पोस्ट्स

सप्टेंबर, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

नविन परीक्षा केंद्र मागणी प्रस्ताव सादर करण्यास 31 ऑक्टोबर पर्यंत मुदतवाढ /दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर विशेष अनुदान योजना

    नविन परीक्षा केंद्र मागणी प्रस्ताव सादर करण्यास 31 ऑक्टोबर पर्यंत मुदतवाढ     अमरावती, दि. 30 :   शैक्षणिक वर्ष 2022 मध्ये फेब्रवारी-मार्च महिन्यात   होणाऱ्या इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षांकरीता नविन परीक्षा केंद्र मागणी प्रस्ताव सादर करण्याकरीता दि. 31 ऑगस्ट 2021 या   कालावधीला 31 ऑक्टोबर 2021 पर्यत मुदतवाढ देण्यात येत आहे, असे विभागीय मंडळाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे. कोविड-19 च्या प्रादुर्भावामुळे काही शाळा, महाद्यिालयांना केंद्र प्रस्ताव सादर न करता आल्यामुळे मुदतवाढ देण्यात येत आहे. ही मुदतवाढ फक्त या वर्षाकरीता लागू राहील. या कालावधित अर्ज विक्री व भरलेले अर्ज स्विकृत करण्यात येणार आहे. नविन प्रस्ताव अर्जाची किमत रुपये 100 निर्धारित करण्यात आली आहे. 31 ऑक्टोबर 2021 नंतर नविन परीक्षा केंद्र मागणी अर्ज स्विकारल्या जाणार नाही असे विभागीय मंडळाने कळविले आहे. 0000000 वृत्त क्र. 123                                                                   दि.- 30 सप्टेंबर 2021   दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर विशेष अनुदान योजना         

4 रोजी युवकांसाठी भरती मेळाव्याचे आयोजन /सहकारी गृहनिर्माण संस्थांची नामतालिका तयार करण्यासाठी अर्ज आंमत्रित

                                             4 रोजी युवकांसाठी भरती मेळाव्याचे आयोजन     अमरावती, दि. 28 : आयटीआय उत्तीर्ण युवकांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी येत्या 4 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता औद्योगिक प्रशिक्षण संस्था व मुलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सुचना केंद्र एन. एन. एस. हॉल, येथे भरती मेळावा आयोजित करण्यात येत आहे. या भरती मेळाव्यात सर्व नामांकित कंपनी आणि प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. सर्व व्यवसायातील आय.टी.आय.उतीर्ण, परीक्षेस बसलेले आणि जे प्रशिक्षाणार्थी परीक्षेस बसणार अशा सर्वांनी आवश्यक मुळे कागदपत्रे व बायोडाटासह उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थेचे अंशकालीन प्राचार्या सौ. एम. डी. देशमुख यांनी कळविले आहे. 00000 वृत्त क्र. 122                                                                                                          दि.28.9.2021 सहकारी गृहनिर्माण संस्थांची नामतालिका तयार करण्यासाठी अर्ज आंमत्रित अमरावती, दि. 28 :    विभागीय सहनिबंधक, ई वर्गातील संस्था म्हणजेच 250 पर्यत किंवा त्यापेक्षा कमी सभासद असणाऱ्या सहकारी गृहनिर्माण संस्थाच्या निवडणूकांसाठ

जागतिक पर्यटन दिनानिमित्त रविवारी हेरिटेज सायकल रॅली

  जागतिक पर्यटन दिनानिमित्त रविवारी हेरिटेज सायकल रॅली ·         स्वातंत्र्याचे 75 वर्षा निमित्त 75 सायकलपटू होणार सहभागी     अमरावती, दि. 21 : पर्यटन संचालनालयातर्फे   स्वातंत्र्याचे 75वर्षे, आझादी का अमृत महोत्सव आणि जागतिक पर्यटन दिनानिमित्त रविवार, दि. 26 सप्टेंबर रोजी हेरिटेज सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. यात पहिले नोंद करणारे 75 सायकलपटू सहभागी होतील.        जागतिक पर्यटन दिन 27 सप्टेंबर रोजी साजरा केला जाणार आहे. यानिमित्ताने पर्यटन संचालनालय व श्री शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालयव अमरावती टूर्स अँड ट्रॅव्हल्स असोसिएशन   यांच्या वतीने दिनांक 26 सप्टेंबर रोजी सकाळी 6 वाजता वेलकम पॉईट, नागपूर रोड येथून हेरिटेज सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.कोविड 19 च्या नियमांचे काटेकोर पालन होण्याच्या दृष्टीने या रॅलीमध्ये प्रथम नोंदणी करणाऱ्या 75 सायकलपटू सहभाग घेता येईल, सायकल रॅलीमध्ये सहभागी होणाऱ्यांना कोविडला प्रतिबंध घालण्याच्या दृष्टीने मास्क, सुरक्षित सामाजिक अंतर आणि सॅनिटायझर या त्रिसुत्रीचे पालन करणे आवश्यक राहिल , ही रॅली अमरावती   ते यावली (शहीद) आणि परत अमरा

सुधारीत बातमी, जागतिक पर्यटन दिनानिमित्त रविवारी हेरिटेज सायकल रॅली

  जागतिक पर्यटन दिनानिमित्त रविवारी हेरिटेज सायकल रॅली   अमरावती, दि. 21 : पर्यटन संचालनालयातर्फे जागतिक पर्यटन दिनानिमित्त रविवार दि. 26 सप्टेंबर रोजी हेरिटेज सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. यात निवड केलेले हौशी सायकलस्वार सहभागी होतील.         जागतिक पर्यटन दिन 27 सप्टेंबर रोजी साजरा केला जातो. यानिमित्ताने पर्यटन संचालनालय व इतर क्षेत्रातील सहभागी घटक यांच्या वतीने दिनांक 26 सप्टेंबर रोजी सकाळी 6 वाजता वेलकम पॉईट, नागपूर रोड येथून हेरिटेज सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. ही रॅली अमरावती   ते यावली (शहीद) आणि परत अमरावती अशी 60 कि. मी.   राहणार आहे, असे उपसंचालक (पर्यटन) विवेकानंद काळकर यांनी कळविले आहे. 000000    

महाडीबीटी प्रणालीवर अर्ज भरण्याची मुदत आता 30 सप्टेंबरपर्यंत मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीबाबत सूचना

  महाडीबीटी प्रणालीवर अर्ज भरण्याची मुदत आता 30 सप्टेंबरपर्यंत मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीबाबत सूचना   अमरावती, दि.21 : महाडीबीटी पोर्टलवर सन 2020 -2021 वर्षातील अनुसूचित जाती, विजाभज , इमाव व विमाप्र प्रवर्गासाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांचे नवीन तसेच नूतनीकरण करण्यासाठी विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यासाठी 30 सप्टेंबर 2021 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे .   सामाजिक न्याय विभाग व इतर मागास बहुजन कल्याण विभागाकडून महाडीबीटी प्रणालीवर अनुसूचित जाती, विजाभज , इमाव व विमाप्र प्रवर्गासाठी भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती , मॅट्रिकोत्तर शिक्षण फी परीक्षा फी,राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती तसेच व्यावसायिक पाठ्यक्रम आणि संलग्न वसतिगृहातील विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता या योजना राबविण्यात येतात . यासाठी महाविद्यालयांनी   https://mahadbtmahait.gov.in   या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांकडून ऑनलाइन अर्ज भरून घ्यावेत . तसेच यात काही अडचण आल्यास  ‘  सेंड बॅक ’ केलेल्या अर्जाची संबंधित महाविद्यालयांनी त्वरित त्रुटी पूर्तता करून घ्यावी तसेच महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांकडून वि

जागतिक पर्यटन दिन 27 रोजी हेरिटेज सायकल रॅलीचे आयोजन

  जागतिक पर्यटन दिन 27 रोजी हेरिटेज सायकल रॅलीचे आयोजन अमरावती, दि. 21 : 27 सप्टेंबर जागतिक पर्यटन दिन म्हणून साजरा केला जातो. जागतिक पर्यटन दिनाचे औचित्य साधून पर्यटन वाढीच्या दृष्टीने पर्यटन संचालनालय व इतर क्षेत्रातील सहभागी घटक यांच्या वतीने दिनांक 26 सप्टेंबर रोजी सकाळी 6 वाजता वेलकम पॉईट, नागपूर रोड येथून हेरिटेज सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. ही रॅलीचा मार्ग अमरावती ते यावली (शहीद) ते अमरावती असा एकूण 60 कि. मी.   एवढा रहाणार आहे. या रॅली मध्ये सहभागी व्हावे असे आवाहन उपसंचालक (पर्यटन) विवेकानंद काळकर यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

विभागीय आयुक्त कार्यालयात प्रबोधनकार ठाकरे यांना अभिवादन

इमेज
  विभागीय आयुक्त कार्यालयात प्रबोधनकार ठाकरे यांना अभिवादन अमरावती, दि. १७ : प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांना १३६ व्या जयंतीनिमित्त विभागीय आयुक्त पीयूष सिंह यांनी अभिवादन केले.   श्री. सिंह यांनी प्रबोधनकार ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. यावेळी उपायुक्त संजय पवार यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

दहावी व बारावीच्या खासगीरित्या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी 12 ऑक्टोबर पर्यंत नाव नोंदणी करावी

  दहावी व बारावीच्या खासगीरित्या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी 12 ऑक्टोबर पर्यंत नाव नोंदणी करावी अमरावती, दि. 16 : शैक्षणिक वर्ष 2022 मध्ये होणाऱ्या इयत्ता बारावी व दहावीच्या विद्यार्थ्यांनी खाजगीरित्या परीक्षा देण्यासाठी विद्यार्थ्यांना फॉर्म नं. 17 भरुन परीक्षेस प्रविष्ट होण्याची सुविधा शिक्षण मंडळाने उपलब्ध करुन दिली आहे. विद्यार्थ्यांनी दिनांक 16 सप्टेंबर ते 12 ऑक्टोबर पर्यंत नाव नोंदणी व शुल्क ऑनलाईन पदधतीने सादर करावे. दहावीच्या विद्यार्थ्यांनी http://form17.mh-ssc.ac.in   या संकेतस्थळावर तर बारावीच्या विद्यार्थ्यांनी http://form17.mh-hsc.ac.in या संकेतस्थळावर अर्ज सादर करावा.      दिनांक 17 सप्टेंबर ते 14 ऑक्टोबर पर्यंत मूळ अर्ज, ऑनलाईन नाव नोंदणी शुल्क जमा केल्याबाबत पोचपावतीच्या दोन छायाप्रती व मूळ कागदपत्रे अर्जावर नमूद केलेल्या संपर्क केंद्र शाळेत/कनिष्ठ महाविद्यालयामध्ये सादर करावी. दिनांक 18 ऑक्टोबर रोजी संपर्क केंद्र शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांनी ही कागदपत्रे व यादी विभागीय मंडळाकडे जमा करावी. शाळा सोडल्याचा व दाखला दिल्याचा दिनांक याबाबत पात्रतेसाठी शाळा सोड

शालांत परीक्षेसाठी समुपदेशकांची नियुक्ती

  शालांत परीक्षेसाठी समुपदेशकांची नियुक्ती अमरावती दि 16: शैक्षणिक वर्ष 2021 मध्ये सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यात उच्च माध्यमिक व माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा करीता विभागीय मंडळस्तरावर 4 समुदेशकांची नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना समुपदेशन, परीक्षेसंबंधी समस्याचे निराकरण, मार्गदर्शन करण्यासाठी सकाळी 8 वाजता ते सायंकाळी 8 वाजेपर्यत ते कार्यान्वीत असतील. हे समुपदेशनाचे कार्य दिनांक 16 सप्टेंबर ते 11 ऑक्टोबर 2021 या कालावधी दरम्यान सुरु ठेवण्यात येईल. भ्रमणध्वनीवरुन विद्यार्थ्यांचे समुदेशन करण्यात येणार असून समुदेशकांची नावे, भ्रमणध्वनी क्रमांक खालील प्रमाणे आहेत. अमरावती जिल्ह्यासाठी सी. एस. कोहळे 9423649541, अकोला जिल्ह्यासाठी एच आर. हिंगनकर 9371641764, यवतमाळसाठी ए. जी. ठमके9423625414, बुलडाणासाठी  व्ही. डी. भारसाकळे 9422926325, तसेच कार्यालयीन हेल्पलाईन दुरध्वनी क्रमांक 0721-2662608 हा असून विद्यार्थ्यांनी आपल्या समस्येचे निराकरण करण्यासाठी या क्रमांकाशी संपर्क साधावा असे विभागीय सहसचिव, तेजराव काळे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले   00000

पालकमंत्र्यांचा अतिवृष्टी भागात दौरा, नांदगाव खंडेश्वर, चांदुर रेल्वे भागाची केली पाहणी, भरपाईचे प्रस्ताव तत्काळ सादर करा - पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर

इमेज
  पालकमंत्र्यांचा अतिवृष्टी भागात दौरा नांदगाव खंडेश्वर, चांदुर रेल्वे भागाची केली पाहणी भरपाईचे प्रस्ताव तत्काळ सादर करा                                                                     - पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर अमरावती दि 11: अतिवृष्टीने झालेल्या नुकसानाचे पंचनामे पूर्ण करून भरपाईचे प्रस्ताव तत्काळ सादर करण्याचे निर्देश पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांनी आज नांदगाव खंडेश्वर व चांदुर रेल्वे तालुक्यातील पाहणी दरम्यान दिले. जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे निर्माण झालेल्या विविध भागातील पूरपरिस्थितीची पाहणी श्रीमती ठाकूर यांनी   केली. माजी आमदार वीरेंद्र जगताप,   उपविभागीय अधिकारी इब्राहिम चौधरी, नांदगाव खंडेश्वरचे   तहसीलदार पुरुषोत्तम भुसारी, कार्यकारी अभियंता विभावरी वैद्य, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनिल खर्चान आदी उपस्थित होते. नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील दाभा गावातील पाझर तलावाचे पाणी परिसरातील 32 घरांमध्ये शिरले. त्याचप्रमाणे धवळसरीच्या 5 आणि टीमटाळा येथील 3 घरांचे पावसामुळे नुकसान झाले. नुकसनाग्रस्तांना सानुग्रह अनुदानाची रक्कम तात्काळ प्रदान करण्यात यावी, असे

आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या जवानांनी 16 जणांचे वाचविले प्राण

  आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या जवानांनी 16 जणांचे वाचविले प्राण, 100 व्यक्तिंना सुरक्षित स्थळी हलविले जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली माहिती   अमरावती, दि.9: जिल्‍हयात पाऊस व पूरस्थितीमुळे विविध ठिकाणी अडकलेल्या 16 व्यक्तिंना जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या जवानांनी तातडीने पोहोचून सुखरुप बाहेर काढले, तसेच बडनेरा येथील 100 व्यक्तिंना सुरक्षित स्थळी हलविले.   शहरातील बडनेरा व इतर भागात पावसाचे पाणी शिरले असता, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या जवानांनी मोजा बडनेरा येथे पावसाच्या पाण्यात अडकलेल्या 100 व्यक्तींना सुखरुप बाहेर काढले. बडनेरा येथील झरी मंदीरात या सर्वांना स्थलांतरीत करण्यात आले. अशी माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आपत्ती कक्षाने आज दिली. तिवसा तालुक्यातील मोजा भिवापूर येथील तलावात 6 युवक अडकले होते. या 6 युवकांना आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या चमुने बाहेर काढले. मोजा शिवणगाव येथे नदीला पुर आल्यामुळे तेथील 30 लोक शिवणगाव येथे जाऊ शकले नाही, त्याकारणाने प्रशासनाने त्यांची फत्तेपुर येथील समाज मंदीरात राहण्याची व्यवस्था

विभागीय आयुक्त कार्यालयात राजे उमाजी नाईक यांना अभिवादन

                                                             विभागीय आयुक्त कार्यालयात राजे उमाजी नाईक यांना अभिवादन   अमरावती, दि. 7:- राजे उमाजी नाईक यांच्या जयंती दिनानिमित्त विभागीय आयुक्त कार्यालयातील सभागृहात विभागीय आयुक्त पियुषसिंह यांनी   आज राजे उमाजी नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी उपायुक्त (सामान्य प्रशासन) संजय पवार, उपायुक्त (पुनर्वसन) गजेंद्र बावणे, तहसिलदार वैशाली पाथरे, नाझर पेठे यांनीही   राजे उमाजी नाईक यांच्या प्रतिमेस‍ अभिवादन केले. विभागीय आयुक्त कार्यालयातील विविध विभागातील अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते. 00000  

जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीचा आढावा

इमेज
  जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीचा आढावा अमरावती, दि. 2 : जिल्ह्यातील अनुसूचित जाती, जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमानुसार घडलेला गुन्हा आणि त्यावर करण्यात आलेल्या कार्यवाहीचा आज आढावा घेण्यात आला. निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे यांनी जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीची बैठक घेऊन आढावा घेतला. जिल्हाधिकारी कार्यालयात ही बैठक घेण्यात आली.             जुलै महिन्यात शहरी आणि ग्रामीण भागात प्रत्येकी दोन प्रकरणे घडली. एप्रिल ते जुलैअखेर शहरी हद्दीत 12 तर ग्रामीण हद्दीत 19 अशी 31 प्रकरणे दाखल करण्यात आली आहेत. या प्रकरणांमधे शहरी व ग्रामीण हद्दीतील   अत्याचारग्रस्त व्यक्तींना अर्थसहाय करण्यासाठी 21 लाख रुपये मंजूर करण्यात आले आहे, अशी माहिती समाज कल्याणच्या सहायक आयुक्त माया केदार यांनी दिली. अर्थसहायचा प्रलंबित निधी प्राप्त करण्यासाठी आवश्यक ती प्रक्रिया पूर्ण करण्यात यावी, एप्रिल महिन्यातील 15 व मार्च महिन्यापूर्वीची 27 अशी जुलैअखेरपर्यंतची एकूण 42 प्रकरणे पोलिस तपास करीत आहेत. याबाबतची कार्यवाही तातडीने पूर्ण करावी, असे निर्देश उपजिल्हाधिकारी डॉ. व्यवहारे यांनी दिले. या बैठकी

राजुरा लघु पाटबंधारे प्रकल्पास 193 कोटींची सुधारीत प्रशासकीय मान्यता

  राजुरा लघु पाटबंधारे प्रकल्पास 193 कोटींची सुधारीत प्रशासकीय मान्यता *जिल्ह्यातील सहा गावांतील एक हजार हेक्टर सिंचन अमरावती, दि. 1 : चांदूरबाजार तालुक्यातील राजुरा लघु प्रकल्पास 193 कोटी रुपयांची सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली. या प्रकल्पाद्वारे 5.989 दलघमी इतका पाणीसाठा होणार असून जिल्ह्यातील सहा गावातील एक हजार हेक्टर क्षेत्रास सिंचनाचा लाभ होऊ शकणार आहे. पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या प्रयत्नाने सुधारीत प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. राजुरा लघु पाटंबधारे योजनेंतर्गत राजुरा नाल्यावर प्रस्तावित आहे. खारपणा पट्ट्यातील योजना आहे. राजुरा बृहत लघु प्रकल्पामध्ये बेलोरा गावाजवळ काशी नदीवर संधानकातील वळण बंधारा बांधून त्यातून पुरवठा कालव्याद्वारे राजुरा नाल्यावर प्रस्तावित राजुरा धरणात पाणी आणण्यात येणार आहे. या धरणापासून उजव्या कालव्याद्वारे सिंचन करण्याचे या प्रकल्पाचे नियोजन आहे. सदर प्रकल्पाचा उपयुक्त उपलब्ध पाणीसाठा 5.496 दलघमी राहणार आहे. या योजनेस विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाने 44 कोटी 79 लाख रुपये इतक्या रकमेस मुळ प्रशासकीय मान्यता प्रदान केली आहे. प्रकल्पाच