प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत
पुनर्रचित हवामानावर आधारीत फळपिक विमा योजनेचा
शेतकरी बांधवांनी लाभ घ्यावा
शेतकऱ्यांनी योजनेत सहभागी होण्यासाठी ऑनलाईन अर्ज सादर करावे
अमरावती,
दि. 29 : प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत पुनर्रचित हवामानावर
आधारित फळपिक विमा योजना सन 2021-22 ते पुढील तीन वर्षासाठी राबविण्यात येत आहे. वातावरणातील
आर्द्रता, गारपीट, इत्यादी नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या पिकांच्या नुकसानीपासून विमा संरक्षणाद्वारे आर्थिक स्थैर्य
अबाधीत राखता यावे यासाठी ही योजना राबविण्यात येत आहे. राज्य शासनाने ही योजना कर्जदार
व बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी ऐच्छिक स्वरुपात
केली आहे. विभागातील बुलडाणा, अकोला, वाशिम, अमरावती व यवतमाळ या जिल्ह्यात
ही योजना राबविण्यात येत आहे.
फळपिक विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी आंबिया
बहारातील विविध पिकांचा समावेश करण्यात आला आहे. अमरावती जिल्ह्यात संत्रा, मोसंबी,
केळी, पपई. बुलडाणा जिल्ह्यात संत्रा, मोसंबी,
डाळिंब, केळी, व आंबा. यवतमाळ जिल्ह्यात संत्रा व केळी. वाशिम जिल्ह्यात संत्रा, डाळिंब, पपई व आंबा आणि
अकोला जिल्ह्यात संत्रा, मोसंबी व डाळिंब. या पिकांचा समावेश करण्यात आला आहे.
या योजनेअंतर्गत सन 2021-22 साठीचे पीकनिहाय
कर्ज दर हे विमा संरक्षित रक्कम म्हणून ग्राह्य धरण्याचे निश्चित करण्यात आले आहे.
हे दर सन 2021-22 ते 2023-24 या कालावधीसाठी कायम ठेवण्यात आले आहे. ही योजना वर्ष
2021-24 या तीन वर्षांमध्ये विमा कंपन्यामार्फत राज्यात राबविण्यात येत आहे. जिल्हा
निहाय विमा कंपनी व त्यांचा पत्ता आदी माहीती पूढील प्रमाणे आहेत.
अमरावती, वाशिम व यवतमाळ येथील विमा कंपीनीचे
नाव रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लि. वेस्टर्न एक्सप्रेस हायवे, 5 मजला चिंतामणी
अव्हेन्यु, विरानी औद्योगिक वसाहत जवळ गोरेगाव (ई). मुंबई 400063 ग्राहक सेवा क्र.
18001024088 असून दुरध्वनी क्र. 022-68623005 आणि ई –मेल rgicl.maharashtraagrl@relianceada.com
हा आहे.
अकोला जिल्ह्यासाठी एचडीएफसी एर्गो जनरल
इन्शुरन्स कं. लि. पहिला मजला,एचडीएफसी हाऊस, 165-166 बॅकवे रिक्लेंमेशन, एच. टी. पारेख
मार्ग चर्चगेट मुंबई -400020, टोल फ्री क्र. 18002660700, दुरध्वनी क्र.
022-62346234 असून ई- मेल pmfby.maharashtra@hdfcergo.com हा आहे.
बुलडाणा जिल्ह्यात भारतीय कृषि विमा कंपनी
लिमिटेड मुंबई क्षेत्रिय कार्यालय, स्टॉक एक्सेंज टॉवर्स, 20वा मजला, दलाल स्ट्रिट
फोर्ट मुंबई -400023, टोल फ्री क्र. 18001165515 असून दुरध्वनी क्र. 022-61710912,
ई- मेल pikvima@aicofindia.com
आहे.
अधिसुचित क्षेत्रातील अधिसुचित फळपिकांसाठी
खातेदारां व्यतिरिक्त कुळाने अगर भाडेपटीने शेती करणारे शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ
शकतात. या योजनेअंतर्गत केंद्र शासनाने त्यांचा विमा हप्ता 30 टक्के दरापर्यत मर्यादित
केला आहे. त्यामुळे 30 टक्के वरील विमा हप्ता राज्य शासन व शेतकरी यांनी स्विकारणे
क्रमप्राप्त आहे. 35 टक्के वरील विमा हप्ता राज्य शासन व शेतकरी यांनी प्रत्येकी
50:50 टक्के प्रमाणे भरावयाचा आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांना योजनेचा लाभ घेता यावा
यासाठी जमीन भुधारणेच्या मर्यादेत एका शेतकऱ्यांस
अधिसूचित फळपिकांसाठी 4 हेक्टर क्षेत्र मया्रदेपर्यत विमा नोंदणी करण्याची मुभा आहे.
एका फळपिकासाठी एका वर्षात एकाच क्षेत्रावर मृग अथवा आंबिया बहारापैकी कोणतयाही एकाच
हंगामा करीता विमा संरक्षणासाठी अर्ज करता येईल. आंबिया बहार सन 2020-21 मध्ये फळपिक
निहाय योजनेचा लाभ घेण्यासाठी मोसंबी, केळी,
पपई साठी दि. 31 ऑक्टोबर पर्यंत, संत्रा पिकासाठी 30 नोव्हेंबर पर्यंत, डाळिंबासाठी
14 जानेवारीपर्यंत, आंबा पिकासाठी 31 डिसेंबर ऑनलाईन अर्ज सादर करावे.
शेतकऱ्यांनी फळपिक विमा योजनेचा लाभ घ्यावा.
योजनेबाबत अधिक माहितीकरीता www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर तसेच जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी
उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषि अधिकारी या कार्यालयाशी संपर्क
साधावा असे आवाहन कृषि विभागाचे विभागीय सहसंचालक शंकर तोटावार यांनी केले आहे.
000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा