गुरुवार, २९ नोव्हेंबर, २०१८

इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षेत खासगीरित्या प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नाव नोंदणी व आवेदन अर्जाबाबत सूचना


इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षेत खासगीरित्या प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी
नाव नोंदणी व आवेदन अर्जाबाबत सूचना
Ø संकेतस्थळ- इ. 10 वी http://form17.mh-ssc.ac.in
Ø संकेतस्थळ- इ. 12 वी http://form17.mh-hsc.ac.in

अमरावती, दि. 27 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत माध्यमिक प्रमाणपत्र (इ. 12 वी) परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना खाजगीरित्या फॉर्म नं. 17 भरुन परीक्षेस प्रविष्ट होण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे.
फेब्रुवारी-मार्च 2019 मध्ये होणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.12 वी) परीक्षा व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. 10 वी) परीक्षेस खाजगीरित्या प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नियमित शुल्काने नावनोंदणी अर्ज (फॉर्म नं. 17) ऑनलाईन प्रक्रियेद्वारे स्विकारण्याचा यापूर्वीचा अंतिम कालावधी दिनांक 19 सप्टेंबर 2018 ते 3 ऑक्टोबर 2018 व विलंब शुल्काने दि. 26 ऑक्टोबर 2018 ते 6 नोव्हेंबर 2018 या दरम्यान तसेच अतिविलंब शुल्काने दि. 7 नोव्हेंबर 2018 ते 14 नोव्हेंबर 2018 निश्चित करण्यात आला होता.
याबाबत सर्व शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांना सुचित करण्यात येते की, इ. 10 वी व इ.12 वी खाजगी विद्यार्थी नावनोंदणी अर्ज अतिविलंब शुल्काने ऑफलाईन पध्दतीने स्विकारण्याच्या मुदतवाढीबाबतच्या तारखा खालीलप्रमाणे निश्चित करण्यात आलेल्या आहेत. त्याकरिता Blank Template Form  मंडळाच्या खालील संकेतस्थळ Website वर उपलब्ध आहे.
इ. 10 वी http://form17.mh-ssc.ac.in व इ. 12 वी http://form17.mh-hsc.ac.in या संकेतस्थळवर उपलब्ध आहे.
माध्यमिक शाळांनी/कनिष्ठ महाविद्यालयांनी अतिविलंब शुल्क प्रती विद्यार्थी रुपये 20/- प्रतिदिन स्विकारुन विभागीय मंडळाकडे ऑफलाईन पध्दतीने नाव नोंदणी अर्ज भरावयाच्या वाढीव तारखा इयत्ता 10 व 12 वीसाठी सोमवार दि. 26 नोव्हेंबर 2018 ते बुधवार दि. 5 डिसेंबर 2018 नाव नोंदणी अर्ज भरावयाच्या वाढीव तारीख आहे.
इयत्या 10 वीच्या विद्यार्थ्यांचे अतिविलंब शुल्कासह प्राप्त झालेले नाव नोंदणी अर्ज विहित शुल्क व मूळ कागदपत्रांसह त्यावर LATE FORM शेरा लिहून शुक्रवार दि. 7 डिसेंबर 2018 पर्यंत संपर्क केंद्रानी विभागीय मंडळाकडे हस्तपोहोच जमा करावेत. तसेच इयत्ता 12 वीच्या विद्यार्थ्यांनी त्यांचे नाव नोंदणी अर्ज विहित शुल्क व मूळ कागदपत्रांसह त्यावर LATE FORM शेरा लिहून विभागीय मंडळ कार्यालयात दि. 7 डिसेंबर 2018 पर्यंत हस्तपोहोच जमा करावेत. अतिविलंब व इतर शुल्क रोख स्वरुपात मंडळात जमा करुन घेण्यात येईल, असे पुणे राज्य मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसल यांनी कळविले आहे.  


दहावी व बारावीची परीक्षेचे वेळापत्रक संकेतस्थळावर उपलब्ध


दहावी व बारावीची परीक्षेचे वेळापत्रक
संकेतस्थळावर उपलब्ध

अमरावती, दि. 29 : फेब्रुवारी - मार्च 2019 मध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यामिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपुर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातुर कोकण या नउ विभागीय मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या इयत्ता 12 वी इयत्ता 10 वी ची लेखी परीक्षांचे संभाव्य वेळापत्रके मंडळाच्या अधिकृ संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आलेले आहे.अंतिम वेळापत्रकानुसार इयत्ता 12 वीची लेखी परीक्षेचा कालावधी दि 21 फेब्रुवारी 2019 ते 20मार्च 2019 आणि इयत्ता 10 वीची लेखी परीक्षा दिनांक 1 मार्च 2019 ते दिनांक 22 मार्च 2019 पर्यंत आयोजित करण्यात आली आहे. या कालावधीमध्ये आयोजित केलेली दिनांकनिहासविस्तर अंतिम वेळापत्रके मंडळाच्या अधिकृ www.mahahsscboard.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आले आहे. शैक्षणिवर्ष 2018-19 पासुन इयत्ता दहावी करीता पुनर्रचित अभ्यासक्रम असल्याने पुनपरीक्षार्थ्याकरिता अंतिम संधी असलेले जुन्या अभ्यासक्रमाचे स्वतंत्र वेळापत्रक तयार करण्यात आले आहे. मंडळाच्या संकेंतस्थळावरील वेळापत्रक परीक्षेपुर्वी माध्यामिक शाळा/उच्च माध्यामिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालय यांचेकडे छापील स्वरुपात देण्यात येणारे वेळापत्रक अंतिम असेल. परीक्षेच्या तारखांची खात्री विदयार्थ्यानी छापील वेळापत्रकावरुन करावी. अन्य संकेंतस्थळावरुन किंवा अन्य यंत्रणेने छपाई केलेले तसेच व्हॉटसॲप किंवा तत्सम माध्यमातून व्हायरल झालेले वेळापत्रक ग्राह्य धरु नये. प्रात्यक्षिक परीक्षा, श्रेणी, तोंडी परीक्षा व अन्य विषयांचे वेळापत्र‍क स्वतंत्रपणे परीक्षेपूर्वी मंडळामार्फत शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांना कळविण्यात येईल, असे राज्यमंडळाचे सचिव डॉ.अशोक भोसले यांनी कळविले आहे.           
000000

मंगळवार, २७ नोव्हेंबर, २०१८

जीव वाचविण्यासाठी रक्तदान महत्त्वपूर्ण -रमेश मावस्कर


जीव वाचविण्यासाठी रक्तदान महत्त्वपूर्ण

-रमेश मावस्कर
Ø  21 कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान
Ø   अधिकारी-कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी

अमरावती, दि. 27 : रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान मानले जाते. वैद्यकीय क्षेत्रात रक्तदानाला अनन्य साधारण महत्त्व आहे. आपल्या रक्तदानाने एखाद्याचा जीव वाचविण्यास मदत होत असल्यामुळे प्रत्येकाने सातत्याने रक्तदान करावे, असे आवाहन पुरवठा उपायुक्त रमेश मावस्कर यांनी केले.
विभागीय आयुक्त कार्यालयात जिल्हा सामान्य रुग्णालयातर्फे आज रक्तदान व ओराग्य तपासणी शिबीर घेण्यात आले. शिबिराच्या उद्घाटनावेळी ते बोलत होते. अपर आयुक्त मंगेश देशमुख, पुनर्वसन उपायुक्त प्रमोद देशमुख, उपायुक्त श्री. निपाने, सहायक आयुक्त जी. व्ही. सुरंजे, जिल्हा सामान्य रुग्णालयाचे डॉ. नानवाणी, युनिक हेल्थकेअर ॲन्ड मेडिकल सर्व्हिसेसचे संचालक डॉ. नरेंद्र पाटील, जिल्हा सामान्य रुग्णालयाचे गजेंद्र बेलसरे, मनोज सहारे, उद्धव जुकरे यांच्यासह आरोग्य विभागाचे डॉक्टर आणि अधिपरिचारीका उपस्थित होत्या.
श्री. मावस्कर म्हणाले, ‘रक्तदान श्रेष्ठदान’ या म्हणण्यानुसार अपघातग्रस्त किंवा आजारी व्यक्तीचा जीव वाचविणारे रक्तदान खऱ्या अर्थाने अतिशय श्रेष्ठदान आहे. रक्तदानामुळे रक्तदात्यालाही अनेक फायदे होतात. मात्र रक्तदान करताना योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे. रक्तसंक्रमणातून होणारे संसर्ग आजारी व्यक्तीचा जीव घेण्यास कारणीभूत ठरु शकतो. प्रत्येक नागरिकाने रक्तदान करावे. मनातील गैरसमज दूर करून न घाबरता रक्तदान करण्याची आवश्यकता आहे. रक्तदानाने दात्यास कोणताही धोका नसतो.
रक्तदान करताना डोके आणि मन शांत ठेवणे गरजेचे आहे. रक्तदानासाठी वापरली जाणारी पिशवी आणि सुई नवीन असल्यास काळजीचे कोणतेही कारण नसते. पहिल्यांदाच रक्तदान करीत रक्तपेढीतील कर्मचाऱ्यांकडून यासंबंधीची काळजी घेण्यात येते, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
डॉ. नरेंद्र पाटील यांनी कुटुंब स्वास्थ योजनेची वैशिष्ट्ये आणि युनिक हेल्थकेअर ॲन्ड मेडिकल सर्व्हिसेस या वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थेविषयी सविस्तर माहिती दिली. कॅशलेस वैद्यकीय प्रतिपूर्ती संदर्भात कंपनीद्वारे पुरविण्यात येणाऱ्या सुविधांविषयी माहिती दिली. राज्यातील मुंबई, नाशिक, नागपूर, अमरावती, औरंगाबाद, कोल्हापुर, जळगाव, धुळे, पुणे, सोलापूर, कोकण या शहरात युनिक हेल्थकेअरव्दारे पॅनल असलेल्या नामांकीत रुग्णालयात उपचार करण्यासाठी शासकीय कर्मचारी आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या व्यक्तींना कॅशलेस उपचार पद्धतीचा लाभ देण्यात येतो. राज्यातील शासकीय अधिकारी, कर्मचारी यांनी कुटुंब स्वास्थ योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
शिबिरात विविध रक्त चाचण्या, रक्तातील साखरेचे प्रमाण, रक्तदाब, एचआयव्ही संदर्भात अधिकारी-कर्मचारी यांची तपासणी करण्यात आली. व्यसनाचे दुष्परिणाम, थॅलेसिमिया, हिमोफिलीया, सिकलसेल, राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग प्रतिबंध आणि नियंत्रण, महालॅब्स आदीविषयी मनोज सहारे आणि उद्धव जुकरे यांनी माहिती दिली. शिबिरात विभागीय आयुक्त कार्यालयातील 21 अधिकारी-कर्मचारी यांनी रक्तदान केले. तसेच सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांनी विविध आरोग्य तपासण्या केल्या.
कार्यक्रमासाठी तहसीलदार वैशाली पाथरे, विवेक काळकर, रवि महाले, प्रशांत अडसूळे तसेच विभागीय आयुक्त कर्मचारी संघटनेचे उद्धव काळे, सुजन सोळंके, राजेश चौधरी, सुधीर धावळे, संजय कडू, शरद लोणारे, अतुल बुटे, रविंद्र मोहोड, संबंधा ठाकरे, रुपाली चन्ने, कल्पना वरोकार, विजय इंगळे, उमेश मोहुर्ले आदींनी पुढाकार घेतला. सर्व कर्मचाऱ्यांनी आरोग्य शिबिरास उत्स्फुर्त प्रतिसाद दिला.











शुक्रवार, १६ नोव्हेंबर, २०१८

पालकमंत्र्यांकडून शहरात स्वच्छता कामांची पाहणी
बाजार व गर्दीच्या ठिकाणी स्वच्छता मोहिम प्रभावीपणे राबवा
                           -पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील

           अमरावती, दि. 16:  शहरातील विविध बाजारांची, गर्दीची व सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता काटेकोर असली पाहिजे. अस्वच्छतेबाबत स्थानिक नगरसेवकांच्या तक्रारी लक्षात घेऊन महानगरपालिका प्रशासनाने आवश्यक ती कार्यवाही करावी व स्वच्छतेच्या कामांत सातत्य ठेवावे, असे निर्देश पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील यांनी आज दिले.
  पालकमंत्र्यांनी स्थानिक नगरसेवकांसह आज शहरात स्वच्छता कामांची पाहणी केली. त्यावेळी ते बोलत होते. महापालिकेचे आयुक्त संजय निपाणे, पालिकेच्या आरोग्याधिकारी श्रीमती नैताम, अतिक्रमण निर्मूलन अधिकारी श्री. कुत्तरमारे, स्वच्छता निरीक्षक यावेळी उपस्थित होते.
  स्वच्छता पाहणी दौऱ्यात शंकरनगर, फरशी स्टॉप, गौरक्षणाच्या बाजूचा दस्तुरनगर, शिवधारा नेत्रालय, जयभारतनगर चपराशीपुरा, बेलपुरा, रेल्वेस्टेशन, जुना कॉटन मार्केट रोड आदी परिसराची पालकमंत्र्यांनी पाहणी केली. त्यानंतर त्यांनी भाजी बाजार व इतवारा बाजारातील भागांची पाहणी केली.  यावेळी पालकमंत्र्यांनी नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या.
            श्री. पोटे पाटील म्हणाले, नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने तसेच साथीच्या रोगांच्या प्रतिबंधासाठी परिसर स्वच्छ असणे अत्यंत आवश्यक आहे. भाजीबाजार, इतवारा बाजारातील भाजीविक्रेत्या व दुकानदारांना कायमस्वरुपी सिमेंट-काँक्रिटचे ओटे बांधून द्यावे. परिसरात सांडपाण्याची सुरळीत व्यवस्था होण्यासाठी नाल्यांचे बांधकाम करावे. सडक्या भाजीपाल्याची दुर्गंधी व मोकाट गुराढोरांचा वावर रोखण्यासाठी जागोजागी कंटेनर ठेवावे आणि त्याची नित्याने साफसफाई करावी. नागरिकांना येणे-जाणे सोयीचे व्हावे यासाठी भाजीपाला विक्रेता व दुकानदारांना साहित्य आपल्या जागेतच ठेवण्यास सूचित करावे. परिसरात स्वच्छता मोहिम प्रभावीपणे राबवावी, असे आदेश त्यांनी  दिले.
            स्वच्छतेच्या ठेक्यासंदर्भात नगरसेवकांच्या तक्रारी आहेत. स्वच्छतेच्या ठेक्यांची प्रक्रिया नव्याने राबवून तक्रारींचा तातडीने निपटारा करावा, असेही त्यांनी मनपा प्रशासनाला आदेश दिले. यावेळी प्रभागाचे नगरसेवक, भाजीपाला विक्रेते, दुकानदार उपस्थित होते.

















शनिवार, ३ नोव्हेंबर, २०१८

पीककर्ज वितरणाची गती वाढवावी
                          - किशोर तिवारी

Ø  शेतीपूरक व्यवसायासंबंधी शेतकऱ्यांना मार्गदर्शन

       अमरावती, दि. 3 : रब्बीचा हंगाम सुरू झाला असून, पीककर्ज वाटपाची टक्केवारी कमी आहे. पीककर्ज वाटपात सहकारी बँकेसह राष्ट्रीयकृत बँकांची जबाबदारी मोठी आहे. त्यामुळे पीककर्ज मेळावे आदी माध्यमातून कर्जवितरणाची गती वाढवावी, अशी सूचना कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी आज केली.
शुक्रवार, 2 नोंव्हेंबर रोजी, विभागीय आयुक्त कार्यालयात शेती विकास कामांचा आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. विभागीय आयुक्त पियूष सिंह, अपर आयुक्त मंगेश मोहिते, जिल्हाधिकारी अभिजित बांगर, पुरवठा उपायुक्त रमेश मावसकर, लिड बँक मॅनेजर तसेच सहकार व कृषी विभागाचे प्रमुख आदी यावेळी उपस्थित होते.
        श्री. तिवारी म्हणाले, विभागात पीककर्ज वाटपाची स्थिती समाधानकारक नाही. रब्बीचा हंगाम सुरू झाला असून, शेतकऱ्यांना शेतीकामासाठी पैश्यांची आवश्यकता आहे. यात बँकांनी गांभीर्याने काम केले पाहिजे. काही शेतकरी कर्जदार तांत्रिकदृष्ट्या अडचणी आल्यामुळे पीक कर्जाच्या लाभापासून दूर राहिले. अशा तांत्रिक अडचणी दूर करून त्यांना कर्जाचा लाभ मिळवून द्यावा, असेही ते म्हणाले. 
        राष्ट्रीयीकृत बँकांना जिल्हा बँकांपेक्षा अधिक कर्जवाटपाचे उद्दिष्ट दिले आहे. त्यामुळे जिल्हा बँकांचे कर्ज नसल्याचे प्रमाणपत्र घेऊन राष्ट्रीयकृत बँकांनी शेतकऱ्यांना कर्ज वाटप करावे. बँकांनी कर्ज दिल्यास शेतकरी सावकाराकडून कर्ज घेण्यापासून परावृत्त होऊ शकतो. त्यामुळे बँकांनी शेतकरी कर्जवाटपासाठी सकारात्मक धोरण राबवावे. जलयुक्त शिवार योजनेबाबत अहवाल देण्याचे निर्देश त्यांनी दिले.
        शेतीपिकांवर अवलंबून राहून शेतकऱ्यांना लाभ मिळणार नाही. त्यासाठी जोडधंदा आणि शेतीपिकांवर प्रक्रिया करण्यासाठी शेतकरी उत्पादन संघांना प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. कृषी विभागाने जिल्ह्यात कोणत्या प्रक्रिया उद्योगांना प्रोत्साहन देऊ शकतो, हे विचारात घेऊन उत्पादक संघांचे प्रस्ताव मान्य करावे. त्यांना बँकांनी कर्ज उपलब्ध करुन देऊन शासनाने या कर्जाची हमी घेण्यासाठीही प्रयत्न करावा. त्यासोबतच कुक्कुटपालन, दुग्ध आणि मत्स्य व्यवसायासाठी शासनाने पुढाकार घेऊन शेतकऱ्यांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन श्री. तिवारी यांनी केले.
        यासोबतच वंचित आदिवासी आणि शेतकऱ्यांना अन्न धान्याचा पुरवठा व्हावा, आरोग्य सुविधा सुधारण्यासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदभरती, जीवनदायी आरोग्य योजनेत रूग्णालयांचे संलग्नीकरण, शेतीपंपांना वीज जोडणी, महात्मा फुले जनआरोग्य योजना, किटकनाशक फवारणी, बळीराजा चेतना अभियान, सिंचन प्रकल्पांमुळे विस्थापित झालेल्यांचे पुनर्वसन आदींबाबत आढावा घेतला.


फासेपारधी समाजाच्या उध्दारासाठी शासन कटिबध्द
       फासेपारधी समाजाचे मागासलेपण दूर करणे तसेच त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासनाव्दारे विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येतात. मुख्यत्वे आदिवासी विकास विभागाव्दारे फासेपारधी यांच्यासाठी योजना राबविण्यात येतात.  पॅकेज अंतर्गत येणारा निधी हा एकात्मिक विकास कार्यक्रम राबवून प्रत्येक पारधी बेड्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी उपयोग करावा, अशा सूचना श्री. तिवारी यांनी केली.

            सन 1982 पासून फासे पारधी लोक हे ई क्लास व वनजमीनीवर अतिक्रमण करुन राहत आहेत. पंरतू आजपर्यंत त्यांचे अतिक्रमण हे नियमानूकुल करण्याची मागणी मतीन भोसले यांनी मांडली. यासंबंधी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महसूल विभागातर्फे नियमानुसार कार्यवाही करुन मार्ग काढण्यात येईल, असे ठरविण्यात आले.