मंगळवार, २८ जुलै, २०२०

उद्या दुपारी एक वाजता दहावीचा निकाल होणार जाहिर


उद्या दुपारी एक वाजता दहावीचा निकाल होणार जाहिर
* संकेतस्थळावर मिळणार निकाल
अमरावती, दि. 28 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या परिक्षांचा निकाल बुधवार, दि. 29 जुलै 2020 रोजी दुपारी एक वाजता जाहिर करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना संकेतस्थळावर त्यांचा निकाल बघता येणार आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत मार्च 2020 मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (दहावी) परीक्षेचा निकाल मंडळाच्या www.mahresult.nic.in www.sscresult.mkcl.org www.maharashtraeducation.com www.mahresult.nic.in या अधिकृत संकेतस्थळावर बुधवार, दि. 29 जुलै रोजी दुपारी एक वाजता ऑनलाईन जाहिर करण्यात येणार आहे, अशी माहिती राज्य मंडळाचे सचिव अशोक भोसले यांनी दिली.
ऑनलाईन निकालानंतर दुसऱ्या दिवसापासून उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेस प्रविष्ठ झालेल्या विद्यार्थ्यास स्वत:च्या अनिवार्य विषयांपैकी (श्रेणी विषयांव्यतिरिक्त) कोणत्याही विशिष्ट विषयात त्या त्यांने संपादित केलेल्या गुणांची गुणपडताळणी व उत्तरपत्रिकांच्या छायाप्रत, पुनर्मूल्यांकन व स्थलांतर प्रमाणपत्रासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पध्दतीने मंडळाच्या http://verification.mh-ssc.ac.in या संकेतस्थळावर स्वत: किंवा शाळांमार्फत अर्ज करण्याची सोय परीक्षेपासून उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे.
        अटी/शर्ती व सूचना संकेतस्थळावर देण्यात आलेल्या आहेत. प्रविष्ठ विद्यार्थी गुणपडताळणीसाठी दिनांक 30/07/2020 ते 08/08/2020 पर्यंत व छायाप्रतीसाठी 30 जुलै ते 18 ऑगस्ट 2020 पर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकतील. ऑनलाईन पध्दतीने शुल्क Debit Card/Credit Card/UPI/Net Banking द्वारे भरू शकतील.
मार्च 2020 परीक्षेच्या उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरुन करण्यासाठी प्रथम उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे आवश्यक आहे. छायाप्रत मिळाल्याच्या दिवसापासून कार्यालयीन कामाच्या पाच दिवसांत पुनर्मूल्यांकनाच्या कार्यपध्दतीचा अवलंब करुन विहित नमुन्यात विहित शुल्क भरुन संबंधित विभागीय मंडळाकडे विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकन करावयाचे असेल त्यांनी अधिक माहितीसाठी संबंधित विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा.
मार्च 2020 च्या माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेस सर्व विषयांसह प्रविष्ट होऊन उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लगतच्या दोनच संधी श्रेणी/गुणसुधार (Class Improvement Scheme) उपलब्ध राहतील, असेही कळविण्यात आले आहे.
00000

शनिवार, २५ जुलै, २०२०

राज्यात गेल्या 10 वर्षातली विक्रमी कापूस खरेदी

 राज्यात गेल्या 10 वर्षातली विक्रमी कापूस खरेदी

मंत्रिमंडळाने केले अभिनंदन

अमरावती, दि. 25 :  राज्यात कोरोनाची परिस्थिती तसेच पावसाला सुरुवात झालेली असून देखील पणन विभागाने विक्रमी 218.73 लाख क्विंटल कापसाची खरेदी केली आहे.  काल 23 जुलै रोजी या संदर्भात मंत्रिमंडळाने या कापूस खरेदीसाठी केलेल्या प्रयत्नांबद्धल मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच सहकार व पणन मंत्र्यांचे अभिनंदन केले. गेल्या 10 वर्षात झाली नाही अशी विक्रमी खरेदी झाल्याचे प्रधान सचिव, पणन अनुप कुमार यांनी एका सादरीकरणाद्धारे सांगितले.

या खरेदीचे एकूण मुल्य 11,776.89 कोटी रुपये असून आतापर्यात 11,029.47 कोटी इतकी रक्कम शेतकऱ्यांना अदा करण्यात आली आहे.  तसेच सीसीआय ने 30 सप्टेंबर 2020 पर्यंत एफएक्यू दर्जाचा कापूस खरेदी करणार असल्याचे घोषित केले आहे.

राज्यात सीसीआय व राज्य कापूस पणन महासंघाने कोव्हिड-19 च्या प्रादुभावापूर्वी अनुक्रमे 91.90 व 54.03 लाख क्विंटल अशी एकूण 145.93 क्विंटल कापूस खरेदी केली.

कोव्हिड-19 च्या प्रादुभावामुळे कापसाचे बाजारातील दर हमीपेक्षा कमी असल्यामुळे, शेतकऱ्यांचा कल, शासकीय खरेदी केंद्रावर विकण्याचा होता.  त्यानुसार शासकीय खरेदी नियोजन करून कोव्हिड-19 च्या काळात सीसीआय व कापूस पणन महासंघाने आतापर्यंत अनुक्रमे 35.70 व 36.75 लाख याप्रमाणे 72.45 लाख क्विंटल कापूस खरेदी केला आहे.

राज्यातील शासकीय व खासगी अशी एकूण खरेदी 418.8 लाख क्विंटल झाली असून वास्तविक पहाता 410 लाख क्विंटल कापूस खरेदी अपेक्षित होती.  एकूण 8 लाख 64 हजार 72 शेतकऱ्यांकडून कापूस खरेदी करण्यात आला.

-----०-----

गुरुवार, २३ जुलै, २०२०

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना अभिवादन


लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना अभिवादन


अमरावती, दि. 23 : येथील विभागीय आयुक्त कार्यालयात लोकमान्य बाळगंगाधर टिळक जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.
विभागीय आयुक्त पियूष सिंह यांनी लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
*****




*****

सोमवार, १३ जुलै, २०२०

प्रधानमंत्री पिक विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी 31 जुलै पर्यंत अर्ज सादर करावे


प्रधानमंत्री पिक विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी
शेतकऱ्यांनी 31 जुलै पर्यंत अर्ज सादर करावे

अमरावती, दि. 13 : अमरावती विभागात बुलडाणा, अकोला, वाशिम , अमरावती व यवतमाळ या जिल्ह्यात प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप व रबी हंगाम वर्ष 2020-21 पासून तीन वर्षाकरीता राबविण्यात येत आहे. शेतकऱ्यांनी या योजनेत सहभागी व्हावे असे आवाहन विभागीय कृषी सहसंचालक यांनी केले आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी बँकेकडे विमा हफ्त्यासह 31 जुलै पर्यंत आपले प्रस्ताव सादर करावे.
             या योजनेचा लाभ कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी ऐच्छिक स्वरुपाचा आहे. खातेदाराचे व्यतिरिक्त कुळांने किंवा भाडेपट्टीने शेती करणारे शेतकरी या योजनेत भाग घेण्यास पात्र आहेत. या योजनेअंतर्गत वास्तवदर्शी दराने विमा हप्ता दर 30 टक्के पेक्षा जास्त नमुद केला आहे. त्यासाठी वाढीव विमा हप्ता अनुदान भार राज्य शासनावर आकारण्यात येणार असून शेतकऱ्यांवरील विमा हप्त्याचा भार कमी करण्यासाठी शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता हा खरीप हंगामासाठी 2 टक्के, रब्बी हंगामासाठी 1.50 टक्के व नगदी पिकांसाठी 5 टक्के असा मर्यादीत ठेवण्यात आला आहे. या योजनेअंतर्गत खरीप व रब्बी हंगाम सन 2020-21 ते 2022-23 या तीन वर्षाकरीता जोखिमस्त्र सर्व पिकांसाठी 70 टक्के असा निश्चित करण्यात आला आहे. विमा क्षेत्र घटका अंतर्गत मंडळ गट आणि तालुका गट स्तरावर ही योजना राबविण्यात येत आहे.
या वर्षीच्या खरीप हंगाम 2020-21 मध्ये प्रधानमंत्री पिक विमा योजनेत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी होऊन पिक विमा योजनेचा लाभ घ्यावा. यासंबंधीच्या अधिक माहितीकरीता जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, उपविभागीय कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी, मंडळ कृषि अधिकारी या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन विभागीय कृषी सहसंचालक, अमरावती विभाग सुभाष नागरे यांनी केले आहे.
*****

गुरुवार, ९ जुलै, २०२०

प्रायोगिक तत्वावर दहावी, बारावीचे वर्ग पाच ऑगस्टपासून सुरू - राज्यमंत्री बच्चू कडू








प्रायोगिक तत्वावर दहावी, बारावीचे वर्ग पाच ऑगस्टपासून सुरू
            - राज्यमंत्री बच्चू कडू
Ø पाचवीचे 21 जुलैपासून ऑनलाईन वर्ग
Ø सक्तीने शुल्‍क वसुली करणाऱ्या शाळांवर कारवाई
Ø पहिली, दुसरीच्या ऑनलाईन शिक्षणावर बंदी
अमरावती, दि. 9 : राज्यातील आपत्कालीन परिस्थितीमुळे शालेय शिक्षण सुरू होण्यास अडचणी आल्या आहेत. या परिस्थितीचा सामना करून शिक्षण सुरू करणे गरजेचे आहे. यासाठी दहावी आणि बारावीचे वर्ग पाच ऑगस्टपासून प्रायोगिक तत्वावर प्रत्यक्ष पद्धतीने सुरू करण्यात येणार आहे. तसेच 21 जुलैपासून पाचवीचे वर्ग ऑनलाईन पद्धतीने सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिली.
सध्याच्या परिस्थितीत शिक्षण सुरू करण्यासंदर्भात आज येथील जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेत श्री. कडू यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. यावेळी उपसंचालक अंबादास पेंदोर, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य रविंद्र आंबेकर यांच्यासह पाचही जिल्ह्यातील शिक्षण विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
श्री. कडू म्हणाले, खासगी शाळांनी सर्व वर्गांचे ऑनलाईन शिक्षण सुरू केले आहे. यामुळे खासगी आणि शासकीय शाळांतील विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक विषमता वाढेल. यावर उपाय म्हणून शिक्षण विभागाच्या शाळाही सुरू होणे गरजेचे आहे. यासाठी पहिल्या टप्प्यात दहावी आणि बारावीचे प्रत्यक्ष वर्ग सुरू होणार आहे. यामध्ये प्रत्येक तालुक्यातील एक शाळा सुरू करण्याचे नियोजन करावे. शाळा सुरू करण्यासाठी येणाऱ्या अडचणी दूर करून इतरही ठिकाणच्या शाळा सुरू करण्यासाठी प्रयत्न करावेत. शाळा सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांचा अभिप्राय घेण्यात यावा. यासाठी त्रयस्थ म्हणून गावातील सरपंच किंवा समिती सदस्यांची मदत घ्यावी.
प्रत्यक्ष शिक्षण पद्धती इतर कोणत्याही पर्यायापेक्षा जास्त प्रभावी आहे. परंतु सध्यास्थिती लक्षात घेता इतर वर्गाच्या शाळा ऑनलाईन सुरू करण्यासाठी प्रयत्न करावेत. अमरावती विभागात सुमारे एक लाख 19 हजार विद्यार्थ्यांकडे ऑनलाईन शिक्षणाची सोय नाही. त्यांच्यापर्यंत कशाप्रकारे शिक्षण पोहोचविता येईल, याचाही विचार होणे गरजेचे आहे. शिक्षण देण्याच्या इतर पद्धती सुचविण्यात याव्यात. ज्या ठिकाणी शाळा सुरू झाल्या आहेत, त्याठिकाणी किती अभ्यासक्रम शिकविण्यात आला आहे, याबाबतही अहवाल मागविण्यात यावा. तसेच विलगीकरणासाठी शाळा उपयोगात आणल्या आहेत, या शाळा पुन्हा ताब्यात घेतेवेळी निर्जंतुकीकरण करून घ्याव्यात.
शासनाने पहिली आणि दुसरीचे ऑनलाईन शिक्षण घेऊ नये, असा निर्णय घेतला आहे. तरीही काही शाळा केवळ शुल्क वसुल करण्यासाठी वर्ग घेत असल्याचे निदर्शनास आले आहे.  मात्र याबाबत अद्यापपर्यंत एकाही शाळेवर कारवाई करण्यात आलेली नाही. तसेच काही शाळा विद्यार्थ्यांना पुस्तके घेण्यासाठी सांगत आहेत, मनाई असताना काही शाळेतच पुस्तक विक्री करण्यात येत आहे. यानंतर तक्रार प्राप्‍त झाल्यास शाळा व्यवस्थापनासह शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना जबाबदार धरून फौजदारी कारवाई करण्यात येईल, असेही श्री. कडू यांनी सांगितले.
00000



बुधवार, ८ जुलै, २०२०

विभागीय लोकशाही दिन


विभागीय लोकशाही दिन
नागरिकांनी त्यांच्या तक्रारी पोस्टाने पाठवाव्या

अमरावती, दि. 8 : दर  महिन्यांच्या  दुसऱ्या सोमवारी  विभागीय लोकशाही  दिनाचे आयोजन करण्यात येते.  परंतू कोविड - 19 च्या आपात्कालीन परिस्थितीमुळे या महिन्यात विभागीय लोकशाही दिनाचे आयोजन होणार नसल्याचे विभागीय आयुक्त यांनी कळविले आहे. नागरिकांनी त्यांच्या विभागीय लोकशाही दिनातील तक्रारी, विभागीय आयुक्त कार्यालयात पोस्टाव्दारे  किंवा  dcg.amravati@gmail.com - dcg amravati@rediffmail.com     या  ई मेलवर  पाठवाव्या  असे आवाहन विभागीय आयुक्त पीयुष सिंह  यांनी केले आहे.

मंगळवार, ७ जुलै, २०२०

माहिती आयुक्त कार्यालयात अत्याधुनिक तंत्रज्ञान


माहिती आयुक्त कार्यालयात अत्याधुनिक तंत्रज्ञान
Ø नव्या सॉफ्टवेअरने जलद सुनावणी
Ø कार्यालय पेपरलेस होण्यास मदत
Ø ‘टेलिग्रामवरून दररोज माहिती
अमरावती, दि. 7 : लॉकडाऊनच्या काळात राज्य माहिती आयुक्त कार्यालय अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करीत आहे. कामकाजातील सर्वात मोठा भाग असलेल्या  सुनावणी ऑनलाईन करून गती देण्यात आली आहे. याशिवाय कार्यालयीन कामकाजात तंत्रज्ञानाचा कुशलतेने उपयोग करण्यात येत आहे. अपिलाची नोटीस ते सुनावणीसाठी नवे सॉफ्टवेअर अंगीकारून प्रकरणे निकाली काढण्यात येत आहेत. या सॉफ्टवेअरच्या उपयोगामुळे येत्या काळात दररोज सुमारे 70 प्रकरणे निकाली काढण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.
            राज्य माहिती आयोगाच्या अंतर्गत येणाऱ्या पाच जिल्ह्यासाठी ऑनलाईन कार्यप्रणाली तयार करण्यात आली आहे. ऑनलाईन कामकाजासाठी प्रत्येक जिल्ह्यासाठी एक सहायक कक्ष अधिकारी नेमण्यात आला आहे. तसेच दोन कक्ष अधिकारी नियंत्रण करणार आहेत. ही प्रकरणे ऑनलाईन होण्यासाठी नव्याने विकसित करण्यात आलेल्या सॉफ्टवेअरमध्ये माहिती अधिकारांतर्गत संबंधित जनमाहिती अधिकाऱ्याकडे सादर करण्यात आलेला पहिला अर्ज ते राज्य माहिती आयुक्तांकडे अपिल येण्यापर्यंत सर्व माहिती भरण्यात येणार आहे. याशिवाय संबंधित जनमाहिती अधिकारी, अपिलीय अधिकारी यांचे संपर्क क्रमांक आणि ई-मेलही याच सॉफ्टवेअरमध्ये भरण्यात येणार आहे. त्यामुळे प्रकरणांची निवड करून वेळी सर्व संबंधितांना एकाचवेळी नोटीस बजावणे शक्य होणार आहे. यात डाक, कागद, मनुष्यबळ यांचा कमीत कमी उपयोग होईल, त्याचबरोबर या सर्व कामासाठी लागणारा वेळी वाचणार आहे.
            सध्यास्थितीत राज्य माहिती आयुक्त कार्यालयात नऊ हजाराहून अधिक प्रकरणे प्रलंबित आहेत. ही प्रकरणे निकाली काढण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे. एका दिवशी एक जिल्हा याप्रमाणे दररोज किमान 70 सुनावण्या घेऊन येत्या नऊ-दहा महिन्यात ही प्रकरणे निकाली निघतली. सुनावणीनंतर दिले जाणारे आदेशही ऑनलाईन प्रणालीद्वारे करण्यात येणार आहेत. दरम्यानच्या काळात नवीन येणारे प्रकरणेही सुनावणीसाठी घेण्यात येणार आहेत. या सॉफ्टवेअरचा पूर्ण क्षमतेने उपयोग करून घेण्यासाठी अर्जदारांनी आपला सुरवातीपासून ते राज्य माहिती आयुक्त कार्यालयापर्यंतचे सर्व अर्ज संगणकीकृत करणे गरजेचे आहे. तसेच अर्जावर भ्रमणध्वनी आणि ई-मेल आयडी लिहिणे आवश्यक आहे.
‘टेलिग्राम’वरून माहिती
जन माहिती अधिकारी, प्रथम अपिलीय अधिकारी आणि कार्यालय प्रमुखांना माहिती अधिकाराबाबत माहिती हवी असल्यास त्यांनी माहिती आयुक्तांना संपर्क साधावा, तसेच उपयुक्त माहिती ‘टेलिग्राम’ ॲपवरून देण्यात येणार आहे. त्यासाठी अधिकाऱ्यांना https://t.me/joinchat/NIqTuBfeaP6ZRhpecjssTg या लिंकवरून ग्रुपमध्ये सामिल होता येईल.
सध्या दररोज २५ प्रकरणांची गुगल मीट ॲपवर ऑनलाईन सुनावणी घेण्यात येत आहे. मागील शुक्रवारी नागपूर येथील २५ प्रकरणांची सुनावणी घेतली आहे. अमरावती विभागातील एका दिवशी एका जिल्ह्याची ७० प्रकरणे हाताळली जातील. यासाठी नवे सॉफ्टवेअर सुरू केले आहे. सुनावणी गतीने होण्यासोबतच कार्यालय पेपरलेस होणार आहे.
- संभाजी सरकुंडे,
राज्य माहिती आयुक्त, खंडपीठ अमरावती.
000000

बुधवार, १ जुलै, २०२०

विभागीय आयुक्त कार्यालयात
वसंतराव नाईक यांना अभिवादन
अमरावतीदि1 : येथील विभागीय आयुक्त कार्यालयात आज विभागीय आयुक्त पियूष सिंह यांनी वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला पूष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी उपायुक्त गजेंद्र बावणेसंजय पवारप्रमोद देशमुखतहसिलदार वैशाली पाथरेनाझर श्रीपेठे यांच्यासह आधिकारी - कर्मचारी उपस्थित होते.