शुक्रवार, ८ डिसेंबर, २०२३

रब्बी हंगामामध्ये अवकाळी पावसामुळे उद्भभलेल्या समस्यावर अपात्कालीन पिक नियोजन कार्यशाळा

 रब्बी हंगामामध्ये अवकाळी पावसामुळे उद्भभलेल्या

समस्यावर अपात्कालीन पिक नियोजन कार्यशाळा

अमरावती, दि. 8 :  अवकाळी पावसामुळे संत्रा पिकावर उद्भवलेल्या समस्यांवर उपाययोजना करण्याच्या अनुषंगाने विभागीय कृषि सहसंचालक अमरावती विभाग अमरावती (कृषि विभाग) व डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ,अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ६ डिसेंबर २०२३ रोजी "संत्रा पिक व्यवस्थापन' या विषयावर वेबीनार आयोजीत करण्यात आला. या वेबीनारमध्ये विभागीय कृषि सहसंचालक श्री. के. एस. मुळे, यांनी मार्गदर्शन केले. वेबीनारमध्ये कृषि विद्यापिठातील सहाय्यक प्राध्यापक डॉ. राजेंद्र वानखडे यांनी अवकाळी पावसामुळे संत्रा पिकावर उदभवलेल्या समस्यांवर, नुकसानग्रस्त बागांची कशी काळजी घ्यावी व विकसित अवस्थेतील मृग बहाराचे कशाप्रकारे व्यवस्थापन करावे, याबाबत संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले.

आंबिया बहरासाठी ताणावर सोडलेल्या बागांचा ताण, अवकाळी पावसाने तुटतो. तरी बागा ताणात राहण्यासाठी क्लोरमेक्वाट क्लोराइड (५० टक्के प्रवाही) २ मिलि प्रति लिटर पाणी घेऊन फवारणी करणाबाबत तसेच ज्या बागांनी मुळातच ताण घेतला नव्हता, अशा बागेकरिता क्लोरमेक्वाट क्लोराइड (५० टक्के प्रवाही) ४ मिलि प्रति लिटर पाणी प्रमाणे फवारणी करणे आवश्यक असल्याचे डॉ. वानखडे यांनी या वेळी सांगितले. अवकाळी पावसामुळे संत्रा पिकांच्या जखमा भरून निघणे, झाडांना संतुलित अन्नपुरवठा होण्यासाठी अतिरीक्त पाण्याचा निचरा करणे, फांद्या कमी करून छाटणी करणे, झाडांची मुळे उघडी पडली असल्यास मातीची भर देणे, तसेच वाफ्यामध्ये सायमोक्सिनील (८ टक्के) अधिक मॅन्कोझेब (६४ टक्के डब्ल्यूपी) (संयुक्त घटक) किंवा मेटॅलॅक्झिल (८ टक्के) अधिक मॅन्कोझेब (६४ टक्के डब्ल्यूपी) (संयुक्त घटक) या बुरशीनाशकांची २.५ ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे द्रावण (८ ते १० लिटर प्रति झाड) या प्रमाणात टाकणे आवश्यक असल्याचे सांगतिले. तसेच मृग बहारातील फळांची वाढ होणे किंवा फळगळ थांबविणे करीता एनएए १ ग्रॅम किंवा २,४-डी १.५ ग्रॅम किंवा जिबरेलिक अॅसिड १.५ ग्रॅम यापैकी कोणत्याही एका संजीवकासह ६ बीए १ ग्रॅम अधिक १३:००:४५ हे १ किलो अधिक प्रोपीकोनॅझोल (२५ टक्के प्रवाही) १०० मिलि १०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करणे व सततच्या ढगाळ वातावरणामुळे आंबिया बहर व मृग बहरातील फळांवर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी संपूर्ण झाडावर कॉपर ऑक्सिक्लोराइड (५० डब्लूपी) 3 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करणेबाबत सुध्दा डॉ. वानखडे यांनी मार्गदर्शन केले. तसेच संत्रा पिकाचे अनुषंगाने, संत्रा बागेचे खत व्यवस्थापन, शेतकऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांवर मार्गदर्शन करून, उद्भवलेल्या समस्यां, अडचणी व शंकांचे निराकरण करण्यात आले.

या वेबीनार मध्ये विभागातील क्षेत्रीय अधिकारी/कर्मचारी तसेच संत्रा उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

0000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा