बुधवार, २५ सप्टेंबर, २०२४

मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेबाबत विद्यार्थ्यांना आवाहन

 

मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेबाबत विद्यार्थ्यांना आवाहन

 

अमरावती, दि. 25: सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी सन २०१८-१९ या शैक्षणिक वर्षापासून महाडीबीटी प्रणालीवर विविध शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येत असून त्यामध्ये केंद्र पुरस्कृत भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेचा सुद्धा समावेश करण्यात आलेला आहे. केंद्र शासनाने सामाजिक न्याय व अधिकारीता मंत्रालय, नवी दिल्ली यांनी सन २०२०-२१ ते २०२५-२६ या कालावधीकरीता जारी केलेल्या अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना देण्यात येणा-या भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत सुधारीत मार्गदर्शक सुचना (केंद्र हिस्सा निधी वितरण पद्धती) राज्यात सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, शासन निर्णय नुसार  १७ मार्च, २०२२ नुसार लागू करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

 शासन निर्णयातील मुद्दा क्रमांक (अ) केंद्र शासनाच्या ६० टक्के च्या हिश्याचे वितरण पद्धती नमूद केलेली असून त्यानुसार भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती निधीचे वितरण विद्यार्थ्यांचे महाडीबीटी प्रणालीवर नोदणीकृत केलेल्या अर्जानुसार आधार संलग्नीकृत बँक खात्यामध्ये केंद्र शासनाकडून थेट डी बी टी तत्वावर पी एफ एम एस प्रणालीद्वारे वितरीत करण्यात येत आहे. सदर केंद्र हिस्सा विद्यार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झाल्यानंतर विद्यार्थ्यांस अनुज्ञेय असलेला निर्वाह भत्ता वजा जाता उर्वरीत महाविद्यालयास देय असलेली रक्कम (शिक्षण शुल्क व इतर शुल्क) विद्यार्थ्यांने पुढील सात दिवसाच्या आत महाविद्यालयास जमा करणे आवश्यक आहे. यासाठी संबंधीत महाविद्यालयांने त्यांच्याकडून विहित नमुन्यात हमीपत्र घ्यावे असे नमूद केलेले आहे. परंतू केंद्र शासनाचा ६० टक्के हिस्सा विद्यार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झाल्यानंतर सुद्धा महाविद्यालयास देय असलेली रक्कम काही विद्यार्थी महाविद्यालयास भरणा करत नसल्याबाबत विभागातील महाविद्यालय व शिक्षण संघटना यांचेकडून जिल्हा कार्यालयास व या कार्यालयास तक्रारी,निवेदन प्राप्त होत आहे.

शासन निर्णयानुसार विद्यार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेल्या केंद्र शासनाच्या शिष्यवृत्तीच्या ६० टक्के हिश्यापैकी महाविद्यालयास देय असलेली रक्कम महाविद्यालयाकडे दिलेल्या विहित जमा करणे विद्यार्थ्यांस बंधनकारक आहे. तरी केंद्र शासनाच्या मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेचा ६० टक्के हिस्सा ज्या विद्यार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेला आहे, अशा विद्यार्थ्यांनी सात दिवसामध्ये महाविद्यालयास देय असलेली रक्कम महाविद्यालयाकडे भरणा करून त्याची रितसर पावती  महाविद्यालयाकडून प्राप्त करून घ्यावी, असे आवाहन विभागातील विद्यार्थी व पालक यांना समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त सुनिल वारे, यांनी  केले आहे.  

000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा