‘मुख्यमंत्री योजनादूत’ उपक्रमासाठी अर्ज करण्याचे आवाहन
राज्यात 46 हजार तर अमरावती विभागात 5 हजार 786 उमेदवारांची नोंदणी
योजनादूतांना दरमहा 10 हजार रूपये मानधन
येत्या 13 सप्टेंबरपर्यंत नोंदणी करता येणार
नोंदणीसाठी www.mahayojanadoot.org संकेतस्थळ उपलब्ध
अमरावती, दि. 9 : शासनाच्या विविध योजनांची सर्वसामान्य नागरिकांना माहिती देण्यासाठी ‘मुख्यमंत्री योजनादूत’ उपक्रम सुरु करण्यात आला आहे. राज्यात एकूण 50 हजार योजनादूत नेमण्यात येणार असून सोमवार (ता. 9 सप्टेंबर) सकाळी 11 वाजेपर्यंत राज्यात 46 हजार तर अमरावती विभागात 5 हजार 786 उमेदवारांनी नोंदणी केली आहे. 7 सप्टेंबर 2024 पासून या उपक्रमासाठी नोंदणी सुरु झाली असून येत्या 13 सप्टेंबरपर्यंत www.
महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत ‘मुख्यमंत्
अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांमध्ये दि. 9 सप्टेंबर रोजी, सकाळी 11 वाजेपर्यंत 5 हजार 786 उमेदवारांनी नोंदणी केली आहे. त्यानुसार अमरावती जिल्ह्यात 1527 उमेदवारांनी, अकोला जिल्ह्यातील 788, यवतमाळ जिल्ह्यातील 1343, बुलडाणा जिल्ह्यातील 1288, वाशिम जिल्ह्यातील 840 उमेदवारांनी या योजनेसाठी नोंदणी केली आहे.
असे आहेत निवडीचे निकष
या योजनेत सहभागी होण्यासाठी इच्छुक उमेदवार 18 ते 35 वयोगटातील असावा, उमेदवार कोणत्याही शाखेचा पदवीधर असणे आवश्यक आहे, उमेदवाराकडे महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. उमेदवारास संगणक ज्ञान असावे. त्याच्याकडे अद्ययावत मोबाईल (स्मार्ट फोन) आणि आधारसंलग्न बँक खाते असणे आवश्यक आहे.
ही कागदपत्रे आवश्यक
मुख्यमंत्री योजनादूत उपक्रमासाठी केलेला ऑनलाईन अर्ज, आधार कार्ड, पदवी उत्तीर्ण असल्याबाबतची पुराव्यादाखल कागदपत्रे / प्रमाणपत्र इ., अधिवासाचा दाखला. (सक्षम यंत्रणेने दिलेला), उमेदवाराकडे आधार जोडणी असलेल्या बँक खात्याचा पुरावा, पासपोर्ट आकाराचा फोटो, हमीपत्र (ऑनलाईन अर्जासोबतच्या नमुन्यामधील) नियुक्तीवेळी सादर करणे आवश्यक आहे. 13 सप्टेंबर 2024 पर्यंत इच्छुक उमेदवारांना www.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा