बुधवार, १८ फेब्रुवारी, २०२६

विशेष लेख (हिंदी) मोहयाल समाज की अमर परंपरा: हिंद दी चादर के अमर प्रहरी (अमर शहीद भाई मती दास और भाई सती दास)

 


विशेष लेख (हिंदी)

 

मोहयाल समाज की अमर परंपरा: हिंद दी चादर के अमर प्रहरी

(अमर शहीद भाई मती दास और भाई सती दास)

 

भारतीय इतिहास में यदि किसी समाज ने अपने धर्म, राष्ट्र और आत्मसम्मान की रक्षा के लिए पीढ़ी-दर-पीढ़ी शौर्य, त्याग और शहादत की परंपरा को जीवित रखा है, तो वह है मोहयाल समाज। यह समाज केवल विद्या और संस्कृति का संवाहक ही नहीं रहा, बल्कि संकट काल में शस्त्र उठाकर अन्याय के विरुद्ध खड़ा होने वाला वह प्रहरी भी रहा है, जिसने इतिहास की धारा को मोड़ने का साहस दिखाया। अमर शहीद भाई मती दास और भाई सती दास इसी मोहयाल समाज की उस गौरवशाली परंपरा के सर्वोच्च शिखर हैं, जिनकी शहादत ने सृष्टि की चादर कहलाने वाले श्री गुरु तेग बहादुर साहिब जी के सनातन धर्म की रक्षा को अमरता प्रदान की।

मोहयाल समाज की ऐतिहासिक जड़ें अत्यंत प्राचीन और गौरवपूर्ण रही हैं। ऐतिहासिक स्रोतों के अनुसार, इस परंपरा का संबंध महाराजा दाहिर सेन के वंश से माना जाता है। इसी वंश परंपरा में जन्मे गौतम दास जी, जो गुरु नानक देव साहिब जी के समकालीन थे, आगे चलकर गुरु अर्जुन देव साहिब जी के सानिध्य में आए और स्वयं को पूर्णतः सिख धर्म की सेवा में समर्पित कर दिया। गुरु पातशाह की आज्ञा से वह सिख धर्म के प्रचार-प्रसार हेतु करियाला नामक स्थान पर भेजे गए, जो आज पाकिस्तान के चकवाल जिले में स्थित है। यह वही क्षेत्र है जहां समीप ही कटासराज शिव मंदिर स्थित है, जो उस युग के धार्मिक सह अस्तित्व का जीवित प्रमाण है।

करियाला ग्राम मोहयाल समाज का एक प्रमुख केंद्र बना। लगभग साढ़े चार सौ वर्षों तक यह समाज वहीं निवास करता रहा और चढ़दी कला अर्थात समृद्धि तथा सामाजिक प्रतिष्ठा का प्रतीक माना गया। मोहयाल ब्राह्मणों का यह छिब्बर परिवार सामान्य संगत में भाई जी का परिवार कहकर सम्मान पूर्वक जाना गया। आज भी करियाला ग्राम को मोहयाल समाज का जेरूसलमकहा जाना, जो इस समाज के ऐतिहासिक योगदान का प्रमाण है। भौगोलिक दृष्टि से यह क्षेत्र अत्यंत संवेदनशील था; पश्चिम में अफगानी शासक और पूर्व में मुगल सत्ता। ऐसे में मोहयाल समाज के शूरवीर इस पूरे क्षेत्र की ढाल बनकर खड़े रहे।

 इसी परंपरा के उज्ज्वल नक्षत्र थे भाई परागा जी, जो गौतम दास जी के सुपुत्र थे। वे गुरु हरगोबिंद साहिब जी की सेना के महान सेनापति बने। सन् 1628 ई. और 1635 ई. के युद्धों में उन्होंने अद्भुत वीरता का परिचय देते हुए मुगल सेना को भारी क्षति पहुँचाई। सन 1635 ई. की करतारपुर की ऐतिहासिक जंग में, जहां 14 वर्षीय गुरु तेग बहादुर साहिब जी ने अपना अप्रतिम शौर्य दिखाया, वहीं एक सैन्य टुकड़ी का नेतृत्व भाई परागा जी कर रहे थे। इस युद्ध में दाहिनी भुजा कट जाने के बाद भी रणभूमि न छोड़ना, मोहयाल समाज की उस परंपरा को दर्शाता है जिसमें शरीर से अधिक धर्म और कर्तव्य का महत्व रहा है।

गुरु हरगोबिंद साहिब जी ने भाई परागा जी की सेवाओं से प्रसन्न होकर उन्हें उत्तम नस्ल का घोड़ा, पाँच सौ रुपये नकद और अपनी स्वयं की कृपाण भेंट की तथा करियाला में रहकर धर्म-प्रचार का दायित्व सौंपा। उनके सुपुत्र भाई लक्खी दास जी और पौत्र भाई हीरानंद जी ने भी गुरु घर की सेवा को ही अपना जीवन बनाया। यह वही परंपरा थी जिसने आगे चलकर भाई मती दास और भाई सती दास जैसे अमर शहीद दिए।

जब गुरु हर कृष्ण साहिब जी के बाद गुरु गद्दी का प्रश्न उपस्थित हुआ, तब मोहयाल समाज से ही भाई दरगाह मल जी को गुरु दरबार का दीवान नियुक्त किया गया। वे दिल्ली से बाबा बकाला साहिब तक गुरता गद्दी की समस्त सामग्री लेकर पहुंचे और नौवीं ज्योत के रूप में गुरु तेग बहादुर साहिब जी के गुरु गद्दी पर प्रतिष्ठित होने की ऐतिहासिक प्रक्रिया में निर्णायक भूमिका निभाई। यही वह क्षण था, जब मोहयाल समाज का संबंध सीधे उस महान शहादत से जुड़ गया, जिसने भारतीय इतिहास की दिशा बदल दी।

वयोवृद्ध भाई दरगाह मल जी ने भविष्य की गुरु-सेवाओं के लिए अपने भतीजों, भाई मती दास और भाई सती दास जी को गुरु घर को समर्पित किया। भाई मती दास जी गुरु दरबार के दीवान बने, जबकि भाई सती दास जी भाषाओं के विद्वान होकर गुरुवाणी के लेखन, अनुवाद और प्रचार में लगे। मोहयाल समाज की यह विशेषता रही है कि उसने शस्त्र और शास्त्र; दोनों को समान श्रद्धा दी।

दिल्ली में गुरु तेग बहादुर साहिब जी पर हुए अमानवीय अत्याचारों के प्रत्यक्ष साक्षी भाई सती दास जी थे। उन्होंने उन घटनाओं को लिपिबद्ध किया, यद्यपि वह अमूल्य साहित्य मुगल सत्ता द्वारा नष्ट कर दिया गया। गुरु पातशाह की यात्राओं में दोनों भाई सदैव साथ रहे। गुरु साहिब का स्नेह और सम्मान दोनों पर समान रूप से बरसता था।

9 नवंबर 1675 ई. को, धर्म परिवर्तन से इंकार करने पर, भाई मती दास जी को आरे से चीरकर शहीद कर दिया गया। जपु जी साहिब का पाठ करते हुए हंसते-हंसते शहादत स्वीकार करना, मोहयाल समाज की उस आध्यात्मिक ऊंचाई को दर्शाता है जहां मृत्यु भी पराजित हो जाती है। अगले दिन, 10 नवंबर 1675 को, भाई सती दास जी को रुई में लपेटकर जीवित जला दिया गया, परंतु उनके चेहरे पर भय नहीं, बल्कि धर्म के लिए गर्व का तेज था।

भाई मती दास और भाई सती दास की शहादत केवल दो व्यक्तियों का इतिहास नहीं है, बल्कि यह मोहयाल समाज की सामूहिक आत्मा का उद्घोष है। यह समाज सदियों से यही संदेश देता आया है कि धर्म, सत्य और आत्मसम्मान के लिए प्राण देना पराजय नहीं, बल्कि इतिहास को अमर दिशा देना है। हिंद दी चादर परियोजना के अंतर्गत हम सभी देशवासीयों की मोहयाल चेतना को नमन है, जिसने सनातन की रक्षा में अपने दो अमर रत्न समर्पित किए।

अमर शहीद भाई मती दास और भाई सती दास को, तथा मोहयाल समाज की इस महान परंपरा को शत-शत नमन।

 

डॉ. रणजीत सिंह अर्श

-लेखक / ब्लॉगर / व्याख्याता

0000

विशेष लेख श्री गुरू तेग बहादुर साहिबजी आणि संत नामदेव: भारतीय संत परंपरेतील धर्म, मानवता व बलिदानाचा संगम

 


विशेष लेख

 

श्री गुरू तेग बहादुर साहिबजी आणि संत नामदेव:

 भारतीय संत परंपरेतील धर्म, मानवता व बलिदानाचा संगम

 

२८ फेब्रुवारी आणि १ मार्च रोजी खारघर, नवी मुंबई येथे आयोजित हिंद-दी-चादर श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने श्री गुरू तेग बहादुर साहिबजी आणि संत नामदेव यांच्या भारतीय संत परंपरेतील धर्म, मानवता व बलिदानाचा संगम याविषयी या लेखातून ऊहापोह करण्यात आला आहे.

            भारतीय आध्यात्मिक आणि संत परंपरा ही विविध काळात, विविध प्रदेशात जन्मलेल्या थोर विभूतींनी समृद्ध झालेली आहे. या परंपरेत शीख धर्माचे नववे गुरू, हिंद- दी -चादर म्हणून ओळखले जाणारे श्री गुरू तेग बहादुर साहिबजी आणि महाराष्ट्रातील म्हणजेच हिंगोली जिल्ह्यातील नरसी नामदेव येथील वारकरी संप्रदायातील महान संत नामदेव महाराज यांचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे. दोघांचे कार्य, विचार आणि त्याग हे धर्मरक्षण, मानवता, समता आणि नैतिक मूल्यांचे प्रतीक मानले जातात.

संत नामदेव महाराज हे १३ व्या-१४ व्या शतकातील महान संत असून त्यांनी विठ्ठल भक्तीच्या माध्यमातून समाजात समता, नामस्मरण आणि सर्वधर्मसमभावाचा संदेश दिला. जात-पात, उच्च-नीच भेद नाकारून त्यांनी सामान्य जनतेला ईश्वरभक्तीचा मार्ग मोकळा करून दिला. त्यांनी रचलेल्या अभंगांमधून मानवता, करुणा आणि सामाजिक ऐक्याचे तत्त्व प्रभावीपणे मांडले गेले. संत नामदेव महाराजांची कीर्ती महाराष्ट्राच्या सीमांपुरती मर्यादित न राहता उत्तर भारतापर्यंत पोहोचली. त्यांचे अनेक अभंग पंजाबी भाषेत आहेत.

दुसरीकडे, १७ व्या शतकात शीख धर्माचे नववे गुरू श्री गुरू तेग बहादुर साहिबजी यांनी धर्मस्वातंत्र्य, मानवाधिकार आणि धार्मिक सहिष्णुतेसाठी अद्वितीय बलिदान दिले. तत्कालिन शासकाच्या‌ धार्मिक अत्याचारांविरुद्ध उभे राहत, त्यांनी काश्मिरी पंडितांच्या धर्मरक्षणासाठी प्रसंगी आपले प्राण अर्पण केले. धर्मासाठी शिश कापले गेले, परंतु त्यांनी कधीही अन्यायासमोर शरणागती पत्करली नाही. त्यामुळेच त्यांना हिंद दी चादर ही गौरवपूर्ण उपाधी प्राप्त झाली आहे.

संत नामदेव आणि श्री गुरू तेग बहादुर साहिबजी यांच्या काळात सुमारे तीन शतकांचे अंतर असले, तरी त्यांच्या विचारांमध्ये मूलभूत समानता आढळून येते. दोघांनीही ईश्वर एकत्व, मानवमूल्ये, अन्यायाविरुद्ध संघर्ष आणि धार्मिक स्वातंत्र्याचा पुरस्कार केला. संत नामदेवांनी भक्तीच्या मार्गाने समाजपरिवर्तन घडविले, तर गुरू तेग बहादुर साहिबजी यांनी त्याग आणि बलिदानाच्या मार्गाने धर्मरक्षणाचा आदर्श निर्माण केला.

विशेष म्हणजे, संत नामदेव महाराजांचे अभंग शीख धर्माच्या पवित्र ग्रंथ गुरुग्रंथ साहिबमध्ये समाविष्ट आहेत. यावरून संत नामदेव यांच्या विचारांचा शीख धर्मपरंपरेवर झालेला प्रभाव स्पष्ट होतो. हा संबंध भारतीय संत परंपरेतील सांस्कृतिक एकात्मतेचे आणि सर्वसमावेशकतेचे उत्तम उदाहरण आहे.

आजच्या काळात श्री गुरू तेग बहादुर आणि संत नामदेव यांच्या विचारांचे महत्त्व अधिकच अधोरेखित होते. धार्मिक सहिष्णुता, सामाजिक सलोखा, मानवाधिकार आणि नैतिक मूल्यांची जोपासना करण्यासाठी त्यांच्या कार्यातून प्रेरणा मिळते.  श्री गुरू तेग बहादुर साहिबजी यांचे बलिदान आणि संत नामदेव यांची भक्तीपर परंपरा ही भारतीय समाजाला एकता, सद्भावना आणि राष्ट्रभावनेच्या दिशेने नेणारी दीपस्तंभ ठरते. त्यामुळे आज त्यांच्या ३५० व्या शहीदी समागमानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रच नव्हे तर भारतवर्ष विविध जनजागृतीपर कार्यक्रम राबवून त्यांना अभिवादन करत आहे.

 

- चंद्रकांत कारभारी, उपसंपादक, जिल्हा माहिती कार्यालय, हिंगोली

0000

मंगळवार, १७ फेब्रुवारी, २०२६

‘हिंद दी चादर’ कार्यक्रमानिमित्त मुंबई उपनगर जिल्ह्यात दोन दिवसीय व्यसनमुक्ती अभियान



‘हिंद दी चादर’ कार्यक्रमानिमित्त मुंबई उपनगर जिल्ह्यात 

दोन दिवसीय व्यसनमुक्ती अभियान

Ø               वक्तृत्व, निबंध व घोषवाक्य स्पर्धेचेही आयोजन

   बुलढाणा/मुंबई, दि. १६ : संतांच्या भूमीत गुरू तेग बहादुर यांच्या गौरवशाली शहादतीच्या इतिहासाला उजाळा देण्यासाठी ओवे मैदान, खारघर (नवी मुंबई) येथे भव्य शहिदी समागम कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘हिंद दी चादर’ गुरू तेग बहादुर यांच्या ३५० व्या शहीदी समागमानिमित्त २८ फेब्रुवारी व १ मार्च रोजी होणाऱ्या कार्यक्रमानिमित मुंबई उपनगर जिल्ह्यात दोन दिवसीय व्यसनमुक्ती अभियान राबविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सौरभ कटीयार यांनी दिले.

कार्यक्रमाच्या पूर्वतयारीसंदर्भात मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक झाली. यावेळी अपर जिल्हाधिकारी मनोज गोहाड, निवासी उपजिल्हाधिकारी सतीश बागल, तसेच आरोग्य, शिक्षण, पोलीस विभागांचे प्रतिनिधी आणि गुरुद्वारा व्यवस्थापन समितीचे प्रतिनिधी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी सौरभ कटीयार म्हणाले की, संस्कृती रक्षण आणि राष्ट्रीय एकात्मतेसाठी गुरू तेग बहादुर यांनी दिलेल्या बलिदानाचे स्मरण या कार्यक्रमातून करण्यात येणार आहे. त्यांच्या शहादतीचा इतिहास शाळा, महाविद्यालये, संस्था आणि गुरुद्वारांपर्यंत पोहोचविण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. मुंबई उपनगर जिल्ह्यात ३ लाख २० हजार विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी वक्तृत्व, निबंध व घोषवाक्य स्पर्धा तसेच प्रभातफेरीद्वारे जनजागृती करण्यात येत आहे.

थीम साँग, माहितीपटाद्वारे प्रचार-प्रसिध्दी

याशिवाय व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरच्या माध्यमातून २०० शाळा जोडण्यात आल्या असून, थीम साँग आणि माहितीपटाद्वारे विद्यार्थ्यांना कार्यक्रमाची माहिती देण्यात येत आहे. चेंबूर, देवनार आणि मानखुर्द येथून नवी मुंबईकडे जाणाऱ्या भाविकांसाठी वाहतूक व सुरक्षा व्यवस्थेची विशेष तयारी करण्यात आली आहे.

या शहीदी समागमाच्या निमित्ताने सिख, सिकलगर, बंजारा, लबाना, सिंधी, मोहयाल, वाल्मीकी, उदासीन आणि वारकरी संप्रदायातील प्रतिनिधी सुमारे ३०० वर्षांनंतर एकत्र येणार असून, राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश या कार्यक्रमातून दृढ होणार आहे. येणाऱ्या भाविकांना सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने कार्य करावे, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. बैठकीत विविध विभागांकडून करण्यात येणाऱ्या तयारीचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

 यावेळी पश्चिम उपनगरचे उपविभागीय अधिकारी प्रशांत ढगे, सहा.जनसंपर्क अधिकारी बृह्न्मुंबई महानगरपालिका विवेक राठोड, उपविभागीय अधिकारी पूर्व उपनगर कल्पना गोडे, तहसिलदार (महसूल) युवराज बांगर, तहसिलदार बोरीवली मुंबई उपनगर इरेश चप्पलवार, शासकीय सदस्य, तहसिलदार अंधेरी स्नेहलता स्वामी, शासकीय सदस्य, नायब तहसिलदार कुर्ला सुनिल कापडनिस निवासी, श्री.मनमोहन सिंग, एव्हर साईन, मालाड, श्री.सुखविंदर सिंग चेंबुरकॅम्प, गुरपिंदर सिंग, गुरू नानक सभा आदिसंह अधिकारी उपस्थित होते.

0000 

विशेष लेख- मानवता धर्म जोपासणारा बंजारा समाज


 


विशेष लेख-

मानवता धर्म जोपासणारा बंजारा समाज

          भारतीय सामाजिक-आर्थिक इतिहासात बंजारा समाजाचे स्थान अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आहे. मध्ययुगीन काळात संपूर्ण भारतभर व्यापार, वाहतूक आणि पुरवठा व्यवस्था सांभाळणारा हा समुदाय केवळ आर्थिकच नव्हे, तर धार्मिक-सांस्कृतिक क्षेत्रातही महत्त्वाची भूमिका बजावतो. शीख इतिहासातील लखीशाह (लाखा) बंजारा यांचे योगदान हे त्याचे सर्वोत्तम उदाहरण मानले जाते. श्री गुरु तेगबहादुर साहेब जी यांच्या शहीदीनंतर सेवा, तसेच त्या काळातील बंजारा समाजाचे व्यापारी सामर्थ्य, हे दोन्ही घटक शीख-बंजारा संबंधांचे सशक्त द्योतक आहेत.

लखीशाह बंजारा यांचे शीख समाजातील महत्त्व

          इ.स. १६७५ मध्ये मुघल सत्तेने श्री गुरु तेगबहादुर साहेबजी यांचा अनन्वित छळ केला त्यामध्ये ते शहीद झाले. त्या काळात भयावह वातावरण होते; कोणालाही गुरुजींच्या पार्थिवाला स्पर्श करण्याची हिंमत होत नव्हती. अशा वेळी लखीशाह बंजारा, जे एक नामांकित व्यापारी व कारवाँ प्रमुख होते, त्यांनी एकाच वेळी हजारो बैलगाड्या एकत्रित केल्या. आपल्या जीवाची पर्वा न करता गुरुजींचे पवित्र शरीर आपल्या गाडीत लपवून दिल्लीतील रायसीना परिसरात नेले. एकाच वेळी आलेल्या हजारो बैलगाड्या त्यांनी उडालेला धुराळा यामुळे त्यांच्या मनातील पवित्र कार्य कोणाच्या लक्षात आले नाही. नंतर आपल्या घराला आग लावून त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले, जेणेकरून मुघल अधिकाऱ्यांना संशय येऊ नये. आजचे गुरुद्वारा रकाब गंज साहिब हे त्याच बलिदानाची साक्ष देणारे पवित्र स्थळ आहे. या ठिकाणी एक भव्य सभागृह आजही त्यांच्या नावाने उभे आहे. या घटनेमुळे लखीशाह बंजारा हे शीख परंपरेत त्याग, निष्ठा आणि मानवतेचे प्रतीक ठरले आहेत.

श्री गुरु तेगबहादूर साहेबजींच्या कार्यात सहभाग

          गुरु तेगबहादूर साहेबजी हे धार्मिक स्वातंत्र्य, मानवाधिकार आणि सर्वधर्मसमभावाचे पुरस्कर्ते होते. काश्मिरी पंडितांच्या धर्मरक्षणासाठी त्यांनी प्राणांची आहुती दिली. लखीशाह बंजारा यांनी केलेली सेवा ही गुरुजींच्या मूल्यांचीच पुनरावृत्ती होती.धर्मापलीकडे जाऊन मानवतेसाठी उभे राहणे, ही शिकवण त्यांनी आपल्या कृतीतून दिली.म्हणूनच शीख परंपरेत बंजारा समाजाला सेवाभावी सहचर म्हणून सन्मान दिला जातो.

३५० वर्षांपूर्वीचा बंजारा समाजाचे व्यापारी महत्त्व

          मुघल काळात बंजारा समाज हा उपखंडातील सर्वात मोठा स्थलांतरित व्यापारी वर्ग मानला जात असे. धान्य, मीठ, कापड, कच्चा माल आणि लष्करी पुरवठा हे मुख्य व्यवसाय. त्या काळातील असुरक्षितता आणि लुटालुट लक्षात घेऊन या समाजाने समुदायातून व्यापार केला.स्वसंरक्षण आणि त्यासाठी आवश्यक शस्त्रकला यामध्ये हा समाज पारंगत होता. भटकंती संदर्भातील रस्ते, जोखीम आणि प्रसंगी लढण्याचे कसब त्यांना अवगत होते. देशाटन करण्याची कला या समुदायाने विकसित केली होती.मोठ्या बैलगाड्यांच्या तांड्यांद्वारे (कारवाँ) हजारो किलोमीटरचा प्रवास केला जात असे.

          मुघल लष्कराचा अन्नपुरवठा प्रामुख्याने बंजाऱ्यांकडून होत असल्याची नोंद तत्कालीन प्रशासनिक कागदपत्रांत आढळते. दुष्काळी परिस्थितीतही अन्नधान्याची वाहतूक करून त्यांनी राजकारभार स्थिर ठेवला.

तत्कालीन व्यापार व्यवस्था

          बंजारा समाजाची व्यापार व्यवस्था अत्यंत शिस्तबद्ध होती. प्रत्येक तांड्याला नायक, कारभारी आणि राखणदार असत. मार्ग, पाणवठे, विश्रांतीस्थळे यांची पूर्वनियोजित माहिती त्यांना असे. व्यवहार बहुधा विश्वासावर आधारित, पण ठराविक संकेत आणि मौखिक करारांवर चालत. ही व्यवस्था आजच्या लॉजिस्टिक्स सिस्टीमची आद्य आवृत्ती मानली जाते.त्यांच्या तांड्याची रचना व त्यातून कामाचे वाटप यामुळे अनेक वर्ष हा समुदाय शिस्तबद्ध व्यापारी समुदाय म्हणून सन्मानित केला जातो.या समाजाकडे असणाऱ्या दळणवळण,मनुष्यबळामुळे तत्कालिन राजकीय चौकटीत या समाजाला फार महत्व प्राप्त झाले होते.

हिंदू समाजातील बंजारा समुदायाचे महत्त्व

          बहुसंख्य बंजारा समाज हिंदू परंपरेत मोडतो.सण, उत्सव, चालीरीती आणि त्यांचे वार्षिक नियोजन यामुळे या समाजाच्या मान्यतांना विविध समाजात प्रतिष्ठा प्राप्त होती. स्वतःची भाषा, संगीत, खानपान पद्धती, आयुर्वेद व औषध शास्त्राचे उत्तम जाण यामुळे त्यांना अन्य समाजात प्रतिष्ठा होती.

          त्यांनी देशभरच्या ग्रामीण-शहरी भागांना जोडण्याचे काम केले. स्थानिक बाजारपेठा, मंदिरे, यात्रास्थळे आणि राजकीय केंद्रे यांना आवश्यक वस्तू पुरवून सामाजिक एकात्मता वाढवली. देशभरातील स्वतःच्या समाजातील उत्सव सोबतच अन्य धर्मीयांच्या उत्सवाची माहिती व त्या दृष्टीचे बिनचूक वार्षिक नियोजनामुळे बंजारा समाज हा केवळ व्यापारी नसून, सांस्कृतिक दुवा ठरला, असे म्हटल्यास वावगे ठरू नये.

भाषा, पेहराव आणि अखिल भारतीय सूत्र

          बंजारा समाजाची गोरबोली (लामणी/लभाणी) ही भाषा संपूर्ण भारतात वेगवेगळ्या प्रादेशिक प्रभावांसह आढळते. हा एक अखिल भारतीय भाषिक सूत्र आहे. स्त्रियांचा रंगीबेरंगी पोशाख, भरजरी दागिने, पुरुषांचा साधा पण प्रवाससुलभ पेहराव,हे सर्व त्यांच्या स्थलांतरित जीवनशैलीशी सुसंगत होते. काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत या समाजाने आपले वैशिष्ट्य, भाषा, पेहराव,खानपान यामध्ये एकसूत्री पण ठेवले.कोणत्याही ठिकाणच्या बंजारा समाजाच्या भाषा आणि राहणीमान हे एक दुसऱ्यांसोबत कितीही वर्ष विलग राहिले तरी बदलू न देण्याची हजारो वर्ष परंपरा त्यांनी जपली.अनेक धर्माचे अनेक पंथाचे व चालीरितीचे शासन आले तरी त्यांनी आपली संस्कृती जतन केली.त्यामुळे हा समाज सर्वकालीन समाज व्यवस्थेत देशाच्या कानाकोपऱ्यात आपल्या सन्मानाने आणि लढवय्या बाण्यामुळे तटस्थ आणि वेगळेपण अधोरेखीत करीत गेला.

लाखा बंजारा यांचे व्यापारातील स्थान

          लखीशाह बंजारा हे केवळ धार्मिक सेवक नव्हते; ते त्या काळातील यशस्वी व्यापारी होते. दिल्लीसारख्या राजधानीत त्यांचे निवासस्थान आणि व्यापारी जाळे होते. तीन ते चार शतकांचा व्यापाराचा त्यांचा अनेक पिढयांचा अनुभव होता. आपल्या मेहनतीने, प्रामाणिकपणाने आणि व्यापार पूरक साहित्य – सुविधांनी त्यांनी गौरवशाली परंपरा निर्माण केली होती. स्वतःचा एक समुदाय,व्यापाराचा वकूब,शब्दाला जपण्याची स्थिरता,धर्माचा स्वाभिमान,व्यवहारातील पारदर्शिता, वक्तशीरपणा,आणि लढाऊ वृत्तीमुळे आदर युक्त दहशत या समाजाची तत्कालीन व्यवस्थेत होती. त्यामुळेच गुरुजींच्या पार्थिवाला सुरक्षितपणे हलवणे त्यांना शक्य झाले.

शीख आणि बंजारा समाजाचा संबंध

          लखीशाह बंजारा यांच्या कृतीमुळे शीख-बंजारा संबंध दृढ झाले. पुढील काळात अनेक बंजारा कुटुंबे शीख गुरुद्वारांच्या सेवेत सहभागी झाली. देशभरातील दोन्ही समाजांचा वावर.ठिकठिकाणी व्यापारासाठी व धर्मप्रसारासाठी जाणारे जत्थे व तांडे यातील स्थलांतर हा समान धर्म.विविध वातावरणात अस्तित्व टिकवण्याची परस्पर सांगड. लंगर व्यवस्था, प्रवासातील मदत, आणि आपत्कालीन सेवा या क्षेत्रांत दोन्ही समाजातील साम्य या समुदायाला सहजीवनासाठी उपयुक्त ठरला.त्यामुळे देशात या दोन्ही समुदायाने तत्कालीन व्यवस्थेत समान धर्मीय म्हणून मान्यता प्राप्त केले होती.ही व्यवस्था दोन्ही समुदायांच्या संबंधाला काळाच्या कसोटीवर सिद्ध करणारी ठरली आहे.

श्री गुरु ग्रंथ साहेब ग्रंथामध्ये आदराने उल्लेख

          गुरुजींच्या शहादतीमध्ये या समाजाने दाखवलेल्या अतुलनीय पराक्रमाचा उल्लेख शिखांच्या पवित्र श्री गुरु ग्रंथ साहेब जी ग्रंथात आहे. तथापि, गुरुमुखी या लिपीमध्ये असलेल्या या पवित्र ग्रंथात थेट बंजारा असा उल्लेख क्वचित आढळतो; मात्र सेवा, त्याग, समता आणि मानवता ही मूल्ये बंजारा समाजाच्या जीवनपद्धतीशी सुसंगत आहेत. शीख परंपरेतील सेवाभावात बंजारा समाजाचा आत्मा प्रतिबिंबित झालेला दिसतो. त्यामुळे शेकडो वर्षांपासून परस्परांच्या मान्यतेत व अस्तित्वात दोन्ही समाजाने एकमेकांचा आदर केला आहे.

          लखीशाह बंजारा यांचे बलिदान, बंजारा समाजाचे व्यापारी सामर्थ्य आणि शीख धर्माशी असलेले नाते हे सर्व भारतीय इतिहासातील सामाजिक ऐक्याचे उत्तम उदाहरण आहे. धर्म, जात किंवा व्यवसाय यापलीकडे जाऊन मानवतेसाठी उभे राहणे हीच या परंपरेची खरी देणगी आहे.

·         प्रवीण टाके, उपसंचालक विभागीय माहिती कार्यालय, कोल्हापूर