा असेल. युनिसेफच्या सहकार्याने विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष चर्चेत आणि उपाययोजनांमध्ये सहभागी केले जाणार आहे. भविष्यातील हवामान नेतृत्व घडवण्यासाठी हा महत्त्वाचा टप्पा ठरू शकतो.

 

विज्ञानसंस्कृती आणि नागरिक सहभाग

मुंबई क्लायमेट वीकमध्ये नवोन्मेष हा केंद्रस्थानी असणार आहे. या सप्ताहात सार्वजनिक व्याख्यानेकला-संस्कृती कार्यक्रमचित्रपट प्रदर्शन आणि नागरिक कार्यशाळा आयोजित केल्या जातील. हवामान बदल हा केवळ वैज्ञानिक विषय नसून सामाजिक आणि सांस्कृतिक प्रश्नही आहेहे यातून अधोरेखित होते.

 

18 फेब्रुवारी रोजी विशेष सत्रात भारताचे अंतराळवीर राकेश शर्मा आणि अंतराळवीर शुभांशु शुक्ला (दोघेही अशोक चक्र पुरस्कारप्राप्त) शालेय विद्यार्थ्यांशी तसेच जागतिक नेतृत्वाशी संवाद साधणार असूनअंतराळ संशोधनविज्ञान आणि हवामान जबाबदारी यांचा परस्पर संबंध अधोरेखित केला जाणार आहे.

 

युनिसेफ (UNICEF) इंडिया आणि यु वाह (YuWaah) यांच्या भागीदारीत युवकांसाठी विशेष उपक्रम राबवले जाणार असून, 16 ते 24 वयोगटातील युवकांचा सहभाग असणार आहे. अन्न प्रणालीऊर्जा संक्रमण आणि शहरी लवचिकता या विषयांवरील युवकांच्या नवोन्मेषांचे प्रदर्शन मुंबई क्लायमेट वीकमध्ये करण्यात येणार आहे.

 

हवामान कृतीचे नवे मॉडेल

मुंबई क्लायमेट वीक ही भारत आणि ग्लोबल साऊथ देशाच्या नेतृत्वाखालीलनागरिक-केंद्रित हवामान कृतीचे नवे मॉडेल ठरणार आहे. मुंबई क्लायमेट वीक हा सार्वजनिक-खासगी-नागरिक भागीदारीवर आधारित उपक्रम आहे. यामधून शहर पातळीवर हवामान उपाययोजना राबविण्याचा भारतीय नमुना साकारणार आहे. जर या मंचातून ठोस भागीदारीनिधी आणि धोरणात्मक निर्णय घडलेतर तो भारत आणि ग्लोबल साऊथ देशांसाठी दिशादर्शक ठरू शकतो.

 

हवामान बदल हा भविष्यातील नव्हेतर वर्तमानाचा प्रश्न आहे. मुंबई क्लायमेट वीक हा या वास्तवाला सामोरे जाण्याचा सामूहिक प्रयत्न असून जिथे कल्पनाविज्ञानउद्योग आणि नागरिक सहभाग एकत्र असेल.

 

हवामान कृती ही सर्वांची जबाबदारी आहेआणि बदलाची सुरुवात आजपासूनच करावी लागेल, हा संदेश मुंबई क्लायमेट विकच्या माध्यमातून जगभरात जाईल हे नक्की.

नंदकुमार बलभीम वाघमारे

वरिष्ठ सहायक संचालक (माहिती)

माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मुंबई

 

 विशेष लेख :

मुंबई क्लायमेट वीक : हवामान कृतीसाठी भारताचा जागतिक मंच

 

मुंबईत होणारा भारतातील पहिला क्लायमेट वीक हा हवामान बदलावर केवळ चर्चा न करता प्रत्यक्ष कृतीकडे नेणारा मंच ठरणार आहे. शासनउद्योगतज्ज्ञयुवक आणि नागरिक यांना एकत्र आणत हा उपक्रम ग्लोबल साऊथ देशांसाठी हवामान नेतृत्वाचा नवा नमुना मांडणार आहे.

अन्नसुरक्षास्वच्छ ऊर्जा आणि शहरी शाश्वतता या तीन महत्त्वाच्या क्षेत्रांवर भर देत नवकल्पनायुवक सहभाग आणि लोकाभिमुख कार्यक्रमांद्वारे हवामान कृती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. हवामान बदलावर उपाय म्हणजे सामूहिक जबाबदारी आणि तातडीची कृती हा यानिमित्ताने मुंबईतून दिला जाणारा संदेश स्पष्ट आहे....

 

हवामान बदल ही  भविष्यातील किंवा केवळ वैज्ञानिक चर्चेची गोष्ट राहिलेली नाही. पूरउष्णतेच्या लाटाअनियमित पाऊसअन्नसुरक्षेची आव्हाने या सगळ्याचा थेट परिणाम आपल्या दैनंदिन आयुष्यावर होत आहे. अशा पार्श्वभूमीवर मुंबईत १७ ते १९ फेब्रुवारी २०२६ दरम्यान होणारा मुंबई क्लायमेट वीक (MCW) हा भारतासाठी आणि विशेषतः ग्लोबल साऊथ देशांसाठी महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.

 

हा केवळ परिषदांचा कार्यक्रम नाहीतर संवादातून प्रत्यक्ष कृतीकडे जाण्याचा प्रयत्न आहे आणि त्याचे वैशिष्ट्य म्हणजे शासनउद्योगतज्ज्ञयुवक आणि सामान्य नागरिक यांना एकाच मंचावर आणणे हे आहे.

 

प्रोजेक्ट मुंबई या संस्थेच्या वतीने हा उपक्रम आयोजित करण्यात आला असून महाराष्ट्र शासनाचा पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आणि बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्या सहकार्याने हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. या उपक्रमामुळे मुंबईला भारत तसेच इतर ग्लोबल साऊथमधील शहरांसाठी हवामान उपाययोजनांची प्रयोगशाळा होणार आहे.

 

 हवामान चर्चेपासून प्रत्यक्ष उपायांकडे

 

मुंबई क्लायमेट वीकचा उद्देश केवळ हवामान बदलावर चर्चा करणे नसूनप्रत्यक्ष अंमलात आणता येतील असे उपाय शोधणे आणि त्यांना गती देणे हा आहे. मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे तीन दिवस मुख्य कार्यक्रम होतीलतर मुंबई शहरभर महाविद्यालयेसमुदाय केंद्रे आणि सांस्कृतिक संस्थांमध्ये विविध उपक्रम राबवले जातील. त्यामध्ये नेतृत्व संवादविविध विषयांवरील ट्रॅक्स, MCW इनोव्हेशन चॅलेंजयूथ ग्रीन इनोव्हेशन चॅलेंज तसेच उपाययोजनांचे प्रदर्शन क्षेत्र आदींचा समावेश असणार आहे.

हब-अँड-स्पोक रचना म्हणजे एकाच वेळी धोरणात्मक चर्चा आणि लोकसहभाग दोन्ही गोष्टी साध्य करण्याचा प्रयत्न या निमित्ताने होणार आहे. हवामान कृती ही केवळ सरकारची जबाबदारी नसून समाजाच्या प्रत्येक घटकाचा सहभाग आवश्यक आहेहा संदेश यातून दिला जाणार आहे.


 

 

मुख्य केंद्रातील पहिल्या दिवशी अर्थशॉट प्राईज या आंतरराष्ट्रीय उपक्रमाचे विशेष सत्र होणार असूनया सत्रात निसर्गअन्न प्रणाली आणि मानव यांवर लक्ष केंद्रित केले जाईल. केन्सिंग्टन पॅलेस (यूके) येथील पथकाच्या मार्गदर्शनाखाली होणारा हा उपक्रम प्रिन्स विल्यम यांच्या संकल्पनेतून साकारलेला असूनमुंबई क्लायमेट वीकमध्ये तो प्रथमच आणि विशेष स्वरूपात सादर केला जाणार आहे. या कार्यक्रमात ग्लोबल साऊथमधील हवामान नवोन्मेषकप्रत्यक्ष उपाययोजना राबवणारे कार्यकर्ते तसेच भारतातील अग्रगण्य व्यक्ती सहभागी होणार असूनमोठ्या प्रमाणावर जनसहभाग वाढवण्याचा उद्देश आहे. याच कालावधीत विविध महाविद्यालयेवसाहती आणि सांस्कृतिक संस्थांमध्ये विविध कार्यक्रम होणार असूनत्यात रोड शोकला व माध्यम उपक्रम तसेच सस्टेनेबिलिटी मेला यांचा समावेश आहे. या उपक्रमांद्वारे हवामान कृती दैनंदिन जीवनाचा भाग बनवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

 

वातावरण हे मुंबई क्लायमेट विकचे नागरिक संवाद व्यासपीठ असूनयाद्वारे नागरिकांना त्यांच्या हवामानविषयक मतांची मुक्त आणि अनफिल्टर्ड मांडणी करता येणार आहे. भाषणेकविताकथागाणी आणि इतर सर्जनशील माध्यमांद्वारे हवामानाशी संबंधित दैनंदिन अनुभव आणि मते मुंबई क्लायमेट वीकच्या केंद्रस्थानी आणल्या जाणार आहेत.

 

ग्लोबल साऊथचा आवाज

 

हवामान बदलाचा सर्वाधिक परिणाम विकसनशील देशांवर होतोपरंतु उपाययोजनांच्या चर्चेत त्यांना कमी महत्त्व मिळते. मुंबई क्लायमेट वीक ग्लोबल साऊथ देशांसाठी एक नेतृत्व मंच उपलब्ध करून देणार आहे. मुंबई क्लायमेट वीक व्यापक भागीदारीच्या माध्यमातून राबवण्यात येत आहे. आयडीएफसी फर्स्ट बँक हा मुख्य भागीदार आहे. डेलॉईट ही धोरणात्मक ज्ञान भागीदार संस्था आहे. टाटा सामाजिक विज्ञान संस्था (टीआयएसएसआणि आयआयटी बॉम्बे हे शैक्षणिक भागीदार आहेत.

एव्हरसोर्स कॅपिटलइंडिया क्लायमेट कोलॅबोरेटिव्हशक्ती सस्टेनेबल एनर्जी फाउंडेशनवर्ल्ड रिसोर्सेस इन्स्टिट्यूट (WRI) इंडियाक्लायमेट ग्रुपसी 40, महिंद्रा ग्रुपइंडियन मर्चंट्स चेंबर यांसारख्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांचा सहभाग असणार आहे. युनिसेफच्या युवाह (YuWaah!) या उपक्रमाद्वारे  युवक सहभाग भागीदार असणार आहे.

 

या उपक्रमात 30 हून अधिक देशांतील प्रतिनिधीआंतरराष्ट्रीय संस्थावित्तीय संघटना आणि उद्योग क्षेत्रातील नेते सहभागी होणार आहेत. बिल गेट्सहिलरी क्लिंटन यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, उद्योगपती आणि नेते यांची उपस्थिती या कार्यक्रमाला जागतिक महत्त्व देते.

यातून भारत हवामान विषयक नेतृत्व केवळ धोरण पातळीवर नव्हेतर प्रत्यक्ष कृतीतून दाखवण्याचा प्रयत्न करत आहे.

 

तीन महत्त्वाचे केंद्रबिंदू

मुंबई क्लायमेट वीकची संकल्पना तीन प्रमुख क्षेत्रांवर आधारित आहे:

१. अन्नप्रणाली (Food Systems) -  हवामान बदलाचा शेती आणि अन्नसुरक्षेवर होणारा परिणाम लक्षात घेऊन टिकाऊ शेती आणि पोषण यावर भर.

२. ऊर्जा संक्रमण (Energy Transition) - पारंपरिक ऊर्जेऐवजी स्वच्छ आणि नवीकरणीय ऊर्जेकडे वाटचाल.

३. शहरी शाश्वतता (Urban Resilience) — शहरांना हवामान बदलाच्या परिणामांपासून सुरक्षित आणि सक्षम बनवणे.

हे तीनही घटक भारताच्या विकासाच्या केंद्रस्थानी आहेतत्यामुळे हा कार्यक्रम केवळ पर्यावरण विषयापुरता मर्यादित राहणार नाही.


 

 

नवकल्पना आणि युवकांची भूमिका

मुंबई क्लायमेट वीकमध्ये नवोन्मेष हा केंद्रस्थानी असणार आहे. हवामान समस्यांवर नवे उपाय शोधण्यासाठी नॅशनल स्टॉक एक्स्चेंजच्या सहकार्याने इनोव्हेशन चॅलेंज आयोजित करण्यात येणार आहे. स्टार्टअपसंशोधक आणि सामाजिक संस्था हे यामध्ये सहभागी होऊन आपले उपाय सादर करणार आहेत.

युवकांसाठी स्वतंत्र हरित नवकल्पना स्पर्धा असेल. युनिसेफच्या सहकार्याने विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष चर्चेत आणि उपाययोजनांमध्ये सहभागी केले जाणार आहे. भविष्यातील हवामान नेतृत्व घडवण्यासाठी हा महत्त्वाचा टप्पा ठरू शकतो.

 

विज्ञानसंस्कृती आणि नागरिक सहभाग

मुंबई क्लायमेट वीकमध्ये नवोन्मेष हा केंद्रस्थानी असणार आहे. या सप्ताहात सार्वजनिक व्याख्यानेकला-संस्कृती कार्यक्रमचित्रपट प्रदर्शन आणि नागरिक कार्यशाळा आयोजित केल्या जातील. हवामान बदल हा केवळ वैज्ञानिक विषय नसून सामाजिक आणि सांस्कृतिक प्रश्नही आहेहे यातून अधोरेखित होते.

 

18 फेब्रुवारी रोजी विशेष सत्रात भारताचे अंतराळवीर राकेश शर्मा आणि अंतराळवीर शुभांशु शुक्ला (दोघेही अशोक चक्र पुरस्कारप्राप्त) शालेय विद्यार्थ्यांशी तसेच जागतिक नेतृत्वाशी संवाद साधणार असूनअंतराळ संशोधनविज्ञान आणि हवामान जबाबदारी यांचा परस्पर संबंध अधोरेखित केला जाणार आहे.

 

युनिसेफ (UNICEF) इंडिया आणि यु वाह (YuWaah) यांच्या भागीदारीत युवकांसाठी विशेष उपक्रम राबवले जाणार असून, 16 ते 24 वयोगटातील युवकांचा सहभाग असणार आहे. अन्न प्रणालीऊर्जा संक्रमण आणि शहरी लवचिकता या विषयांवरील युवकांच्या नवोन्मेषांचे प्रदर्शन मुंबई क्लायमेट वीकमध्ये करण्यात येणार आहे.

 

हवामान कृतीचे नवे मॉडेल

मुंबई क्लायमेट वीक ही भारत आणि ग्लोबल साऊथ देशाच्या नेतृत्वाखालीलनागरिक-केंद्रित हवामान कृतीचे नवे मॉडेल ठरणार आहे. मुंबई क्लायमेट वीक हा सार्वजनिक-खासगी-नागरिक भागीदारीवर आधारित उपक्रम आहे. यामधून शहर पातळीवर हवामान उपाययोजना राबविण्याचा भारतीय नमुना साकारणार आहे. जर या मंचातून ठोस भागीदारीनिधी आणि धोरणात्मक निर्णय घडलेतर तो भारत आणि ग्लोबल साऊथ देशांसाठी दिशादर्शक ठरू शकतो.

 

हवामान बदल हा भविष्यातील नव्हेतर वर्तमानाचा प्रश्न आहे. मुंबई क्लायमेट वीक हा या वास्तवाला सामोरे जाण्याचा सामूहिक प्रयत्न असून जिथे कल्पनाविज्ञानउद्योग आणि नागरिक सहभाग एकत्र असेल.

 

हवामान कृती ही सर्वांची जबाबदारी आहेआणि बदलाची सुरुवात आजपासूनच करावी लागेल, हा संदेश मुंबई क्लायमेट विकच्या माध्यमातून जगभरात जाईल हे नक्की.

नंदकुमार बलभीम वाघमारे

वरिष्ठ सहायक संचालक (माहिती)

माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मुंबई