सोमवार, ८ जुलै, २०२४

महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळात इयत्ता पाचवी व आठवीच्या प्रवेशासाठी 15 जुलैपर्यंत मुदतवाढ

महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळात इयत्ता पाचवी व आठवीच्या प्रवेशासाठी 15 जुलैपर्यंत मुदतवाढ प्रवेश अर्ज भरण्यासाठी http://msbos.mh-ssc.ac.in संकेतस्थळ उपलब्ध अमरावती, दि. 5 : महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळामध्ये इयत्ता 5 वी व 8 वीसाठी नव्याने प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन पध्दतीने नाव नोंदणी प्रवेश अर्जासाठी 15 जुलै पर्यंत अंतिम मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांचे नाव नोंदणी प्रवेश अर्ज दि. 5 जुलै ते 15 जुलैपर्यंत ऑनलाईन पध्दतीने स्विकारण्यात येईल, अशी माहिती मंडळाचे प्र. सचिव शैलेंद्र पाटील यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे दिली आहे. तपशील पुढीलप्रमाणे - दि. 5 ते 15 जुलै पर्यंत विद्यार्थ्यांना ऑनलाईन नावनोंदणी अर्ज भरता येईल. दि. 6 ते 19 जुलै दरम्यान विद्यार्थ्यांनी मूळ अर्ज, विहित शुल्क व मूळ कागदपत्रे अर्जावर नमूद केलेल्या संपर्क केंद्र शाळेमध्ये जमा करणे अनिवार्य राहील. 24 जुलैला संपर्क केंद्र शाळांनी विद्यार्थ्यांचे अर्ज, विहित शुल्क, मुळ कागदपत्रे व यादी विभागीय मंडळात जमा करणे अनिवार्य राहील. विद्यार्थ्यांनी उपरोक्त नमूद कालावधीमध्ये मुक्त विद्यालय मंडळाच्या इयत्ता 5 वी व इयत्ता 8 वीमध्ये प्रवेश घेण्यासाठी http://msbos.mh-ssc.ac.in या संकेतस्थळाचा वापर करावा. अर्ज भरण्यासाठीच्या सूचना संकेतस्थळावर उपलब्ध असून त्या वाचून विद्यार्थ्यांनी अर्ज भरण्यास सुरुवात करावी, असे आवाहन मंडळाचे प्रभारी सचिव शैलेंद्र पाटी यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे. 00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा