बुधवार, ९ मार्च, २०२२

 

                           राजर्षी शाहु महाराज शिष्यवृत्तीचा लाभ घेण्यासाठी

                              विद्यार्थ्यांनी 11 मार्च पर्यंत अर्ज सादर करावे

अमरावती दि.8:- अनूसुचित जातीच्या (नैवबौध्दंसहीत) विद्यार्थ्यांनी देशातील उच्च शिक्षण घेण्यासाठी राजर्षी शाहु महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती योजना राज्याच्या सामाजिक न्याय विभागाकडून राबविली जाते. या योजनेसाठी सन 2021-22 या वर्षाकरिता अर्ज सादर करण्याचे आवाहन समाज कल्याण विभागाचे आयुकत डॉ. प्रशांत नारनवरे यांनी केले आहे.

               राज्यातील अनूसुचित जातीच्या नवबौध्द विद्यार्थ्यांसह 100 विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ दिला जात आहे. पात्र विद्यार्थ्यांस संबंधित विद्यापिठ , संस्थेने अभ्यासक्रमासाठी ठरवून दिलेले पुर्ण शिक्षण शुल्क, नोंदणी फी, जिमखाना, ग्रंथालय, संगणक, तसेच वसतिगृह व भोजन शुल्क इत्यादी शुल्क रक्कम विद्यार्थ्यांच्या आधार संलंग्न बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. पदवी अभ्यासक्रमासाठी इयत्ता 12 वीत किमान 55 टक्के गुण असणे आवश्यक आहे. तर पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांने पदवीत किमान 55 टक्के गुण मिळविणे आवश्यक आहे. तसेच कुटूंबाचे वार्षिक उत्पन्न मर्यादा 6 लाख आहे. या शिष्यवृत्ती करिता निवड झालेल्या विद्यार्थ्यांस भारत सरकार शिष्यवृत्ती लाभ मिळणार नाही. या अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षाला शिकत असला पाहीजे. तथापि पुढील वर्षाचे विद्यार्थी अर्ज करु शकतात. परंतु त्यांच्या विचार प्रथम वर्षाचे विद्यार्थी न मिळाल्यास करण्यात येईल.

               या योजनेचा लाभ घेण्याबाबत अधिक माहिती, जाहीरात, अर्ज व नियमावली शासनाच्या www.maharashtra.gov.in  या संकेस्थळावर जलद दुवे रोजगार या मथळ्याखाली प्रसिध्द झालेली आहे. संकेतस्थळावरुन अर्ज डाऊनलोड करुन परिपुर्ण अर्ज आवश्यक त्या कागदपत्रासह दि. 11 मार्च 2022 रोजी सांयकाळी 6.15 वाजेपर्यत swceda.nationalscholar@gmail.com  या ईमेल वर पाठवावे. अर्जाची प्रत समाज कल्याण आयुक्तालय, 3 चर्च रोड पुणे – 411001 येथे सादर करण्यात यावी, असे समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे पुणे यांनी व प्रादेशिक समाज कल्याण उपआयुक्त सुनील वारे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

 

0000


                           बारावीच्या परीक्षेतील एकाच दिवशी येणाऱ्या

               दोन विषयांची परीक्षा विद्यार्थी 5 व 6 एप्रिलला देऊ शकतील

अमरावती दि. 9:-  इयत्ता बारावीची परीक्षा दिनांक 4 मार्च पासुन सुरु झाली असुन वेळापत्रकाप्रमाणे माहिती तंत्रज्ञान विषयाची ऑनलाईन परीक्षा दिनांक 31 मार्च, 01 व 4 एप्रिल 2022 रोजी सकाळी साडेदहा ते दुपारी दिड आणि दुपारी तीन ते सहा याप्रमाणे सकाळच्या व दुपारच्या सत्रात प्रत्येकी 3 तास या कालावधीची राहील. तसेच इयत्ता बारावीची सामान्यज्ञान या विषयाची ऑनलाईन परीक्षा दि. 1, 4 व 5 एप्रिल 2022 रोजी सकाळी साडेदहा ते दुपारी एक व दुपारी तीन ते दुपारी साडेपाच याप्रमाणे सकाळाच्या व दुपारच्या सत्रात प्रत्येकी 2 तास 30 मिनिटे या कालावधीची राहील हे मंडळाकडून कळविण्यात आले आहे.

              इयत्ता बारावीच्या परीक्षेच्या वेळापत्रकातील अंशत: बदलानुसार शनिवार दि. 5 मार्च 2022 रोजी होणाऱ्या  प्रथम व द्वितीय सत्रातील भाषा विषयाच्या परीक्षा मंगळवार दि. 5 एप्रिल 2022 रोजी  आयोजित करण्यात आलेल्या आहेत. मूळ वेळापत्रकानुसार इयत्ता 12 वी माहिती तंत्रज्ञान (आय. टी.) या विषयाची ऑनलाईन परीक्षा दि. 31 मार्च 2022 आणि 1 व 4 एप्रिल 2022 या कालावधीमध्ये सकाळ व दुपार सत्रात आयोजित करण्यात आलेली आहे. आणि दि. 5 एप्रिल 2022 रोजी पुर्नपरीक्षेची संधी उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. काही विद्यार्थ्यांनी भाषा विषय आणि माहिती तंत्रज्ञान विषय एकत्रित घेतले असल्यास त्यांना अडचण निर्माण होऊ नये यासाठी दिनांक 5 व 6 एप्रिल रोजी पुर्नपरीक्षेची संधी उपलब्ध करुन देण्यात येत आहे. असे अमरावती विभागीय मंडळाचे सचिव उल्हास नरड यांनी कळविले आहे.

0000000

             दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षेच्या आदल्या दिवशी पर्यंत आवेदनपत्र भरण्याची सुविधा

                        विद्यार्थी 14 मार्च पर्यंत ऑनलाईन आवेदन सादर करु शकतील

 

            अमरावती दि. 9: राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत मार्च - एप्रिल 2022 मध्ये इयत्ता दहावी ची परीक्षा दिनांक 15 मार्च ते 4 एप्रिल 2022 या कालावधीत आयोजित करण्यात आलेली आहेत.

या परीक्षेसाठी आवेदनपत्र भरणाऱ्या विद्यार्थ्यांना विलंब शुल्क आकारण्यात येऊ नये. विलंब शुल्क माफ करण्यात यावे तसेच विद्यार्थ्याना परीक्षेच्या आदल्या दिवशीपर्यत ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात यावी असे कळविण्यात आले आहे. त्यानुसार सर्व संबंधित घटकांना विभागीय मंळामार्फत अवगत करण्याबाबत कार्यवाही करण्यात आलेली आहे.

                  इयत्ता दहावीची परीक्षा दिनांक 15 मार्च  पासून सुरु होत असल्याने या परीक्षेचे आवेदनपत्र नियमित शुल्कासह ऑनलाईन पध्दतीने दि. 14 मार्च 2022  रोजी सकाळी 11 वाजेपर्यत भरण्याची सुविधा उपलब्ध राहील, त्यानंतर आवेदनपत्र भरणेसाठी संकेतस्थळ बंद करण्यात येणार आहे. मार्च - एप्रिल 2022 मध्ये इयत्ता दहावी परीक्षेस प्रविष्ट होण्यासाठी खाजगी विद्यार्थी म्हणून नाव नोंदणीसाठी अर्ज केलेल्या परंतू प्रस्तावामध्ये त्रुटी असणाऱ्या विद्यार्थ्यांनी दि 10 मार्च 2022 पर्यत त्रुटीची पुर्तता करुन दि. 12 मार्च 2022 पर्यत नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त करुन घ्यावे व दिलेल्या मुदतीत परीक्षेचे आवेदनपत्र भरावे. असे अमरावती विभागीय मंडळाचे सचिव उल्हास नरड यांनी कळविले आहे.

0000000

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा