सोमवार, २५ सप्टेंबर, २०२३

सत्यशोधक समाजाने दिला बहुजनांना विवेकी जगण्याचा मार्ग

 सत्यशोधक समाजाने दिला बहुजनांना विवेकी जगण्याचा मार्ग

 

Ø  महाज्योती कार्यालयात सत्यशोधक समाजाचा शतकोत्तरी

     सुवर्ण महोत्सव उत्साहात साजरा


Ø  अधिकारी व कर्मचारी यांना सार्वजनिक सत्य धर्मपुस्तकाचे वाटप

 

            अमरावती दि. 25 : महात्मा जोतीराव फुले व सावित्रीबाई फुले यांनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाने बहुजन समाजाला विवेकी पद्धतीने जीवन जगण्याचा मार्ग दिला. मनुष्याला विषमताअंधश्रद्धाअनिष्ट रूढी यापासून परावृत्त करून उच्च मुल्यांवर आधारित पर्यायी संस्कृती तयार करून दिली. जन्ममृत्यूविवाह अश्या सर्व संस्कारांचे विवेकीकरण करणेनिर्मिकाला सर्व लोक समान असल्याचा संदेश देणे हे सत्यशोधक समाजाच्या कार्याचे महत्वाचे योगदान आहे. त्यामुळे बहुजन समाजाला शिक्षणाची प्रेरणा मिळत गेलीत्यामुळे आजही सत्यशोधक समाजाची तत्वे कालसुसंगत आहेत असे प्रतिपादन महाज्योतीचे प्रकल्प व्यवस्थापक कुणाल शिरसाठे यांनी केले.

महाज्योती कार्यालयात सत्यशोधक समाजाला 150 वर्षे पूर्ण झाल्यामुळे आजच्या काळात सत्यशोधक समाजाचे महत्व या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आलेले होतेयावेळी प्रकल्प व्यवस्थापक कुणाल शिरसाठे बोलत होते. महाराष्ट्राच्या सामाजिकशैक्षणिक क्षेत्रात सत्यशोधक समाजाचा मोठा प्रभाव पडला त्यामुळे बहुजनांना शिक्षण देणाऱ्या अनेक शिक्षण संस्था उदयाला आल्या तसेच अनेक सुधारणावादी चळवळीचा जन्म झाला. महाराष्ट्राच्या राजकीय क्षेत्रात देखील सत्यशोधक समाजाच्या विचारांना स्थान आहेत्यातूनच बहुजन कल्याणाच्या विविध योजना शासन तयार करीत आहे असे देखील शिरसाठे म्हणाले.

सत्यशोधक समाजाने पत्रकारितामहिला शिक्षण अश्या क्षेत्रात देखील मोठे योगदान दिल्याचे कार्यक्रमाचे अध्यक्ष महाज्योतीचे व्यवस्थापकीय संचालक मा.राजेश खवले यांनी सांगितले. अध्यक्षीय समारोप करताना त्यांनी सत्यशोधक चळवळ जलास्याच्या माध्यमातून देश विदेशात पसरली आणि त्यातून शिक्षण चळवळीला हातभार लागला याचे सविस्तर विवेचन केले.

या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून महाज्योतीचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी प्रशांत वावगेलेखाधिकारी रश्मी तेलेवारसहाय्यक लेखाधिकारी जयश्री बोदेले उपस्थित होते.

महाज्योती कार्यालयात सत्यशोधक समाजाचा शतकोत्तरी सुवर्ण महोत्सव उत्साहात साजरी करताना  कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांना सार्वजनिक सत्य धर्मपुस्तकाचे वाटप देखील करण्यात आले.

00000

 

‘सेवा महिना’ अंतर्गत नागरिकांना मिळणार विविध सेवा-सुविधांचा लाभ

 ‘सेवा महिना’ अंतर्गत नागरिकांना मिळणार विविध सेवा-सुविधांचा लाभ

·         16 ऑक्टोंबरपर्यंत विविध लोकाभिमूख उपक्रमांचे आयोजन

·         विभागीय आयुक्त कार्यालयात बुधवारी विशेष शिबिराचे आयोजन

·         नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन

 

अमरावती, दि. 25 :  राज्यात 17 सप्टेंबर ते 16 ऑक्टोबर 2023 या कालावधीत ‘सेवा महिना राबविण्यात येणार आहे. या कालावधीत शासनाच्या विविध कार्यालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती नागरिकांना देणे तसेच योजनांचा लाभ घेण्याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी ‘सेवा महिनाअंतर्गत  विशेष मोहिम व लोकाभिमुख उपक्रम राबविण्यात येणार आहे. या सेवा महिन्यात एकूण 25 सेवांचा समावेश राहणार असून त्याअंतर्गत आधारकार्ड व पॅनकार्ड अपडेशन, आधारकार्ड व पॅनकार्डची नवीन नोंदणी तसेच नवीन मतदार नोंदणी करणे आदी सेवा नागरिकांना पुरविण्यात येणार आहे. यासाठी येथील विभागीय आयुक्त कार्यालयात येत्या बुधवारी (ता.27 सप्टेंबर) सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचा विभागातील सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन उप आयुक्त (सामान्य प्रशासन) संजय पवार यांनी केले आहे.

नवीन आधारकार्ड काढणे व आधारकार्ड अपडेशन करण्याकरीता तसेच नवीन पॅनकार्ड काढणे व पॅनकार्ड अपडेशन करण्याकरीता ओळखीचा पुरावा (पॅनकार्ड/ राशनकार्ड/वोटरआय.डी./पासपोर्ट/ड्राइविंग लाइसेंस), पत्त्याचा पुरावा (छायाचित्रासह मतदार ओळखपत्र/नवीन वीज बिल/पासपोर्ट/चालक परवाना), जन्म तारखेचा पुरावा (जन्म दाखला / शाळा सोडल्याचा दाखला) इ. कागदपत्रे सादर करणे अनिवार्य राहील.

घरातील मुलगा/मुलगी यांच्या नवीन मतदार नांव नोंदणीकरीता जन्म पुरावा, शाळा सोडल्याचा दाखला किंवा बोनाफाईड सर्टीफिकेट, रहिवासी पुरावा, आधारकार्ड, दोन पासपोर्ट साईज फोटो, घरातील नात्यातील (आई, वडील, भाऊ, वहीण) यांपैकी एकाचे ज्यांचे नाव अगोदर मतदार यादीत समाविष्ट असेल तर त्यांच्या मतदान ओळखपत्राची झेरॉक्स प्रत, घरातील सुनबाईचे नाव समाविष्ट करण्यासाठी कागदपत्रे जसे की, जन्म पुरावा सोडल्याचा दाखला किंवा बोनाफाईड सर्टीफिकेट, रहिवासी पुरावा, आधारकार्ड, दोन पासपोर्ट साईज फोटो, माहेरच्या गावात मतदार यादीत नाव असेल तर ते नाव कमी केल्याचा दाखला, माहेरच्या गावात मतदार यादीत नाव असेल तर यादीत नाव नसल्याचा दाखला, पतीचे मतदार ओळखपत्र झेरॉक्स, लग्नपत्रिका किंवा विवाह नोंदणी दाखला इ. कागदपत्रे सादर करणे आवश्यक राहील, असे श्री. पवार यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.

सेवा महिन्यात मिळणाऱ्या विविध सेवा-सुविधा

            या सेवा महिना कालावधीत आपले सरकार सेवा पोर्टल, महावितरण पोर्टल, डी. बी. टी. पोर्टल, नागरी सेवा केंद्र,सार्वजनिक तक्रार पोर्टल (पब्लिक ग्रिव्हियन्स पोर्टल), कार्यालयाच्या संकेतस्थळावर प्राप्त झालेल्या व प्रलंबित असलेल्या सर्व अर्जांचा मोहिम स्वरुपात निपटारा करण्यात येणार आहे.

            यामध्ये तांत्रिक अडचणीमुळे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत प्रलंबित पात्र लाभार्थ्यांना लाभ देणे, प्रलंबित फेरफार नोंदीचा निपटारा करणे. पात्र लाभार्थ्यांना शिधापत्रिकांचे वितरण, मालमत्ता हस्तांतरण नोंद घेणे, नव्याने नळ जोडणी देणे, मालमत्ता कराची आकारणी करणे व मागणी पत्र देणे, प्रलंबित घरगुती विद्युत जोडणीस मंजुरी देणे, मालमत्ता हस्तांतरणानंतर विद्युत जोडणीमध्ये नवीन मालमत्ताधारकाचे नाव नोंदविणे, बिरसा मुंडा कृषी क्रांती योजने अंतर्गत सिंचन विहिरीकरिता अनूसुचित जमातीच्या लाभार्थ्यांची ऑनलाईन नोंदणी, दिव्यांग प्रमाणपत्र देणे, अनूसुचित जमातीच्या लाभार्थ्यांना प्रलंबित वन हक्क पट्टे मंजूर करणे. (अपिल वगळून), नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र देणे, विवाह नोंदणी प्रमाणपत्र देणे, आधार कार्ड सुविधा, पॅन कार्ड सुविधा, नवीन मतदार नोंदणी, जन्म-मृत्यू नोंद घेणे व प्रमाणपत्र देणे, शिकाऊ चालक परवाना, रोजगार मेळावा, सखी किट वाटप, महिला बचत गटास परवानगी देणे, महिला बचत गटास प्राधान्याने रोजगार उपलब्ध करून देणे, लसीकरण, ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र, प्रशिक्षित उमेदवारांना रोजगार उपलब्ध करून देणे आदी सेवांचा आता यामध्ये अंतर्भाव करण्यात आला आहे.

            सेवा महिन्यामध्ये सर्व शासकीय विभांगाकडील सेवा हक्क अधिनियमाअंतर्गत अधिसूचित केलेल्या सेवा विषयी प्रलंबित कामांचा विहित कालमर्यादेमध्ये निपटारा करण्याकरिता कार्यपद्धती निश्चित करण्याच्या व अंमलबजावणीकरिता सर्व संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करण्यात येणार आहे.

00000

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत जुन्या फळबागांचे पुनरुज्जीवन योजना

 एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत

जुन्या फळबागांचे पुनरुज्जीवन योजना

 

महाडीबीटी पोर्टल अर्ज सादर करण्याचे आवाहन

 

              अमरावती दि. 25 : एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान अंतर्गत सन 2023-24 मध्ये जुन्या फळबागांचे पुनरुज्जीवन करणे हा घटक राबविण्यात येते. राज्यामध्ये ब-याचशा जुन्या फळबागांची उत्पादकता कमी होत आहे. याचे कारण योग्य मशागत पद्धतीचा अवलंब न करणे, नांग्या न भरणे, खते व औषधांचा योग्य वापर न करणे, झाडांना व्यवस्थित आकार न देणे (Dense & Over Crowded Canopy) इ. बाबींमुळे उत्पादकता कमी होत आहे.

                  नवीन लागवडीप्रमाणेच जुन्या फळबागांची उत्पादकता वाढविणे ही 2023-24 मध्ये राज्यामध्ये जुन्या फळबागांची उत्पादकता वाढविणे या दृष्टीने सदरचा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. यामध्ये आंबा, संत्रा, मोसंबी व चिक्कु या फळपिकांचा समावेश आहे. या घटकांतर्गत जुन्या फळबागांच्या पुनरूज्जीवनासाठी प्रकल्प खर्च रक्कम रू.40,000/- प्रति हे. ग्राह्य धरून त्याच्या 50 टक्के प्रमाणे जास्तीत-जास्त रक्कम रु.20000/- प्रति हेक्टर या प्रमाणे अनुदान देय आहे. तसेच यामध्ये कमीत-कमी 0.20 हेक्टर व कमाल 2 हेक्टर क्षेत्रासाठी अनुदान देय राहील. पुनरूज्जीवन कार्यक्रमासाठी फळपिकनिहाय बागांचे किमान व कमाल वय खालीलप्रमाणे राहील.

                  आंबा फळपिकासाठी फळपिकाचे कमीतकमी 20 वर्षे तर जास्तीत जास्त 50 वर्षे, चिकूसाठी पिकाचे कमीतकमी 25 वर्षे तर जास्तीत जास्त 50 वर्षे, संत्रा पिकासाठी कमीतकमी 10 वर्षे तर जास्तीत जास्त 25 वर्षे, मोसंबीसाठी कमीतकमी 8 वर्षे तर जास्तीत जास्त 25 वर्षे असावे.

                 तरी, याव्दारे सर्व शेतकऱ्यांना आवाहन करण्यात येते की, जुन्या फळबागांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी आंबा, चिकू, संत्रा व मोसंबी या फळपिकांच्या बागा असलेल्या अधिकाधिक शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टल mahadbtmahait.gov.in वर फलोत्पादन या घटकाखाली अर्ज करावेत. या योजनेच्या अधिक माहितीसाठी संबंधित नजीकच्या कृषि कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन कृषी विभागाव्दारे करण्यात आले आहे.

000000

शुक्रवार, २२ सप्टेंबर, २०२३

 आरोग्य, पोषण आणि स्वच्छता यावर एकत्रितपणे काम करणे गरजेचे

                                                                               -  अविश्यांत पंडा

निपाणी येथे अमृत कलश यात्रा

            अमरावती, दि.22 : 'मेरी मिट्टी, मेरा देश' अभियानांतर्गत जिल्ह्यात अमृत कलश यात्रेचे आयोजन करण्यात येत आहे. याअंतर्गत मातीविषयी प्रेम आणि  देशभक्तीच्या भावनेसोबतच गावाच्या शाश्वत विकासासाठी आरोग्य,पोषण, स्वच्छता या तीनही विषयावर एकत्रितपणे काम करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा यांनी केले.

       ग्रामपंचायत पिंपरी निपाणी येथे 'मेरी मिट्टी, मेरा देश' अभियानांतर्गत अमृत कलश यात्रेचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी श्री. पंडा बोलत होते.  श्री. पंडा यांच्या हस्ते 'सर्वांसाठी घरे ' अंतर्गत प्रधानमंत्री घरकुल योजनेंतर्गत मंजूर असलेल्या भूमीहिन लाभार्थ्यांना इ वर्ग जमिनीमधील नमुना आठ मालकीपत्राचे मोफत वितरण यावेळी करण्यात आले. सोबतच 'आयुषमान भारत' अंतर्गत गोल्डन कार्ड तर पोषण महासप्ताहाचे औचित्य साधत  गर्भवती महिला आणि स्तनदा माता यांना सकस आहार कीटचे वाटप करण्यात आले.

        अमृत कलशाचे मंगल पूजन करत पालखी, बैलगाडी, ढोल -ताशे, लेझिम पथक आणि टाळ मृदंगाच्या नादात, उत्साहाच्या वातावरणात गावातून अमृत कलश यात्रेची मिरवणूक काढत माती गोळा करण्यात आली. मिरवणुकीत छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, संत गाडगेबाबा आदी महापुरुषांच्या वेशभूषेतील चिमुकल्यांचा उत्साह लक्ष वेधून घेणारा होता.

        समारोपीय कार्यक्रमामध्ये पंचप्रण शपथ घेण्यात आली. संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानामध्ये पिंपरी निपाणी गावाला अमरावती विभागामधे द्वितीय क्रमांक प्राप्त झाल्याबद्दल मान्यवरांनी गावकर्‍यांचे कौतुक केले. यावेळी सरपंच योगिता रिठे, तहसीलदार पुरुषोत्तम भुसारी, गटविकास अधिकारी प्रकाश नाटकर, महिला बालविकास अधिकारी विरेंद्र गलपट, तालुका आरोग्य अधिकारी स्वप्नील मालखेडे, गटशिक्षणाधिकारी श्री. शेंडे, विस्तार अधिकारी विठ्ठल जाधव , सामाजिक कार्यकर्ते सचिन रिठे, विशाल रिठे आदी उपस्थित होते.

        कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकाश नाटकर यांनी केले .संचालन श्री.बरदिवे यांनी तर  व आभार  विठ्ठल जाधव यांनी मानले.

****

 ‘भगाडी’ तलावावर संस्था नोंदणीसाठी प्रस्ताव आमंत्रित

 

 

अमरावती, दि. 21 :  अमरावती जिल्ह्यातील चांदुर बाजार तालुक्यातील 500 हे. खालील पाटबंधारे-जलसंधारण विभागांतर्गत असणारा भगाडी तलाव’ (96 हे.) हा तलाव मत्स्यव्यवसाय विभागाकडे हस्तांतरीत करण्यात आला आहे. या तलावावर 3 जुलै 2019 च्या शासन निर्णयानुसार मच्छिमार संस्था नोंदणी करावयाची असल्यामुळे तलाव परिसरातील स्थानिक मच्छिमार, प्रकल्पग्रस्त व महिला यांच्याकडून प्रस्ताव मागविण्यात आले आहे.

त्यानुसार भगाडी तलाव (96 हे.) या तलावावर संस्था नोंदणी करण्यास इच्छुक असलेल्या स्थानिक मच्छिमार, प्रकल्पग्रस्त व मच्छिमार महिला यांनी सहाय्यक निबंधक (सहकारी संस्था), अमरावती या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन मत्स्यव्यवसाय विभागाव्दारे करण्यात आले आहे. तरी संबंधितांनी ही जाहिरात सूचना प्रसिध्द झाल्याच्या दिनांकापासुन 30 दिवसांच्या आत संस्था नोंदणीकरीता प्रस्ताव सादर करावे, असे आवाहन मत्स्यव्यवसाय सहाय्यक आयुक्त सुरेश भारती यांनी जाहीर सूचनेव्दारे केले आहे.

00000

सोमवार, १८ सप्टेंबर, २०२३

'आयटीआय'चा दीक्षांत समांरभ थाटात संपन्न आत्मसात केलेल्या कौशल्याचा उपयोग समाज हितासाठी करावा - सहसंचालक प्रदिप घुले

 'आयटीआय'चा दीक्षांत समांरभ थाटात संपन्न

 

आत्मसात केलेल्या कौशल्याचा उपयोग समाज हितासाठी करावा

                 - सहसंचालक प्रदिप घुले

 

अमरावती, दि. 18 : प्रत्येक विद्यार्थ्याच्या कौशल्याचे कौतुक होणे आवश्यक आहे. तसेच विद्यार्थ्यांनीही आत्मसात केलेल्या तांत्रिक शिक्षणाचा उपयोग समाजहितासाठी करावा, असे आवाहन व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण सहसंचालक प्रदिप घुले यांनी आज केले.

 माजी प्रशिक्षणार्थीनी एकत्र ऐवुन आपल्या संस्थेसाठी ॲल्युमिनी तयार क











रुन संस्थेचा विकास करायला हवा. त्यांचे हे कार्य येणाऱ्या पीढीसाठी नक्कीच प्रेरक व मार्गदर्शक ठरणार, असा आशावादही श्री. घुले यांनी व्यक्त केला.

रविवारी, (ता.17 सप्टेंबर) येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या सभागृहात आयोजित कौशल्य दीक्षांत समारंभ कार्यक्रमात अखिल भारतीय व्यवसाय परीक्षा जुलै 2023 मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये संस्था स्तरावर प्रथम व द्वितीय क्रमवारीत आलेल्या प्रशिक्षणार्थ्यांसाठी व इतर ट्रेडच्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. त्यावेळी श्री. घुले अध्यक्ष स्थानावरून बोलत होते.

सर्वप्रथम 'गर्जा महाराष्ट्र' या राज्य गीताने दीक्षांत समारंभाची सुरुवात झाली. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. या समारंभात मान्यवरांच्या हस्ते आयटीआय मधील प्राविण्यप्राप्त एकूण 55 प्रशिक्षणार्थींना पदवीदान करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांचा त्यांच्या पालकासहीत सत्कार करण्यात आला.

यावेळी सर्व प्रमुख अतिथींनी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे कौतुक करुन त्यांना भावी आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या. या समारंभाच्या अध्यक्षपदी अमरावती विभागाचे सहसंचालक (व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण) श्री. प्रदिप घुले हे होते तर प्रमुख उपस्थिती मध्ये तंत्रशिक्षण प्रादेशिक कार्यालयाचे सहसंचालक डॉ. विजय आर. मानकर, शासकीय अभियांत्रीकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आशिष महल्ले, सहायक संचालक रविंद्र लोखंडे, गुक्स इंडस्ट्रीलचे डॉ. संजय सुपे, श्री. इंगळे (अस्पा बंड संन्स) उद्योजिका सौ. रंजना बिडकर, अमरावती आयटीआयचे उपसंचालक संजय बोरकर, प्रभारी उपप्राचार्य संजय बोराडे या समारंभात उपस्थित होते.           

यावेळी गीत गायन समिक्षा थोरात यांनी केले. शिल्पनिदेशक सुरेंद्र भांडे यांनी सुत्रसंचालन केले तर संस्थेचे उपसंचालक संजय बोरकर आभर मानले. संजय बोराडे यांनी प्रास्ताविकातून आयटीआयमध्ये सुरु असलेल्या विविध कौशल्याधारित अभ्यासक्रमांविषयी माहिती दिली. यावेळी संस्थेतील गटनिदेशक, शिल्पनिदेशक, कार्यालयीन कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

शुभम गेडाम, ओम कावलकर, कार्तीक अवसरमोल,  राम राऊत, कु. प्रिया, सागर आडे, साक्षी चावरे, पायल पंडित, प्रणय सावरकर, स्वप्निल कोळसकर आदींना मान्यवरांच्या हस्ते ड्राफ्टमन मेकॅनिक पदवी प्रदान करण्यात आली. तसेच इतर विद्यार्थी- विद्यार्थींनींना पदवी प्रमाणत्रांचे वितरण मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.

 

इयत्ता पाचवी व आठवीसाठी नव्याने प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन नावनोंदणी प्रवेशासाठी मुदतवाढ

इयत्ता पाचवी व आठवीसाठी नव्याने प्रविष्ठ होणाऱ्या

विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन नावनोंदणी प्रवेशासाठी मुदतवाढ

Ø  ऑनलॉईन नावनोंदणी अर्ज सादर करण्यासाठी  http://msbos.mh-ssc.ac.in संकेतस्थळ उपलब्ध 
Ø  30 सप्टेंबर अंतीम मुदत

 

अमरावती दि. 18 :  महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळामध्ये इयत्ता पाचवी व आठवीसाठी नव्याने प्रविष्ठ होणाऱ्या तसेच जानेवारी-फेब्रुवारी 2024 मध्ये होणाऱ्या मुल्यमापन सत्रासाठी विद्यार्थ्यांचे ऑनलाईन पध्दतीने नावनोंदणी प्रवेश अर्ज सादर करण्यासाठी 30 सप्टेंबर मुदतवाढ देण्यात आली आहे.

ऑनलाईन नावनोंदणी प्रवेश अर्ज भरण्यास व कागदपत्रे स्विकारण्याबाबतचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.        

दि. 16 ते 30 सप्टेंबर 2023 या कालावधीत स्विकारण्यात येणार आहेत. दि. 18 सप्टेंबर ते  4 ऑक्टोबर या कालावधीत विद्यार्थ्यांनी मूळ अर्ज, विहित शुल्क व मूळ कागदपत्रे अर्जावर नमूद केलेल्या संपर्क केंद्र शाळेमध्ये जमा करावे.  दि. 11 ऑक्टोबर 2023 रोजी संपर्क केंद्र शाळांनी विद्यार्थ्यांचे अर्ज विहित शुल्क, मुळ कागदपत्रे व यादी विभागीय मंडळात जमा करावे.

इयत्ता पाचवी व आठवीसाठी प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांनी http://msbos.mh-ssc.ac.in या संकेतस्थळाचा वापर करावा तसेच अर्ज भरतेवेळी संकेतस्थळावर दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे अमरावती विभागीय मंडळाच्या विभागीय सचिव निलिमा टाके यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले यांनी कळविले आहे.

00000

 


शुक्रवार, १५ सप्टेंबर, २०२३

गणेशोत्सव स्पर्धेत जास्तीत जास्त मंडळांनी 15 सप्टेंबरपर्यंत सहभाग नोंदवावा

 गणेशोत्सव स्पर्धेत जास्तीत जास्त मंडळांनी

15 सप्टेंबरपर्यंत सहभाग नोंदवावा

 

विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय यांचे आवाहन

 

           अमरावती, दि. १५ : राज्य शासनाने १९ सप्टेंबर २०२३ पासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवात राज्यातील उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला आहे. या स्पर्धेत जास्तीत जास्त मंडळांनी १५ सप्टेंबर २०२३ पर्यंत आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय यांनी केले आहे.

            या स्पर्धेसाठी मुंबई, मुंबई उपनगर, पुणे, ठाणे या जिल्ह्यांतून प्रत्येकी ३ व अन्य जिल्ह्यांतून प्रत्येकी एक या प्रमाणे उत्कृष्ट ४४ गणेशोत्सव मंडळांची निवड करण्यात येईल. या ४४ गणेशोत्सव मंडळांमधून राज्यातील पहिल्या क्रमांकाच्या उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळास पाच लाख रुपयांचे, द्वितीय क्रमांकास अडीच लाख रुपयांचे, तर तृतीय क्रमांकास एक लाख रुपयांचे पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येईल. उर्वरित ४१ गणेशोत्सव मंडळांना राज्य शासनाकडून प्रत्येकी २५ हजार रुपयांचे पारितोषिक व प्रमाणपत्र देण्यात येईल.

उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धेचे वेळापत्रक

            उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धेत सहभागी होण्यासाठी गणेश मंडळांना 15 सप्टेंबर 2023 पर्यंत स्पर्धेत अर्ज करता येईल. mahotsav.plda.@gmail.com या ई -मेलवर गणेशमंडळांनी अर्ज करावा.         पु. ल. देशपांडे कला अकादमी तर्फे ई-मेलवर प्राप्त अर्ज संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयाला १८ सप्टेंबरपर्यंत परीक्षणासाठी उपलब्ध करून देण्यात येईल. १९ ते २८ सप्टेंबर दरम्यान जिल्हास्तरीय समितीचे सदस्य स्पर्धेत सहभागी गणेशोत्सव मंडळांचे प्रत्यक्ष भेटी देऊन परीक्षण करतील. व्हिडिओग्राफी आणि कागदपत्रे तपासून अभिप्रायासह गुणांकन करतील. जिल्हास्तरीय समिती जिल्ह्यातून एका उत्कृष्ट गणेश मंडळाची शिफारस १ ऑक्टोबरपर्यंत पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीला करेल. राज्यस्तरीय समिती राज्यातील उत्कृष्ट ३ गणेश मंडळाची शिफारस अकादमीला करेल. त्यानुसार कला अकादमी विजेत्या मंडळांची घोषणा करेल व १२ ऑक्टोबरला विजेत्या गणेश मंडळांना पुरस्कार प्रदान करण्यात येईल. 

            राज्य शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरील पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या ४ जुलै २०२३ रोजीच्या शासन निर्णयात स्पर्धेचा तपशील, स्पर्धा निवडीचे निकष नमूद केले आहेत. तसेच अर्जही उपलब्ध करून देण्यात आला आहे. अर्जाच्या या नमुन्यानुसार सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी पु. ल. देशपांडे, महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई यांच्या mahotsav.plda@gmail.com या ई- मेल १५ सप्टेंबर २०२३ पर्यंत अर्ज करावा. या स्पर्धेत जास्तीत जास्त मंडळांनी सहभाग नोंदवावा, असेही आवाहन विभागीय आयुक्तांनी केले आहे.

०००००

 

दहावी व बारावी च्या खाजगी परिक्षार्थ्यांना प्रवेश नोंदणीसाठी मुदतवाढ, फॉर्म नं. 17 भरण्यास 30 सप्टेंबरची मुदत

 दहावी व बारावी च्या खाजगी परिक्षार्थ्यांना प्रवेश नोंदणीसाठी  मुदतवाढ

फॉर्म नं. 17 भरण्यास 30 सप्टेंबरची मुदत

अमरावती, दि.15: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक ‍शिक्षण मंडळामार्फत इयत्ता दहावी व बारावीच्या माहे फेब्रुवारी-मार्च 2024 च्या परीक्षेस फॉर्म नं. 17 द्वारे खाजगी विद्यार्थी म्हणून प्रविष्ठ होण्यासाठी ऑनलाईन अर्ज स्विकारण्यास 30 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

विद्यार्थ्यांना नाव नोंदणी अर्ज व शुल्क ऑनलाई पध्दतीने भरण्यासाठी दि. 20 ते 30 सप्टेंबर 2023 पर्यंत मुतदवाढ देण्यात आली आहे. तसेच मुळ अर्ज, ऑनलाईन नाव नोंदणी शुल्क जमा केल्याबाबत पोचपावतीच्या दोन छायाप्रती व मुळ कागदपत्रे अर्जावर नमुद केलेल्या माध्यमिक शाळेत, कनिष्ठ महाविद्यालयात जमा करण्यासाठी 22 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबर 2023 हा कालावधी देण्यात आला आहे. माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांचे अर्ज, ऑनलाईन नाव नोंदणी शुल्क जमा केल्याबाबत पोचपावती एक छायाप्रत मुळ कागदपत्रे व यादी विभागीय मंडळाकडे जमा करण्यासाठी 5 ऑक्टोबर 2023 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

विद्यार्थ्यांनी ऑनलाईन सूचना व अधिक माहितीसाठी इयता दहावीसाठी          http://form17.mh-ssc.ac.in तर बारावीसाठी  http://form17.mh-hsc.ac.in या संकेतस्थळाचा वापर करावा, असे राज्य मंडळ, पुणेच्या सचिव, अनुराधा ओक यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.

0000

बुधवार, १३ सप्टेंबर, २०२३

महाकृषी ऊर्जा अभियान योजनेंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना अर्जातील त्रृटी पूर्ण करण्याचे आवाहन


महाकृषी ऊर्जा अभियान योजनेंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना

अर्जातील त्रृटी पूर्ण करण्याचे आवाहन

 

अमरावती दि. 13 : महाकृषी ऊर्जा अभियान (पी.एम.कुसुम योजना घटक-ब) योजनेंतर्गत अमरावती जिल्ह्यामध्ये  अद्यापपर्यंत शेतक-यांचे परीपुर्ण एकुण 3 हजार 225 अर्ज ऑनलाईनरित्या महाऊर्जाच्या कुसुम पोर्टलवर प्राप्त झालेले आहेत, त्यापैकी 741 लाभार्थी शेतकऱ्यांनी सौर पंप योजनेचा लाभ घेतलेला आहे. तसेच एकुण 3 हजार 225 लाभार्थी शेतकऱ्यांपैकी 843 लाभार्थी शेतकऱ्यांच्या अर्जांमध्ये कागदपत्रांची त्रृटी आढळून आल्यामुळे त्यांचे अर्ज प्रलंबित यादीमध्ये आहेत. सदर प्रकरणी महाऊर्जा, विभागीय कार्यालय, अमरावती यांच्याकडुन अशा सर्व लाभार्थ्यांना कागदपत्रांची त्रृटी पूर्ण करण्याकरीता भ्रमणध्वनीव्दारे/पत्राव्दारे कळविण्यात आले आहे. तरी सुध्दा अद्यापपर्यंत लाभार्थ्यांकडुन त्रृटींची पूर्तता करण्यात आलेली नाही.

या अनुषंगाने अशा सर्व लाभार्थी  शेतकऱ्यांना  सुचित करण्यात येते की, आपण महाऊर्जा, विभागीय कार्यालयाला भेट देऊन किंवा दुरध्वनीवर क्र.0721-2661610 संपर्क करुन आपल्या अर्जामध्ये असलेल्या कागदपत्रांच्या त्रृटींबाबत विचारणा करावी. तसेच https://kusum.mahaurja.com/benef_home या संकेतस्थळाला भेट देवुन आपल्या कुसूम लाभार्थी  लॉगीन मधुन  आवश्यक कागद‍पत्रे अपलोड करावीत, जेणे करुन आपल्याला सौर पंप योजनेचा लाभ घेता येईल, असे महाऊर्जा कार्यालयाने प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.    

00000

 

गुरुवार, ७ सप्टेंबर, २०२३

सोयाबीनवरील चक्रीभुंगाचे ओळख आणि एकात्मिक व्यवस्थापन

 सोयाबीनवरील चक्रीभुंगाचे ओळख आणि एकात्मिक व्यवस्थापन


अमरावती, दि. 7 :  राज्यात सोयाबीन पिक सध्या फांद्या फुटण्याच्या किंवा फुले लागण्याच्या अवस्थेत आहे. या किडीचा प्रादुर्भाव उगवणीनंतर २० ते ६० दिवस या कालावधी मध्ये होतो. सोयाबीनचे खोड पोखरणारी ही महत्वाची किड आहे. चक्री भुंग्याच्या प्रादुर्भावामुळे ३५ टक्के पर्यंत नुकसान होते. सोयाबीन व्यतिरिक्त मुग, उडीद, चवळी, तूर, भुईमुग, मिरची, कारली इ. पिकांना देखील चक्री भुंग्याच्या प्रादुर्भाव होतो. यावर नियंत्रणाबाबत कृषी विभागाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. ते याप्रमाणे.

किडींची ओळख
            प्रौढ भुंगा फिकट तपकिरी रंगाचा ७ ते १० मि.मी. लांबीचा असतो. त्याचे समोरचे पंख खालच्या बाजूने एक तृतीयांश ते अर्धा भाग काळ्या रंगाचे असतात. अंडी फिकट पिवळसर लांबट आकाराची असतात. पूर्ण वाढ झालेली अळी पिवळी व गोलाकार असते व डोक्याच्या मागील बाजूस थोडी मोठी असते. मादी भुंगा पानाचे देठ, खोड यावर दोन समांतर खाचा करून त्यामध्ये जवळपास ७८ अंडी घालते.

नुकसानीचा प्रकार
            प्रौढ भुंगा व अळी या दोन्ही अवस्था सोयाबीन पिकाचे नुकसान करतात. प्रौढ भुंगा पानाच्या मुख्य शिरा, देठ किंवा खोड यावर खरवडतो, त्यामुळे सोयाबीनचे जास्त नुकसान होत नाही. परंतू या किडीच्या अळी अवस्थेमुळेच मुख्यत्वे पिकाचे नुकसान होते. मादी भुंगा पानाचे देठ, खोड यावर दोन समांतर खाचा करतो व खालच्या खाचे जवळ अंडी घालण्यासाठी तीन छिद्रे पाडतो. खोडावर खाचा केल्यास २ ते ३ दिवसांनी वरचा भाग सुकायला सुरुवात होते. पानाच्या देठावर खाचा केल्यास पान वाळून जाते. पिक उगवणीनंतर १५ ते २० दिवसांनी चक्री भुंग्याचा प्रादुर्भाव झाल्यास जास्त प्रमाणात नुकसान होते. त्यामानाने प्रादुर्भाव ४५ ते ६० दिवसांनी झाल्यास कमी प्रमाणात नुकसान होते. अंड्यातून अळी निघाल्यानंतर ती पानाचे देठ, खोड पोखरत खाली जमिनीकडे जाते. चक्री भुंग्याच्या प्रादुर्भावामुळे शेंगा कमी लागतात तसेच शेंगा पूर्ण भरत नाहीत. एकरी झाडांची संख्या कमी होऊन नुकसान होते.

एकात्मिक व्यवस्थापन

पिकाच्या सुरुवातीच्या अवस्थेत पिक तणमुक्त ठेवावे.  चक्री भुंगा प्रादुर्भावामुळे कीडग्रस्त पाने, फांद्या वाळतात. अशी कीडग्रस्त झाडे, पाने, फांद्या तात्काळ गोळा करून आतील किडीसह नष्ट करावेत.  सुरुवातीच्या काळात प्रादुर्भाव कमी असल्यास ५ टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी. पिकांची फेरपालट करावी सोयाबीन पिकानंतर भुईमुगाचे पीक घेऊ नये.  आर्थिक नुकसान पातळी  (१० -१५ % प्रादुर्भाव ग्रस्त झाडे) ओलांडल्यास क्लोरॅनट्रॅनीलीप्रोल १८.५ एस ३ मिली किंवा इमामेक्टीन बेंन्झोएट १.९० ई सी ९ मिली किंवा प्रोफॅनोफोस ५० ई सी २० मिली किंवा टेट्रॅनीलीप्रोल १८.१८ एस सी ५-६ मिली किंवा बीटा सायफ्लूथ्रीन ८.४९ % + इमीडॅक्लोप्रीड १९.८ टक्के ओ डी ७ मिली किंवा थायमिथॉक्झाम १२.६ टक्के + लॅम्बडा-सायलोथ्रिन ९.५० झेड सी २.५ मिली किंवा क्लोरॅनट्रॅनीलीप्रोल ९.३० + लॅम्बडा-सायलोथ्रिन ४.६० झेड सी ४ मिली प्रती १० लिटर पाण्यात या रासायनिक कीटकनाशकांचा वापर फवारणीसाठी करावा.

संकलन :

विभागीय माहिती कार्यालय

अमरावती

 


क्रॉपसॅप प्रकल्प अंतर्गत पिक सरंक्षण सल्ला “एकात्मिक व्यवस्थापन -सोयाबीनवरील पिवळा मोझॅक रोग”

 


                                   क्रॉपसॅप प्रकल्प अंतर्गत पिक सरंक्षण सल्ला

एकात्मिक व्यवस्थापन -सोयाबीनवरील पिवळा मोझॅक रोग

            सोयाबीन पिक सध्या फांद्या फुटण्याच्या किंवा फुले लागण्याच्या अवस्थेत असून मावा आणि पांढरी माशीचा प्रादुर्भाव होऊ शकतो. सोयाबीनवरील पिवळा मोझॅक रोग मुंगबीन यलो मोझॅक या विषाणूमुळे उद्भवतो. पांढरी माशी ही किड या रोगाचा प्रसार करते. या रोगाचा विषाणू केवळ कडधान्य पिकांवर आढळून येतो. मुगउडीदवाल, चवळीघेवडा इ. यजमान पिकांवर तो जिवंत राहू शकतो व सोयाबीन पिकावर संक्रमित होत राहतो. यासाठी सोयाबीनवरील पिवळा मोझॅक रोगाच्या नियंत्रणाबाबत कृषी विभागाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. ते याप्रमाणे.

रोगाची लक्षणे :

            सुरवातीला रोगग्रस्त झाडावरील पानांच्या शिरांमधील भागावर फिकट पिवळे ठिपके /हलके चट्टे दिसतात. कालांतराने ठिपक्यांच्या/ चट्ट्यांच्या आकारमानात वाढ होऊन संपूर्ण पान पिवळे पडते. हरितद्रव्याचा ऱ्हास झाल्याने प्रकाश संश्लेषणाची प्रक्रिया मंदावते. रोगग्रस्त झाडांवरील पाने अरुंद व वेडीवाकडी होतात व आकार लहान होतो. अशा पिवळ्या पानांवर तांबूस - करपट  रंगाचे ठिपके दिसतात. प्रादुर्भावग्रस्त झाडांना शेंगा कमी प्रमाणात लागतात व त्यातील दाणे लहान राहतात. बहुतांश वेळी शेंगा दाणे विरहीत व पोचट राहिल्याने उत्पादनात लक्षणीय घट होते.

एकात्मिक व्यवस्थापन:-

ü  निरोगी झाडावर होणारा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रादुर्भावीत पाने किंवा झाडे वेळोवेळी काढून नष्ट करावेत.

ü  पिक तन मुक्त ठेवावे.

ü  रोगवाहक किडींचे (पांढरी माशी व मावा) नियंत्रण-

v शेतामध्ये निळे व पिवळे चिकट सापळे एकरी २५ या प्रमाणे पिकाच्या समउंचीवर लावावेत.

v निंबोळी अर्क ५ टक्के किंवा अझाडीरेक्टिन (३००० पी पी एम) १० मिली प्रती १० लिटर पाणी या प्रमाणे गरजेनुसार १० ते १५ दिवसांच्या अंतराने फवारण्या कराव्यात.

v थायमिथॉक्झाम १२.६ टक्के लॅम्बडा-सायलोथ्रिन ९.५० टक्के झेड सी २.५ मिली किंवा  असिटामेप्रिड २ टक्के + बायफेन्थ्रीन २५ टक्के डब्लू जी २.५ ग्रॅम किंवा बीटा सायफ्लुथ्रीन ८.४१ टक्के + इमिडाक्लोप्रीड १९.८१ टक्के ओडी ७ मिली प्रती १० लिटर पाण्यात घेऊन फवारणी करावी.

 

संकलन :

विभागीय माहिती कार्यालय

अमरावती