रविवार, ३१ जुलै, २०२२

विभागातील विविध प्रकल्पांतील जलाशय पातळी

 

विभागातील विविध प्रकल्पांतील जलाशय पातळी

अमरावती दि.1 (विमाका) : विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाने दि. 1 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 7 वाजता दिलेल्या माहितीनुसार अमरावती प्रादेशिक विभागातील मोठ्या व मध्यमप्रकल्पांतील दैनिक जलाशय पातळी व पाणीसाठा अहवाल खालीलप्रमाणे.

विभागातील मोठ्या प्रकल्पातील जलाशय पातळी खालील प्रमाणे (मी.मध्ये)

अमरावती जिल्ह्यातील उर्ध्ववर्धा (341.24), यवतमाळ जिल्ह्यातील पुस प्रकल्प (397.39), अरुणावती (329.28), बेंबळा (266.55), अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा (346.71), वान (405.20), बुलढाणा जिल्ह्यातील नळगंगा (290.55), पेनटाकळी (556.90), खडकपूर्णा (519.44).

मध्यम प्रकल्पातील जलाशय पातळी खालील प्रमाणे (मी.मध्ये)

अमरावती जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पातील जलाशय पातळी शहानूर (443.10), चंद्रभागा (502.70), पूर्णा (448.22), सपन (507.45), पंढरी (426.70), गर्गा (344.50), बोर्डीनाला (362.00),यवतमाळ जिल्ह्यातील अधरपूस (304.78), सायखेडा (272.50), गोकी (315.70), वाघाडी (318.60), बोरगांव (319.00), नवरगांव (254.10), अकोला जिल्ह्यातील  निर्गुणा (390.70), मोर्णा (366.20), उमा (343.25), घुंगशीबॅरेज (254.00), वाशिम जिल्ह्यातील अडाण (379.96), सोनल (451.90), एकबुर्जी (151.94), बुलडाणा जिल्ह्यातील ज्ञानगंगा (402.50), पलढग (401.75), मस (324.50), कोराडी (545.25), मन (372.90), तोरणा (403.35), उतावळी (370.50) आहे.   

000000

 

 

 

 

विभागातील विविध प्रकल्पांतील जलाशय पातळी

 

विभागातील विविध प्रकल्पांतील जलाशय पातळी

अमरावती दि.31 (विमाका) : विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाने दि. 31 जुलै 2022 रोजी सकाळी           7 वाजता दिलेल्या माहितीनुसार अमरावती प्रादेशिक विभागातील मोठ्या व मध्यम प्रकल्पांतील दैनिक जलाशय पातळी व पाणीसाठा अहवाल खालीलप्रमाणे.

विभागातील मोठ्या प्रकल्पातील जलाशय पातळी खालील प्रमाणे (मी.मध्ये)

अमरावती जिल्ह्यातील उर्ध्ववर्धा (341.24), यवतमाळ जिल्ह्यातील पुस प्रकल्प (397.26), अरुणावती (329.19), बेंबळा (266.55), अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा (346.89), वान (405.10), बुलढाणा जिल्ह्यातील नळगंगा (290.53), पेनटाकळी (556.80), खडकपूर्णा (519.28)

मध्यम प्रकल्पातील जलाशय पातळी खालील प्रमाणे (मी.मध्ये)

अमरावती जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पातील जलाशय पातळी शहानूर (442.92), चंद्रभागा (502.60), पूर्णा (448.14), सपन (507.30), पंढरी (426.70), गर्गा (344.50), बोर्डीनाला (362.00), यवतमाळ जिल्ह्यातील अधरपूस (304.79), सायखेडा (272.50), गोकी (315.70), वाघाडी (318.60), बोरगांव (319.00), नवरगांव (254.10), अकोला जिल्ह्यातील  निर्गुणा (390.70), मोर्णा (366.10), उमा (343.15), घुंगशीबॅरेज (254.00), वाशिम जिल्ह्यातील अडाण (379.85), सोनल (451.90), एकबुर्जी (151.94), बुलडाणा जिल्ह्यातील ज्ञानगंगा (402.50), पलढग (401.70), मस (324.45), कोराडी (545.25), मन (372.90), तोरणा (403.35), उतावळी (370.50) आहे.   

000000

 

 

विभागातील विविध प्रकल्पांतील जलाशय पातळी

 

विभागातील विविध प्रकल्पांतील जलाशय पातळी

अमरावती दि.30 (विमाका) : विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाने दि. 30 जुलै 2022 रोजी सकाळी           7 वाजता दिलेल्या माहितीनुसार अमरावती प्रादेशिक विभागातील मोठ्या व मध्यम प्रकल्पांतील दैनिक जलाशय पातळी व पाणीसाठा अहवाल खालीलप्रमाणे.

विभागातील मोठ्या प्रकल्पातील जलाशय पातळी खालील प्रमाणे (मी.मध्ये)

अमरावती जिल्ह्यातील उर्ध्ववर्धा (341.22), यवतमाळ जिल्ह्यातील पुस प्रकल्प (397.04), अरुणावती (329.05), बेंबळा (266.50), अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा (346.67), वान (405.00), बुलढाणा जिल्ह्यातील नळगंगा (290.52), पेनटाकळी (556.75), खडकपूर्णा (519.11)

मध्यम प्रकल्पातील जलाशय पातळी खालील प्रमाणे (मी.मध्ये)

अमरावती जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पातील जलाशय पातळी शहानूर (442.62), चंद्रभागा (502.50), पूर्णा (448.33), सपन (507.40), पंढरी (426.70), गर्गा (344.60), बोर्डीनाला (362.10),यवतमाळ जिल्ह्यातील अधरपूस (304.75), सायखेडा (272.50), गोकी (315.70), वाघाडी (318.60), बोरगांव (319.00), नवरगांव (254.10), अकोला जिल्ह्यातील  निर्गुणा (390.60), मोर्णा (366.00), उमा (343.15), घुंगशीबॅरेज (254.10), वाशिम जिल्ह्यातील अडाण (379.85), सोनल (451.90), एकबुर्जी (151.80), बुलडाणा जिल्ह्यातील ज्ञानगंगा (402.40), पलढग (401.65), मस (324.40), कोराडी (545.25), मन (372.90), तोरणा (403.35), उतावळी (370.50) आहे.   

000000

अमरावती विभागात जूनपासून आतापर्यंत 497.6 मिमि पावसाची नोंद विभागात सरासरी 1.7 मि.मि. पाऊस

 

अमरावती विभागात

जूनपासून आतापर्यंत 497.6 मिमि पावसाची नोंद

विभागात सरासरी 1.7 मि.मि. पाऊस

 

अमरावती दि 30 (विमाका) : अमरावती विभागातील 56 तालुक्यात पाऊस झाला. विभागीय आपत्ती व्यवस्थापन कक्षाने उपलब्ध करुन दिलेल्या ‘महावेधच्या नोंदीनुसार आज दुपारी बारा वाजेपर्यंत विभागात सरासरी 1.7 पाऊस झाला. दि. 1 जून ते आजपर्यंत 497.6 मिमि पावसाची नोंद करण्यात आली आहे.

विभागात नोंदला गेलेला आजचा तालुका निहाय पाऊस पुढीलप्रमाणे असून कंसातील आकडेवारी यंदा 1 जूनपासून आजवर झालेल्या पावसाची आहे. सर्व आकडेवारी मिली मिटर परिमाणात आहेत. ही माहिती ‘महावेधच्या नोंदीनुसार दुपारी बारावाजेपर्यंतची असुन बदलत्या पर्जन्यमानानुसार त्यात बदल होऊ शकतात.

अमरावती जिल्हा : धारणी 0.0 (492.7), चिखलदरा 0.0 (789.9), अमरावती 0.1 (416.8), भातकूली 0.1 (337.4), नांदगाव खडेश्वर 4.6 (518.2), चांदूर रेल्वे 1.4 (440.1), तिवसा 5.3 (593.2), मोर्शी 1.5 (520.2), वरुड 0.2 (547.0), दर्यापूर 0.0 (323.9), अंजनगाव 1.5 (385.3), अचलपूर 0.0 (375.1), चांदूरबाजार 0.0 (553.7), धामणगाव रेल्वे 2.6 (622.2) अमरावती जिल्ह्यात चोवीस तासांत सरासरी 1.2 मि.मि पाऊस झाला. जिल्ह्यात यंदा आजवर सरासरी 484.1 मि.मि. पाऊस झाला.

अकोला जिल्हा :- अकोट 0.0 (260.3), तेल्हारा 0.0 (370.5), बाळापूर 0.0 (472.2), पातूर 0.1 (401.3),  अकोला 0.0 (445.8), बार्शी टाकळी 0.0 (342.6), मुर्तीजापूर 3.2 (353.7), जिल्ह्यात 24 तासांत सरासरी 0.5 मि.मि. तर आजवर 381.6 मि.मि पाऊस झाला आहे.

बुलडाणा जिल्हा :- जळगाव जामोद 0.0 (299.0), संग्रामपूर 0.0(368.4), चिखली 0.0 (438.0), बुलडाणा 0.0 (544.7), देऊळगाव राजा 6.5 (412.4), मेहकर 0.0 (456.7), सिंदखेड राजा 4.9 (453.8), लोणार 0.4 (372.3), खामगाव 0.0 (326.9), शेगाव 0.0 (404.7), मलकापूर 0.0 (291.3), मोताळा 0.0 (322.4), नांदूरा 0.0 (316.8), जिल्ह्यात दिवसभरात 0.8 तर यंदाच्या हंगामात आजवर 391.6 मि.मि. पाऊस झाला.

यवतमाळ जिल्हा : यवतमाळ 0.7 (604.8), बाभूळगाव 6.6 (618.4), कळंब 1.7 (625.8), दारव्हा 1.1 (474.1), दिग्रस 1.9 (591.5), आर्णी 0.0 (756.2), नेर 0.8 (542.3), पुसद 4.1 (471.1), उमरखेड 7.5 (605.1), महागाव 0.0 (683.6), वणी 17.8 (852.8), मारेगाव 2.6 (785.8), झरीजामणी 4.8 (742.5), केळापूर 0.8 (735.6), घाटंजी 2.0 (610.7), राळेगाव 0.7 (797.1), जिल्ह्यात 24 तासांत सरासरी 3.6 तर यंदाच्या हंगामात आजवर सरासरी 652.0 मि.मि पाऊस झालाआहे.

वाशिम जिल्हा : - वाशिम 3.1 (483.5), रिसोड 3.1 (510.3), मालेगाव 0.0 (526.6), मंगरुळपिर 0.0 (518.1), मानोरा 0.0 (567.1), कारंजा 0.0 (374.3), जिल्ह्यात 24 तासात 1.1 तर 1 जूनपासून आजवर 492.8 मि.मि. पाऊस झाला.

****

शुक्रवार, २९ जुलै, २०२२

अमरावती विभागात जूनपासून आतापर्यंत 495.9 मिमि पावसाची नोंद, विभागात सरासरी 2.5 मि.मि. पाऊस

 

अमरावती विभागात

जूनपासून आतापर्यंत 495.9 मिमि पावसाची नोंद

विभागात सरासरी 2.5 मि.मि. पाऊस

 

अमरावती दि 29 (विमाका) : अमरावती विभागातील 56 तालुक्यात पाऊस झाला. विभागीय आपत्ती व्यवस्थापन कक्षाने उपलब्ध करुन दिलेल्या ‘महावेधच्या नोंदीनुसार आज दुपारी बारा वाजेपर्यंत विभागात सरासरी 2.5 पाऊस झाला. दि. 1 जून ते आजपर्यंत 495.9 मिमि पावसाची नोंद करण्यात आली आहे.

विभागात नोंदला गेलेला आजचा तालुका निहाय पाऊस पुढीलप्रमाणे असून कंसातील आकडेवारी यंदा 1 जूनपासून आजवर झालेल्या पावसाची आहे. सर्व आकडेवारी मिली मिटर परिमाणात आहेत. ही माहिती ‘महावेधच्या नोंदीनुसार दुपारी बारावाजेपर्यंतची असुन बदलत्या पर्जन्यमानानुसार त्यात बदल होऊ शकतात.

अमरावती जिल्हा : धारणी 7.3 (492.7), चिखलदरा 8.8 (789.9), अमरावती 0.6 (416.7), भातकूली 0.7 (337.3), नांदगाव खडेश्वर 0.0 (513.6), चांदूर रेल्वे 0.0 (438.7), तिवसा 0.0 (587.9), मोर्शी 0.6 (518.7), वरुड 0.0 (546.8), दर्यापूर 0.1 (323.9), अंजनगाव 3.5 (383.8), अचलपूर 9.4 (375.1), चांदूरबाजार 0.5 (553.7), धामणगाव रेल्वे 0.0 (619.6) अमरावती जिल्ह्यात चोवीस तासांत सरासरी 1.9 मि.मि पाऊस झाला. जिल्ह्यात यंदा आजवर सरासरी 482.9 मि.मि. पाऊस झाला.

अकोला जिल्हा :- अकोट 8.0 (260.3), तेल्हारा 2.5 (370.5), बाळापूर 0.0 (472.2), पातूर 0.0 (401.2),  अकोला 0.1 (445.8), बार्शी टाकळी 0.0 (342.6), मुर्तीजापूर 0.0 (350.5), जिल्ह्यात 24 तासांत सरासरी 0.5 मि.मि. तर आजवर 381.1 मि.मि पाऊस झाला आहे.

बुलडाणा जिल्हा :- जळगाव जामोद 0.1 (299.0), संग्रामपूर 0.2 (368.4), चिखली 0.4 (438.0), बुलडाणा 0.0 (544.7), देऊळगाव राजा 0.5 (405.9), मेहकर 0.5 (456.7), सिंदखेड राजा 0.2 (448.9), लोणार 0.5 (371.9), खामगाव 0.0 (326.9), शेगाव 0.0 (404.7), मलकापूर 0.0 (291.3), मोताळा 0.0 (322.4), नांदूरा 0.0 (316.8), जिल्ह्यात दिवसभरात 0.2 तर यंदाच्या हंगामात आजवर 390.8 मि.मि. पाऊस झाला.

यवतमाळ जिल्हा : यवतमाळ 11.5 (604.1), बाभूळगाव 0.0 (611.8), कळंब 6.6 (624.1), दारव्हा 3.0 (473.0), दिग्रस 2.5 (589.6), आर्णी 1.8 (756.2), नेर 0.1 (541.5), पुसद 2.1 (467.0), उमरखेड 6.3 (597.6), महागाव 1.2 (683.6), वणी 7.9 (835.0), मारेगाव 0.0 (783.2), झरीजामणी 18.6 (737.7), केळापूर 4.4 (734.8), घाटंजी 1.0 (608.7), राळेगाव 3.5 (796.4), जिल्ह्यात 24 तासांत सरासरी 4.6 तर यंदाच्या हंगामात आजवर सरासरी 648.4 मि.मि पाऊस झालाआहे.

वाशिम जिल्हा : - वाशिम 3.5 (480.4), रिसोड 4.9 (507.0), मालेगाव 7.6 (526.6), मंगरुळपिर 1.7 (518.1), मानोरा 6.4 (567.1), कारंजा 0.1 (374.3), जिल्ह्यात 24 तासात 4.0 तर 1 जूनपासून आजवर 491.7 मि.मि. पाऊस झाला.

****

विभागातील विविध प्रकल्पांतील जलाशय पातळी

 

विभागातील विविध प्रकल्पांतील जलाशय पातळी

अमरावती दि.29 (विमाका) : विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाने दि. 29 जुलै 2022 रोजी सकाळी 7 वाजता दिलेल्या माहितीनुसार अमरावती प्रादेशिक विभागातील मोठ्या व मध्यम प्रकल्पांतील दैनिक जलाशय पातळी व पाणीसाठा अहवाल खालीलप्रमाणे.

विभागातील मोठ्या प्रकल्पातील जलाशय पातळी खालील प्रमाणे (मी.मध्ये)

अमरावती जिल्ह्यातील उर्ध्ववर्धा (341.18), यवतमाळ जिल्ह्यातील पुस प्रकल्प (396.84), अरुणावती (328.95), बेंबळा (266.45), अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा (346.56), वान (404.90), बुलढाणा जिल्ह्यातील नळगंगा (290.50), पेनटाकळी (556.75), खडकपूर्णा (519.0).

मध्यम प्रकल्पातील जलाशय पातळी खालील प्रमाणे (मी.मध्ये)

अमरावती जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पातील जलाशय पातळी शहानूर (442.44), चंद्रभागा (502.40), पूर्णा (448.53), सपन (507.65), पंढरी (426.70), गर्गा (344.70), बोर्डीनाला (362.25),यवतमाळ जिल्ह्यातील अधरपूस (304.76), सायखेडा (272.50), गोकी (315.70), वाघाडी (318.60), बोरगांव (319.00), नवरगांव (254.10), अकोला जिल्ह्यातील  निर्गुणा (390.50), मोर्णा (365.80), उमा (343.15), घुंगशीबॅरेज (254.00), वाशिम जिल्ह्यातील अडाण (379.85), सोनल (451.90), एकबुर्जी (150.90), बुलडाणा जिल्ह्यातील ज्ञानगंगा (402.40), पलढग (401.60), मस (324.40), कोराडी (545.25), मन (372.90), तोरणा (403.35), उतावळी (370.50) आहे.   

000000

 

 

 

 

 

 

गुरुवार, २८ जुलै, २०२२

कोविडमुळे अनाथ झालेल्या बालकांना आवश्यक सुविधा द्याव्या - आशिष बिजवल

 





कोविडमुळे अनाथ झालेल्या बालकांना आवश्यक सुविधा द्याव्या

-         आशिष बिजवल

जिल्हा कृती दलाच्या बैठकित दिले निर्देश

 

अमरावती दि. 28 (विमाका): कोविड काळात अनाथ झालेल्या बालकांना कायदेशिर हक्क व आवश्यक न्यायिक मदत मिळावी यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व महिला व बालविकास विभागाने समन्वयाने कार्यवाही  करावी. या बालकांना शैक्षणिक व आरोग्यविषयक सुविधेचा तात्काळ लाभ द्यावा असे निर्देश निवासी उपजिल्हाधिकारी आशिष बिजवल यांनी दिले. जिल्हा कृती दलाच्या माध्यमातुन कोविड-१९ आपत्तीमध्ये अनाथ झालेल्या बालकांच्या संरक्षण व संगोपनासाठी केलेल्या उपाययोजनांचा आढावा श्री बिजवल यांनी आज घेतला. त्यावेळी ते बोलत होते.

महिला व बालकल्याण उपायुक्त नरेंद्र वानखडे, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी उमेश टेकाडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बाल विकास) कैलास घोडके, जिल्हा नियोजन अधिकारी वर्षा भाकरे, बाल विकास प्रकल्प अधिकारी अतुल भडांगे, राजश्री कौलखेडे, मंगल पंचाळ, माविमचे जिल्हा समन्वयक सुनिल सोसे, जिल्हा बाल सरंक्षण अधिकारी अजय डबले, परिविक्षा अधिकारी सुभाष अक्वार, जिल्हा संरक्षण अधिकारी राजेश नांदने, चाईल्ड लाईन समन्वयक अमित कपुर, बाल कल्याण समितीचे अध्यक्ष किरण पुंशी आदी यावेळी उपस्थित होते.

श्री बिजवल म्हणाले, ज्या बालकांनी दोन्ही पालक गमावले आहेत त्यांचे बँक खाते तात्काळ उघडण्यात यावे, त्यांना बालसंगोपन योजनेचा लाभ देण्यात यावा, या बालकांना अनाथ असल्याचे प्रमाणपत्र देण्यात यावे तसेच राज्य शासनाकडुन देण्यात येणारी आर्थिक मदत त्यांना उपलब्ध करुन देण्यात यावी असे सांगितले. खाजगी शाळा, महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेत असलेल्या बालकांचे शैक्षणिक शुल्क भरतांना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी शिक्षण विभागाने संबंधित शाळा, महाविद्यालयांशी संपर्क साधावा. समन्वयातुन या समस्येचे निराकरण करण्याबाबत श्री बिजवल यांनी सांगितले.

दोन्ही पालक गमावलेले सर्व बालके पर्यायी पालकांच्या जवळ त्यांच्या कुटूंबात रहात असुन बालगृहात असलेल्या एका बालिकेची पर्यायी पालकत्वाच्या माध्यमातुन निवासाची व्यवस्था करण्यात यावी असे सांगुन या बालकांचे यथायोग्य संगोपन होण्यासाठी जिल्हास्तरीय कृती दलाने महिला व बालविकास विभाग, आरोग्य विभाग, पोलीस विभाग, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण या सर्व शासकिय विभागांनी समन्वयाने काम करण्याच्या सुचना श्री बिजवल यांनी केल्या.

लसीकरणाबाबत जनजागृती

कोरोना लसीकरणाबाबत सर्व शासकीय कार्यालये, अशासकीय संस्था, बालकांचे संगोपन व संरक्षण करणाऱ्या सामाजिक संस्थांनी लसीकरणाबाबत व्यापक जनजागृती करावी. अठरा वर्षे वयोगटातील युवक-युवतींमध्ये लसीकरण करण्यासाठी नियोजन करण्यात यावे. आरोग्य विभागाच्या मदतीने बालकांची कोरोना तपासणी, विलगीकरण व त्यांच्यावर तात्काळ उपचार करण्यात यावे. लसीकरणाची बुस्टर मात्रा अद्याप न घेतली नाही त्या नागरिकांसाठी विशेष शिबीरांचे आयोजन करण्यात यावे, असे श्री बिजवल यांनी सांगितले.

0000000

प्रधानमंत्री पिक विमा योजना ३१ जुलै पर्यंत शेतकऱ्यांनी प्रस्ताव सादर करावे / अनुसूचित जाती व नवबौध्द शासकीय निवासी शाळांची ‘स्वच्छ विद्यालय’ पुरस्कारासाठी निवड

 

प्रधानमंत्री पिक विमा योजना

३१ जुलै पर्यंत शेतकऱ्यांनी प्रस्ताव सादर करावे

 

अमरावती दि. 28 (विमाका) : नैसर्गिक आपत्ती, किड आणि रोगामुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण देणे. शेतकऱ्यांना नाविण्यपूर्ण व सुधारित मशागतीचे तंत्रज्ञान वापरण्यास प्रोत्साहन देणे, यासाठी अमरावती विभागातील सर्व जिल्हयात प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम २०२२-२३ मध्ये राबविण्याबाबत येत आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी बँकेकडे विमा हप्त्यासह ३१ जुलै २०२२ पर्यंत प्रस्ताव सादर करावे.

भात, ज्वारी, मका, तूर, मुग, उडीद, सोयाबिन, कापूस पिकांचा या खरीप हंगामात समावेश करण्यात आला आहे.  बुलढाणा, वाशिम, अमरावती व यवतमाळ जिल्ह्यांसाठी भारतीय कृषि विमा कंपनी, पत्ता- मुंबई क्षेत्रीय कार्यालय, स्टॉक एक्सेंज टॉवर्स, २० वा मजला, दलाल स्ट्रीट, फोर्ट, मुंबई- ४०००२३ ई-मेल pikvima@aicofindia.com टोल फ्री क्रमांक १८००४१९५००४ आहे. अकोला जिल्ह्यासाठी आयसीआयसीआय लोंबार्ड जनरल इन्शुरन्स कंपनी लि. पत्ता- माणिकचंद आयकॉन, ३ रा मजला, प्लाट नं. २४६, सी विंग, बंडगार्डन, पुणे ४११००१ ई-मेल customersupportba@icicilombard.com टोल फ्री क्रमांक १८००१०३७७१२ आहे. ह्या कंपन्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

या योजने अंतर्गत राज्यात सन 2022-2023 साठी सर्वसाधारणपणे जिल्हास्तरीय पिक कर्ज दर समितीने निश्चित केलेल्या पिक कर्ज दराप्रमाणे पिकनिहाय विमा संरक्षित रक्कम निश्चित करण्यात आली आहे.

प्रधानमंत्री पीक विमा योजना अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी बंधनकारक असून कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक आहे. या योजने अंतर्गत शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता हा खरीप हंगामासाठी २ टक्के, रब्बी हंगामासाठी १.५० टक्के व नगदी पिकांसाठी ५ टक्के असा मर्यादित ठेवण्यात आला आहे.

या वर्षीच्या खरीप हंगाम २०२२-२३ मध्ये प्रधानमंत्री पिक विमा योजनेमध्ये जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी होऊन पिक विमा योजनेचा लाभ घ्यावा. यासंबंधीच्या अधिक माहितीकरीता जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, उपविभागीय कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी, मंडळ कृषि अधिकारी या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन विभागीय कृषि सहसंचालक के.एस. मुळे यांनी केले आहे.

 

००००

वृत्तक्र. 199                                                                        दिनांक: 28 जुलै, 2022

अनुसूचित जाती व नवबौध्द शासकीय निवासी शाळांची

‘स्वच्छ विद्यालय’ पुरस्कारासाठी निवड

 

अमरावती दि. 28 (विमाका) : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमीत्त ‘स्वच्छ भारत,स्वच्छ विद्यालय’ या अभियानाअंतर्गत सन २०२१- २०२२चा स्वच्छ विद्यालय हा पुरस्कार जिल्ह्यातील, अंजनगाव सुर्जीच्या पांढरी खानमपुर येथील अनुसूचित जाती व नवबौध्द मुलींची शासकीय निवासी शाळा व दर्यापुर तालुक्यातील सामदा कासमपुर येथील अनुसूचित जाती व नवबौध्द मुलींची शासकीय निवासी शाळा या दोन शाळांची निवड जिल्हास्तरीय पुरस्कारासाठी करण्यात आली आहे.

निवड समितीने या निवासी शाळांना प्रत्यक्ष भेट देऊन तपासणी केली. शाळा तपासणीदरम्यान वॉटर, हॅडवॉशिंग विथ सोप, बिहेवियर चेंजेंस अॅन्ड कॅपॅसिटी बिल्डींग, टॉयलेट्स, ऑपरेशन अॅन्ड मेनटेनन्स, कोविड-१९ व फोटोस या बाबींची प्रश्नावली व प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली व त्यानुसार प्रत्येक जिल्ह्यामधून जिल्हास्तरीय पुरस्कारासाठी सर्वसाधारण श्रेणीमधून एकुण ८ शाळांची व उपश्रेणीमधून एकुण ३० शाळांची निवड करण्यात आली.

अकोला जिल्हयातील अकोट तालुक्यातील गोरेगाव खुर्दची अनुसूचित जाती मुलींची शासकीय निवासी शाळेची जिल्हास्तरीय पुरस्कारासाठी निवड करण्यात आली असुन राज्यस्तरीय पुरस्कारासाठी नामांकन करण्यात आले आहे. यवतमाळ जिल्हयातील आर्णि तालुक्यातील (भंडारी नाथ), अनुसूचित जाती मुलांची शासकीय निवासी शाळेची निवड करण्यात आली आहे.

भारत सरकारच्या शालेय शिक्षण व साक्षरता मंत्रालयातर्फे शालेय स्वच्छतेसंबंधीत पाच विविध बाबीवर निवड निश्चित करण्यात आली होती. त्यानुसार जिल्ह्यातील शिक्षण विभागाअंतर्गत येणाऱ्या तसेच समाज कल्याण विभागाअंतर्गत येणाऱ्या सर्व शैक्षणिक संस्थांनी सदर पुरस्काराकरीता ऑनलाईन सहभाग नोंदविला होता.

विद्यार्थ्यांचे विकासाकरिता विविध स्पर्धांचे आयोजन व स्पर्धांमध्ये सहभाग याच मुळे शाळांची गुणवत्ता वाढविण्यासाठी केलेल्या प्रयत्नांमुळेच भारत सरकारच्या शालेय शिक्षण व साक्षरता मंत्रालयातर्फे घेण्यात आलेल्या स्वच्छ विद्यालय पुरस्काराकरीता निवड झाली अशी, माहिती समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त सुनिल वारे यांनी दिली.

अमरावती विभागात जूनपासून आतापर्यंत 493.3 मिमि पावसाची नोंद विभागात सरासरी 1.1 मि.मि. पाऊस

 

अमरावती विभागात

जूनपासून आतापर्यंत 493.3 मिमि पावसाची नोंद

विभागात सरासरी 1.1 मि.मि. पाऊस

 

अमरावती दि 28: अमरावती विभागातील 56 तालुक्यात पाऊस झाला. विभागीय आपत्ती व्यवस्थापन कक्षाने उपलब्ध करुन दिलेल्या महावेधच्या नोंदीनुसार आज दुपारी बारा वाजेपर्यंत विभागात सरासरी 1.1 पाऊस झाला. दि. 1 जून ते आजपर्यंत 493.3 मिमि पावसाची नोंद करण्यात आली आहे. मागील 24 तासांत विभागात बुलडाणा जिल्ह्यात 2.9 मिमि पाऊस झाला.

विभागात नोंदला गेलेला आजचा तालुका निहाय पाऊस पुढीलप्रमाणे असून कंसातील आकडेवारी यंदा 1 जूनपासून आजवर झालेल्या पावसाची आहे. सर्व आकडेवारी मिली मिटर परिमाणात आहेत. ही माहिती महावेधच्या नोंदीनुसार दुपारी बारावाजेपर्यंतची असुन बदलत्या पर्जन्यमानानुसार त्यात बदल होऊ शकतात.

अमरावती जिल्हा : धारणी 3.7 (485.4), चिखलदरा 6.2 (781.1), अमरावती 0.1 (416.1), भातकूली 0.0 (336.6), नांदगाव खडेश्वर 0.0 (513.6), चांदूर रेल्वे 1.0 (438.7), तिवसा 0.3 (587.9), मोर्शी 2.0 (518.1), वरुड 0.0 (546.8), दर्यापूर 0.0 (323.8), अंजनगाव 0.0 (380.3), अचलपूर 0.1 (365.7), चांदूरबाजार 0.2 (553.2.), धामणगाव रेल्वे 0.6 (619.6) अमरावती जिल्ह्यात चोवीस तासांत सरासरी 0.8 मि.मि पाऊस झाला. जिल्ह्यात यंदा आजवर सरासरी 481.0 मि.मि. पाऊस झाला.

अकोला जिल्हा :- अकोट 0.0 (252.3), तेल्हारा 0.4 (368.0), बाळापूर 0.0 (472.2), पातूर 0.0 (401.2),  अकोला 0.1 (445.7), बार्शी टाकळी 0.3 (342.6), मुर्तीजापूर 0.0 (350.5), जिल्ह्यात 24 तासांत सरासरी 0.1 मि.मि. तर आजवर 379.6 मि.मि पाऊस झाला आहे.

यवतमाळ जिल्हा : यवतमाळ 0.0 (592.6), बाभूळगाव 0.0 (611.8), कळंब 0.0 (617.5), दारव्हा 0.0(470.0), दिग्रस 0.0 (587.1), आर्णी 0.1 (754.4), नेर 0.1 (514.4), पुसद 2.1 (464.9), उमरखेड 0.0 (591.3), महागाव 0.0 (682.4), वणी 1.2 (827.1), मारेगाव 0.4 (783.2), झरीजामणी 0.1 (719.1), केळापूर 0.3 (730.4), घाटंजी 0.2 (606.8), राळेगाव 0.0 (790.7), जिल्ह्यात 24 तासांत सरासरी 0.3 तर यंदाच्या हंगामात आजवर सरासरी 643.6 मि.मि पाऊस झालाआहे.

बुलडाणा जिल्हा :- जळगाव जामोद 1.4 (298.9), संग्रामपूर 0.0 (368.2), चिखली 12.9 (437.6), बुलडाणा 0.3 (544.7), देऊळगाव राजा 7.3 (405.4), मेहकर 5.6 (456.2), सिंदखेड राजा 1.0 (448.7), लोणार 2.0 (371.4), खामगाव 0.0 (326.9), शेगाव 0.0 (404.7), मलकापूर 0.0 (291.3), मोताळा 0.1 (322.4), नांदूरा 0.0 (316.8), जिल्ह्यात दिवसभरात 2.9 तर यंदाच्या हंगामात आजवर 390.6 मि.मि. पाऊस झाला.

वाशिम जिल्हा : - वाशिम 1.1 (476.9), रिसोड 2.5 (502.1), मालेगाव 1.9 (519.0), मंगरुळपिर 0.0 (516.4), मानोरा 0.0 (560.7), कारंजा 0.0 (374.2), जिल्ह्यात 24 तासात 1.0 तर 1 जूनपासून आजवर 487.7 मि.मि. पाऊस झाला.

****

 

 

बुधवार, २७ जुलै, २०२२

विभागातील विविध प्रकल्पांतील जलाशय पातळी

 

विभागातील विविध प्रकल्पांतील जलाशय पातळी

अमरावती दि.28 (विमाका) : विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाने दि. 28 जुलै 2022 रोजी सकाळी 7 वाजता दिलेल्या माहितीनुसार अमरावती प्रादेशिक विभागातील मोठ्या व मध्यमप्रकल्पांतील दैनिक जलाशय पातळी व पाणीसाठा अहवाल खालीलप्रमाणे.

विभागातील मोठ्या प्रकल्पातील जलाशय पातळी खालील प्रमाणे (मी.मध्ये)

अमरावती जिल्ह्यातील उर्ध्ववर्धा (341.10), यवतमाळ जिल्ह्यातील पुस प्रकल्प (396.45), अरुणावती (328.84), बेंबळा (266.45), अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा (346.60), वान (404.80), बुलढाणा जिल्ह्यातील नळगंगा (290.48), पेनटाकळी (556.75), खडकपूर्णा (518.82).

मध्यम प्रकल्पातील जलाशय पातळी खालील प्रमाणे (मी.मध्ये)

अमरावती जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पातील जलाशय पातळी शहानूर (442.52), चंद्रभागा (502.20), पूर्णा (448.15), सपन (507.60), पंढरी (426.89), गर्गा (344.70), बोर्डीनाला (362.30),यवतमाळ जिल्ह्यातील अधरपूस (304.78), सायखेडा (272.50), गोकी (315.70), वाघाडी (318.60), बोरगांव (319.00), नवरगांव (254.10), अकोला जिल्ह्यातील  निर्गुणा (390.30), मोर्णा (365.60), उमा (343.15), घुंगशीबॅरेज (254.40), वाशिम जिल्ह्यातील अडाण (379.85), सोनल (451.90), एकबुर्जी (150.90), बुलडाणा जिल्ह्यातील ज्ञानगंगा (402.40), पलढग (401.55), मस (324.30), कोराडी (545.25), मन (372.90), तोरणा (403.35), उतावळी (370.50) आहे.   

000000

 

 

 

 

 

 

मंगळवार, २६ जुलै, २०२२

प्रधानमंत्री पिक विमा योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा - जिल्हाधिकारी पवनीत कौर

 



प्रधानमंत्री पिक विमा योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा

-         जिल्हाधिकारी पवनीत कौर

फिरत्या वाहनाच्या माध्यमातुन योजनेची प्रसिद्धी

अमरावती दि. 26 (विमाका) : प्रधानमंत्री पिक विमा योजनेचा लाभ जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांना घेता यावा यासाठी योजनेची माहिती दर्शविणाऱ्या चार फिरत्या वाहनांना आज जिल्हाधिकारी कार्यालयातील परिसरात जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी हिरवी झेंडी दाखविली. फिरत्या वाहनांच्या माध्यमातुन जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पिक विमा योजनेची माहिती, वैशिष्ठ्ये सांगण्यात येणार आहे. ही केंद्र शासनाची योजना असुन फिरत्या वाहनाच्या माध्यमातुन या योजनेची जिल्हाभर प्रसिद्धी करण्यात येत आहे. जिल्ह्यातील अमरावती, चांदुर रेल्वे, धामणगाव व भातकुली या तालुक्यात ‍ही फिरती वाहने रवाना करण्यात आली.     

कर्जदार,बिगर कर्जदार व भाडेपट्टीवर शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी पीक विमा अर्ज नोंदणी प्रक्रिये पुर्ण करण्यासाठी ‘आपले सरकार’ या केंद्रावर सुविधा निर्माण करण्यात आली असुन ३१ जुलै पर्यंत शेतकऱ्यांनी अर्ज सादर करण्याचे आवाहन श्रीमती कौर यांनी केले.

नैसर्गिक आपत्ती, किड आणि रोगामुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण देणे, सुधारीत तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यास प्रोत्साहन देणे व शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखण्यासाठी प्रधानमंत्री पिक योजना राबविण्यात येत आहे. यावर्षी खरीप हंगाम योजना २०२२-२३ मध्ये भारतीय कृषी विमा कंपनी लिमिटेड या योजनेची अंमलबजावणी करीत आहे. तांदुळ, ज्वारी, सोयाबीन, मुग, उडीद, तुर व कापुस पिकांचा खरीप हंगामात समावेश आहे.

उपविभागीय अधिकारी डॉ. नितीन व्यवहारे, विभागीय कृषी सहसंचालक किसन मुळे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी अनिल खर्चान, विमा कंपनीचे जिल्हा प्रतिनीधी नितीन सावळे आदी यावेळी उपस्थित होते.

00000000

जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीचा आढावा

 

जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीचा आढावा

अमरावती, दि. 26 (विमाका) : जिल्ह्यातील अनुसूचित जाती, जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमानुसार घडलेला गुन्हा आणि त्यावर करण्यात आलेल्या कार्यवाहीचा आज आढावा घेण्यात आला. निवासी उपजिल्हाधिकारी आशिष बिजवल यांनी जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीची बैठक घेऊन आढावा घेतला. जिल्हाधिकारी कार्यालयात ही बैठक घेण्यात आली.

            जुन महिन्यात शहरी ग्रामीण भागात अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीची 14 प्रकरणे घडली. जानेवारी ते जुन अखेर शहरी हद्दीत 17 तर ग्रामीण हद्दीत 24 अशी 41 प्रकरणे दाखल करण्यात आली आहेत. अशी माहिती समाज कल्याणच्या सहायक आयुक्त माया केदार यांनी दिली. अर्थसहायचा प्रलंबित निधी प्राप्त करण्यासाठी आवश्यक ती प्रक्रिया पूर्ण करण्यात यावी. जानेवारी 2022 ते 30 जुनअखेरपर्यंतची एकूण 29 प्रकरणांचा पोलिस तपास करीत आहेत. याबाबतची कार्यवाही तातडीने पूर्ण करावी, असे निर्देश उपजिल्हाधिकारी आशिष बिजवल यांनी दिले.

या बैठकीला समाज कल्याण निरिक्षक सुरेश ‍कोंडे, ग्रामीण पोलिस अधीक्षक कार्यालयाचे तपन कोल्हे, पोलिस उपअधीक्षक कार्यालयाचे प्रशांत राजे, अशासकीय सदस्य राजेंद्र महल्ले, दिलीप काळबांडे आदी उपस्थित होते.

जि.प., पं. स. निवडणूकीसाठी नियोजनभवनात गुरूवारी आरक्षण सोडत

 

जि.प., पं. स. निवडणूकीसाठी नियोजनभवनात गुरूवारी आरक्षण सोडत

अमरावती, दि. 26 (विमाका) : अमरावती जिल्ह्यातील जिल्हा परिषद निवडणूक-2022साठी जिल्हा परिषद सदस्यांच्या एकूण 66 पदांच्या अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग व सर्वसाधारण या पदांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन गुरूवारी (28 जुलै) आरक्षण सोडत होणार आहे. पं. स. निवडणुकीसाठी जिल्ह्यातील एकूण 11 तहसील स्तरावर याच दिवशी आरक्षण सोडत होईल.

जिल्हाधिकारी श्रीमती पवनीत कौर यांच्या अध्यक्षतेखाली जि. प. निवडणुकीसाठीची सोडत प्रक्रिया सकाळी 11 वाजता होणार आहे.  प्रशासनाकडून सोडतीच्या अनुषंगाने पूर्वतयारी सुरू करण्यात आली आहे. उपजिल्हा निवडणूक कार्यालयाकडून कार्यवाही होत आहे. सोडत सभेच्या अनुषंगाने आवश्यक बाबी, आवश्यक पोलीस बंदोबस्त आदी तजवीज करण्यात येत आहे.

जिल्ह्यातील 11 तहसील स्तरावर पं. स. निवडणुकीची आरक्षण सोडत गुरूवारी सकाळी 11 वा. होईल. जिल्ह्यातील तिवसा, धामणगाव रेल्वे व चांदूर रेल्वे या अस्तित्वात असलेल्या पंचायत समित्या वगळता उर्वरित 11 पं. स. निवडणूकीसाठी सोडत होणार आहे.  

0000000

अमरावती विभागात सर्वदूर पाऊस, जूनपासून आतापर्यंत 483.3 मिमि पावसाची नोंद

 

अमरावती विभागात सर्वदूर पाऊस

जूनपासून आतापर्यंत 483.3 मिमि पावसाची नोंद

अमरावती दि 26: अमरावती विभागात आज 56 तालुक्यात पाऊस झाला. प्राप्त अहवाला नुसार, दुपारी बारा वाजेपर्यंत झालेल्या पावसाच्या घेण्यात आलेल्या नोंदी नुसार विभागात 1 जून ते आजपर्यंत 483.3 मि मि पावसाची नोंद करण्यात आली आहे. मागील 24 तासांत विभागात 13.7 मिली मिटर पाऊस झाला.

विभागात नोंदला गेलेला आजचा तालुका निहाय पाऊस पुढीलप्रमाणे असून कंसातील आकडेवारी यंदा 1 जूनपासून आजवर झालेल्या पावसाची आहे. सर्व आकडेवारी मिली मिटर परिमाणात आहेत.

अमरावती जिल्हा : धारणी 19.8 (473.6), चिखलदरा 24.8 (770.4), अमरावती 20.6 (406.0), भातकूली 9.3 (329.1), नांदगावखडेश्वर 29.8 (513.4), चांदूररेल्वे 17.4 (437.2), तिवसा 14.9 (582.9), मोर्शी 1.5 (505.1), वरुड 7.8 (546.8), दर्यापूर 1.8 (323.3), अंजनगाव 3.3 (373.6), अचलपूर 4.7  (348.3), चांदूरबाजार 6.6 (542.3.4), धामणगावरेल्वे 30.2 (615.9) अमरावती जिल्ह्यात चोवीस तासात सरासरी 13.6 मि.मि पाऊस झाला. जिल्ह्यात यंदा आजवर सरासरी 473.8 मि.मि. पाऊसझाला.

अकोला जिल्हा :- अकोट 0.4 (250.3), तेल्हारा 0.1 (365.6), बाळापूर 6.2 (469.8), पातूर 12.7 (390.3),  अकोला 1.0 (437.4), बार्शीटाकळी 6.5 (337.9), मुर्तीजापूर 2.5 (349.2), जिल्ह्यात 24 तासात सरासरी 13.7 मि.मि आजवर 483.3 मि.मि पाऊस झाला आहे.

यवतमाळ जिल्हा : यवतमाळ 26.0 (586.6), बाभूळगाव 41.3 (611.2), कळंब 14.7 (616.7), दारव्हा 9.2 (445.6), दिग्रस 50.9 (566.7), आर्णी 42.3 (690.3), नेर 26.5 (537.6), पुसद 15.2 (454.5), उमरखेड 14.5 (578.4), महागाव 29.1 (672.5), वणी 9.7 (805.1), मारेगाव 7.9 (757.4), झरीजामणी 13.4 (711.5), केळापूर 24.1 (711.2), घाटंजी 12.6 (596.6), राळेगाव 18.0 (771.9), जिल्ह्यात 24 तासात सरासरी 21.2 तर यंदाच्या हंगामात आजवर सरासरी 627.9 मि.मि पाऊस झालाआहे.

बुलडाणा जिल्हा :- जळगाव जामोद 3.2 (295.1), संग्रामपूर 1.9 (360.1), चिखली 9.9 (415.2), बुलडाणा 8.1 (519.2), देऊळगाव राजा 0.6 (394.0), मेहकर 3.2 (443.9), सिंदखेडराजा 1.1 (444.9), लोणार 1.1 (365.6), खामगाव 4.7 (321.6), शेगाव 2.9 (401.1), मलकापूर 4.9 (291.2), मोताळा 2.3 (321.7), नांदूरा 6.8 (313.9), जिल्ह्यात दिवसभरात 4.3 तर यंदाच्या हंगामात आजवर 381.5 मि.मि. पाऊस झाला.

वाशिम जिल्हा : - वाशिम 20.9 (467.0), रिसोड 17.2 (484.8), मालेगाव 35.8 (505.2), मंगरुळपिर 40.0 (512.5), मानोरा 42.6 (547.5), कारंजा 3.1 (371.1), जिल्ह्यात 24 तासात 13.7 तर 1 जूनपासून आजवर 483.3 मि.मि. पाऊस झाला.

****

 

सोमवार, २५ जुलै, २०२२

विभागातील विविध प्रकल्पांतील जलाशय पातळी

 

 

विभागातील विविध प्रकल्पांतील जलाशय पातळी

अमरावती दि.26 (विमाका) : विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाने दि. 26 जुलै 2022 रोजी सकाळी 7 वाजता दिलेल्या माहितीनुसार अमरावती प्रादेशिक विभागातील मोठ्या व मध्यमप्रकल्पांतील दैनिक जलाशय पातळी व पाणीसाठा अहवाल खालीलप्रमाणे.

विभागातील मोठ्या प्रकल्पातील जलाशय पातळी खालील प्रमाणे (मी.मध्ये)

अमरावती जिल्ह्यातील उर्ध्ववर्धा (341.17), यवतमाळ जिल्ह्यातील पुस प्रकल्प (394.48), अरुणावती (327.95), बेंबळा (266.55), अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा (345.34), वान (404.32), बुलढाणा जिल्ह्यातील नळगंगा (290.45), पेनटाकळी (556.75), खडकपूर्णा (518.43).

मध्यम प्रकल्पातील जलाशय पातळी खालील प्रमाणे (मी.मध्ये)

अमरावती जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पातील जलाशय पातळी शहानूर (442.78), चंद्रभागा (501.90), पूर्णा (448.48), सपन (507.55), पंढरी (426.25), गर्गा (345.10), बोर्डीनाला (362.60),यवतमाळ जिल्ह्यातील अधरपूस (304.49), सायखेडा (272.50), गोकी (315.70), वाघाडी (318.60), बोरगांव (319.00), नवरगांव (254.10), अकोला जिल्ह्यातील  निर्गुणा (390.00), मोर्णा (365.30), उमा (343.15), घुंगशीबॅरेज (254.70), वाशिम जिल्ह्यातील अडाण (379.85), सोनल (451.85), एकबुर्जी (150.45), बुलडाणा जिल्ह्यातील ज्ञानगंगा (402.40), पलढग (401.40), मस (324.20), कोराडी (545.25), मन (372.90), तोरणा (403.35), उतावळी (370.50) आहे.   

000000

 

 

 

 

 

प्रधानमंत्री पिक विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी ३१ जुलै पर्यंत प्रस्ताव सादर करावे/परीक्षा केंद्रासाठी मागणी प्रस्ताव ३१ ऑगस्ट पर्यंत सादर करावे

 

प्रधानमंत्री पिक विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी

३१ जुलै पर्यंत प्रस्ताव सादर करावे

 

अमरावती दि.25 (विमाका) : सन 2022-23 मध्ये  राबविण्यात येणाऱ्या प्रधानमंत्री पिक विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी दि.31 जुलै पर्यंत प्रस्ताव सादर करावे.           

    शासनाच्या ई- पिक मध्ये पिक पेऱ्याची नोंद 1 ऑगस्ट 2022 पासून करण्यात येत आहे. पिक विमा योजनेत भाग घेत असतांना काही वेळेस विमा काढलेले पिक व प्रत्यक्ष शेतात असलेले पिक यामध्ये तफावत आढळुन शेतकरी पिक विमा नुकसान भरपाई पासून वंचित राहु नये यासाठी शेतकऱ्यांने पिक पाहणीमध्ये केलेली नोंद ही अंतीम गृहीत धरण्यात येईल. असा निर्णय शासनाकडुन घेण्यात आला आहे. त्यामुळे पिक विमा योजनेत सहभाग घेतांना ई- पिक पाहणीमध्ये पिकाची नोंद असलेला दाखला असण्याची आवश्यकता नाही. शेतकरी पिक विमा बाबत स्वयंघोषणा पत्राद्वारे पिक विमा योजनेत सहभाग घेऊ शकतो. मात्र दि. 1 ऑगस्ट 2022 नंतर त्यांनी ई-पिक पाहणीमध्ये आपल्या पिकांची नोंद करावी, असे आवाहन विभागीय कृषि सहसंचालक के. एस मुळे यांनी  केले आहे.

0000000

 

वृत्तक्र. 192                                                                        दिनांक: 25 जुलै, 2022

 

परीक्षा केंद्रासाठी मागणी प्रस्ताव

३१ ऑगस्ट पर्यंत सादर करावे

अमरावती दि.25 (विमाका) : इयत्ता दहावी व बारावीच्या शैक्षणिक वर्ष 2023 मध्ये घेण्यात येणाऱ्या परिक्षेसाठी नविन परीक्षा केंद्राचे मागणी प्रस्ताव दि. 1 ते 31 ऑगस्ट 2022  या कालावधीत अर्ज विक्री व भरलेले अर्ज स्विकृत करण्यात येणार आहे. नविन प्रस्ताव अर्जाची किंमत एक हजार रुपये असुन, दि. 31 ऑगस्ट 2021 नंतर नविन परीक्षा केंद्रासाठी मागणी अर्ज स्विकारल्या जाणार नाही. असे अमरावती विभागीय मंडळाचे सचिव उल्हास नरड यांनी कळविले आहे.

00000

रविवार, २४ जुलै, २०२२

विभागातील विविध प्रकल्पांतील जलाशय पातळी

 

विभागातील विविध प्रकल्पांतील जलाशय पातळी

अमरावती दि.25 (विमाका) : विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाने दि. 25 जुलै 2022 रोजी सकाळी 7 वाजता दिलेल्या माहितीनुसार अमरावती प्रादेशिक विभागातील मोठ्या व मध्यमप्रकल्पांतील दैनिक जलाशय पातळी व पाणीसाठा अहवाल खालीलप्रमाणे.

विभागातील मोठ्या प्रकल्पातील जलाशय पातळी खालील प्रमाणे (मी.मध्ये)

अमरावती जिल्ह्यातील उर्ध्ववर्धा (341.27), यवतमाळ जिल्ह्यातील पुस प्रकल्प (394.10), अरुणावती (327.84), बेंबळा (266.15), अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा (345.13), वान (404.40), बुलढाणा जिल्ह्यातील नळगंगा (290.39), पेनटाकळी (556.75), खडकपूर्णा (518.33).

मध्यम प्रकल्पातील जलाशय पातळी खालील प्रमाणे (मी.मध्ये)

अमरावती जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पातील जलाशय पातळी शहानूर (442.56), चंद्रभागा (502.00), पूर्णा (448.86), सपन (507.60), पंढरी (425.70), गर्गा (344.90), बोर्डीनाला (362.80),यवतमाळ जिल्ह्यातील अधरपूस (304.44), सायखेडा (272.50), गोकी (315.70), वाघाडी (318.60), बोरगांव (319.00), नवरगांव (254.10), अकोला जिल्ह्यातील  निर्गुणा (389.50), मोर्णा (365.20), उमा (343.10), घुंगशीबॅरेज (254.80), वाशिम जिल्ह्यातील अडाण (380.04), सोनल (451.50), एकबुर्जी (150.45), बुलडाणा जिल्ह्यातील ज्ञानगंगा (402.30), पलढग (401.30), मस (324.15), कोराडी (545.25), मन (372.90), तोरणा (403.35), उतावळी (370.50) आहे.   

000000

 

 

गुरुवार, २१ जुलै, २०२२

सखी निवारा केंद्रातुन संकटग्रस्त महिलांना मदतीचा हात - जिल्हाधिकारी पवनीत कौर

 



सखी निवारा केंद्रातुन संकटग्रस्त महिलांना मदतीचा हात

-         जिल्हाधिकारी पवनीत कौर

 

अमरावती दि 21 (विमाका) :- संकटग्रस्त महिलांना आरोग्य, सुरक्षा, भोजन, निवारा, कायदेशिर बाबींची मदत तसेच समुदपदेशन आदी सर्व सुविधा तात्काळ व एकाच ठिकाणी उपलब्ध व्हाव्या, यासाठी सखी निवारा केंद्राची (one stop crises centre)  निर्मिती करण्यात आली आहे. या निवारा केंद्राच्या माध्यमातुन संकटग्रस्त महिलांना मदतीचा हात द्यावा. या योजनेची व्यापक प्रचार प्रसिध्दी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात सखी सेंटरच्या व्यवस्थापकीय समितीच्या बैठकित त्या बोलत होत्या.

उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास घोडके, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी तुकाराम टेकाडे, अति. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सोळंके, सहा. जिल्हा आरोग्य अधिकारी मनिषा सुर्यवंशी, सहा. पोलीस आयुक्त प्रशांत राणे, आदी यावेळी उपस्थित होते.

डफरिन रुग्णालयाच्या परिसरात सखी निवारा केंद्राची निर्मिती करण्यात आली असुन या केंद्राअंतर्गत महिला व मुलींना तात्पुरत्या निवासाची व्यवस्था करण्यात येत आहे. प्रज्ञा महिला बहुउद्देशिय संस्थेच्या माध्यमातुन या सेवा केंद्रात विविध सेवा पुरविण्यात येत आहे. संकटग्रस्त महिलांना या केंद्राची माहिती व्हावी यासाठी शासन स्तरावर जनजागृती करण्यात येणार असल्याचे संबंधितांनी सांगितले. या केंद्रात महिला कर्मचारी, केंद्र व्यवस्थापक, कायदेशिर सल्लागार, पोलीस अधिकारी असणार आहेत. महिलांसाठी हे केंद्र चोवीस तास खुले रहाणार असुन संकटग्रस्त महिलांनी या सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन श्रीमती कौर यांनी केले.

****