बुधवार, २८ जानेवारी, २०२६

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे लोकभवन येथील राष्ट्रध्वज अर्ध्यावर

मुंबई, दि.२८ : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे राज्य शासनाने तीन दिवसांचा दुखवटा जाहीर केला आहे. महाराष्ट्र लोकभवन येथे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी अजित पवार यांना श्रद्धांजली वाहिल्यानंतर मुंबई येथील लोकभवनातील राष्ट्रध्वज अर्ध्यावर आणण्यात आला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा