शेतकरी मिशनच्या ‘कुटुंब आपले-जबाबदारी आमची’
मोहिमेतून असंख्य रुग्ण कोरोनामुक्त
अमरावती, दि. 8 :
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेतकरी मिशनच्या ‘कुटुंब आपले-जबाबदारी आमची’ या
मोहिमेद्वारे अनेक गरजू रुग्णांवर तात्काळ उपचार करण्यात येत असून असंख्य रुग्ण
कोरोनामुक्त होत आहे. जेमतेम आर्थिक परिस्थिती असलेल्यां कोरोनाग्रस्तासांठी ही
मोहिम आहे, अशी माहिती कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर
तिवारी यांनी दिली. कोरोनाग्रस्त रुग्णांनी या मोहिमेचा लाभ घ्यावा, असे आवाहन
त्यांनी केले.
‘कुटुंब आपले-जबाबदारी
आमची' या मोहिमेअंतर्गत ज्या रुग्णांना कोरोना सदृश्य लक्षणे आहेत त्यांनी शेतकरी
मिशनच्या 09422108846 या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधल्यास रुग्ण पूर्णपणे बरा
होई पर्यंतच्या सर्व बाबी शेतकरी मिशनच्यावतीने पार पाडल्या जातात. गंभीर आजार
असलेले रुग्णांवर विशेष लक्ष ठेवून त्यांच्या प्राणवायू व फुफ्फुसाच्या स्थितीवर
निगराणी ठेवण्यात येते. आर्थिक परिस्थिती सर्वसाधारण असलेल्या नागरिकांसाठी ही
मोहिम असून महाराष्ट्र कोरोनामुक्त होण्यासाठी या मोहिमेची मोलाची भूमिका असल्याचे
त्यांनी सांगितले.
*****
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा