शुक्रवार, ६ फेब्रुवारी, २०२६



 हिंद-दी-चादर’ कार्यक्रमासाठी सुरक्षा व सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात

मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव डॉ. श्रीकर परदेशी

 

·        प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री अमित शाह यांची विशेष उपस्थितीनवी मुंबईत भव्य कार्यक्रम

 

मुंबई दि. ६ : हिंद-दी-चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या 350 व्या शहीदी समागमाचा भव्य कार्यक्रम 28 फेब्रुवारी व 1 मार्च 2026 रोजी नवी मुंबईतील खारघर येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. देशभरातून लाखो भाविक या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. या पार्श्वभूमीवर कार्यक्रमाच्या तयारीस गती देत सुरक्षापाणीपुरवठाभोजननिवासवाहतूकस्वच्छता आदी बाबींची चोख व्यवस्था करण्याचे निर्देश मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव डॉ.श्रीकर परदेशी यांनी दिले.


हिंद-दी-चादर’ श्री गुरू तेग बहादुर यांच्या ३५० व्या शहीदी समागम कार्यक्रमास मुख्यमंत्री देवेंद्र  फडणवीस यांच्यासह गोवा राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंतमध्यप्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादवगुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेलराजस्थानचे मुख्यमंत्री भजन लाल शर्माआसामचे मुख्यमंत्री डॉ. हिमांता बिस्वा सरमा उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाच्या पूर्वतयारीसाठी मंत्रालयात बैठक झाली.

यावेळी राज्य समन्वय समितीचे समन्वयक रामेश्वर नाईकनवी मुंबईचे उपजिल्हाधिकारी तथा कार्यक्रमाचे समन्वयक रविंद्र राठोडसमितीचे शासकीय समन्वयक डॉ.  जगदीश सकवानमुख्यमंत्री कार्यालयाचे अवर सचिव तुषार राठोड यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.


तरदूरदृश्य प्रणालीद्वारे कोकणपुणेनाशिक विभागाचे आयुक्तमुंबई शहरउपनगरठाणेरायगडपालघरसिंधुदूर्गरत्नागिरीपुणेसातारासांगलीसोलापूरकोल्हापूरअहिल्यानगरनाशिकजळगावधुळेनंदूरबारचेजिल्हाधिकारीमुख्य कार्यकारी अधिकारीपोलीस आयुक्तपोलीस अधिक्षकपरिवहन आयुक्तमहानगरपालिकेचे आयुक्त यांच्यासह संबंधीत अधिकारी उपस्थित होते.

प्रधान सचिव डॉ. श्रीकर परदेशी म्हणाले कीनागपूर आणि नांदेड येथील कार्यक्रम लाखो भाविकांच्या उपस्थित यशस्वीरित्या झाला आहे. या कार्यक्रमात सिखसिकलकर,बंजारालबानासिंधीमहोयालवाल्मिकीउदासीनभगत नामदेव (वारकी) संप्रदायासह नागरिकही मोठ्या संख्येने गुरू तेग बहादुर यांचा इतिहासाला उजाळा देण्यासाठी एकत्र येतात. नवी मुंबई येथील कार्यक्रमातही दहा लाख भाविक राज्य तसेच देशातून अपेक्षित आहेत. या अनुषंगाने वाहतुकस्वच्छतालंगरपाणी पुरवठामैदानधर्मशाळानिवासव्यवस्थापिण्याचे पाणीसुरक्षा व्यवस्थाफिरते स्वच्छतागृहनि:शुल्क शटल बससेवा या सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात.


समन्वयक रामेश्वर नाईक म्हणाले की, ‘हिंद-दी-चादर श्री गुरू तेग बहादुर यांच्या शहीदीच्या स्मृतीस उजाळा देण्यासाठी आयोजित कार्यक्रमाअंतर्गत शाळामहाविद्यालयेनिवासी शाळाशिक्षण संस्था येथे विद्यार्थ्यांमार्फत प्रभातफेरी काढण्यात येतेघोषवाक्यनिबंध स्पर्धा तसेच डॉक्युमेंट्री बनविण्यात येणार आहे. सतिंदर सरताज यांचे भक्तिगीत सिनेमागृहात प्रदर्शीत करण्यात येत आहे.

सर्व जिल्ह्यांमध्ये डिजिटल प्रचार रथसंत प्रवास वाहनेजागरणप्रचार व प्रसार समित्या यांच्यामार्फत गुरू तेग बहादुर आणि त्यांच्या परिवाराच्या शहीदीचा इतिहास जनमानसात पोहोचविण्यात येत आहे.

 

https://gurutegbahadurshahidi.com या संकेतस्थळावर कार्यक्रमाची संपुर्ण माहिती देण्यात आली आहे. नऊ समाज या कार्यक्रमाच्यानिमित्ताने एकत्र येत असूनया कार्यक्रमाच्या माध्यमातून राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. या कार्यक्रमात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहनही त्यांनी केले.

                                                               00000



                   येत्या ५ वर्षात विदर्भाचा सर्वांगीण विकास करु –

                                    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

        नागपुरात पहिल्यांदा ऑटोमोबाईल उद्योगाची गुंतवणूक;

                      १५ हजार कोटींचा सामंजस्य करार

 

                      केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते

    ‘खासदार औद्योगिक महोत्सव- ॲडव्हान्टेज विदर्भ’चे थाटात उद्घाटन

 

नागपूर,दि. ६ : गडचिरोली येथे जगातील सर्वात मोठे ग्रीन स्टिल हब, नागपुरात सोलर मॉडयुल आणि अमरावतीमध्ये आशियाखंडातील सर्वात मोठे वैमानिक प्रशिक्षण केंद्र उभारण्याच्या दिशेने महत्त्वाची पाऊले पडली आहेत. निर्मिती आणि सेवा क्षेत्रात विदर्भाची घोडदौड सुरु आहे. आज महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीसोबत झालेल्या सामंजस्य करारातून पहिल्यांदा नागपूरमध्ये ऑटोमोबाईल उद्योगाचे पदार्पण झाले आहे, या सर्व प्रयत्नांतून येत्या ५ वर्षांत विदर्भाचा सर्वांगीण विकास साधन्यात येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले. त्यांच्या उपस्थित विदर्भासाठी विविध चार गुंतवणूक करारही करण्यात आले. 

असोसिएशन फॉर इंडस्ट्रियल डेव्हलपमेंटच्यावतीने आयोजित  ‘खासदार औद्योगिक महोत्सव- ॲडव्हान्टेज विदर्भ-२०२६’ च्या तिसऱ्या आवृत्तीचे  राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ परिसरात आज केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत उद्घाटन झाले. यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, वित्त व नियोजन राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल ,शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर ,आमदार सर्वश्री  परिणय फुके, चरणसिंह ठाकूर, सुमित वानखेडे, उद्योग विभागाचे प्रधान सचिव पी. अल्बलगन,उद्योजक पद्मश्री सत्यनारायण नुवाल आणि देश-विदेशातील उद्योजक  यावेळी उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, अनेक वर्षांपासून नागपुरात ऑटोमोबाईल उद्योग आणण्यासाठी प्रयत्न सुरु होते ते आज फळाला आले आहेत. महिंद्रा ॲड महिंद्रा कंपनीने नागपुरात एकात्मिक ऑटोमोबाईल क्षेत्रात १५ हजार कोटी गुंतवणुकीचा सामंजस्य करार करून आपल्या पुढील योजनेविषयी महत्वाची घोषणाही केली आहे. या गुंतवणुकीतून भारत आणि जागतिक बाजारासाठी नेक्स्ट जनरेशन इलेक्ट्रिक व्हेईकल आणि ट्रॅक्टरचे नागपुरात उत्पादन होणार आहे. या प्रकल्पासाठी आजच जागा निश्चितच करण्यात येणार आहे. कंपनीने संभाजीनगर येथे पुरवठा केंद्र तर नाशिक येथे विस्तार केंद्र उघडण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे पुणे शहरानंतर राज्यात आता नागपूर,नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर या शहरांमध्ये देशातील सर्वात मोठी ऑटोमोबाईल परिसंस्था निर्माण होणार आहे.

एन मोटिव्ह जर्मनी कंपनीसोबत प्रथमच गीगा कास्टिंग तंत्रज्ञानाधारित तीन चाकी इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रात १० हजार कोटींचा करार झाला आहे. भविष्यात २५०० कोटींच्या गुंतवणुकीतून याचा विस्तार होणार असून ८० टक्के उत्पादनाची निर्यात होऊन ६ हजार प्रत्यक्ष व १० हजार अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

राज्याच्या समतोल विकासासाठी उद्योग धोरण आखण्यात आले असून ज्या भागात उद्योग नाहीत अशा भागांचाही विकास साधला जाणार आहे. यासाठी राज्यात मॅग्नेट औद्योगिक क्षेत्र तयार करण्यात येत आहेत. विदर्भातही नागपूर आणि अमरावती असे मॅग्नेट तयार करण्यात आले आहेत. नागपूर मॅग्नेटद्वारे गडचिरोली,भंडारा,चंद्रपूर आणि नागपूर या जिल्हयांचा औद्योगिक विकास करण्यात येत आहे. या भागात स्टिल हब तयार करण्यात येत आहे. गॅसबेस एनर्जीसाठी प्रयत्न सुरु असून येत्या काळात ग्रीन स्टील हब म्हणून या भागाचा विकास करण्यात येणार आहे.

अमरावती मॅग्नेटद्वारे अमरावती येथे पहिल्या टेक्सटाईल पार्कनंतर दुसरा टेक्टाईल पार्क उभारण्यात येत आहे. अमरावती विमानतळाचा विस्तार करण्यात येईल येथेच आशिया खंडातील सर्वात मोठे वैमानिक प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येत असून येत्या जुलै महिन्यात त्याचे उद्घाटन होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.अमरावती मॅग्नेटच्या माध्यमातून यवतमाळ,अकोला,वाशीम व बुलडाणा जिल्ह्यांचा औद्योगिक विकास करण्याच्या दिशेने प्रयत्न सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. येत्या काळात उद्योजकांच्या पुढाकाराने विदर्भाचा विकास होईल असा विश्वास व्यक्त करून  उद्योजकांना राज्य शासन पूर्ण मदत करेल असेही त्यांनी सांगितले.

उद्योगासाठी कुशल मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात येईल, रेल्वे व विमानवाहतूक बळकट करण्यात येईल, वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्पाद्वारे विदर्भाला दुष्काळ मुक्त करण्याच्या ध्येयाने राज्यशासन कार्य करीत  असून यावर्षी  या दिशेने महत्वाचे पाऊल पडेल असे सांगून विदर्भातील पर्यटन क्षेत्रातील मोठया संधींचा उपयोग येथील विकासकरिता करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. 

 

            विदर्भाला समृद्ध व संपन्न बनवू - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

                 

गडचिरोली ते वाशिम अशा विदर्भातील सर्व जिल्ह्यांमधील गरिबी, बेरोजगारी दूर करून या भागाला समृद्ध व संपन्न करण्याचे स्वप्न असून ते पूर्ण होईल, असा विश्वास व्यक्त करत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी येत्या 5 वर्षात विदर्भात 5 लाख रोजगार निर्मिती करण्यात येईल असे प्रतिपादन केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात गडचिरोली जिल्ह्यात 7.5 लाख कोटींची गुंतवणूक आली असून ही गौरवास्पद बाब असल्याचे त्यांनी सांगितले. विदर्भातील लोखंड, कोळसा, मँग्निज या खनिज संपत्तीसह कापूस, संत्रा उत्पादन व पर्यटन क्षेत्राच्या बलस्थानांना कुशल मनुष्यबळ, पायाभूत सुविधा व आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन विदर्भाला संपन्न बनविण्याची वचनबद्धता त्यांनी व्यक्त केली.

तत्पूर्वी, विदर्भात गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणुकदारांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते  सन्मानित करण्यात आले.त्यांच्या हस्ते असोसिएशन फॉर इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट युवा विंगच्या लोगोचे अनावरण करण्यात आले. सुपर मेटल्स लि.कंपनी, महिंद्रा अँड महिंद्रा उद्योग समूह, एन मोटीव्ह इंडिया-जर्मन आणि जीआयडीसी या कंपन्यासोबत मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार झाले.

अदानी समूहाचे (एअरपोर्ट्स) संचालक जीत अदानी, पद्मश्री सत्यनारायण नुवाल, उद्योग विभागाचे प्रधान सचिव पी. अल्बलगन यांनी मनोगत व्यक्त केले. असोसिएशन फॉर इंडस्ट्रियल डेव्हलपमेंटचे अध्यक्ष आशिष काळे प्रास्ताविक केले. सुत्रसंचालन वसुंधरा काशिकर यांनी केले तर निर्भय संचेती यांनी आभार मानले.

 

                                                               000000

 

ऊर्जा संवर्धनावर विभागीयस्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धा;

·        उर्जा बचतीचे महत्व पटवून देण्यासाठी अभिनव उपक्रम

·        २० फेब्रुवारी रोजी स्पर्धा होणार

          अमरावती, दि. ६ : शालेय विद्यार्थ्यांमध्ये ऊर्जा बचत व अपारंपरिक ऊर्जेबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी राज्य शासन व महाऊर्जा विभागाच्या वतीने विभागीयस्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. महाऊर्जा‍ विभागातील सर्व जिल्हा परिषद शाळा, नगरपरिषद/नगरपालिका च्या शाळा, समाजकल्याण शाळा व आदिवासी विकास विभागाच्या शाळा आदींना या स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन महाऊर्जा विभागाव्दारे करण्यात आले आहे.  विभागाच्या निर्देशानुसार ही स्पर्धा दि. २० फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११ वाजता विभागीय क्रीडा संकुल, अमरावती येथे होणार आहे. सर्व संबंधितांनी याची नोंद घेण्याचे आवाहन विभागीय महाव्यवस्थापक सारंग महाजन यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.

            ऊर्जा संवर्धनाचा प्रचार व प्रसार करण्यासाठी शासनाने यापूर्वीही विविध उपक्रम राबविले असून, विद्यार्थ्यांमध्ये ऊर्जा बचतीचे महत्त्व रुजवून ते संदेश पालक व समाजापर्यंत पोहोचविणे हा या योजनेचा प्रमुख उद्देश आहे. त्याअनुषंगाने जिल्हा परिषद शाळा, नगरपरिषद/नगरपालिका शाळा, समाजकल्याण व आदिवासी शाळांतील इयत्ता ८ वी व ९ वीच्या विद्यार्थ्यांसाठी ऊर्जा संवर्धन व अपारंपरिक ऊर्जा या विषयावर आधारित प्रश्नमंजुषा स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

            प्रत्येक शाळेतून एक किंवा दोन गटांची नोंदणी करता येणार असून, प्रत्येक गटात एक किंवा दोन विद्यार्थी सहभागी होऊ शकतात. नोंदणी केलेल्या गटांनाच स्पर्धेत सहभाग दिला जाणार आहे. स्पर्धेत जास्तीत जास्त २०० विद्यार्थ्यांचा सहभाग अपेक्षित असून ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या तत्त्वावर नोंदणी स्वीकारली जाणार आहे.

            सहभागी सर्व विद्यार्थ्यांना महाऊर्जा विभागीय कार्यालय, अमरावती मार्फत प्रशस्तीपत्रक देण्यात येणार असून विजेत्यांना आकर्षक रोख पारितोषिके देण्यात येणार आहेत. प्रथम क्रमांकासाठी १५ हजार रुपये, द्वितीय क्रमांकासाठी १० हजार रुपये तर तृतीय क्रमांकासाठी ५ हजार रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.

            स्पर्धेसाठी अकोला व बुलढाणा जिल्ह्यांसाठी समन्वय अधिकारी म्हणून शैलेश मुळे, यवतमाळ व वाशिम जिल्ह्यांसाठी विजय काळे तर अमरावती जिल्ह्यासाठी हर्षल काकडे हे समन्वय अधिकारी म्हणून कार्य पाहणार आहेत. संबंधित शाळांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून विद्यार्थ्यांना या स्पर्धेचा लाभ द्यावा, असे आवाहन महाऊर्जा विभागाकडून करण्यात आले आहे.

००००००

गुरुवार, ५ फेब्रुवारी, २०२६



              मुंबईत 2728 मार्च रोजी वैद्यकीय परिषद 'पल्स' चे आयोजन

'पल्स' परिषदेच्या माध्यमातून वैद्यकीय वेलनेस पर्यटनाचा 'महाराष्ट्र ब्रँड' निर्माण करा

-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. ५ : वैद्यकीय क्षेत्रात जागतिक स्तरावर महाराष्ट्राला ओळख निर्माण करून देणाऱ्या 'पल्स' या वैद्यकीय परिषदेचे आयोजन मुंबईत जिओ वर्ल्ड सेंटर, येथे २७ व २८ मार्च २०२६ रोजी करण्यात येणार आहे. या परिषदेत देशातून आणि जगभरातून वैद्यक क्षेत्रातील २९०० पेक्षा जास्त तज्ज्ञ, अभ्यासक आणि मान्यवर सहभागी होणार आहेत.

 'पल्स' वैद्यकीय परिषदेचे भव्य दिव्य आयोजन करून परिषदेच्या माध्यमातून 'वेलनेस' उपचारांचा  वैद्यकीय पर्यटनातील 'महाराष्ट्र ब्रँड' निर्माण करावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षा निवासस्थानी परिषद आयोजनाच्या आढावा बैठकीत दिले. यावेळी वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ उपस्थित होत्या.

        पारंपरिक खर्चिक असलेल्या वैद्यकीय उपचाराऐवजी 'वेलनेस' उपचारांकडे नागरिकांचा ओढा वाढत आहे. 'वेलनेस' उपचार पद्धतीत राज्यात मोठ्या प्रमाणावर वाव आहे. त्यामुळे आयुषमधील उपचार पद्धतींना 'वेलनेस' कडे वळविण्यात यावे, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

          मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, वैद्यकीय क्षेत्रामध्ये अनेक स्टार्टअप कार्यरत आहेत. अधिकाधिक स्टार्टअपला परिषदेत सहभागी करून घ्यावे. जेणेकरून परिषदेमध्ये या क्षेत्रात होणाऱ्या नवनवीन संशोधनावर आधारित चर्चांमधून कर्करोगासारख्या आजारांवर सहज, सोपी आणि परवडणारी उपचार पद्धती विकसित करण्यात स्टार्टअपला मदत होईल.वैद्यकीय क्षेत्रातील जागतिक गुंतवणूकदार या परिषदेत सहभागी होतील याबाबत दक्षता घ्यावी, त्यांच्या माध्यमातून राज्यात होत असलेल्या 'बल्क ड्रग पार्क' मध्ये गुंतवणूक होईल, यासाठी प्रयत्न करावे. परिषदेच्या यशस्वी आयोजनासाठी संबंधित विभागांनी नोडल अधिकारी नियुक्त करावेत. सबंधित विभागांनी समन्वयाने काम करीत परिषदेच्या आयोजनातून राज्याला वैद्यकीय क्षेत्रात मोठा लाभ मिळवून द्यावा, असे निर्देशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिले.

          वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ म्हणाल्या, ग्रामीण भागात आरोग्य यंत्रणा बळकट होण्यासाठी परिषदेत वैद्यक क्षेत्रातील गुंतवणूकदारांसोबत करार करण्यात यावेत. यामधून ग्रामीण भागात आरोग्याच्या दर्जेदार सुविधा निर्माण होतील. मानसिक आजारांवरील नवनवीन उपचार पद्धती, वैद्यकीय पर्यटन विकसित होण्यासाठी परिषदेच्या संधीचा उपयोग करण्यात यावा.

           बैठकीस मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणचे महानगर आयुक्त डॉ.संजय मुखर्जी, पर्यटन विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह, वैद्यकीय शिक्षण आयुक्त अनिल भंडारी, अन्न व औषध प्रशासन आयुक्त श्रीधर दुबे, मुख्य राजशिष्टाचार अधिकारी राजेश गवांदे, मुख्यमंत्री यांच्या सल्लागार पूजा मिसाळ, आदी उपस्थित होते.


 अशी असणार परिषद

-परिषदेचे उद्घाटन 27 मार्च रोजी होईल.

-परिषदेत प्लेनरी, 360 डिग्री डोम, आदींसह स्टार्टअपसाठी वेगळी दालने असणार आहेत. -तसेच उद्योग क्षेत्रातील नवनवीन संशोधनाची माहिती असणारी दालने असणार आहेत.

-परिषदेत जागतिक आरोग्य संघटना, युनेस्को यांचे उच्चपदस्थ अधिकारी सहभागी होतील.

-जगातील नामांकित वैद्यकीय शिक्षण देणाऱ्या विद्यापीठांचे कुलगुरू आणि संशोधकही परिषदेत सहभाग घेणार आहेत. -भविष्यातील वैद्यकीय शिक्षण, डिजिटल हेल्थ आणि कृत्रिम बुद्धिमत्ता, उपचार पद्धतीतील संशोधन या विषयांवर पॅनल चर्चा, कार्यशाळा आणि केस स्टडीज होणार आहेत.

-तसेच प्रदर्शन, राऊंड टेबल चर्चा, 'टेक टॉक' असणार आहे. 

0000