वन्यजीव हत्याप्रकरणी तपास सुरू;
शवविच्छेदनानंतर नमुने प्रयोगशाळांना
पाठविले
उपवनसंरक्षक दिव्य भारती यांची माहिती
अमरावती दि. 10 (विमाका): सिपना वन्यजीव विभागांतर्गत मेळघाट
व्याघ्र प्रकल्पातील रायपूर परिक्षेत्रात पाच चौसिंगा व दोन भेकर अशा एकूण सात वन्यप्राण्यांची
हत्या झाल्याचे निदर्शनास आल्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला असून, तपास होत आहे.
या प्राण्यांचे शवविच्छेदनानंतर नमुने तपासणीसाठी हैदराबाद व नागपूर येथील
प्रयोगशाळेला पाठविण्यात आल्याची माहिती उपवनसरंक्षक दिव्य भारती यांनी दिली.
उपवनसंरक्षक श्रीमती भारती, सहायक वनसंरक्षक के. एस.
पाटील, वनपरिक्षेत्र अधिकारी ए. एम. शेलार, वनपाल शेख इक्बाल आदींसमक्ष चिखलद-याचे
पशुवैद्यकीय अधिकारी अनिल पुंड व त्यांच्या चमूने मृत सात वन्यप्राण्यांचे शवविच्छेदन करुन
दिले. शवविच्छेदनाचे, तसेच घटनास्थळी प्राप्त नमुने हैदराबादेतील शासकीय
प्रयोगशाळा व नागपूरमधील गोरेवाडा आणि अमरावतीतील प्रादेशिक न्यायसहायक वैद्यकीय
प्रयोगशाळा येथे पाठविण्यात आले आहेत.
वनविभागातील अधिकारी व वनकर्मचारी यांनी या
क्षेत्रामध्ये पायदळ गस्त घालून तपास केला. प्राथमिक माहितीनुसार संशयितांची चौकशी
करून बयाण नोंदविण्यात आले आहे. पुढील तपास सुरु आहे, उपवनसंरक्षकांनी सांगितले.
000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा