रविवार, ३१ मे, २०२०

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त विभागीय आयुक्त कार्यालयात अभिवादन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त विभागीय आयुक्त कार्यालयात अभिवादन
अमरावती, दि. ३१ : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त विभागीय आयुक्त कार्यालयात उपायुक्त संजय पवार यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी तहसिलदार वैशाली पाथरे यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेला अभिवादन केले.
यावेळी नाझर श्री. पेठे उपस्थित होते.

गुरुवार, २८ मे, २०२०

स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीनिमित्त विभागीय आयुक्त कार्यालयात अभिवादन
अमरावती, दि. २८ : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त विभागीय आयुक्त कार्यालयात विभागीय आयुक्त पियुष सिंह यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी उपायुक्त गजेंद्र बावणे, संजय पवार, प्रमोद देशमुख, विजय भाकरे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेला अभिवादन केले.
यावेळी अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

बुधवार, २७ मे, २०२०

सर्व नागरिकांना महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ


सर्व नागरिकांना महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ
Ø  जिल्हाधिकारी यांना दक्षता घेण्याच्या सूचना

अमरावती, दि. 27 : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ राज्यातील सर्व नागरिकांना अंगीकृत रुग्णालयामार्फत उपलब्ध करून देण्यात येत आहे, नागरिकांना या योजनेचा लाभ देताना जिल्हाधिकारी यांनी योग्य ती दक्षता घ्यावी, असे निर्देश विभागीय आयुक्त यांनी दिले आहे.
राज्य शासनाने ज्योतिबा फुले जन आरोग्य ही योजना प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेशी संलग्नित करून एकत्रितरित्या 1 एप्रिल 2020 पासून अंमलात आणली आहे. त्यामुळे या योजनेत सुमारे 90 टक्के नागरिकांचा लाभार्थी म्हणून समावेश झाला आहे. उर्वरीत नागरिक योजनेच्या लाभापासून वंचित राहू नये, तसेच सध्यास्थिती पाहता महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे अंतर्गत समाविष्ट नसलेल्या राज्यातील रहिवासी असल्याने नागरिकांनाही महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत असलेल्या 996 उपचार पद्धती मान्यताप्राप्त दराने सर्व अंगीकृत रुग्णालयात उपलब्ध करून देण्यात येतील.
शासकीय रुग्णालयाकरिता राखीव असलेल्या 134 उपचारापैकी 120 खासगी रुग्णालयांना 31 जुलै 2020 पर्यंत मान्यताप्राप्त दराने उपलब्ध करून देण्यात आले आहे. तसेच काही किरकोळ, मोठे उपचार आणि तपासण्या ज्या महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेंतर्गत समाविष्ट नाहीत, त्या उपचार आणि तपासण्या सदर योजनेंतर्गत अंगीकृत रुग्णालयांमध्ये वैद्यकीय प्राधिकरणाच्या दरानुसार उपलब्ध करून देण्यात येत आहे. सदर खर्चाची प्रतिपूर्ती संबंधित रुग्णालयास राज्य शासनाद्वारे राज्य आरोग्य सोसायटी, वरळी मुंबई यांच्यामार्फत करता येईल.
कोरोनासाठी शासनाने जाहीर केलेल्या खासगी अंगीकृत रुग्णालयाकडून संशयित रुग्णांवर उपचार करण्यात करण्यात येईल. त्यासाठी पीपीई कीट आणि एन 95 मास्कचा  आवश्यक वापर करण्यात येईल. त्या प्रमाणात प्रत्यक्ष शासनाने ठरविलेल्या दरानुसार निधी देण्यात येईल. याबाबत जिल्हा शल्यचिकित्सक यांच्यामार्फत नियंत्रण केले जाईल. यामध्ये जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी यांनी योग्य ती कारवाई करावी, असे निर्देश विभागीय आयुक्त पियुष सिंह यांनी दिले आहे.
00000

शुक्रवार, २२ मे, २०२०

‘छुट्टीयों का मजा’ने आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणीत









‘छुट्टीयों का मजा’ने आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणीत
Ø  साडेसहा हजार विद्यार्थ्यांना घरपोच कार्यपुस्तिका
Ø  लॉकडाऊनच्या काळात उपयुक्त
Ø  धारणी प्रकल्प कार्यालयाचा उपक्रम

अमरावती, दि. 22 : कोरोना‍ विषाणूच्या संसर्गामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून आदिवासी विभागाच्या सर्व आश्रमशाळा बंद आहेत. शैक्षणिक कालावधी पूर्ण झालेला नसल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ  नये, यासाठी धारणी येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाने ‘छुट्टियों का मजा’ ही कार्यपुस्तिका तयार केली आहे. याद्वारे विद्यार्थ्यांचा गुणवत्तापूर्ण सर्वांगीण विकास साधला जाणार आहे.
सध्या राज्यातील विविध प्रकल्प कार्यालयातर्फे ई-लर्निंगच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जात आहे. हाच प्रयोग धारणी प्रकल्पामध्ये राबविण्यात येत होता. मात्र मेळघाटातील अतिदुर्गम भागातील विद्यार्थ्यांकडे स्मार्टफोन नाहीत. बहुतांश गावात आवश्यक असणारी इंटरनेटची सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांचा विकास व्हावा, यासाठी कार्यपुस्तिकेचा उपक्रम हाती घेण्यात आला. प्रकल्प अधिकारी डॉ. मिताली सेठी यांच्या निर्देशानुसार ग्रामीण वातावरणाशी सुसंगत अशी ‘छुट्टियों का मजा’ ही कार्यपुस्तिका मुर्तरूपात आकारास आली.
या कार्यपुस्तिकेची छपाई झाल्यानंतर 18 मे 2020 पासून वितरीत करण्यात येत आहे. प्रकल्पांतर्गत येत असलेल्या 20 शासकीय आश्रमशाळेतील सुमारे साडेसहा हजार विद्यार्थ्यांना त्यांच्या घरी जाऊन परस्पर अंतर ठेवून या कार्यपुस्तिका पोहोचविण्यात येत आहे. या भेटीदरम्यान विद्यार्थ्यांना नियमित मास्क वापरणे आणि वारंवार हात धुण्याचे महत्त्व पटवून सांगण्यात येत आहे. या कार्यपुस्तिका पाहून विद्यार्थ्यांनी आपल्या आनंदी भावना व्यक्त केल्या.
ही कार्यपुस्तिका केवळ धारणी प्रकल्प कार्यालयांतर्गत मर्यादीत न ठेवता, या कार्यपुस्तिकेचे स्वरूप व्यापक केले आहे. कार्यपुस्तिकेची "https://drive.google.com/drive/u/0/folders/1vUS4NutHV6IWCRhiXOQuMDcTGm6_U-Gj" ही लिंक सार्वत्रिक करण्यात आली आहे. या लिंक आधारे कुणीही कार्यपुस्तिका डाऊनलोड करून त्याचा अभ्यास करता येऊ शकतो. तसेच शैक्षणिक संस्था कार्यपुस्तिकेची छपाई करून विद्यार्थ्यांना वाटप करू शकतात.

या उपक्रमास आदिवासी विकास मंत्री डॉ. के. सी. पाडवी, आदिवासी विकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा वर्मा, आयुक्त किरण कुलकर्णी, अमरावतीचे अपर आयुक्त विनोद पाटील यांनी पाठींबा देऊन प्रकल्प अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्यासह प्रकल्प कार्यालयातील सर्व अधिकारी-कर्मचारी यांचे कौतुक केले आहे.
कार्यपुस्तिका हाताळताना विद्यार्थ्यांना काही अडचण आल्यास ती सोडविण्यासाठी नियोजन अधिकारी तथा सहायक प्रकल्प अधिकारी विनोद धनगर यांच्या मार्गदर्शनाखाली तज्ज्ञ शिक्षकांचे दोन व्हॉटस् ॲप ग्रुप तयार करण्यात आले आहे. यात विद्यार्थ्यांना आलेल्या समस्या शिक्षकांसाबत चर्चा करून या समस्यांचे निराकरण करण्यात येतील, असे प्रकल्प अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी सांगितले.
0000000


अमरावती विभागात एक लाखावर मजूर रोहयोच्या कामावर



अमरावती विभागात एक लाखावर मजूर रोहयोच्या कामावर
Ø  लॉकडाऊनच्या काळात रोहयोचा आधार
Ø  अमरावती जिल्ह्यात सर्वाधिक मजूर
Ø  यवतमाळात 735 ग्रामपंचायतीत कामे
          अमरावती, दि. 22 : कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे लॉकडाऊनच्या परिस्थितीत शहरी भागासह ग्रामीण भागातील नागरिकांसमोर रोजगाराचा प्रश्न गंभीर झाला. मजूरांच्या हाताला काम मिळावे, यासाठी शासनाने महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेची कामे तातडीने सुरू केली. यात प्रामुख्याने वैयक्तिक लाभाच्या योजनांना प्राधान्य देऊन ते पूर्ण करण्यात येत आहेत. आज अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यात एक लाखाच्यावर मजूर कामावर आले आहेत.
            अमरावती विभागातील चार हजार 25 ग्रामपंचायतीपैकी दोन हजार 404 ग्रामपंचायतीमध्ये रोहयोची कामे सुरू करण्यात आली आहेत. या कामावर तब्बल एक लाख सात हजार 641 मजूर कामावर आली आहेत. मजूरांना रोजगार उपलब्ध व्हावा, यासाठी रोहयोमधील वैयक्तिक लाभाच्या योजना पूर्ण करण्यावर भर देण्यात येत आहे. यामध्ये प्रामुख्याने सार्वजनिक आणि खासगी विहिरी, घरकुल, वृक्षसंगोपन ही कामे हाती घेण्यात आली आहे.
सध्यास्थितीत अमरावती जिल्ह्यात सर्वाधिक मजूर कामावर आले आहेत. जिल्ह्यात 851 ग्रामपंचायतीपैकी 709 ग्रामपंचायतीमध्ये रोहयोची कामे सुरू करण्यात आली आहे. या कामावर विभागात सर्वाधिक 71 हजार 869 मजूर कामावर आली आहेत. यात 14 हजार 290 मजूर आधार प्रमाणीकरण झालेले नाहीत. यवतमाळ जिल्ह्यातील एक हजार 218 ग्रामपंचायतीपैकी सर्वाधिक 735 ग्रामपंचायतीमध्ये कामे सुरू करण्यात आली आहेत. याठिकाणी 16 हजार 517 मजूर कामावर आहेत. बुलडाणा जिल्ह्यातील 900 ग्रामपंचायतीपैकी 541 गावात सुरू असलेल्या कामावर 11 हजार 479 मजूर कामावर आहेत. वाशिम जिल्ह्यातील 507 ग्रामपंचातीपैकी 237 ग्रामपंचायतीमध्ये कामे सुरू आहेत. याठिकाणी तीन हजार 944 मजूर कामावर आहेत. अकोला जिल्ह्यातील 549 ग्रामपंचायतीपैकी 182 ग्रामपंचातीत तीन हजार 832 मजूर कामावर आहेत.
लॉकडाऊनमुळे शहरी भागातील खासगी आस्थापनांमधील रोजगार संपूष्टात आला. त्यामुळे ग्रामीण भागातील मजूर रोहयोच्या कामाकडे वळला आहे. तीन आठवड्यापूर्वी दि. 28 एप्रिल रोजी पाचही जिल्ह्यात 52 हजार 162 मजूर रोजयोच्या कामावर होते. आज दि. 22 मे रोजी ही संख्या दुप्पटीने वाढून एक लाख सात हजाराच्या वर गेली आहे. ग्रामीण भागात रोजगार उपलब्ध व्हावा, यासाठी शासनाने तात्काळ दखल घेत रोहयोची कामे सुरू केल्याने ग्रामीण भागातील अकुशल मजूरांना रोजगाराचा आधार मिळाला आहे.
रोहयोच्या कामावर येणाऱ्या प्रत्येक मजुराला मास्क देण्यात येत आहे. तसेच साबून आणि सॅनिटायझरही गरजेनुसार उपलब्ध करून देण्यात येत आहे. मोठ्या प्रमाणावर मजूर एकत्र येणार नाही, याची काळजी घेत कामाचे वाटप करण्यात येत आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मास्कच्या वापरासह हात स्वच्छ ठेवणे आणि परस्परांमध्ये अंतर ठेवण्याविषयी मजूरांना सुचना देण्यात येत आहे. इतर ठिकाणचा रोजगार बंद झाल्यामुळे रोहयोच्या कामावर जास्त प्रमाणात मजूर येत असल्याचे रोहयो उपायुक्त गजेंद्र बावणे यांनी सांगितले.

गुरुवार, २१ मे, २०२०





विभागीय आयुक्त कार्यालयात
दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिवसानिमित्त शपथ
अमरावती, दि. 21 : येथील विभागीय आयुक्त कार्यालयात आज दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिवसानिमित्त विभागीय आयुक्त पियूष सिंह यांनी उपस्थित अधिकारी आणि कर्मचारी यांना शपथ दिली.
यावेळी उपायुक्त गजेंद्र बावणे, धनंजय भाकरे, तहसिलदार वैशाली पाथरे, तसेच अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
00000

मंगळवार, १९ मे, २०२०

माहिती आयुक्त कार्यालयाचे काम दूरस्थ पद्धतीने सुरू


माहिती आयुक्त कार्यालयाचे काम दूरस्थ पद्धतीने सुरू
Ø नागरिकांनी ई-मेलद्वारे अर्ज पाठवावा
Ø अर्जावर ई-मेल, भ्रमणध्वनी नमूद करण्याचे आवाहन
 अमरावती, दि. 19 : राज्य माहिती आयुक्त कार्यालयाच्या अमरावती खंडपिठाचे कामकाज मर्यादीत उपस्थितीसह सुरू करण्यात आलेले आहे. तरीही वाहतूक व्यवस्था बंद असल्याने व्यक्तिश: सुनावणी प्रभावित झाली आहे. आयोगाकडील अपिल आणि तक्रारींवर जलदगतीने सुनावणी होण्यासाठी नागरिकांनी आयोगाकडे प्रत्यक्ष न येता स्वत:च्या ई-मेलद्वारे आयोगाच्या ई-मेलवर सर्व कागदपत्रांच्या छायांकित प्रतिसह 20 रूपयांचा स्टॅम्प लावून अर्ज केल्यास तात्काळ सुनावणी व्यवस्था केली आहे. तसेच आयोगाकडे पत्रव्यवहार करताना भ्रमणध्वनी क्रंमाक आणि ई-मेल पत्ता नमूद करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
या संदर्भात आयोगाने कळविले आहे की, शासनाच्या निर्देशानुसार सध्या कार्यालय मर्यादीत उपस्थितीमध्ये सुरू करण्यात आलेले आहे. एरवी  दर महिन्याला या कार्यालयात सुमारे 350 द्वितीय अपिल अर्ज आणि माहिती अधिनियम कलम 18 नुसार महितीसंबंधी तक्रारी दाखल होतात. निर्बंधामुळे संख्या कमी झाली आहे. कार्यालय मर्यादित उपस्थितीसह सुरू करण्यात आले असले तरी दळणवळणाची साधने उपलब्ध नसल्यामुळे आणि ती वापरास निर्बंध असल्यामुळे नागरिकांना व्यक्तीशः माहिती आयोगाचे कार्यालयात येणे शक्य होत नाही.
गेल्या तीन वर्षांपासून आयोगाकडे दाखल झालेल्या आठ हजार द्वितीय अपिल आणि एक हजार तक्रारींवर सुनावणी घेण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. यासाठी अमरावती खंडपिठाच्या कामात काही अंशी बदल करण्यात आले आहेत. अपिलकर्त्यांना कार्यालयात व्यक्तिश: येणे शक्य नसले तरीही आयोगाने कामकाज सुरू केले आहे. गरजेनुरूप अप्रत्यक्ष सुनावणीचा भाग म्हणून व्हाट्स ॲप कॉल आणि श्राव्य सुनावणीचा भाग म्हणून साधा कॉल करून अपिलकर्त्यांचे म्हणणे ऐकून घेण्यात येत आहे. तक्रारी आणि अपिलावर कार्यवाही करतांना अप्रत्यक्ष सूनावणी घेण्यात येणार आहे. अपिलार्थी आणि तक्रादार यांच्या अर्जावर संबंधित सार्वजनिक प्राधिकरणाला त्यांच्या कार्यालयीन ई-मेल पत्यावर विस्तृत नोटीस पाठविण्यात येत आहे. तसेच सविस्तर खुलासे मागविण्यात येत आहेत.
अपिलार्थी आणि तक्रारदा यांना सुनावणीच्या दृष्टीने संपर्क करण्यासाठी अर्जावर त्यांचे मोबाल क्रमांक आणि ई-मेल पत्ते उपलब्ध नाहीत. त्यामुळे त्यांना संपर्क करण्यात मोठी अडचण झाली आहे. तसेच सार्वजनिक प्राधिकरणावर बजावण्यात येत असलेल्या नोटिसमधून अपिलार्थी आणि तक्रारदार यांचे मोबाइल क्रमांक आणि ई-मेल आयडी प्राप्त करून आयोगास पुरविण्यात यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
सार्वजनिक प्राधिकरण आणि नागरिकांच्या सोयीसाठी नागरिकांनी आयोगाकडे प्रत्यक्ष न येता स्वतःच्या ई-मेलद्वारे आयोगाचा ई-मेल आयडी dsmsicamwt@gmail.com वर सर्व कागदपत्राच्या छायांकित प्रतिसह 20 रुपयांचा स्टॅम्प लावून अर्ज केल्यास तात्काळ सुनावणी लावण्याची व्यवस्था केली आहे. आयोगाकडे असा पत्रव्यवहार करण्यासाठी आपला भ्रमणध्वनी क्रमांक व ई-मेल आयडी आवश्यक नमूद करावा, असे आवाहन राज्य माहिती आयोग खंडपीठ अमरावतीचे माहिती आयुक्त संभाजी सरकुंडे यांनी केले आहे.
000000


सोमवार, १८ मे, २०२०

माहिती आयुक्त कार्यालयाचे काम दूरस्थ पद्धतीने सुरू


 माहिती आयुक्त कार्यालयाचे काम दूरस्थ पद्धतीने सुरू
Ø नागरिकांनी ई-मेलद्वारे अर्ज पाठवावा
Ø अर्जावर ई-मेल, भ्रमणध्वनी नमूद करण्याचे आवाहन

अमरावती, दि. 18 : राज्य माहिती आयुक्त कार्यालयाच्या अमरावती खंडपिठाचे कामकाज मर्यादीत उपस्थितीसह सुरू करण्यात आलेले आहे. तरीही वाहतूक व्यवस्था बंद असल्याने व्यक्तिश: सुनावणी प्रभावित झाली आहे. आयोगाकडील अपिल आणि तक्रारींवर जलदगतीने सुनावणी होण्यासाठी नागरिकांनी आयोगाकडे प्रत्यक्ष न येता स्वत:च्या ई-मेलद्वारे आयोगाच्या ई-मेलवर सर्व कागदपत्रांच्या छायांकित प्रतिसह 20 रूपयांचा स्टॅम्प लावून अर्ज केल्यास तात्काळ सुनावणी व्यवस्था केली आहे. तसेच आयोगाकडे पत्रव्यवहार करताना भ्रमणध्वनी क्रंमाक आणि ई-मेल पत्ता नमूद करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
या संदर्भात आयोगाने कळविले आहे की, शासनाच्या निर्देशानुसार सध्या कार्यालय मर्यादीत उपस्थितीमध्ये सुरू करण्यात आलेले आहे. एरवी  दर महिन्याला या कार्यालयात सुमारे 350 द्वितीय अपिल अर्ज आणि माहिती अधिनियम कलम 18 नुसार महितीसंबंधी तक्रारी दाखल होतात. निर्बंधामुळे संख्या कमी झाली आहे. कार्यालय मर्यादित उपस्थितीसह सुरू करण्यात आले असले तरी दळणवळणाची साधने उपलब्ध नसल्यामुळे आणि ती वापरास निर्बंध असल्यामुळे नागरिकांना व्यक्तीशः माहिती आयोगाचे कार्यालयात येणे शक्य होत नाही.
गेल्या तीन वर्षांपासून आयोगाकडे दाखल झालेल्या आठ हजार द्वितीय अपिल आणि एक हजार तक्रारींवर सुनावणी घेण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. यासाठी अमरावती खंडपिठाच्या कामात काही अंशी बदल करण्यात आले आहेत. अपिलकर्त्यांना कार्यालयात व्यक्तिश: येणे शक्य नसले तरीही आयोगाने कामकाज सुरू केले आहे. गरजेनुरूप अप्रत्यक्ष सुनावणीचा भाग म्हणून व्हाट्स ॲप कॉल आणि श्राव्य सुनावणीचा भाग म्हणून साधा कॉल करून अपिलकर्त्यांचे म्हणणे ऐकून घेण्यात येत आहे. तक्रारी आणि अपिलावर कार्यवाही करतांना अप्रत्यक्ष सूनावणी घेण्यात येणार आहे. अपिलार्थी आणि तक्रादार यांच्या अर्जावर संबंधित सार्वजनिक प्राधिकरणाला त्यांच्या कार्यालयीन ई-मेल पत्यावर विस्तृत नोटीस पाठविण्यात येत आहे. तसेच सविस्तर खुलासे मागविण्यात येत आहेत.
अपिलार्थी आणि तक्रारदायांना सुनावणीच्या दृष्टीने संपर्क करण्यासाठी अर्जावर त्यांचे मोबाल क्रमांक आणि ई-मेल पत्ते उपलब्ध नाहीत. त्यामुळे त्यांना संपर्क करण्यात मोठी अडचण झाली आहे. तसेच सार्वजनिक प्राधिकरणावर बजावण्यात येत असलेल्या नोटिसमधून अपिलार्थी आणि तक्रारदार यांचे मोबाइल क्रमांक आणि ई-मेल आयडी प्राप्त करून आयोगास पुरविण्यात यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
सार्वजनिक प्राधिकरण आणि नागरिकांच्या सोयीसाठी नागरिकांनी आयोगाकडे प्रत्यक्ष न येता स्वतःच्या ई-मेलद्वारे आयोगाचा ई-मेल आयडी dsmsicamwt@gmail.com वर सर्व कागदपत्राच्या छायांकित प्रतिसह 20 रुपयांचा स्टॅम्प लावून अर्ज केल्यास तात्काळ सुनावणी लावण्याची व्यवस्था केली आहे. आयोगाकडे असा पत्रव्यवहार करण्यासाठी आपला भ्रमणध्वनी क्रमांक व ई-मेल आयडी आवश्यक नमूद करावा, असे आवाहन राज्य माहिती आयोग खंडपीठ अमरावतीचे माहिती आयुक्त संभाजी सरकुंडे यांनी केले आहे.
000000

सोमवार, ११ मे, २०२०

‘पोस्ट बँके’ तून आठ कोटींची रक्कम लॉकडाऊनमध्ये घरपोच




‘पोस्ट बँके’ तून आठ कोटींची रक्कम लॉकडाऊनमध्ये घरपोच
Ø  पोस्टाचे 4.6, बँकांचे 3.6 कोटी वितरीत
Ø  51 हजाराहून अधिक बँकींग व्यवहाराची नोंद

अमरावती, दि. 11 : पोस्टाची ओळख ही आतापर्यंत फक्त पत्र आणि मनी ऑर्डर इथपर्यंत मर्यादीत होती. परंतू काळाच्या ओघात पत्रांसोबतच डाक विभागाच्या इंडिया पोस्ट पमेंट बँकेने नव्या क्षेत्रावर आपली मोहोर उमटविली आहे. गेल्या दोन महिन्यांपासून सुरु असलेल्या निर्बंधामुळे गरजू नागरिकांना बँकेपर्यंत पोहोचता येत नव्हते. अशावेळी या पोस्ट बँकेने लॉकडाऊनच्या काळात सर्वसामान्य नागरिकांना बँकेच्या सेवेचा आधार दिला. आतापर्यंत पोस्ट बँकेने सुमारे आठ कोटी रूपये एवढी रक्कम खातेदारांच्या हाती दिली आहे.
लॉकडाऊनचा काळ हा प्रत्येक नागरिकाचा कसोटीचा काळ आहे. बँकांच्या मर्यादीत वेळा, एटीएममधील विशिष्ट रक्कम, दळणवळणाच्या साधनांची कमतरता, दुर्गम भागातील नागरिकांना बँकेपर्यंत पोहोचण्यासाठी होणारा त्रास, वाढता उन्हाळा अशा अनेक समस्या या काळात आल्या. नागरिकांना आवश्यक वस्तू खरेदीसाठी रोख रक्कम आवश्यक असते. त्यावर उपाय म्हणून पोस्ट बँकेने पोस्टाच्या कार्यालयातून नागरिकांना त्यांच्या आधार क्रमांक संलग्न बँक खात्यातून थेट रक्कम देण्याची सुविधा उपलब्ध करून दिली.
अमरावती जिल्ह्यात 454 पोस्ट कार्यालये आहेत. या पोस्टामधील सुमारे आठशे पोस्टमन ही आधार संलग्नित पेमेंट व्यवस्था देत आहेत. ही सेवा जिल्ह्यातील शहरासह मेळघाटमधील डोमा, चुरणी या दूर्गम भागात देत आहे. या सेवेबाबत संबंधित तहसिलदारांनी गावात बैठक घेऊन माहिती दिली. त्यामुळे तसेच पोस्टाची विश्वासार्हता आणि गावातीलच पोस्टमन बँकेतील रक्कम देणार असल्याने या सेवेला नागरिकांचा चांगला प्रतिसाद लाभला. याचा परिणाम म्हणून 23 हजार व्यवहारातून पोस्ट बँकेने 4.6 कोटी, तर 21 हजार 321 व्यवहारातून इतर बँकेचे 3.6 कोटी बँक खातेदारांना रोख रक्कम वितरीत करण्यात आले आहेत.
आधार संलग्नीत खात्यातून पोस्टाच्या या सेवेमधून रक्कम काढण्यासाठी खातेदारांना पोस्टात जाऊन फक्त आपला आधार क्रमांक सांगावा लागतो. एका खात्यापेक्षा अधिक खात्यांना आधार संलग्न असल्यास त्याला बँकेचे नाव सांगावे लागते. बोटांचे ठसे प्रमाणीकरण झाल्यानंतर त्या बँक खात्यातून संबंधित व्यक्तीला ही रक्कम पोस्टातच मिळते आहे. दूर्गम भागात बँका नसल्यातरी पोस्टाचे जाळे आहे. सध्याच्या लॉकडाऊनच्या परिस्थितीत ही पोस्ट कार्यालय उपयोगाला आली आहेत. नागरिकांना गावातच रक्कम मिळू लागल्याने बँकांतील गर्दी कमी होण्यास मदत झाली आहे.
शहरी तसेच ग्रामीण भागात पोस्टाचे जाळे आहे. मुख्य पोस्ट कार्यालय ते गावातील पोस्ट कार्यालय अशी साखळी आहे. बँकांच्या अडचणीमुळे पोस्टाने नागरिकांना त्यांच्या गावातच ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे. पोस्टातर्फे गावागावात जाऊन या व्यवस्थेची माहिती देण्यात येत आहे. नागरिकांचा कलही आता पोस्टामधून रक्कम काढण्याकडे वाढत असल्याचे अमरावती येथील इंडिया पोस्ट पेमेंट बँकेचे शाखा व्यवस्थापक चंद्रकांत झेंडे यांनी सांगितले.
000000