शुक्रवार, ३० जानेवारी, २०२६
राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठीच्या शिष्यवृत्ती योजना परीक्षेची अंतीम उत्तरसूची जाहिर
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विधान भवन येथे श्रध्दांजली
गुरुवार, २९ जानेवारी, २०२६
केंद्रप्रमुख पदासाठी विभागीय स्पर्धा परीक्षा ३ व ४ फेब्रुवारीला ऑनलाइन परीक्षा प्रवेशपत्र www.mscepune.in संकेतस्थळावर उपलब्ध
बुधवार, २८ जानेवारी, २०२६
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाच्या बातमीने मन सुन्न झाले -महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे
उत्तम प्रशासक व कणखर नेतृत्व हरपले - वन मंत्री गणेश नाईक
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे लोकभवन येथील राष्ट्रध्वज अर्ध्यावर
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने महाराष्ट्राची अपरिमित हानी राष्ट्रपती, प्रधानमंत्री आणि लोकसभेकडून भावपूर्ण श्रद्धांजली
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातात झालेल्या अकाली निधनामुळे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. दिवंगत अजित पवार यांच्या आत्म्यास ईश्वर सद्गती देवो व पवार यांच्या कुटुंबीयांना, सहकाऱ्यांना आणि असंख्य समर्थकांना हा दुखद प्रसंग सहन करण्याचे धैर्य प्रदान करो, ही प्रार्थना करतो, असे महाराष्ट्र व गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.
महाराष्ट्र के उपमुख्यमंत्री अजित पवार के निधन पर राज्यपाल की शोक संवेदना महाराष्ट्र एवं गुजरात के राज्यपाल आचार्य देवव्रत ने महाराष्ट्र के उपमुख्यमंत्री श्री अजित पवार के निधन पर गहरा शोक व्यक्त किया है। “महाराष्ट्र के उपमुख्यमंत्री श्री अजित पवार जी के असमायिक निधन से गहरा दुख हुआ । दिवंगत श्री अजित पवार जी के आत्मा को ईश्वर सद्गति प्रदान करें और परिजनों व समर्थकों को इस अपूरणीय क्षति को सहन करने की शक्ति दें।
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादांच्या अपघाती निधनाची बातमी अविश्वसनीय आणि धक्कादायक आहे. ते माझ्यापेक्षा अनुभवाने आणि वयानेही मोठे होते. त्यांच्या निधनाने माझा मोठा भाऊ गेल्याची भावना माझ्या मनात आहे. महाराष्ट्रासाठी आजचा काळा दिवस असून एक दूरदर्शी, स्पष्टवक्ता आणि अतिशय अभ्यासू नेता आपण गमावला आहे. महायुती सरकारमधले ते केवळ माझे सहकारी नव्हते तर माझे चांगले मित्रही होते. त्यांचं अकाली जाणं जीवाला चटका लावणारं आहे, अशा भावपूर्ण शब्दात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. उपमुख्यमंत्री श्री. शिंदे आपल्या शोकसंदेशात म्हणतात की, महाराष्ट्र त्यांना ‘दादा’ म्हणून ओळखायचा आणि ते तसे होते. त्यांच्याकडे ‘वेळ’ साधण्याचा अप्रतिम गुण होता. त्यांच्या कामाचा झपाटा आणि निर्णयक्षमता आम्ही सगळ्यांनी अनुभवली आहे. मी केवळ सहकारी म्हणूनच नाही तरी मित्र म्हणून सुद्धा त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या पैलुंना जवळून पाहिलं आहे. आज दादा आपल्यात नाहीत ही कल्पना सुद्धा मनाला पटत नाही. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.
दादा गेले! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली जमिनीशी घट्ट नाळ असलेले जननेते, माझे मित्र आणि सहकारी, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाल्याची घटना मनाला अत्यंत व्यथित करणारी, मनाला चटका लावणारी आहे. या दुर्घटनेमुळे मन सुन्न झाले आहे, अशा शोकभावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केल्या आहेत. दमदार आणि दिलदार मित्र मी गमावला आहे. माझ्यासाठी ही वैयक्तिक हानी आहे. हे कधीही भरून न येणारे नुकसान आहे. आजचा दिवस महाराष्ट्रासाठी अतिशय कठीण आहे. मी दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या संपूर्ण कुटुंबियांच्या आणि राष्ट्रवादी काँग्रेस परिवाराच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. या अपघातात मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. माझे सर्व कार्यक्रम मी रद्द केले आहेत. थोड्याच वेळात बारामतीसाठी निघतो आहे, असेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले.
मंगळवार, २७ जानेवारी, २०२६
देशातील पहिले ‘मेनोपॉज क्लिनिक’ राज्यात सुरू -आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर · महिलांच्या आरोग्यासाठी ऐतिहासिक पाऊल
ग्रंथ हे मनुष्याचे सच्चे मित्र - राज्यपाल आचार्य देवव्रत ''घोस्ट्स, हॉरर अँड हिल्स' कथासंग्रहाचे प्रकाशन
मुख्यमंत्री सचिवालय (जनसंपर्क कक्ष) मंगळवार, दि. २७ जानेवारी, २०२६. मंत्रिमंडळ निर्णय (एकूण - ५)
जिल्हाधिकारी अमोल येडगे यांची 'दिलखुलास' कार्यक्रमात विशेष मुलाखत
छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ मेट्रो जोडणीस मान्यता · भूसंपादनासह सर्व परवानग्यांची कार्यवाही प्रकल्प सुरू होण्यापूर्वी पूर्ण करावी -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस · गडचिरोली जिल्ह्यात खनिज वाहतुकीसाठी नवेगाव मोर ते सुरजागड या चार पदरी सिमेंट काँक्रिट महामार्गाच्या सुधारित आखणीस मान्यता
शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांची शासकीय विद्यानिकेतनला, सदिच्छा भेट • विद्यानिकेतनचा कायापालट सहा महिन्यांत करणार –शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे
सोमवार, २६ जानेवारी, २०२६
प्रजासत्ताक दिनानिमित्त राज्य माहिती आयोगात ध्वजारोहण
भारतीय प्रजासत्ताकाचा 76 वा वर्धापन दिनोत्सव विभागीय आयुक्तालयात ध्वजारोहण व तिरंग्यास मानवंदना
रविवार, २५ जानेवारी, २०२६
‘हिंद-दी-चादर’ गुरू तेग बहादुर साहिब जी यांच्या बलिदानातून मानवी मूल्यांच्या रक्षणाची प्रेरणा - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस - नांदेड येथे 'हिंद-दी-चादर' श्री गुरु तेग बहादुर साहिब जी यांच्या 350 व्या शहीदी समागमनिमित्त कार्यक्रमाला लाखो भाविकांची उपस्थिती - श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या बलिदानाचा इतिहास घराघरात पोहचवण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न - श्री गुरु नानक देवजी यांच्या विचारांवर श्रद्धा ठेवणारे नऊ समाज प्रथमच लाखोंच्या संख्येने एकत्र
शुक्रवार, २३ जानेवारी, २०२६
नेताजी सुभाषचंद्र बोस आणि बाळासाहेब ठाकरे यांना विभागीय आयुक्तालयात अभिवादन
लेख : श्री गुरु तेग बहादुर साहिबजी अर्थात हिंद दी चादर !
धर्म व मानवतेच्या रक्षणासाठी बलिदान देणाऱ्या महापुरुषांचे नाव इतिहासात अजरामर होत असते. शीख गुरु परंपरेतील नववे गुरु श्री गुरु तेग बहादुर साहिब यांनी धर्म रक्षणासाठी आपले संपूर्ण आयुष्य वेचले. ज्यांची ‘हिंद दी चादर’ म्हणजेच 'भारतभूमीचे कवच' अशी अभिमानास्पद ओळख आहे. त्यांनी धर्म स्वातंत्र्य, न्याय आणि सहिष्णुतेच्या रक्षणासाठी दिलेले बलिदान म्हणजे भारतीय संस्कृतीतील एक गौरवास्पद अध्याय आहे. श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांचा आदर्श बाळगणे हीच त्यांना खरी आदरांजली आहे. श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या बलिदानामुळे धर्म अबाधित राहिला. त्यांच्या या महान बलिदानास ३५० वर्षे पूर्ण होत आहेत. त्यांच्या या बलिदान दिनानिमित्त नांदेड येथे विशेष सोहळयाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्त त्यांच्या कार्याचा आढावा घेणारा लेख.
अमृतसरमध्ये एप्रिल १६२१ मध्ये शिखांचे सहावे गुरू हरगोबिंद आणि माता नानकी यांच्या कुटुंबात श्री गुरू तेग बहादूर यांचा जन्म झाला. १६६४ मध्ये त्यांना गुरू ही पदवी प्राप्त झाली. गुरू तेग बहादूर यांचे मूळ नाव त्यागमल होते. लहान वयातच एका घनघोर युद्धात अतुलनीय शौर्य दाखवल्याबद्दल त्यांना 'तेग बहादूर' असे गौरवाने संबोधले जाऊ लागले. 'तेग बहादूर' म्हणजे 'शूर, तळपती तलवार' होय ! श्री गुरु तेग बहादूर यांनी त्यांच्या नावाप्रमाणेच तळपत्या तलवारीसारखे शौर्य दाखवत धर्म रक्षणाचे पवित्र कार्य केले.
तो काळ क्रूर शासकांच्या राजवटींमुळे धार्मिक-राजकीय संघर्षाचा होता. समाजातील मोठा वर्ग विविध अत्याचारांना बळी पडत होता. धर्म, संस्कृती, श्रद्धा समूळ नष्ट करण्यासाठी अत्यंत वाईट मार्गांचा अवलंब करण्यात येत होता. लोकांचा केवळ छळच नव्हे तर त्यांचे आयुष्य उध्वस्त करण्यात येत होते. बळजबरी करून लोकांचे धर्मांतर करण्याचा मार्ग या क्रूर शासकांनी अवलंबिला होता. यामुळे सर्वत्र हाहा:कार माजला होता, या साऱ्यांची इतिहासात नोंद आहे.
अशा आव्हानात्मक परिस्थितीत श्री गुरु तेग बहादुर शौर्याने अखेरपर्यंत लढले. समाजाची चेतना व संकल्पशक्ती जागवण्यासाठी प्रसंगी बलिदान दिले. औरंगजेबाच्या क्रूर राजवटीला त्यांनी आव्हान दिले. श्री गुरु तेग बहादुर जुलमी राजवटीसमोर झुकले नाहीत. त्यांचा तेजस्वी निश्चय मोडून काढण्यासाठी मुघल राज्यकर्त्यांनी त्यांच्या परिवारासही संपवले व क्रूरतेचा कळस गाठला. तरीही श्री गुरु तेग बहादुर यांचा संकल्प ढळला नाही. अखेरच्या श्वासापर्यंत ते धर्म व मानवतेच्या रक्षणासाठी लढत होते. अखिल मानवजातीला चारित्र्य, सत्य, संयम, करुणेचा संदेश देत ते दिव्य ज्योतीत विलीन झाले. त्यांच्या आदर्शांचे स्मरण करीत आपण आपले आयुष्य घडवावे हाच आपला निर्धार असावा. भारतीय परंपरेतील अशा महान तेजस्वी ताऱ्याची शिकवण आणि बलिदानाचे महत्त्व बालक, तरुण व प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचवणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.
श्री गुरु तेग बहादुर हे जगभर प्रभाव टाकणारे महान गुरु मानले जातात. यानिमित्ताने त्यांच्या शहिदी समागमाचा इतिहास सर्वदूर पोहोचावा यासाठी महाराष्ट्र शासनाचा अल्पसंख्यांक विभाग व श्री गुरू तेग बहादुर साहिबजी ३५० शहीदी समागम राज्यस्तरीय समितीतर्फे राज्यभर विविध प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
हा शहीदी समागमाचा उपक्रम केवळ श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांना श्रद्धांजली नसून गुरु साहिबांची शिकवण, आदर्श आणि त्यांच्या बलिदानाच्या तेजस्वी परंपरेची ज्योत भावी पिढ्यांपर्यंत पोहोचवण्याचा एक सामूहिक प्रयत्न आहे.
श्री गुरु तेग बहादुर साहिब यांचे जीवन निर्भयता, धार्मिक स्वातंत्र्य आणि मानवतेसाठी केलेल्या त्यागाचे प्रतीक असून त्यांच्या बलिदानाचे स्मरण करणे आपले कर्तव्य आहे. श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहिदी समागमानिमित्त नागपूर येथे ७ डिसेंबर २०२५ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मानवता, सत्य आणि धर्म रक्षणाचा मार्ग दाखवणारे श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांचा गौरवशाली इतिहास समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचावा यासाठी जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. नागरिकांनीही या सर्व कार्यक्रमांना अभूतपूर्व प्रतिसाद दिला. येत्या २४ व २५ जानेवारी २०२६ रोजी नांदेड येथे विशेष सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात श्री गुरु तेग बहादूर साहेबजींच्या शौर्यावर आधारित गीतांचे गायन, अखंड जप तसेच इतर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
श्री गुरु तेग बहादूर यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी विविध धार्मिक व सामाजिक संघटनांसह सर्वजण अनेक सामाजिक, प्रबोधनात्मक व जागृतीपर कार्यक्रम आयोजित करत आहेत. यात मॅरेथॉन, रॅली, भक्तीगीत, स्मरणिका प्रकाशन आदी कार्यक्रमांचा समावेश आहे.
धर्माचे संरक्षक निर्माण करणे हा श्री गुरु तेग बहादूर यांच्या जीवनकार्याचा उद्देश होता. ग्रंथाला गुरु मानावे ही त्यांची शिकवण ! येणाऱ्या पिढ्यांनी त्यांच्या शौर्य व बलिदानाचे स्मरण करून आयुष्य समृद्ध करावे, असे जणू इतिहास आपणा सर्वांना सांगत आहे. त्यांचे तत्त्वज्ञान व त्यांच्या शिकवणीचे पालन करणे हेच खरे धर्म कर्तव्य होय.
श्रीमती पल्लवी अ. धारव सहायक संचालक माहिती व जनसंपर्क नागपूर
00000














































