चार महिन्यांच्या पिण्याच्या पाण्याचे नियोजन करावे - राज्यमंत्री बच्चू ऊर्फ ओमप्रकाश कडू
चार महिन्यांच्या पिण्याच्या पाण्याचे नियोजन करावे - राज्यमंत्री बच्चू ऊर्फ ओमप्रकाश कडू Ø सिंचन प्रकल्पांवर नावीन्यपूर्ण संकल्पना राबवा Ø भूसंपादनात नियमांचे पालन करावे अमरावती, दि. 19 : येत्या उन्हाळ्यात नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न येऊ नये, यासाठी पाण्याची समस्या सोडविण्याला प्राधान्य देण्यात यावे, तसेच चार महिने पुरेल असा पाणीपुरवठा होण्यासाठी आराखडा तयार करावा असे निर्देश जलसंपदा राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिले. आज येथील सिंचन भवनात श्री. कडू यांनी जलसंपदा विभागाच्या कामाचा आढावा घेतला. यावेळी मुख्य अभियंता अनिल बहादुरे, अ. ल. पाठक, अधिक्षक अभियंत आशिष देवगडे, रश्मी देशमुख, नरेंद्र तायडे आदी उपस्थित होते. जिल्ह्यातील नांदगावपेठ येथील 32 गावांच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी नांदगाव पेठ औद्योगिक क्षेत्रातूनच या गावांना पाणी पुरवठा करण्याबाबत आराखडा तयार करण्यात यावा, असे निर्देश देऊन त्यांनी बुलडाणा जिल्ह्यातील जिगाव, खडकपूर्णा आणि पेनटाकळी प्रकल्पांची सद्यस्थिती जाणून घेतली. या प्रकल्पाचे दोन हजार कोटी खर्च होणे