पीक स्पर्धेत
सहभागी होण्याचे आवाहन
अमरावती दि. 28 : 1 जून ते दि. 28 ऑगस्ट या कालावधीचे
राज्याचे सरासरी पर्जन्यमान 796.8 मिमी असून या खरीप हंगामात दि.28 ऑगस्ट 2023 पर्यंत
प्रत्यक्षात 675.4 मिमी
(दि. 28 ऑगस्ट पर्यंतच्या सरासरीच्या 85%) एवढा पाऊस पडलेला आहे.
खरीप हंगामातील राज्याचे सरासरी
पेरणीचे क्षेत्र 142 लाख हेक्टर असून दि.28 ऑगस्ट 2023 अखेर प्रत्यक्षात 139.84 लाख
हेक्टर (98 टक्के) क्षेत्रावर पेरणी झालेली आहे. राज्यात पेरणीची कामे पुर्ण झालेली
आहेत. आज दि.28.08.2023 रोजीपर्यंत राज्यात सोयाबीन पिकाची 50.28 लाख हे. क्षेत्रावर,
कापूस पिकाची 42.08 लाख हे. क्षेत्रावर, तूर पिकाची 11.15 लाख हे. मका पिकाची 9.00
लाख हे. क्षेत्रावर पेरणी झाली आहे. तसेच भात पिकाची 14.96 लाख हे. क्षेत्रावर पुर्नलागवड
झाली आहे.
राज्यामध्ये दि.25 जुलै-2023
ते आज दि.28.08.2023 अखेर 484 महसूल मंडळामध्ये 15 ते 21 दिवसांचा तर 376 महसूल मंडळामध्ये
21 दिवसापेक्षा जास्त पावसाचा खंड पडलेला आहे.
खरीप हंगाम 2023 करीता
19.21 लाख क्विं.बियाणे गरजेच्या तुलनेत प्राथमिक अंदाजानुसार 21.78 लाख क्विं.बियाणे
उपलब्ध होते. त्यानुसार राज्यात 19,72,182 क्विंटल
(102%) बियाणे पुरवठा झालेला आहे.
खरीप हंगाम 2023 करिता
राज्यास 43.13 लाख मे. टन खतांच्या पुरवठ्याचे नियोजन मंजूर असून आतापर्यंत 57.57 लाख मे. टन खतांचा साठा उपलब्ध झाला आहे. त्यापैकी 36.48 लाख मे.टन खतांची विक्री झालेली असून सद्यस्थितीत
राज्यात 21.09 लाख मे. टन खतांचा साठा उपलब्ध आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आवश्यकतेनुसार
खतांची खरेदी करावी.
कृषी विभागामार्फत खरीप
हंगाम सन 2023 मध्ये सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी
(रागी), तूर, मूग, उडीद, सोयाबीन, भुईमुग, सुर्यफुल या 1१ पिकांसाठी पिकस्पर्धेचे आयोजन
करण्यात आले आहे. त्यापैकी भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी
(रागी), तूर, सोयाबीन, भुईमुग व सुर्यफुल या पिकांसाठी 31 ऑगस्ट 2023 हि पीकस्पर्धेसाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत आहे. अधिक माहितीसाठी आपल्या नजीकच्या कृषी विभागाच्या कार्यालयाशी
संपर्क साधून जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी पिकस्पर्धेमध्ये
सहभागी व्हावे, असे आवाहन कृषी आयुक्त श्रीसुनील चव्हाण यांनी राज्यातील
शेतकरी बांधवांना केले आहे.
०००००
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा