बुधवार, २५ जानेवारी, २०२३

भारतीय प्रजासत्ताकाचा 73 वा वर्धापनदिन उत्साहात साजरा, हक्कांबरोबरच कर्तव्याची जाणीव ठेवून लोकशाही अधिक बळकट करूया -विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्टे

 भारतीय प्रजासत्ताकाचा 73 वा वर्धापनदिन उत्साहात साजरा

हक्कांबरोबरच कर्तव्याची जाणीव ठेवून लोकशाही अधिक बळकट करूया

                                                -विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्टे

 

अमरावती, दि. 26 : जगातील सर्वात मोठी व यशस्वी लोकशाही म्हणून भारताचा जगभर गौरव होतो. ही संविधानाची ताकद आहे आणि येथील नागरिकांच्या सौहार्द, सहिष्णूता व बंधुभावाचे ते गमक आहे. नागरिक म्हणून आपले कर्तव्य पाळून ही लोकशाही अधिकाधिक बळकट करण्याचा संकल्प आपण सर्वांनी प्रजासत्ताकदिनानिमित्त करूया, असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी आज येथे केले.























 

भारतीय प्रजासत्ताकाच्या 73 व्या वर्धापन दिनोत्सवानिमित्त पं. जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये आयोजित मुख्य सोहळ्यात ध्वजारोहण विभागीय आयुक्तांच्या हस्ते झाले. या सोहळ्यात ते बोलत होते. विशेष पोलीस महानिरीक्षक जयंत नाईकनवरे, प्र. जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, पोलीस आयुक्त नविनचंद्र रेड्डी, पोलीस अधिक्षक अविनाश बारगळ, राज्य राखीव पोलीस दलाचे समादेशक राकेश कलासागर आदी यावेळी उपस्थित होते.

राष्ट्रध्वज वंदन व राष्ट्रगीतानंतर विभागीय आयुक्तांनी मैदानावर उघड्या जीपमधून फेरी मारून पोलीस, विविध सुरक्षा दलांच्या व विभागांच्या पथकांचे निरीक्षण केले. त्यांच्या हस्ते विविध गुणवंत अधिकारी व कर्मचा-यांना गौरविण्यात आले.  

विभागीय आयुक्तांनी सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले की,  

देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशात लोकांचे राज्य स्थापण्याच्या हेतूने लोकशाही प्रस्थापित करण्याचा विचार पुढे आला. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील मसुदा समितीने राज्यघटना निर्माण केली. ती 26 जानेवारी 1950 रोजी देशभर लागू करण्यात आली. आज सात दशकांहून अधिक काळ लोकशाही या देशात दृढपणे टिकून आहे, वृद्धिंगत व अधिक मजबूत होत आहे. ही खरी संविधानाची ताकद आहे.  

 

ते पुढे म्हणाले की, लोकशाही हा केवळ शासनसंस्थेचा प्रकार नाही तर ती एकत्रित असण्याची जीवनपद्धती आहे. समाज बदलण्याचे सामर्थ्य लोकशाहीच्या संकल्पनेत आहे. या देशातील प्रत्येक नागरिकाला घटनात्मक हक्क संविधानाने बहाल केले आहेत. गत सात दशकांमध्ये राज्यघटनेद्वारे न्याय, समता, बंधुता, एकता व एकात्मता ही मूल्ये येथे रुजली. लोकशाही प्रस्थापित झाली.  लोकशाहीचे सक्षमीकरण ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. लोकसहभाग हा यातील महत्वाचा घटक आहे. हक्कांबरोबरच कर्तव्याची जाणीव ठेवून लोकशाही बळकट करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे.

 

राष्ट्रीय मतदारदिनाचा उल्लेख करून ते म्हणाले की, आपला मताधिकार बजावण्याचे राष्ट्रीय कर्तव्य पार पाडणे ही नागरिकांची जबाबदारी आहे. त्यासाठी प्रत्येक पात्र व्यक्तीने मतदार म्हणून नोंदणी करून मतदानाचा हक्क बजावला पाहिजे, असे त्यांनी सांगितले.  राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ‘गाव हा विश्वाचा नकाशा’ या रचनेतील ओळीही त्यांनी यावेळी उद्धृत केल्या.   

शासन व्यवहारात लोकसहभाग आवश्यक असतो. त्यामुळे एक मतदार म्हणून आणि एक नागरिक म्हणून जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात आपले कर्तव्य कसोशीने पार पाडण्याचा संकल्प करण्याचे आवाहन त्यांनी केले.

यावेळी विविध क्षेत्रांतील अनेक मान्यवर, विविध अधिकारी व कर्मचारी, महिला, ज्येष्ठ नागरिक, युवक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

०००

‘भारत माता की जय’च्या घोषणांनी निनादले आसमंत सुरक्षा, पथकांच्या कवायतीला अमरावतीकरांची दाद

 






‘भारत माता की जय’च्या घोषणांनी निनादले आसमंत

सुरक्षा पथकांच्या कवायतीला अमरावतीकरांची दाद

 

अमरावती, दि.26: ‍‍प्रजासत्ताक दिनाच्या 73व्या वर्धापन दिनानिमित्त पं. जवाहरलाल नेहरु स्टेडियममध्ये विविध सुरक्षा पथकांनी केलेले शिस्तबध्द कवायत व पथसंचलनाला अमरावतीकरांनी मोठी दाद दिली. यावेळी ‘भारतमाता की जय’च्या घोषणांनी आसमंत निनादून गेले होते.

मुख्य सोहळ्यात ध्वजारोहण विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्टे यांच्या हस्ते झाले. त्यानंतर विविध सुरक्षादलांच्या व  विभागांच्या चमूमार्फत शिस्तबध्द पथसंचलन करण्यात आले. त्यात  एकूण 17 पथकांनी भाग घेतला. या सोहळ्याला विविध क्षेत्रातील मान्यवर, महिला, ज्येष्ठ नागरिक, युवक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्टेडियममधील प्रेक्षागृह गर्दीने फुलून गेले होते.   

राज्य राखीव पोलीस बल गट, अमरावती पोलीस आयुक्तालयाचे पोलीस पथक, ग्रामीण पोलीस पथक, महिलाविषयक गुन्हे व तक्रार निवारणासाठी दक्ष असलेले पथक, गृहरक्षक पुरुष तसेच महिला दल, शहर वाहतुक पथक, पोलीस बॅन्ड पथकाने दिमाखदार पथसंचलन करुन सर्वांची मने जिंकली.

स्कुल ऑफ स्कॉलर्स राजमाता जिजाबाई गाईड पथक तसेच स्वामी विवेकानंद स्काऊट पथक, केम्ब्रिज इंग्लिश स्कुल, जिल्हा परिषद गर्ल्स हायस्कुल, दिपा इंग्लिश प्रायमरी स्कुल, अस्मिता विद्यालय यांचे स्काऊट गाईड यांनी आकर्षक पथसंचलन करुन मोठी दाद मिळविली. पथसंचलनामध्ये पोलिस विभागाचे श्वानपथक आकर्षणाचे मुख्य केंद्र होते. यावेळी श्वानाने सलामी देताच टाळ्यांचा कडकडाट झाला.  महिला आर्थिक विकास महामंडळाचा महिला शक्तीचा जागर करणारा देखावा लक्षवेधी ठरला.

जलद प्रतिसाद पथक, मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन, मनपा अग्निशामक वाहन तसेच बुलेट दुचाकी, दंगा नियंत्रण पथक ‘वज्र वाहन’, ‘वरुण वाहन’,  मनपा आरोग्य विभागाचे वाहन, परिवहन महामंडळाच्या विविध योजनांची माहिती देणारी एसटी बस, जिल्हा आरोग्य रुग्णालय तसेच जिल्हा परिषदेचे आरोग्य विभागाची रुग्णवाहिका, सामाजिक वनीकरण विभाग, जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षण विभाग, जिल्हाधिकारी कार्यालयाचे जिल्हा शोध व बचाव पथक, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाचे पथक संचालनात सहभागी होते.

000000

अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून बैठकीद्वारे उमेदवारांना मार्गदर्शन

 अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक

 

निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून बैठकीद्वारे उमेदवारांना मार्गदर्शन

अमरावती, दि. 18 : अमरावती पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचे मतदान दि. 30 जानेवारीला विभागातील 262 मतदान केंद्रावर होणार आहे. तसेच निवडणुकीची मतमोजणी दि. दि. दोन फेब्रुवारी रोजी बडनेरा रस्त्यावरील नेमाणी गोडाऊन येथे होणार आहे. या अनुषंगाने निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी उमेदवारांची बैठक घेऊन त्यांच्या विविध प्रश्नांचे निरसन केले.

सहायक निवडणूक निर्णय अधिकारी संजय पवार, उपायुक्त विजय भाकरे, तहसीलदार वैशाली पाथरे, नायब तहसीलदार मधुकर धुळे तसेच निवडणूक लढविणारे उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी यावेळी बैठकीला उपस्थित होते.

निवडणुकीच्या अनुषंगाने मतपत्रिकेवरील उमेदवारांच्या अनुक्रमांकाबाबत यावेळी संबंधितांना माहिती देण्यात आली. मतदानासाठी छायाचित्र असलेले ओळखपत्र उदा. मतदान ओळखपत्र, आधार कार्ड, पॅन कार्ड, वाहन चालविण्याचा परवाना इ. तसेच पदवी उत्तीर्ण प्रमाणपत्रावर छायाचित्र असणे आवश्यक आहे. निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांवर गुन्हे दाखल असल्यास त्यासंदर्भात तीनवेळा वृत्तपत्रातून व स्थानिक टि.व्ही चॅनल्सवर प्रसिध्दी करणे आवश्यक आहे. प्रचारासाठी लागणाऱ्या विविध प्रकारच्या परवानग्या सुलभतेने मिळण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालय तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात कक्ष स्थापन करण्यात आले असून तेथून उमेदवारांना आवश्यक परवानग्या घेता येतील. तसेच ध्वनीक्षेपकाव्दारे प्रचाराची वेळ ही रात्री दहापर्यंतच अनुज्ञेय आहे, असे डॉ. पांढरपट्टे यांनी सांगितले.

निवडणुकीच्या अनुषंगाने निवडणूक प्रतिनिधी तसेच मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रावर मतदार प्रतिनिधी व मतमोजणीच्या दिवशी मतमोजणी प्रतिनिधींची नेमणूक करण्याची उमेदवारांना मुभा असेल. त्यासाठी विहित नमून्यातील अर्ज सादर करुन त्यांची नेमणूक करता येईल. उमेदवारांनी आदर्श आचारसंहितेचे पालन करण्याचे आवाहनही त्यांनी केले. 

  निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या मतदान पद्धतीबाबतही त्यांनी माहिती दिली. विविध पक्षांचे उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

0000

22 जानेवारीला समुदाय आरोग्य अधिकारी पदाची प्रवेश परीक्षा

 22 जानेवारीला समुदाय आरोग्य अधिकारी पदाची प्रवेश परीक्षा

 प्रवेशपत्र https://arogya.maharashtra.gov.in संकेतस्थळावर उपलब्ध

अमरावतीदि. 19 (विमाका)  : राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यक्रमांतर्गत अकोला परिमंडळातील समुदाय आरोग्य अधिकारी (Community Health Officer) या पदाकरीता राज्यस्तरावरून दि. 12 डिसेंबर 2022 रोजी जाहिरात प्रकाशित करण्यात आली होती. तसेच अर्ज स्विकृती दि.20 डिसेंबर 2022 पर्यंत होती. अकोला परिमंडळांतर्गत सदर पदाकरीता बऱ्याच प्रमाणात अर्ज प्राप्त झाले असुन अर्ज छाननी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यानुसार येत्या दि. 22 जानेवारी 2023 रोजी परीक्षेचे नियोजन करण्यात आले आहे.

समुदाय आरोग्य अधिकारी पदाचे प्रवेश परिक्षापत्र https://arogya.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. समुदाय आरोग्य अधिकारी परिक्षेकरीता अर्ज केलेल्या अकोला, अमरावती व यवतमाळ या तीन जिल्ह्यांतील उमेदवारांसाठी परीक्षा केंद्र लक्ष्मीबाई राधाकिसन तोष्णावाल वाणिज्य विद्यालय, रतनलाल प्लॉट, अकोला हे राहील. बुलडाणा जिल्ह्यातील उमेदवारांसाठी श्री. शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, शिवाजी पार्क अकोला हे असेल तर वाशिम जिल्ह्याच्या न्यु ईग्लिश हायस्कुल, ज्युनियर कॉलेज, रामदास पेठ, पोलीस स्टेशन जवळ, अकोला हे राहणार.

पात्र उमेदवारांनी संकेतस्थळावरुन आपले प्रवेशपत्र प्राप्त करुन संबंधित परीक्षा केंद्रावर नियोजित वेळेत परीक्षा देण्यासाठी उपस्थित राहावे, असे आवाहन अकोला मंडळाचे उपसंचालक (आरोग्य सेवा) डॉ. तरंगतुषार वारे यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.

00000

‘महाज्योती’मार्फत पोलीस-मिलिटरी भरती पूर्व प्रशिक्षणासाठी अर्ज आमंत्रित

 ‘महाज्योती’मार्फत पोलीस-मिलिटरी भरती पूर्व प्रशिक्षणासाठी अर्ज आमंत्रित

अमरावती, दि. 20 : महात्मा ज्योतीबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती), नागपूर या संस्थेमार्फत इतर मागासवर्ग, विमुक्त जाती-भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी पोलीस-मिलिटरी भरती पूर्व प्रशिक्षण राबविण्यात येते. त्याकरिता नोंदणी प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. त्यानुसार इच्छुकांनी प्रशिक्षणासाठी नोंदणी महाज्योतीच्या www.mahajyoti.org.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पध्दतीने 25 जानेवारीपर्यंत करावी, असे आवाहन महाज्योतीमार्फत करण्यात आले आहे.

या प्रशिक्षण हे महाज्योतीमार्फत नागपूर व औरंगाबाद या दोन ठिकाणी देण्यात येणार आहे. प्रशिक्षणाचा कालावधी चार महिन्याकरिता असून हे प्रशिक्षण अनिवासी स्वरुपाचे आहे. सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना दरमाह सहा हजार रुपये इतके विद्यावेतन देण्यात येणार आहे. तसेच प्रशिक्षणा दरम्यान पुस्तके, गणवेश देखील देण्यात येणार आहे.

या प्रशिक्षणाचा लाभ घेण्यासाठी उमेदवार हा इतर मागासवर्ग, विमुक्त जाती-भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गापैकी असावा तसेच तो नॉनक्रिमिलेअर गटातील असावा. उमेदवार किमान 12 वी उत्तीर्ण असावा. इच्छुक उमेदवाराने महाज्योतीच्या www.mahajyoti.org.in या संकेतस्थळावरील नोटीस बोर्डमधील पोलीस भरती पुर्व प्रशिक्षण या टॅबवर जाऊन ऑनलाईन पध्दतीने अर्ज करावा. अर्ज करण्याची अंतीम दिनांक 25 जानेवारी ही आहे. या संधीचा लाभ घेण्यासाठी महाराष्ट्रातील इतर मागासवर्ग, विमुक्त जाती-भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी पोलीस-मिलिटरी भरती पूर्व प्रशिक्षणाकरिता अर्ज करण्याचे आवाहन महाज्योतीचे व्यवस्थापकीय संचालक राजेश खवले यांनी केले आहे.

0000

मराठी भाषा पंधरवडा, मराठी वाङमयनिर्मितीत अमरावती जिल्ह्याचे मोठे योगदान - प्रा. भगवान फाळके

 मराठी भाषा पंधरवडा

मराठी वाङमयनिर्मितीत अमरावती जिल्ह्याचे मोठे योगदान

-         प्रा. भगवान फाळके

अमरावती, दि. २० : प्राचीन, मध्ययुगीन व अर्वाचीन या तिन्ही कालखंडात अमरावती जिल्ह्याच्या भूमीत मराठी भाषेत मोठी व अक्षर वाङमयनिर्मिती झालेली आहे. महाराष्ट्रीय संस्कृतीत या भूमीचे महत्व अनन्यसाधारण आहे, असे प्रतिपादन विद्यापीठातील स्त्री अभ्यास केंद्राचे प्रा. भगवान फाळके यांनी आज येथे केले.

मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त मराठी भाषा विभाग, भाषा संचालनालय, विदर्भ साहित्य संघ आणि संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या पदव्युत्तर मराठी विभागातर्फे विद्यापीठात प्रा. फाळके यांचे 'मराठी साहित्यात अमरावती जिल्ह्याचे वाङ्मयीन योगदान' या विषयावर व्याख्यान झाले, त्यात ते बोलत होते. विद्यापीठाच्या मानव विज्ञान विद्या शाखा अधिष्ठाता व मराठी विभाग प्रमुख डॉ. मोना चिमोटे अध्यक्षस्थानी होत्या.  भाषा सहायक संचालक हरिश सूर्यवंशी, स्नेहा पुनसे, धनंजय कानेड, मनोज तायडे, डॉ. हेमंत खडके आदी उपस्थित होते.

प्रा. फाळके म्हणाले की, जागतिकीकरणाने जगाचे वैश्विक खेडे झालेले असताना मानवी मनोविश्व व व्यवहारात आभासी बाबींचा शिरकाव झाला आहे. अशा काळात भोवतालाचे व आपल्या परंपरेचे भान जागृत ठेवणे आवश्यक आहे. या भूमीतील वाङमयीन परंपरा थोर आहे. त्याची जाणीव आपल्याला असली पाहिजे. चक्रधर, म्हाईंभट, महंदबा यांच्या महानुभाव साहित्यापासून ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत गाडगेबाबा, प्रज्ञाचक्षू गुलाबराव महाराजांपर्यंत मोठी परंपरा जिल्ह्याला लाभली आहे.  सत्यशोधक चळवळीतही येथे मोठी साहित्यनिर्मिती झाली.

कविभूषण ब. ग. खापर्डे, वीर वामनराव जोशी, लेडी यशोदाबाई जोशी, उद्धव शेळके, सुरेश भट, मधुकर केचे, शरच्चंद्र सिन्हा, तुळशीराम काजे, सुशीला पाटील, माणिक कानेड, वसंत आबाजी डहाके, प्रभा गणोरकर, मधुकर वाकोडे, सुखदेव ढाणके, बबन सराडकर, सुभाष सावरकर, अशोक थोरात, रमेश अंधारे आदी अनेक साहित्यिकांचा योगदानाची मांडणी त्यांनी केली.

कोशनिर्मिती व नाट्यक्षेत्रातही जिल्ह्याचे स्थान मोठे आहे. अचलपूर शहराला एकोणविसाव्या शतकाच्या पूर्वार्धापासूनची परंपरा आहे. याबाबत अधिक संशोधन गरजेचे असल्याचे डॉ. चिमोटे यांनी सांगितले.

 

शासन व्यवहारात मराठी भाषेचा वापर वाढावा म्हणून भाषा संचालनालय विविध उपक्रम राबवत असल्याचे श्री. सूर्यवंशी यांनी प्रास्ताविकात सांगितले. अभिजित इंगळे यांनी सूत्रसंचालन केले.

०००

पदवीधर मतदारसंघ निवडणूक, मतदान ओळखपत्र नसल्यास विविध पर्याय

 पदवीधर मतदारसंघ निवडणूक

मतदान ओळखपत्र नसल्यास विविध पर्याय

अमरावती, दि. २१ : पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूकीसाठी मतदान करताना जे मतदार ओळखपत्र (EPIC) सादर करु शकत नाहीत, त्यांना ओळख पटविण्यासाठी मतदार ओळखपत्राच्या (EPIC) व्यतिरिक्त पर्यायी कागदपत्रे पुरावा म्हणून सादर करता येतील. तसे आदेश राष्ट्रीय निवडणूक आयोगाने दिले आहेत.  

त्यानुसार आधारकार्ड, वाहनचालक परवाना, पॅनकार्ड, पारपत्र, केंद्र/राज्य सरकार/सार्वजनिक उपक्रम/ पब्लिक लिमिटेड कंपन्या यांनी कर्मचा-यांना जारी केलेले फोटोसह ओळखपत्र, खासदारांना/आमदारांना जारी करण्यात आलेले अधिकृत ओळखपत्र, संबंधित शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघातील मतदार ज्या शैक्षणिक संस्थेत नोकरी करत आहेत त्या शैक्षणिक संस्थांनी जारी केलेले सेवा ओळखपत्र, विद्यापीठाद्वारा वितरित मूळ पदवी/पदविका प्रमाणपत्र, सक्षम प्राधिका-याने दिलेले शारीरिक दिव्यांगत्वाचे मूळ प्रमाणपत्र,  भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाने वितरित केलेले युनिक डिसॅबिलीटी ओळखपत्र (UDID) आदी पर्याय जाहीर करण्यात आले आहेत.

00000

 

राष्ट्रीय मतदारदिनानिमित्त उपक्रम, जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे व्हिडीओ मेकिंग व भित्तीचित्रकला स्पर्धा

 राष्ट्रीय मतदारदिनानिमित्त उपक्रम

जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे व्हिडीओ मेकिंग व भित्तीचित्रकला स्पर्धा

अधिकाधिक कलावंतांनी सहभागी व्हावे

-         जिल्हाधिकारी पवनीत कौर

अमरावती, दि. २१ : राष्ट्रीय मतदारदिनानिमित्त नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे व्हिडीओ व रील मेकिंग स्पर्धा, तसेच अमरावती महापालिकेच्या सहकार्याने भित्ती चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील अधिकाधिक कलावंतांनी त्यात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी केले आहे.

व्हिडीओ मेकिंग स्पर्धा

ही स्पर्धा १३ वर्षांवरील सर्व नागरिकांसाठी खुली आहे. स्पर्धक हे वैयक्तिकरीत्या किंवा जास्तीत जास्त तीन सदस्य असलेल्या गटात भाग घेऊ शकतात. गुगल फॉर्मच्या माध्यमातून नोंदणी करता येईल. स्पर्धेला कुठलेही प्रवेशशुल्क नाही. सर्व स्पर्धकांना प्रमाणपत्रे प्रदान करण्यात येतील. स्पर्धेसाठी २३ जानेवारीपूर्वी नोंदणी करणे आवश्यक आहे. राष्ट्रीय मतदार दिन, मतदानाचा अधिकार, मतदानाची ताकद हे स्पर्धेचे विषय आहेत. व्हिडीओ कमीत कमी ३० सेकंद व जास्तीत जास्त ९० सेकंदांचा असावा. स्पर्धकांनी त्यांचे व्हिडीओ फेसबुक, इंस्टाग्राम व ट्विटर या तीनपैकी एका किंवा त्याहून अधिक समाजमाध्यमांवर पोस्ट करणे आवश्यक आहे. स्पर्धेची नोंदणी करताना व्हिडीओची लिंक गुगल फॉर्ममध्ये अपलोड करावी. व्हिडीओसाठी माध्यम म्हणून मराठी, हिंदी किवा इंग्रजी यापैकी कुठलीही भाषा वापरता येईल.  व्हिडीओ गुणात्मकदृष्ट्या उत्तम असावा. त्यासाठी ग्राफिक्स, संगीत व व्हिज्युअल इफेक्टसचा प्रभावी वापर असावा. नाविन्यपूर्ण संकल्पनांना प्राधान्य दिले जाईल. त्यानुसार विषयाशी संबंधित कविता, भाषण, लघुनाट्य आदी स्वरूपातील व्हिडीओ करता येईल.

व्हिडीओमध्ये कोणताही राजकीय पक्ष, व्यक्ती किंवा संघटनेचा उल्लेख नसावा. कोणत्याही धार्मिक, सांस्कृतिक भावनांना ठेच पोहोचेल असे संवाद किंवा दृश्ये नसावीत, तसे आढळल्यास कडक कारवाई केली जाईल. स्पर्धेसाठी तीन हजार, दोन हजार व एक हजार अशी अनुक्रमे पहिली तीन बक्षीसे व साडेसातशे रूपयांची दोन उत्तेजनार्थ बक्षीसे आणि इंस्टाग्रामवर सर्वाधिक पाहिल्या गेलेल्या व शेअर झालेल्या व्हिडीओ  संकल्पनेसाठी दोन हजार रूपयांचे विशेष पारितोषिक दिले जाईल. व्हिडीओ टाकताना कॅप्शन National Voter’s Day 2023 Video Competition , Amravati Collector, तसेच संपूर्ण नाव (आधारकार्डानुसार), विषय नमूद करावा. व्हिडीओ @ceo_maharashtra, @dio_amravati, @deoamravati यांना टॅग करावा. #nationalvoterday #amravaticollector, #amravaticollectoroffice, #vote, #amravati असे हॅशटॅग जोडावेत.

व्हिडीओ मेकिंग स्पर्धेसाठी नोंदणीसाठी लिंक https://forms.gle/zauDZHbw6kAXcWmg7 अशी आहे.

 

 

भित्तीचित्रकला स्पर्धा

भित्तीचित्रकला (वॉल पेंटिंग) स्पर्धा महाविद्यालयीन विद्यार्थी, तसेच नागरिकांसाठी खुली आहे. स्पर्धा दि. २२ जानेवारीला होईल. स्पर्धेला प्रवेशशुल्क नाही. सर्व सहभागींना प्रमाणपत्र दिले जाईल. सहभागींना किमान दोन व जास्तीत जास्त पाच सदस्यांच्या गटात सहभागी होता येईल. स्पर्धेचा विषय राष्ट्रीय मतदारदिन, मतदानाचा अधिकार, मतदानाची ताकद आणि मतदान जागृतीशी संबंधित सर्व बाबी असा आहे. चित्रात राजकीय टिप्पणी नको. धार्मिक, सांस्कृतिक विद्वेष पसरवणारा मजकूर असल्यास कारवाई केली जाईल.  स्पर्धेसाठी ब्रश आणि रंग पुरवले जातील; तथापि, स्केल, पेन्सिल व इतर अनुषंगिक साहित्य स्पर्धकांनी आणणे अपेक्षित आहे. स्पर्धक गटाला चार बाय सहा आकाराचा ब्लॉक दिला जाईल. स्पर्धेची वेळ सकाळी ८ ते ११.३० अशी आहे. वेळेत चित्र पूर्ण करणे अपेक्षित आहे. आयडी कार्ड (आधारपत्र) सोबत आणावे. गुगल फॉर्मवर नोंदणी आवश्यक आहे. स्पर्धेचे ठिकाण ई-मेलद्वारे कळवले जाईल. स्पर्धेसाठी चार हजार, तीन हजार व दोन हजार अशी अनुक्रमे पहिली तीन बक्षीसे व एक हजार रूपयांची दोन उत्तेजनार्थ बक्षीसे आणि नाविन्यपूर्ण संकल्पनेसाठी दीड हजार रूपयांचे विशेष पारितोषिक दिले जाईल.  भित्तीचित्रकला स्पर्धेसाठी नोंदणी करण्यासाठी लिंक https://forms.gle/WGomt4Bowj8SgSe7A  अशी आहे. उपक्रमाला संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ व आय क्लीन संस्थेचे सहकार्य लाभले आहे.

 

०००


राष्ट्रीय मतदारदिनानिमित्त उपक्रम, भित्तीचित्रकला स्पर्धेत शेकडो कलावंतांचा सहभाग

 राष्ट्रीय मतदारदिनानिमित्त उपक्रम

भित्तीचित्रकला स्पर्धेत शेकडो कलावंतांचा सहभाग

 मतदानाच्या महत्वाबाबत रेखाटली अनेकविध चित्रे

अमरावती, दि. 22 : राष्ट्रीय मतदारदिनानिमित्त नागरिकांमध्ये मतदानाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय व महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने भित्ती चित्रकला स्पर्धा आज झाली. त्यात जिल्ह्यातील शेकडो कलावंतांनी सहभाग घेऊन मतदानाच्या अधिकाराचे महत्व विशद करणारी अनेक आकर्षक चित्रे काढली. विद्यार्थी व तरूण कलावंतांचा सहभाग लक्षणीय होता.

   जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी भित्ती चित्रकलेच्या (वॉल पेटींग) ठिकाणी आज प्रत्यक्ष भेट देऊन सहभागी स्पर्धकांचे कौतूक करीत उत्साह वाढविला.  निवासी उपजिल्हाधिकारी विवेक घोडके, उप जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. नितीन व्यवहारे, उपविभागीय अधिकारी रिचर्ड यानथन, तहसीलदार संतोष काकडे यांच्यासह चित्रकला महाविद्यालयाचे शिक्षकवृंद, मनपा शाळेचे कलाशिक्षक व विद्यार्थी-विद्यार्थींनी यावेळी उपस्थित होते.

भित्तीचित्रकला (वॉल पेंटिंग) स्पर्धा महाविद्यालयीन विद्यार्थी, तसेच नागरिकांसाठी खुल्या स्वरुपात नि:शुल्क आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेचा विषय राष्ट्रीय मतदारदिन, मतदानाचा अधिकार, मतदानाची ताकद आणि मतदान जागृतीशी संबंधित सर्व बाबी असा होता.  स्पर्धकांना ब्रश आणि रंग आदी साहित्य पुरविण्यात आले होते. या स्पर्धेत विजयी होणाऱ्या स्पर्धकांना चार हजार, तीन हजार व दोन हजार अशी अनुक्रमे पहिली तीन बक्षीसे व एक हजार रूपयांची दोन उत्तेजनार्थ बक्षीसे आणि नाविन्यपूर्ण संकल्पनेसाठी दीड हजार रूपयांचे विशेष पारितोषिक घोषित करण्यात आले आहे. त्याशिवाय, व्हिडीओ मेकिंग स्पर्धाही आयोजित करण्यात आली असून, त्यासाठी विविध आकर्षक बक्षीसे देण्यात येणार आहेत. स्पर्धांचे बक्षीसवितरण राष्ट्रीय मतदारदिनी होणार आहे.

व्हिडीओ मेकिंग स्पर्धा

ही स्पर्धा १३ वर्षांवरील सर्व नागरिकांसाठी खुली आहे. स्पर्धक हे वैयक्तिकरीत्या किंवा जास्तीत जास्त तीन सदस्य असलेल्या गटात भाग घेऊ शकतात. गुगल फॉर्मच्या माध्यमातून नोंदणी करता येईल. स्पर्धेला कुठलेही प्रवेशशुल्क नाही. सर्व स्पर्धकांना प्रमाणपत्रे प्रदान करण्यात येतील. स्पर्धेसाठी २३ जानेवारीपूर्वी नोंदणी करणे आवश्यक आहे. राष्ट्रीय मतदार दिन, मतदानाचा अधिकार, मतदानाची ताकद हे स्पर्धेचे विषय आहेत. व्हिडीओ कमीत कमी ३० सेकंद व जास्तीत जास्त ९० सेकंदांचा असावा. स्पर्धकांनी त्यांचे व्हिडीओ फेसबुक, इंस्टाग्राम व ट्विटर या तीनपैकी एका किंवा त्याहून अधिक समाजमाध्यमांवर पोस्ट करणे आवश्यक आहे. व्हिडीओ मेकिंग स्पर्धेसाठी नोंदणीसाठी लिंक https://forms.gle/zauDZHbw6kAXcWmg7 अशी आहे.

 

00000

महाज्योती’मार्फत पोलीस-मिलिटरी भरती पूर्व प्रशिक्षणासाठी अर्ज आमंत्रित

 महाज्योती’मार्फत पोलीस-मिलिटरी भरती पूर्व प्रशिक्षणासाठी अर्ज आमंत्रित

अमरावती, दि. 20 : महात्मा ज्योतीबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती), नागपूर या संस्थेमार्फत इतर मागासवर्ग, विमुक्त जाती-भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी पोलीस-मिलिटरी भरती पूर्व प्रशिक्षण राबविण्यात येते. त्याकरिता नोंदणी प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. त्यानुसार इच्छुकांनी प्रशिक्षणासाठी नोंदणी महाज्योतीच्या www.mahajyoti.org.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पध्दतीने 25 जानेवारीपर्यंत करावी, असे आवाहन महाज्योतीमार्फत करण्यात आले आहे.

या प्रशिक्षण हे महाज्योतीमार्फत नागपूर व औरंगाबाद या दोन ठिकाणी देण्यात येणार आहे. प्रशिक्षणाचा कालावधी चार महिन्याकरिता असून हे प्रशिक्षण अनिवासी स्वरुपाचे आहे. सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना दरमाह सहा हजार रुपये इतके विद्यावेतन देण्यात येणार आहे. तसेच प्रशिक्षणा दरम्यान पुस्तके, गणवेश देखील देण्यात येणार आहे.

या प्रशिक्षणाचा लाभ घेण्यासाठी उमेदवार हा इतर मागासवर्ग, विमुक्त जाती-भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गापैकी असावा तसेच तो नॉनक्रिमिलेअर गटातील असावा. उमेदवार किमान 12 वी उत्तीर्ण असावा. इच्छुक उमेदवाराने महाज्योतीच्या www.mahajyoti.org.in या संकेतस्थळावरील नोटीस बोर्डमधील पोलीस भरती पुर्व प्रशिक्षण या टॅबवर जाऊन ऑनलाईन पध्दतीने अर्ज करावा. अर्ज करण्याची अंतीम दिनांक 25 जानेवारी ही आहे. या संधीचा लाभ घेण्यासाठी महाराष्ट्रातील इतर मागासवर्ग, विमुक्त जाती-भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी पोलीस-मिलिटरी भरती पूर्व प्रशिक्षणाकरिता अर्ज करण्याचे आवाहन महाज्योतीचे व्यवस्थापकीय संचालक राजेश खवले यांनी केले आहे.

0000



नेताजी सुभाषचंद्र बोस, बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन

 नेताजी सुभाषचंद्र बोसबाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन

 

        अमरावतीदि. २३ नेताजी सुभाषचंद्र बोस आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनानिमित्त विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी आज विभागीय आयुक्त कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार वाहून अभिवादन केले.

            यावेळी उपायुक्त संजय पवार, सहायक आयुक्त विवेकानंद काळकर, तहसीलदार वैशाली पाथरे यांच्यासह अन्य अधिकारी-कर्मचारी उपस्थिती होते. उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही नेताजी सुभाषचंद्र बोस आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

00000

सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणासाठी अर्ज आमंत्रित

 सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणासाठी अर्ज आमंत्रित

अमरावती, दि. 24 : संघ लोकसेवा आयोग (युपीएससी) नवी दिल्ली यांच्यामार्फत पदवीधर उमेदवारासाठी दि. 16 एप्रिल 2023 रोजी कंम्बाईन्ड डिफेन्स सर्व्हिसेस (सीडीएस) या संरक्षण दलातील अधिकारी पदाची परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी ऑनलाईन आवेदनपत्र भरलेल्या उमेदवारांकरीता राज्य शासनाकडून छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक येथे पूर्वतयारी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले असून त्यासाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. त्यानुसार जिल्ह्यातील युवकांनी या प्रशिक्षणाचा लाभ घेण्यासाठी दि. 30 जानेवारीला जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, अमरावती येथे मुलाखतीस हजर राहावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.

युपीएससीच्या कंम्बाईन्ड डिफेन्स सर्व्हिसेस (सीडीएस) परीक्षेच्या माध्यमातून कायमस्वरुपी व अल्पमुदतीचे कमीशनसाठी युवकांची निवड केल्या जाते. राज्यातील युवक-युवतींना भारतीय सैन्य दलात अधिकारी पदाची संधी उपलब्ध व्हावी, यासाठी राज्य शासनातर्फे छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक येथे सीडीएस परीक्षा पूर्वतयारी प्रशिक्षणाचे (सीडीएस कोर्स क्र.60) दि. 1 फेब्रुवारी ते 9 एप्रिल 2023 दरम्यान आयोजन करण्यात आले आहे. या कोर्ससाठी निवड होणाऱ्या प्रशिक्षणार्थिंची निवास, भोजन व प्रशिक्षणाची नि:शुल्क सुविधा करण्यात आली आहे.

जिल्ह्यातील अधिकाधिक युवकांनी सैन्यदलात अधिकारी बनण्याच्या संधीचा लाभ घेण्यासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयास दि. 30 जानेवारी मुलाखतीस कार्यालयीन वेळेत उपस्थित राहावे. मुलाखतीला येताना डिपार्टमेन्ट ऑफ सैनिक वेलफेअर, पुणे (DSW) या संकेतस्थळाच्या फेसबुक, वेबपेज सर्च करुन त्यातील सीडीएस-60 कोर्ससाठी प्रवेशपत्र व त्यासोबत असलेल्या परिशिष्ठाची प्रिंट काढून तो पूर्ण भरुन मुलाखतीस हजर राहावे.

अधिक माहितीसाठी दि. 21 डिसेंबर 2022 चे रोजगार समाचार वृत्तपत्र, युपीएससीचे www.upsconline.nic.in संकेतस्थळ तसेच छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक यांचा दूरध्वनी क्रमांक 0253-245032 वर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.

00000

शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ जयंती साजरी

 शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात

स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ जयंती साजरी

 


‘युवकांसमोरील आदर्श’ या विषयावर परिसंवाद

 

अमरावती, दि. 24 : शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात नुकताच स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांची जयंती साजरी करण्यात आली. यानिमित्त ‘युवकांसमोरील आदर्श’ या विषयावर आयोजित परिसंवाद कार्यक्रमात शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांकडून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. संस्थेच्या स्थापत्य अभियांत्रिकी विभागाच्या सभागृहात जयंती कार्यक्रम संपन्न झाला असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य प्रा.डॉ.ए.एम. महल्ले होते. या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक राजेश बुरंगे, प्रा. टि.सी. भगत, प्रभारी अधिकारी प्रा. ए. एम. मुकादम, प्रा. एन.जी. गाडगे तसेच सर्व शाखांचे व्दितीय वर्षाचे विद्यार्थी व एन.एस.एस स्वयंसेवक उपस्थित होते.

प्रारंभी श्री. बुरंगे यांच्याहस्ते स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. महाविद्यालयाच्या एन.एस.एस. विद्यार्थ्यांनी ‘एकता स्वतंत्रता समानता रहे’ हे देशभक्ती गीत गायले.

आजच्या युवकाला जर चांगली शिकवण दिली तर स्वामी विवेकानंद यांच्या विचारांसारखा देश घडू शकतो. संस्थेच्या अनेक माजी विद्यार्थ्यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाची (युपीएससी) परीक्षा उत्तीर्ण केली असून ते सध्या भारतीय नागरी सेवेमध्ये सेवा बजावत आहेत. अशा यशस्वी कर्तबगार विद्यार्थ्यांकडून संस्थेत शिकत असलेल्या विद्यार्थी-विद्यार्थीनींनी प्रेरणा घेऊन आपले भविष्य उज्ज्वल करावे, असे आवाहन प्राचार्य डॉ. महल्ले यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात केले.

‘युवकांसमोरील आदर्श’ या विषयावर श्री. राजेश बुरांगे यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, तरुणांनी स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांचा आदर्श घेत त्यांचे विचार आचरणात आणावे. राष्ट्रीय सेवा योजनेचे रक्तदान हे मुख्य काम असून रक्तदानातून अनेक गरजू व्यक्तिंचे प्राण वाचविल्या जाऊ शकते, यासाठी सर्वांनी नियमित रक्तदान करावे. अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी आत्मसात केलेल्या ज्ञानाचा उपयोग समाजातील शेवटाला होईल यादृष्टीने प्रयत्न करावे,  असेही श्री. बुरांगे यांनी यावेळी सांगितले.

संस्थेव्दारे आयोजित चित्रकला स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविणाऱ्या कु. आचल तराळे या विद्यार्थीनीचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र व बक्षीस देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन सौरभ महाजन यांनी केले.

0000

राष्ट्रीय मतदारदिन लोकशाही बळकट करण्यासाठी मतदान करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य - विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्टे

 राष्ट्रीय मतदारदिन

लोकशाही बळकट करण्यासाठी मतदान करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य

-        विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्टे

अमरावती, दि. २५ : लोकशाही बळकट करण्यासाठी मतदान करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य असते. त्यामुळे मतदार यादीत नाव नसलेल्या १८ वर्षांवरील युवक, तसेच प्रत्येकाने मतदार नोंदणी पूर्ण करावी, असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी आज येथे केले.

राष्ट्रीय मतदारदिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय व संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातर्फे कार्यक्रम विद्यापीठाच्या सभागृहात झाला, त्यावेळी ते बोलत होते. कुलगुरू विजयकुमार चौबे, प्र. जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, सहायक जिल्हाधिकारी रिचर्ड यांथन, उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. नितीन व्यवहारे, कुलसचिव डॉ. तुषार देशमुख, धनुर्विद्यापटू मधुरा धामणकर आदी उपस्थित होते. सर्व उपस्थितांनी यावेळी मतदारदिनाची प्रतिज्ञा घेतली.

निवडणुकीच्या दृष्टीने मतदार नोंदणी महत्वाची असते. त्यामुळे वयाची १८ वर्षे पूर्ण करणा-या प्रत्येकाने मतदार यादीत आपले नाव असण्याची दक्षता घ्यावी व आपला मताधिकार बजावून आपले राष्ट्रीय कर्तव्य पार पाडावे, असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. पांढरपट्टे यांनी केले. मतदार म्हणून कर्तव्य बजावण्याच्या शपथेचा उल्लेख करत कुलगुरू डॉ. चौबे म्हणाले की, मतदार प्रतिज्ञेचे पावित्र्य जाणून ती सर्वांनी ती आचरणात आणावी व मतदार म्हणून आपले कर्तव्य पूर्ण करावे.

 

मतदार नोंदणीसाठी उत्कृष्ट कार्य करणा-या अधिकारी, कर्मचारी, राष्ट्रीय सेवा योजनेचे अधिकारी, स्वयंसेवक आदींचा यावेळी गौरव करण्यात आला. डॉ. व्यवहारे यांनी प्रास्ताविक केले. राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक राजेश बुरंगे यांनी सूत्रसंचालन केले. अमर कथोरे यांनी स्वागतगीत म्हटले. तहसीलदार संतोष काकडे यांनी आभार मानले. उपविभागीय अधिकारी मनोज लोणारकर, तहसीलदार मदन जाधव, नायब तहसीलदार श्यामसुंदर देशमुख, क्रीडा प्रशिक्षक पवन तांबट आदी यावेळी उपस्थित होते.   

०००

जप्त रेतीसाठ्याचा चांदूर रेल्वे येथे शुक्रवारी लिलाव

 जप्त रेतीसाठ्याचा चांदूर रेल्वे येथे शुक्रवारी लिलाव

अमरावती, दि. 25: अवैधरीत्या साठा केल्याचे आढळल्यावरून पथकाने जप्त केलेल्या 120 ब्रास वाळूचा जाहीर लिलाव चांदूर रेल्वे येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयात शुक्रवारी (27 जानेवारी) दुपारी 4 वाजता होणार आहे.  इच्छूकांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

धामणगाव तालुक्यातील नायगाव रेतीघाटाचा 2021-2022 या आर्थिक वर्षात लिलाव झाला होता. या घाटातून अवैध वाळू उत्खनन करुन त्याची विनापरवाना साठवणूक झाल्याचे निदर्शनास येताच विशेष पथकाकडून  ते साठे जप्त करण्यात आले. या 120 ब्रास वाळूची हातची किंमत 72 हजार रू. ठेवण्यात आली आहे. त्यानुसार लिलाव होईल.

लिलावात सहभागी होणारे व्यक्ती, संस्था व शासकीय विभाग यांना लिलावात सहभागी होण्याकरीता अर्जासोबत ई-मेल आयडी, पॅन कार्ड, जीएसटी नंबर, करारपत्र, रहिवास पुरावा व आयकर भरणा करत असल्याबाबतचा पुरावा आदी दस्तऐवज द्यावे लागतील. अपसेट प्राईसच्या 25 टक्के इसारा रक्कम व इतर सर्व रकमा धनादेशाद्वारा भराव्या लागतील.

सर्वोच्च बोली धारकाने सर्वोच्च बोलीची 100 टक्के रक्कम लिलावाच्या दिवसानंतर कार्यालयीन कामकाजाच्या 12 तासाच्या आत भरणा करणे आवश्यक आहे.

 

000000

गुरुवार, ५ जानेवारी, २०२३

अमरावती पदवीधर मतदारसंघ निवडणूक, निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे यांची पत्रकार परिषद, निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध; प्रशासन सुसज्ज

 अमरावती पदवीधर मतदारसंघ निवडणूक

निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे यांची पत्रकार परिषद

निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध; प्रशासन सुसज्ज

अमरावती, दि. 5 : अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघाची निवडणुकीसाठी मतदान दि. 30 जानेवारीला सकाळी 8 ते दुपारी 4 वाजेपर्यंत व मतमोजणी 2 फेब्रुवारीला होणार आहे. त्यादृष्टीने प्रशासनाकडून तयारी करण्यात आली असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी आज येथे सांगितले.

विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. उपायुक्त संजय पवार, अजय लहाने, गजेंद्र बावणे, विजय भाकरे आदी उपस्थित होते.

डॉ. पांढरपट्टे म्हणाले की, निवडणुकीची अधिसूचना आज प्रसिद्ध करण्यात आली असून, नामनिर्देशन पत्रे स्वीकारायला सुरुवात झाली आहे. पहिल्या दिवशी एकही नामनिर्देशन प्राप्त नाही. नामनिर्देशन पत्रे दि. 12 जानेवारीपर्यंत स्वीकारण्यात येतील. त्यांची छाननी दि. 13 जानेवारीला होईल. उमेदवारी अर्ज दि. 16 जानेवारीपर्यंत मागे घेता येतील. निवडणूक प्रक्रिया दि. 4 फेब्रुवारीला पूर्ण करण्यात येईल.  

मतदार संख्या






अंतिम मतदार यादीनुसार, अमरावती विभागात 1 लाख 20 हजार 944 पुरूष, 64 हजार 906 महिला व इतर 75 अशा एकूण 1 लाख 85 हजार 925 मतदारांची नोंदणी आहे. त्यात अमरावती जिल्ह्यात 33 हजार 236 पुरूष, 23 हजार 329 महिला, इतर 64 असे एकूण 56 हजार 629 पदवीधर मतदारांची नोंदणी झाली आहे. अकोला जिल्ह्यात 27 हजार 943 पुरूष, 16 हजार 552 महिला व 11 इतर असे एकूण 44 हजार 506, तसेच बुलडाणा जिल्ह्यात 26 हजार 161 पुरूष, 10 हजार 336 महिला (इतर शून्य) असे एकूण 36 हजार 497 मतदार नोंदणी आहे.

वाशिम जिल्ह्यात 11 हजार 78 पुरूष, 3 हजार 966 महिला (इतर शून्य) असे एकूण 15 हजार 44 आणि यवतमाळ जिल्ह्यात 22 हजार 526 पुरूष, 10 हजार 723 महिला (इतर शून्य) एकूण 33 हजार 249 मतदारांची नोंदणी आहे.

मतदान केंद्रे

विभागात संभाव्य 262 मतदान केंद्रे असतील. त्यात अमरावती जिल्ह्यात 75, अकोला जिल्ह्यात 61, बुलडाणा जिल्ह्यात 52, वाशिम जिल्ह्यात 26 व यवतमाळ जिल्ह्यात 48 केंद्रे असतील.

निवडणूक प्रक्रियेसाठी नोडल अधिका-यांच्या नियुक्त्या यापूर्वीच करण्यात आल्या आहेत. मतदान केंद्राध्यक्ष म्हणून 288, मतदान अधिकारी म्हणून 1 हजार 153 व सूक्ष्म निरीक्षक म्हणून 289  अधिकारी व कर्मचा-यांना जबाबदारी देण्यात येत आहे.

निवडणुकीदरम्यान मतदानाच्या प्रक्रियेबाबत भरीव जनजागृती करण्यात येईल जेणेकरून मतदान बाद होणार नाही. आदर्श आचारसंहितेचे पालन होण्याच्या दृष्टीने यंत्रणा सुसज्ज करण्यात आली आहे. निवडणूक प्रक्रियेदरम्यान कोविड-19 बाबत मार्गदर्शक सूचनांचे पालन होणे आवश्यक आहे. मतमोजणीचे प्रशिक्षण, वाहतूक आराखडा, मतमोजणी केंद्र निश्चिती आदी प्रक्रिया सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. सहायक आयुक्त श्यामकांत म्हस्के, विवेकानंद काळकर, तहसीलदार वैशाली पाथरे, निकिता जावरकर, रवी महाले, नायब तहसीलदार मधुकर धुळे यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते.

दरम्यान, निवडणूक निर्णय अधिका-यांनी आज राजकीय पक्षांची बैठक घेऊन त्यांना निवडणूकविषयक विविध बाबींची माहिती दिली, तसेच त्यांचे शंकानिरसन केले. विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.