मंगळवार, १४ नोव्हेंबर, २०१७

युवकांसाठी दिशादर्शक - रोजगार मिळावे
96 रोजगार मेळाव्यातून 20 हजार युवकांची निवड

महाविद्यालयीन शिक्षणानंतर युवकांना ध्यास लागतो तो नोकरीचा. आजच्या स्पर्धेच्या युगात रोजगार प्राप्तीसाठी अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागते. असा असंख्य तरुणांचा अनुभव आहे. त्यातही आपली आवड निवड, आपल्यातील कला गुणांना वाव देण्यास योग्य संधी मिळावी असा रोजगार प्राप्त करण्याचे स्पप्न अनेक युवक युवती आपल्या उराशी बाळगतात. बेरोजगारीच्या या समस्येवर उपाय म्हणून राज्यशासनाच्या वतीने जिल्हा पातळीवर रोजगार निर्मिती उपलब्ध केले आहे.
विभागात अमरावती 29, अकोला 18, बुलडाणा 17, यवतमाळ 19 व वाशिम 13 अशा 96 रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या रोजगार मेळाव्यांच्या माध्यमातून  आतापर्यंत वीस हजार युवकांची प्राथमिक स्तरावर निवड करण्यात आली आहे.
स्वयंरोजगाराच्या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या दृष्टिने सुशिक्षीत बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्यासाठी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजगता विभागाच्या वतीने रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात येत आहे.
या योजनेअंतर्गत विभागीय स्तरावर एक आणि जिल्हा स्तरावर  चार मेळाव्यांचे आयोजन करण्यात येते. योग्य अभ्यासक्रम, शिक्षण आणि प्रशिक्षीत शिक्षकांवर यात अधिक लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. या मेळाव्यांमध्ये उद्योजक व नोकरी उत्सुक उमेदवारांना एका छताखाली आणून उद्योजकांना आवश्यक मनुष्यबळ विनामुल्य उपलब्ध करुन देणे व नोकरी उत्सुक उमेदवारांना नोकरी मिळवून देण्यासाठी सहाय्य करण्यात येते. यासाठी ऑनलाईन नोंदणीची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.
योग्य प्रशिक्षण व पसंतीशिवाय स्वयंरोजगारासाठी सामान्यपणे कोणतीही व्यक्ती सहसा प्रवृत्त होत नाही. परंतु या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातुन युवकांना आपल्या पसंतीच्या ठिकाणी सेवा देण्याची, उत्कृष्ठ प्रशिक्षण प्राप्त करण्याची संधी उपलब्ध होते. समाजात स्वयंरोजगाराबाबत अनुकुल बदल व राष्ट्राचा विकास कौशल्ययुक्त प्रशिक्षणातुनच शक्य आहे.
00000



शुक्रवार, १० नोव्हेंबर, २०१७

 ‘मनोधैर्य’ने दिले पिडीतांना जगण्याचे धैर्य
*187 पिडीतांना 2 कोटी 65 लाखांचे अर्थसहाय्य
* तत्परतेने समुपदेशनासह वैद्यकीय, कायदेशीर मदत

 पिडीत महिला, मुली आणि बालकांना मदतीचा हात देऊन त्यांना पुन्हा नव्या उमेदीने जीवन जगण्यासाठी 2 ऑक्टोबर 2013 पासून मनोधैर्य योजना सुरू करण्यात आली. या योजनेंतर्गत अमरावती विभागातील 187 पिडीतांना सुमारे 2 कोटी 65 लाख रुपयांचे अर्थसहाय्य देऊन जगण्याचे धैर्य प्राप्त करून दिले आहे. वित्तीय मदतीसोबतच समुपदेशन, वैद्यकीय आणि कायदेशीर मदतही तत्परतेने उपलब्ध करून दिले जात आहे.
मनोधैर्य योजनेतून अमरावती जिल्ह्यात 65 पिडीतांना प्रत्येकी 50 हजार रुपयांचे अर्थसहाय्य देण्यात आले आहे. बुलडाणा जिल्ह्यातील 20 पिडितांना 40 लाख रुपये, तर वाशिम जिल्ह्यातील 32 पिडीतांना 30 लाख रुपये मदत म्हणून देण्यात आले. अकोला जिल्ह्यात 10 लाख 22 हजार 900 रुपये, तर यवतमाळ जिल्ह्यात 92 लाख रुपये अर्थसहाय्य देण्यात आले आहे. 
अत्याचार पिडीत महिला-बालकांना आधार देऊन त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी मनोधैर्य योजना 2013 पासून सुरु केली आहे. यात बलात्कार, बालकांवरील लैंगिक अत्याचारप्रकरणी किमान दोन लाख आणि विशेष प्रकरणामध्ये तीन लाख रूपयांची मदत देण्यात येते. ॲसिड हल्ल्यात महिला आणि बालकांचा चेहरा विदृप झाल्यास किंवा कायमचे अंपगत्व आल्यास तीन लाख रुपये तसेच जखमी झाल्यास 50 हजार रुपये अर्थसहाय्य दिले जाते.
महिला-बालकांवरील अत्याचारप्रकरणी गंभीर शिक्षा होणे आवश्यक आहे. त्याचबरोबर यातील पिडीत महिला आणि बालकांना प्रतिष्ठा, आत्मविश्वास परत मिळवून देणेही तितकेच आवश्यक आहे. पिडीत महिला आणि बालकांना शारीरिक आणि मानसिक आघातातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करणे, वित्तीय साहाय्य देणे तसेच समुपदेशन, निवास, वैद्यकीय आणि कायदेशीर मदत, उपचार सेवा तत्परतेने उपलबध करुन त्यांचे पुनवर्सन करणे आवश्यक असते. महिला, बालकांवर वाईट प्रसंग ओढवल्यास त्यांना मदतीचा हात देण्यासाठी शासनाने ही योजना सुरु केली आहे.


महिला, बालकावरील अत्याचाराबाबत पोलिसात एफआयआर दाखल झाल्यानंतर मदतीसाठी जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा क्षतिसहाय्य व पुनवर्सन मंडळाकडे अर्ज करावा लागतो. मंडळाकडे अर्ज सादर झाल्यानंतर तातडीने मदत देण्यात येते. पिडीत महिला, बालकास जिल्हा शल्य चिकित्सकातर्फे वैद्यकीय सेवा पुरविली जाते. 
अर्ज कोठे करावा
महिला, बालकांवर अत्याचाराचे प्रकरण उद्भवल्यास त्याची पोलिसात तक्रार नोंदविली जाते. सदर प्रकरणात एफआयआर नोंद झाल्यानंतर मदतीचा प्रस्ताव संबंधित पोलिस ठाण्यामार्फत तयार केला जाते. तो प्रस्ताव त्या पोलिस ठाण्यामार्फतच जिल्हा महिला आणि बालविकास अधिकारी कार्यालयास प्राप्त होतात. त्यानंतर हा प्रस्ताव जिल्हा क्षतिसहाय्य आणि पुनवर्सन मंडळाकडे मंजूरासाठी सादर केला जातो.

00000

गुरुवार, ९ नोव्हेंबर, २०१७

खोपडा, बोडना व खापरखेडा या गावांच्या
पुनर्वसनाची कार्यवाही तातडीने पूर्ण करा
                                    -जिल्हाधिकारी अभिजित बांगर

अमरावती, दि. 9 :  मोर्शी तालुक्यातील खोपडा व बोडना तसेच वरुड तालुक्यातील खापरखेडा या तीनही पुरग्रस्त गावांच्या पुनर्वसनाची कार्यवाही तातडीने पूर्ण करा, असे निर्देश जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी दिले.
बैठकीला आमदार अनिल बोंडे, अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) रामदास सिध्दभट्टी, मजीप्राच्या अधिक्षक अभियंता श्वेता बॅनर्जी, जिल्हा कृषी अधिक्षक अनिल खर्चान, उपविभागीय अधिकारी मनोहर कडू, सार्व. बांधकाम विभागाचे व लघु पाटबंधारे महामंडळाचे अधिकारी उपस्थित होते.
श्री. बांगर म्हणाले, खोपडा, बोडना व खापरखेडा या गावांचे सुनियोजित पुनर्वसन करण्यासाठी तेथील कुटुंबाच्या नावे वाटप करण्यात आलेले भूखंडाची जागा व्यवस्थित करुन घ्यावी. तेथील झाडे झुडपे कापून जागेचे सरळीकरण करुन घ्यावे. सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्ते, नाल्या, स्ट्रीट लाईट व इतर नागरी सुविधांची उभारणी करण्यासाठी नियोजन करुन तातडीने कामाला सुरुवात करावी. उपविभागीय अधिकारी, ग्रामसेवक, तलाठी यांनी गावस्तरीय समितींची मान्यता घेऊन भुखंड वाटप करावे. पाणी पुरवठा विभागाने (मजीप्रा) तीनही गावांची पेय जलाची मागणी लक्षात घेऊन पाण्याची टाकी निर्माण करण्यासाठी नियोजन करावे. विज वितरण कंपनीने (एमएसईबी) तातडीने वीज पुरवठा उपलब्ध होईल यादृष्टीने विजेचे पोल उभारण्यासाठी नियोजन करावे, अशा सूचना श्री. बांगर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

आमदार बोंडे म्हणाले, खोपडा, बोडना व खापरखेडा या तीनही गावांचे नागरिक पावसाळ्यातील पुरामुळे त्रस्त आहेत. या तीनही गावांचे पुनर्वसन योग्य पध्दतीने करण्याची मागणी गावकऱ्यांनी बरेच वर्षापासून रेटून धरली आहे. या तीनही गावांचे पुनर्वसनासाठी जिल्हा प्रशासनाने तातडीने कामाला सुरुवात करावी. असे त्यांनी सांगितले. पुनर्वसनासाठी तयार करण्यात आलेल्या कृती आराखडयानुरुप निधीची तरतूद संबंधित यंत्रणेला तातडीने उपलब्ध करुन द्यावी. सर्व संबंधित शासकीय विभागांनी आराखडया अनुसार निधीचा प्रस्ताव तातडीने मंजूर करुन घ्यावा, जेणेकरुन तीनही गावात प्राधान्याने पायाभूत सुविधा उभारता येईल. असेही श्री. बोंडे यांनी यावेळी सांगितले.
कृषी विकास परिषद 2017 चे वरुड येथे आयोजन
* 7 ते 10 डिसेंबर दरम्यान कृषी तज्ञांचे मार्गदर्शन
* कृषी प्रदर्शनी व शासकीय योजनांचे स्टॉल्स




अमरावती, दि. 9 :  येत्या डिसेंबर महिन्यात 7 ते 10 डिसेंबर पर्यंत वरुड येथे कृषी विकास परिषद 2017 चे भव्य आयोजन करण्यात येत आहे. या परिषदेमध्ये वरुड व मोर्शी तालुक्यासह जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी संत्रा उत्पादन वाढविण्यासाठी संशोधनात्मक प्रयत्न, शेतीपुरक व्यवसाय, शेतमालावर आधारित प्रक्रिया उद्योग, शेतमालाचे उत्तम मार्केटींग, शेतीच्या मशागतीसाठी लागणारे अत्याधुनिक साहित्य व उपकरणे याविषयी कृषी क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तीव्दारे मार्गदर्शन करण्यात येणार आहे. परिषदेचे आयोजन कृषी विभाग, कृषी मित्र इव्हेंट कंपनी, जैन इरिगेशन सि. लि. यासारख्या नामवंत कंपन्यांव्दारा करण्यात येत आहे. या परिषदेच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व शासकीय विभाग प्रमुखांनी सहकार्य करावे, असे आवाहन परिषदेचे अध्यक्ष तथा आमदार डॉ. अनिल बोंडे यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात कृषी विकास परिषद 2017 च्या आयोजनाबाबत पूर्वतयारी आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत  होते. बैठकीला जिल्हाधिकारी अभिजित बांगर, निवासी उपजिल्हाधिकारी नितिन व्यवहारे, जिल्हा कृषी अधिक्षक श्री. खर्चान, उपविभागीय अधिकारी मनोहर कडू यांचेसह कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
आमदार श्री. बोंडे म्हणाले की, या परिषदेच्या उद्घाटनाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेसह अन्य गणमान्य मंत्री उपस्थित राहणार आहेत. कमी खर्चात जास्त शेती उत्पादन कसे घ्यावे, संत्रा उत्पादन क्षेत्रातील नवनवीन संशोधन, कापूस, सोयाबीन, कडधान्य या पीकांचे भरघोस उत्पादन घेण्यासाठी काय करावे, शेतीपुरक व्यवसाय व शेती साहित्य- उपकरणांचा उपयोग आदी विषयावर तज्ज्ञांचे मार्गदर्शन व प्रदर्शनीचे आयोजन करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी शासन राबवित असलेल्या विविध योजनांची माहिती देणारे स्टॉल्स लावण्यात येणार आहे. शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी, शेतीतील उत्पादन वाढविणे, शेतीपुरक व प्रक्रिया उद्योगाच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती साधणे हा या कृषी विकास परिषदेच्या आयोजनाचा मुख्य उद्देश आहे. कृषी विभागाने परिषदेच्या यशस्वी आयोजनासाठी आवश्यक निधीची तरतूद करावी. यासंबंधी प्रशासकीय मान्यतेसाठी तातडीने प्रस्ताव जिल्हा प्रशासनाला सादर करावेत. असे त्यांनी यावेळी सांगितले.
जिल्हाधिकारी श्री. बांगर म्हणाले की, जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कृषी क्षेत्रातील नवनवीन संशोधन व केंद्र शासन राबवित असलेल्या कृषी विकासाच्या योजना याविषयी माहिती होण्यासाठी परिषदेच्या आयोजनामागील उद्देश आहे. जिल्ह्यातील सर्व कृषी संलग्नीत शासकीय विभागांनी (सहकार, पदूम, केम, एमटीडीसी, खादी ग्रामोद्योग, जिल्हा उद्योग केंद्र) या परिषदेमध्ये सहभाग घ्यावा. कृषी विभागाने योग्य नियोजन करुन निधी मागणीसाठी तातडीने प्रस्ताव सादर करावा. कृषी क्षेत्रात उत्पादन वाढीसाठी उपयोगी ठरलेल्या मॉडेलचे स्टॉल्स , विविध कल्याणकारी योजना आदी संबंधी दर्शनी भागात स्टॉल्स्‍ उभारण्यात यावे. दिनांक 7 ते 10 डिसेंबर दरम्यान होणाऱ्या या परिषदेत व्याख्यान देण्यासाठी येणाऱ्या व्याख्यातांची राहण्याची व इतर व्यवस्था सुरळीत करावी, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.


******



सोमवार, ३० ऑक्टोबर, २०१७

शुभमंगल सामुहिक विवाह योजनेतून 
1583 जोडपे परिणयबध्द
1583 लाभार्थ्यांच्या बँक खात्यात 1 कोटी 71 लक्ष 96 हजार रुपये अनुदान जमा
अमरावती दि. 29 : मुलींच्या किंवा मुलांच्या विवाहावर फार मोठा खर्च होतो. सामान्य शेतकरी किंवा गरीब कुटुंबांना हा खर्च परवडण्यासारखा नसतो. विवाहावरचा खर्च भागविण्यासाठी शेतकरी वर्ग सावकाराकडून कर्ज घेऊन कर्जबाजारी होतो. शेतकरी आत्महत्या करण्यामागे हे सुध्दा प्रमुख कारण आढळून आले आहे. या प्रश्नावर मात करण्यासाठी तसेच शेतकरी, शेतमजूर यांचा विवाहवरचा खर्च वाचविण्यासाठी महिला व  बालवीकास विभागाद्वारे शुभमंगल सामुहिक विवाह योजना/नोंदणीकृत विवाह योजना राबविण्यात येते. शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी तसेच कर्जबाजारीपणा वाढू नये म्हणून ही योजना सन 2008 पासून राज्यात राबविण्यात येत आहे. या योजनेची व्याप्ती शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात आहे.
           या योजनेअंतर्गत सन 2016-17 मध्ये अमरावती विभागातील 1583 लाभार्थ्यांना सामुहिक विवाह योजनेतून 1 कोटी 76 लाख 96 हजार रुपये अनुदान महिला व बालविकास विभागाकडून लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले. अमरावती जिल्ह्यातील 241 लाभार्थ्यांना 28 लक्ष 92 हजार रुपये विवाह खर्च देण्यात आला. अकोला जिल्ह्यातील 108 लाभार्थ्यांना 10 लक्ष 80 हजार रुपयाचा निधी त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आला. यवतमाळ जिल्ह्यातील  167 लाभार्थ्यांना 20 लक्ष 4 हजार रुपये,  बुलडाणा जिल्ह्यातील 925 लाभार्थ्यांना 1 कोटी  11 लक्ष रुपये तर वाशिम जिल्ह्यातील 142 लाभार्थ्यांना 1 लक्ष 20 हजार रुपये विवाह खर्च अनुदान स्वरुपात त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले.
अशी आहे योजना :-
या योजने अंतर्गत सामुहिक विवाहात सहभागी होणाऱ्या शेतकरी/शेतमजूर यांच्या मुलीच्या विवाहासाठी आवश्यक असलेल्या मंगळसूत्र व इतर वस्तुंची खरेदी करण्यासाठी प्रती जोडपे 10 हजार रुपये एवढे अनुदान वधुच्यवडिलांच्या नावाने, वडिल हयात नसल्यास वधुच्या आईच्या नावाने व आई-वडिल दोन्हीही हयात नसल्यास वधुच्या नावाने धनादेश देण्यात येते. याशिवाय या योजनेंतर्गत जे जोडपे सामुहिक विवाह सोहळ्यात सहभागी न होता सरळ विवाह नोंदणी कार्यालयात जाऊन नोंदणीकृत विवाह करतात,  त्यांनाही 10 हजार रुपये अनुदान देण्यात येते. सामुहिक विवाह सोहळ्याच्या आयोजनाकरिता  संबंधित संस्थेस प्रति जोडपे दोन हजार एवढे प्रोत्साहनात्मक अनुदान (विवाह नोदंणी शुल्कासह) विवाह योजनेसाठी  देण्यात येते. या योजनेमुळे अनेक गोर-गरीब शेतकरी कुटुंबातील मुला-मुलींचे विवाह झाले असून शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी सुध्दा ही योजना प्रभावी ठरली आहे.
00000
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भिमटेकडी, बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याचे लोकार्पण
                                             -पालकमंत्री प्रविण पोटे-पाटील
* भिमटेकडी व शिवटेकडी सौंदर्यीकरणासाठी 2 कोटीचा निधी प्राप्त

अमरावती 27- भिमटेकडी व शिवटेकडींचे सौंदर्यीकरण पालकमंत्री प्रविण पोटे-पाटील यांच्या प्रयत्नाने मिळालेल्या 2 कोटींच्या निधीतून करण्यात येत आहे. काम पूर्ण झाल्यानंतर भिमटेकडी स्मारक व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयाचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हस्ते करण्यात येईल, अशी माहिती पालकमंत्री प्रविण पोटे-पाटील यांनी दिली.
शहरातील भिमटेकडी व शिवटेकडी या दोन्ही स्थळांची पाहणी पालकमंत्री महोदयांनी आज केली. यावेळी त्यांच्या समवेत मनपा आयुक्त हेमंत पवार, बौध्द धम्म प्रचार समितीचे पदाधिकारी श्री. आकोडे, तायडे, शहारे, पालकमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी अनिल भटकर, स्वीय सहायक राजेश बोबडे, नगरसेवक दिनेश बुब, आर्कीटेक्चर श्री. खंडारकर, कंत्राटदार श्री. अग्रवाल आदी उपस्थित होते.
            प्रारंभी पालकमंत्री महोदय व इतर मान्यवरांनी भिमटेकडीला भेट दिली. तेथील परिसराची, बांधकामाची पाहणी त्यांनी केली. सदर वास्तुचे सद्यस्थितीत 75 टक्के काम पूर्ण झाले असल्याची माहिती मनपा आयुक्त यांनी दिली. भिमटेकडीची उर्वरित स्थापत्य कामे तातडीने पूर्ण करण्यात यावी, असे आदेश त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिले. भिमटेकडी येथील वास्तू तयार झाल्यावर या पवित्र स्थळाची पवित्रता कायम राहील यासाठी संस्थेने व नागरिकांनी दक्षता घ्यावी. हा परिसर रमनिय व सुंदर होण्यासाठी मोठया प्रमाणात झाडे लावावीत. विद्यार्थ्यांना या स्मारकाच्या माध्यमातून प्रेरणा मिळण्यासाठी नवीन उपक्रम राबवावा, असेही त्यांनी यावेळी सांगितले
त्यानंतर पालकमंत्री महोदयांनी शिवटेकडीला भेट दिली. शिवटेकडीच्या परिसरातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची व परिसराची पाहणी त्यांनी केली. परिसरातील जलशुध्दीकरण पाण्याच्या टाकीचे काम तातडीने पूर्ण करावे, असे आदेश त्यांनी यावेळी दिले. भिमटेकडी आणि शिवटेकडीच्या सौंदर्यीकरणासाठी तसेच आवश्यक सोयी-सुविधांकरीता आराखडा तयार करण्यात यावा, अशा सूचनाही त्यांनी मनपा प्रशासनाला दिल्या. शहर सौंदर्यीकरणासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही, असेही त्यांनी यावेळी सांगितले
पालकमंत्री प्रविण पोटे-पाटील यांनी मागील वर्षी भिमटेकडीची पाहणी केली होती. त्यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे वेळोवेळी भिमटेकडी व शिवटेकडी सौंदर्यीकरणासाठी निधी मिळण्याबाबत पाठपुरावा केला होता. त्यांच्या या पाठपुराव्यामुळे राज्य शासनाकडून शहरातील भिमटेकडी व शिवटेकडी या दोन्ही पवित्र स्थळांच्या विकासाकरीता 2 कोटी 42 लाख रुपये निधी 11 ऑक्टोंबर रोजी मंजूर झाला आहे. सदर निधी महानगरपालिका प्रशासनाकडे वर्ग करण्यात आला असून प्राप्त निधीतून दोन्ही पर्यटन स्थळांचा विकास करण्यात येईल. या दोन्ही पर्यटन स्थळांच्या सौंदर्यीकरणासाठी शासनाकडून 4 कोटी 57 लाख रुपयाच्या प्रस्तावास मान्यता देण्यात आली होती. त्यापैकी टप्प्याने टप्प्याने हा निधी मनपा प्रशासनाला मिळाला आहे.
******


सहकारी संस्थांनी नाविन्यपूर्ण उपक्रमातून आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे
 -         सहकार मंत्री सुभाष देशमुख
  
 कृषी प्रक्रिया उद्योगासाठी व्याज अनुदान देणार


अमरावती, दि. 26 : राज्याच्या आर्थिक विकासात सहकार चळवळीचा मोठा वाटा आहे. यापुढेही सहकारी संस्थांची जोमदार वाटचाल व्हावी म्हणून बळकटीकरणासाठी संस्थांनी शासकीय अनुदानावर पूर्णपणे विसंबून राहू नये. तर, स्वत:च्या योगदानातून नाविण्यपूर्ण उपक्रम राबवून संस्थेचा विकास साधावा, असे प्रतिपादन सहकार, पणन व वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख यांनी आज केले.
महाराष्ट्र राज्य सहकारी संघाला शंभर वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त संघातर्फे विदर्भ को- ऑप मार्केटिंग फेडरेशनच्या सहकार्याने सहकारी संस्थांसाठी कार्यशाळेचे आयोजन अभियंताभवन येथे करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून श्री. देशमुख बोलत होते.  आमदार डॉ. अनिल बोंडे, आमदार यशोमती ठाकूर,  फेडरेशनचे अध्यक्ष राजेंद्र शिंगणे, संचालक एस. हरीबाबू, जिल्हा उपनिबंधक गौतम वालदे, भाजपा पदाधिकारी निवेदीता दिघळे तसेच अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते.
श्री. देशमुख म्हणाले की,  राज्य सहकारी संघाची निर्मिती राज्यघटनेनुसार झाली आहे. तेव्हापासून संघाद्वारे विविध सहकारी संस्थांच्या पदाधिकारी, कर्मचारी यांना संस्थांच्या बळकटीकरण आणि पारदर्शक व्यवहारासाठी प्रशिक्षण देण्यात येते.  संघाची शताब्दी साजरा होणे ही राज्यासाठी गौरवाची बाब आहे. राज्यात ज्या-ज्या ठिकाणी सहकाराचा विकास झाला आहे, त्या भागाचा सर्वांगीण विकास झाला आहे. सहकारी संस्थांच्या विकासासाठी सहकार विभागाकडून राज्यातील सर्व जिल्ह्यांना भेटी देऊन आढावा घेण्यात येत आहे, असेही त्यांनी सांगितले.
विदर्भातील पिकांच्या उत्पादनाविषयी आढावा घेऊन ते पुढे म्हणाले की, विदर्भात सोयाबीन, तूर, कापूस व कडधान्य पिकांची उत्पादन क्षमता चांगली आहे. या भागात दरवर्षी सोयाबीनचे उत्पादन चांगले होते. शेतकऱ्यांनी सोयाबीन प्रक्रिया उद्योग उभारण्यासाठी पुढाकार घ्यावा. सहकारी संस्थांनीसुध्दा या क्षेत्रात प्रक्रिया उद्योगासाठी पुढे येऊन कृती आराखडा तयार करुन शासनाकडे प्रस्ताव सादर करावा. यासाठी व्याज अनुदान देण्यात येईल, असे आश्वासन श्री. देशमुख यांनी दिले.
राज्यात बचत गटाची संख्या चार लाख आहे. या गटांना प्रक्रिया उद्योगासाठी प्रोत्साहित केले पाहिजे.  बचत गटांनी निर्माण केलेल्या मालास बाजारपेठ उपलब्ध करुन दिल्यास नक्कीच प्रगती होईल. फेडरेशनमध्ये आलेल्या मालाची खरेदी-विक्री प्रक्रियेमध्ये बोगसपणा रोखण्यासाठी ऑनलाईन प्रक्रिया लागू करण्यात आली आहे. तूर विक्रीसाठी सुध्दा ऑनलाईन पध्दती महत्वपूर्ण ठरली आहे,  असेही श्री. देशमुख यांनी सांगितले.
आमदार अनिल बोंडे यांनी अमरावती विभागातील सहकारी संस्थांच्या मागण्यांविषयी व प्रशिक्षणा संदर्भात मागणी मांडली.  डॉ. शिंगणे यांनीही मनोगत व्यक्त केले. श्री. इंदलकर यांनी आभार मानले.  


शुक्रवार, २७ ऑक्टोबर, २०१७

 मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भिमटेकडी, बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याचे लोकार्पण
                                             -पालकमंत्री प्रविण पोटे-पाटील
भिमटेकडी व शिवटेकडी सौंदर्यीकरणासाठी कोटीचा निधी प्राप्त

अमरावती 27- भिमटेकडी व शिवटेकडींचे सौंदर्यीकरण पालकमंत्री प्रविण पोटे-पाटील यांच्या प्रयत्नाने मिळालेल्या कोटींच्या निधीतून करण्यात येत आहेकाम पूर्ण झाल्यानंतर भिमटेकडी स्मारक व डॉबाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयाचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हस्ते करण्यात येईलअशी माहिती पालकमंत्री प्रविण पोटे-पाटील यांनी दिली.
शहरातील भिमटेकडी व शिवटेकडी या दोन्ही स्थळांची पाहणी पालकमंत्री महोदयांनी आज केलीयावेळी त्यांच्या समवेत मनपा आयुक्त हेमंत पवारबौध्द धम्म प्रचार समितीचे पदाधिकारी श्रीआकोडेतायडेशहारेपालकमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी अनिल भटकरनगरसेवक दिनेश बुबआर्कीटेक्चर श्रीखंडारकरकंत्राटदार श्रीअग्रवाल आदी उपस्थित होते.
            प्रारंभी पालकमंत्री महोदय व इतर मान्यवरांनी भिमटेकडीला भेट दिलीतेथील परिसराचीबांधकामाची पाहणी त्यांनी केलीसदर वास्तुचे सद्यस्थितीत 75 टक्के काम पूर्ण झाले असल्याची माहिती मनपा आयुक्त यांनी दिली. भिमटेकडीची उर्वरित स्थापत्य कामे तातडीने पूर्ण करण्यात यावीअसे आदेश त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिलेभिमटेकडी येथील वास्तू तयार झाल्यावर या पवित्र स्थळाची पवित्रता कायम राहील यासाठी संस्थेने व नागरिकांनी दक्षता घ्यावीहा परिसर रमनिय व सुंदर होण्यासाठी मोठया प्रमाणात झाडे लावावीतविद्यार्थ्यांना या स्मारकाच्या माध्यमातून प्रेरणा मिळण्यासाठी नवीन उपक्रम राबवावाअसेही त्यांनी यावेळी सांगितले
त्यानंतर पालकमंत्री महोदयांनी शिवटेकडीला भेट दिली. शिवटेकडीच्या परिसरातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची व परिसराची पाहणी त्यांनी केलीपरिसरातील जलशुध्दीकरण पाण्याच्या टाकीचे काम तातडीने पूर्ण करावेअसे आदेश त्यांनी यावेळी दिलेभिमटेकडी आणि शिवटेकडीच्या सौंदर्यीकरणासाठी तसेच आवश्यक सोयी-सुविधांकरीता आराखडा तयार करण्यात यावाअशा सूचनाही त्यांनी मनपा प्रशासनाला दिल्याशहर सौंदर्यीकरणासाठी निधीची कमतरता भासू देणार नाहीअसेही त्यांनी यावेळी सांगितले
पालकमंत्री प्रविण पोटे-पाटील यांनी मागील वर्षी भिमटेकडीची पाहणी केली होतीत्यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे वेळोवेळी भिमटेकडी व शिवटेकडी सौंदर्यीकरणासाठी निधी मिळण्याबाबत पाठपुरावा केला होतात्यांच्या या पाठपुराव्यामुळे राज्य शासनाकडून शहरातील भिमटेकडी व शिवटेकडी या दोन्ही पवित्र स्थळांच्या विकासाकरीता कोटी 42 लाख रुपये निधी 11 ऑक्टोंबर रोजी मंजूर झाला आहेसदर निधी महानगरपालिका प्रशासनाकडे वर्ग करण्यात आला असून प्राप्त निधीतून दोन्ही पर्यटन स्थळांचा विकास करण्यात येईलया दोन्ही पर्यटन स्थळांच्या सौंदर्यीकरणासाठी शासनाकडून कोटी 57 लाख रुपयाच्या प्रस्तावास मान्यता देण्यात आली होतीत्यापैकी टप्प्याने टप्प्याने हा निधी मनपा प्रशासनाला मिळाला आहे.

शनिवार, ७ ऑक्टोबर, २०१७

आय चिंतन संमेलनाच्या माध्यमातून
नवे शोध सामान्यांपर्यंत पोहोचवा
                                            -पालकमंत्री प्रविण पोटे-पाटील

विदर्भ ऑप्थॅलमिक सोसायटीच्या 42 व्या वार्षिक परिषदेचे
पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

अमरावती दि. 7 : नेत्र शस्त्रक्रीयेच्या क्षेत्रात घडून आलेले नवे बदल आणि नवनवीन संशोधन सर्वांपर्यंत पोहोचावेत या उदात्त हेतूने विदर्भ ऑप्थलमिक सोसायटीने केलेले परिषदेचे आयोजन स्तुत्य उपक्रम आहे. आय चिंतनाच्या या तीन दिवसीय संमेलनाच्या माध्यमातून नेत्र शस्त्रक्रीयेच्या क्षेत्रात झालेले नवे शोध व शस्त्रक्रीयेविषयी माहिती जनसामान्यापर्यंत पोहोचवावी, असे आवाहन पालकमंत्री प्रविण पोटे-पाटील यांनी केले.
हॉटेल ग्रॅन्ड महफील येथे आयोजित तीन दिवसीय विदर्भ ऑप्थॅलमिक सोसायटीच्या 42 व्या वार्षिक परिषदेचे उद्घाटन श्री. पोटे-पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर संघटनेचे अध्यक्ष डॉ. पी. टी. लहाने, डॉ. अनिल धामोरीकर, डॉ. ललीत वर्मा, डॉ. वरुन नायर, डॉ. प्रकाश मराठेडॉ. सेनीन अग्रवाल, डॉ. सेनील सगने, डॉ. अनिल हरवानी, डॉ. बिपीन सगने, डॉ. शैनक मोकादम, डॉ. राजेश जवादे, डॉ. प्रवीण व्यवहारे, डॉ. अतुल कढाणे, डॉ. प्रशांत बावनकुळे आदी उपस्थित होते.
यावेळी विदर्भ संघटनेच्या मोबाईल ॲपचा शुभारंभ पालकमंत्री प्रविण पोटे-पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. तीन दिवस (6, 7 8 ऑक्टोंबर) चालणाऱ्या या परिषदेमध्ये नेत्र शस्त्रक्रीया क्षेत्रात झालेले नवीन संशोधन या विषयावर तज्ञ व्यक्तींचे व्याख्यान व लाईव्ह शस्त्रक्रीयेसंबंधी माहिती देण्यात येणार आहे. यावेळी उपस्थित मान्यवरांनी कार्यक्रमाच्या आयोजनाची भूमिका आपल्या भाषणातून विषद केली. डॉ. नायर यांनी नेत्र चिकित्सेच्या क्षेत्रात घडून आलेल्या नवनवीन सर्जरीविषयी या संमलेनात माहिती मिळणार असल्याचे सांगितले. या परिषदेत देशातील 20 राष्ट्रीय आणि 72 लोकल पातळीवरील फॅकल्टीज नेत्र चिकीत्सेवर आपले संशोधन मांडणार असून संघटनेच्या सर्व सदस्यांसाठी मोठी उपलब्धी असणार आहे, असे डॉ. बावनकुळे यांनी सांगितले.
यावेळी कार्यक्रमाला उपस्थित डॉ. अनिल लद्दड, डॉ. बी. आर. देशमुख, डॉ. विरल शहा, डॉ. कौस्तुभ भट्टाचार्य, डॉ. मनिपाल जॉर्ज, डॉ. सुजाता गुहा, डॉ. सौरभ लुथरा, डॉ. संतोष अग्रवाल आदींचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्र संचालन डॉ. निता व्यवहारे व डॉ. अनुराधा तोटे यांनी तर डॉ. अतुल कढाने यांनी आभार मानले.

000000




शुक्रवार, २९ सप्टेंबर, २०१७

स्वच्छता ही सेवाकार्यक्रमात पाणीपुरवठा मंत्र्यांचे निर्देश

शासकीय अभिलेख तातडीने संगणकीकृत करा
                     - बबनराव लोणीकर
                                                                                               
अमरावती, दि. 29 : संपूर्ण देशभरात स्वच्छता अभियानाची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर शासकीय कार्यालयातही स्वच्छता असणे अपरिहार्य आहे. त्यामुळे मोठी जागा व्यापणारे शासकीय अभिलेख संगणकीकृत करावे व कार्यालयात सातत्यपूर्ण स्वच्छता निर्माण करावी, असे निर्देश पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी आज येथे दिले.
स्वच्छता ही सेवाया कार्यक्रमांतर्गत श्री. लोणीकर यांनी आज येथील जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, पोलीस आयुक्त कार्यालय व महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयात जाऊन तेथील रेकॉर्डरुमची व परिसराची पाहणी केली व अधिकारी- कर्मचा-यांशी संवाद साधला. पालकमंत्री प्रविण पोटे-पाटील, जिल्हापरिषदेचे अध्यक्ष नितीन गोंडाणे, उपाध्यक्ष दत्ता ढोमणे, जिल्हाधिकारी अभिजीत बांगर, पोलीस उपायुक्त चिन्मय पंडित व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
ते म्हणाले की, परिसरातील स्वच्छतेसोबतच कार्यालयात अनेक वर्षांपासून जतन केलेले अभिलेख व दस्तावेज मोठी जागा व्यापतात. त्यामुळे ते संगणकीकृत करुन कार्यालयांची स्वच्छता करावी.
 श्री. लोणीकर पुढे म्हणाले की, सर्व शासकीय कार्यालयांमध्ये जुने अभिलेख सुरक्षित ठेवणे आव्हानात्मक असते; पण तंत्रज्ञानाच्या साह्याने हे काम सुलभ झाले आहे. विशिष्ट आज्ञावलींच्या मदतीने सर्व अभिलेख व माहिती सुरक्षित ठेवता येते व त्यातून हवी ती माहिती तातडीने मिळणे शक्य होते. त्यामुळे या अभिलेखांचे संगणकीकरण लवकरात लवकर शासकीय कार्यालयांची स्वच्छ, सुसज्ज करावीत.  शासकीय कार्यालयांत जिल्ह्यातील नागरिकांची सतत वर्दळ असते. त्यामुळे स्वच्छता अभियानाचा प्रसार करताना आपले कार्यालयही स्वच्छ असावे, या जाणिवेतून सर्वांनी काम केले पाहिजे.
यावेळी विविध कार्यालयांचे अधिकारी -कर्मचारी उपस्थित होते.





00000

शुक्रवार, १५ सप्टेंबर, २०१७

शेती व शेतकऱ्यांच्या समस्या प्राथमिकतेने सोडविणे आवश्यक
-         पालकमंत्री प्रविण पोटे

·        शोभा फडणवीस लिखीत धांडोळा शेतीचा पुस्तकाचे
पालकमंत्र्यांच्या हस्ते विमोचन
अमरावती, दि. 15 : शेती आणि शेतकरी जगले तरच देश जगेल. सर्वांगीण विकास साधण्यासाठी प्रथम शेतीविषयक समस्या सोडविण्यास प्राधान्य द्यावे. वर्तमानातून भविष्यात पाहतांना शेती व शेतकऱ्यांच्या हिताकडे प्राथमिकतेने पाहणे गरजेचे आहे. धांडोळा शेतीचा या पुस्तकाच्या माध्यमातून श्रीमती शोभा फडणवीस यांनी शेतीच्या समस्यांवर प्रभावी उपाय सूचविले आहेत. हा प्रयत्न शेतकऱ्यांच्या जास्तीत जास्त समस्या सोडवण्यात यशस्वी होईल, असा विश्वास पालकमंत्री प्रविण पोटे यांनी व्यक्त केला. श्रीमती शोभा फडणवीस लिखीत धांडोळा शेतीचा या पुस्तकाच्या विमोचन सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. टाऊन हॉल येथे आयोजित कार्यक्रमात उपमहापौर संध्या टिकले, खासदार रामदास तडस, आमदार रमेश बुंदिले, ॲड. यशोमती ठाकूर, मनपा स्थायी समिती सभापती तुषार भारतीय, वनस्पतीशास्त्रज्ञ केशव ठाकरे, मनपाचे झोन सभापती लविना हर्षे व सुरेखा लुंगारे, शिक्षण सभापती चेतन गावंडे, उपसभापती पद्मजा कौंडण्य उपस्थित होते.
प्रविण पोटे म्हणाले, राज्यात शेती व शेतकऱ्यांच्या असंख्य समस्यांनी उग्र रुप धारण केले आहे. त्याचे परिणाम शेतकरी बांधवांसह समाजातील सर्व घटक भोगत आहे. या पुस्तकाच्या माध्यमातून भविष्यातील शेती नियोजन व परिवर्तनाच्या दिशेने सूचविलेल्या उपाययोजनांचा निश्चितच सकारात्मक परिणाम होईल. सिंचन, कर्ज, हमी भाव, खत विषयक समस्या यावरील उपायांच्या प्रभावी अंमलबजावणीने शेतकऱ्यांच्या प्रश्नांना न्याय देता येईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
श्रीमती शोभा फडणवीस यांनी धांडोळा शेतीचा या पुस्तकाच्या विषयाबाबत पार्श्वभूमी सांगितली. शेतकरी बांधवांच्या समस्या, त्यांचे उध्वस्त होणारे कुटुंब, आत्महत्या या सोबतच शेतकरी ह्या स्थितीपर्यंत का पोहोचला यावरही चिंतन व उपाय करणे गरजेचे आहे. पंचवार्षिक योजना, शाश्वत शेतीचा विकास, सेंद्रिय खत वापरण्याबाबत मार्गदर्शन या सर्व बाबींवर पुन्हा एकदा विचार करण्याची वेळ आली आहे. शासन, प्रशासन व समाजाने या क्षेत्रातील त्रृटी दूर करण्याला प्राथमिकता द्यावी, असे सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. दिनेश सुर्यवंशी यांनी केले. खासदार रामदास तडस व वनस्पतीशास्त्रज्ञ केशव ठाकरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन क्षिप्रा मानकर यांनी केले. कार्यक्रमाला महिला, युवक-युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते.         

00000

बुधवार, १३ सप्टेंबर, २०१७

पालकमंत्री प्रविण पोटे यांच्या हस्ते व्हीएमव्ही महाविद्यालयात
फिफा विश्वचषक स्पर्धेच्या रॅलीचे उद्घाटन

महाराष्ट्र मिशन वन मिलीयन
या फुटबॉलच्या अनोखा उपक्रमास अमरावतीत शुभारंभ

अवघा महाराष्ट्र फुटबॉलमय ! जयघोषने वातावरण क्रीडामय…

परिसरात जागोजागी फुटबॉल सेल्फी पॉईंट

अमरावती. दि. 12 : जागतिक फुटबॉल महासंघाची (फिफा ) 17 वर्षाखालील विश्वचषक स्पर्धा 6 ऑक्टोंबर ते 24 ऑक्टोंबर दरम्यान भारतात होत आहे. या ऐतिहासिक स्पर्धेच्या निमित्ताने देशभरात क्रीडा संस्कृती रुजविण्याचा ड्रीम प्रोजेक्ट पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी जाहीर केला आहे. त्या अनुषंगाने राज्यातील मुला-मुली मध्ये फुटबॉलची आवड निर्माण करण्यासाठी ‘ महाराष्ट्र मिशन वन मिलीयन ’ हा फुटबॉलचा अनोखा उपक्रम राज्य शासनाने हाती घेतला आहे. या मिशनचा शुभारंभ व्हीएमव्ही महाविद्यालयात आयोजित फिफा विश्वचषक स्पर्धेच्या रॅलीला पालकमंत्री प्रविण पोटे यांनी आज हिरवी झेंडी दाखवून केला.  
या मिशनसंदर्भात अधिक माहिती देतांना श्री. पोटे म्हणाले, राज्यातील मुला-मुली मध्ये फुटबॉल या खेळासंबंधी आवड निर्माण करण्यासाठी  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि क्रीडा व युवक कल्याण मंत्री विनोद तावडे यांनी  महाराष्ट्र फुटबॉल मिशन एक मिलीयन अंतर्गत राज्यातील शाळा व महाविद्यालय मध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्याचे आवाहन केले आहे.  फुटबॉल हा जगातील अतिशय लोकप्रिय खेळ आहे. एकाच दिवशी 10 लाख मुलांनी फुटबॉल खेळावा यासाठी 30 हजार शाळांमध्ये एक लाख फुटबॉलचे वितरण करण्यात येणार आहे. एक मिलीयन पेक्षा जास्त मुले फुटबॉल खेळतील असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या व्टिटरवरुन व्यक्त केला आहे, असेही पालकमंत्री महोदयांनी सांगितले.
या फुटबॉल रॅलीमध्ये शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञन संस्थेच्या संचालक डॉ. अर्चना नेरकर, प्राध्यापक , क्रीडा शिक्षक, एनसीसीचे प्रशिक्षक व विद्यार्थी तसेच मोठया संख्येने महाविद्यालयाचे विद्यार्थी-विद्यार्थींनी सहभागी झाले होते.

विद्यार्थ्यांमध्ये उत्साह संचारीत व्हावा व सर्व वातावरण क्रीडामय होण्यासाठी महाविद्यालयाव्दारे परिसरात विविध ठिकाणी सेल्फी पॉईंट सुरु करण्यात आली आहेत. यावेळी अवघा महाराष्ट्र फुटबॉलमय ! या जयघोषने वातावरण क्रीडामय झाले होते.

*******