बुधवार, २० मार्च, २०१९

जिल्‍ह्यात जमावबंदी आदेश लागू


जिल्‍ह्यात जमावबंदी आदेश लागू

अमरावती, दि. 20  : लोकसभा निवडणूक 2019 अनुषंगाने सर्वत्र आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. त्याअनुषंगाने राजकीय पक्षातर्फे प्रचाराकरिता सभा व स्थानिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. तसेच दि. 21 मार्च 2019 रोजी धुलीवंदन मोठ्या प्रमाणात सर्वत्र साजरा करण्यात येतो. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे.
यादरम्यान जिल्‍ह्यात शांतता व सुव्‍यवस्‍था अबाधित रहावी, यासाठी अपर जिल्‍हा दंडाधिकारी यांनी मुंबई पोलिस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) 3 लागू करण्यात आले आहे. या काळात जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी पोलिस आयुक्तालय परिक्षेत्र वगळून जिल्ह्यात दि. 16 ते 30 मार्च 2019 पर्यंत कलम 37 (1) व (3) लागू करण्यात येत आहे. या कलमाचा भंग करणाऱ्या व्यक्तिंविरुध्द कायदेशीर कारवाई करण्‍यात येईल, असे अपर  जिल्हा दंडाधिकारी यांनी कळविले आहे.
000000






  


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा