दक्षता व नियंत्रण
समितीची आढावा बैठक
समितीपुढे
आलेली प्रकरणे तातडीने निकाली काढावी
-विभागीय आयुक्त पीयूष सिंह
अमरावती दि. 30 : जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीपुढे असलेल्या
सर्व प्रकरणाचा तपास गतीने पूर्ण करावा. दाखल प्रकरणांबाबत तातडीने निर्णय घेऊन प्रकरणे
निकाली काढावी. दाखल झालेल्या प्रकरणातील गुन्ह्याची नोंद, तपास, चौकशी योग्य रितीने
करण्याबाबतचे निर्देश विभागीय आयुक्त पीयूष सिंह यांनी दिले. विभागीय आयुक्त कार्यालयातील
सभागृहात विभागीय आयुक्त पीयूष सिंह यांच्या अध्यक्षतेत आज दक्षता व नियंत्रण समितीची
बैठक झाली त्यावेळी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले.
बैठकीला अमरावती येथील विशेष पोलीस
महानिरीक्षक कार्यालयाचे शशिकांत सातव, पोलीस आयुक्त कार्यालयाचे लक्ष्मण डुंबरे, यवतमाळ,
वाशिम, बुलडाणा येथील जिल्हाधिकारी कार्यालयाचे प्रतिनिधी, अकोला येथील उपजिल्हाधिकारी
गजानन सुरंजे, अकोला पोलीस अधिक्षक कार्यालयातील मोनिका राऊत, बुलडाणा येथील पोलीस
अधिक्षक कार्यालयाचे श्रवण दत्त, प्रादेशिक उपायुक्त सुनिल केदार, अमरावतीच्या सहाय्यक
आयुक्त माया केदार, पाचही जिल्ह्याचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी, सहायक आयुक्त, जिल्हा
सरकारी अधिवक्ता आदी उपस्थित होते.
अमरावती शहरी व ग्रामीण मिळून दाखल
एकूण अकरा प्रकरणांपैकी चार प्रकरणांचा तपास पूर्ण झाला असून सात प्रकरणांचा तपास सुरु
आहे. अकोला येथे दाखल दहा प्रकरणांपैकी पाच प्रकरणांचा तपास पूर्ण झाला असून पाच प्रकरणांचा
तपास सुरु आहे. यवतमाळ येथील चार, बुलडाणा येथे तीन, वाशीमच्या दोन प्रकरणांचा तपास
पूर्ण झाला आहे. यवतमाळ येथील पाच, बुलडाणाची आठ, आणि वाशीमची बारा प्रकरणांची तपासणी
सुरु असल्याची माहीती संबधितांनी दिली. तालुकास्तरीय आढावा घेण्याकरीता
जिल्हा दक्षता व नियंत्रण समिती स्थापन केल्याबाबतचा अहवाल संबधितांनी तात्काळ सादर
करावा. जिल्हास्तरीय दक्षता व नियंत्रण समितीने नियमीत स्वरुपात आढावा घ्यावा असे निर्देश
पीयूष सिंह यांनी दिले.
0000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा