महाराष्ट्र
राज्य मार्ग परिवहन महामंडळ विभाग, अमरावती
अमरावती
जिल्हा महामंडळ एक दृष्टीक्षेप
अमरावती
विभागाची माहे डिसेबेंर -220- पर्यतची वाहतुक फलनिष्पती माहिती खालीलप्रमाणे
अमरावती,
दि. 11 : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने प्रवासी वाहतूकीसोबतच, महामंडळाच्या
प्रवासी वाहनांमधून प्रवासी वाहनांमधून आवश्यक व इतर वस्तु नेण्यास महाराष्ट्र
शासनाने मुजूरी दिली आहे. सदर अनुषंगाने तसेच महामंडळाच्या ठरावानुसार महामंडळाने
दिनांक 21 मे, 2020 पासून मालवाहतूकीच्या व्यवसाय सुरूवात केलेली आहे. मालवाहतूक
ही पुर्णत: सुरक्षितपणे करुन त्याचे वेळेवर वितरण केल्या जात आहे. सदरची सेवा ही
24 तास सुरू आहे.सदरील माल वाहतुकीचे दर अत्यंत माफक प्रमाणात असून मालवाहतूकीच्या
सेवंचा लाभ शेतकरी, व्यापक ,लघु व मोठे कारखानदार तसेच शासकीय, निमशासकीय खात्यास
देण्यात येत आहे.
दि. 21 मे, 2020 पासून ते डिसेंबर 2020 पर्यत
मालवाहतूक ट्रकव्दारे एकूण 1276 फेऱ्या चालविण्यात आल्या असून एकूण 193251 सार्थ
कि.मी. झालेले आहे.
प्रवासी वाहतूकीबाबत – कोविड-19 विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता शासनाने
दि.32/03/2020 पासून देशभरात लॉकडॉऊन जाहीर केल्यामुळे सामान्य प्रवाशांकरिता
रा.प. वाहतुक काही अपवाद वगळता स्थगित करण्यात आली. त्यावेळेला विभागास उत्पन्न
2ते 3लाख मिळत होते.
त्यानंतर 21 ऑगस्ट 2020 पासून 50 टक्के प्रवासी पुर्ण
क्षमजेने आंतरजिल्हा रा.प. वाहतुक चालविण्यास शासनाने परवानगी दिली होती.
त्यानुसार अमरावती विभागातील सर्व आगाराची
जिल्हा वाहतुक सरू करण्यात आली. परंतु प्रवासी प्रतिसाद हा अत्यल्प
असल्यामुळे कोविड -19 विषाणूचा प्रादुर्भावामुळे रा.प. महामंडळास फार कमी उपन्न 10
ते 12लाख मिळत होते.
माहे नाव्हेंबर 2020 या महिन्यात दिवाळी सण असल्याने
प्रवासी वाहतुकीस बराचसा प्रतिसाद मिळत असल्याने महामंडळाच्या उपन्नात थोडया
प्रमाणात वाढ होण्यास सुरूवात झाली. त्यानुसार दररोज दिवाळीनंतर जवळपास 33 ते 34
लाख उपन्न आलेले आहे.
आंतरराज्य वाहतुकीमध्ये हैद्राबाद, खडवा, भेापाळ,
बऱ्हाणपूर, छिंदवाडा बैतुल, मुलताई,पाढुर्णा अशा
बसेस सुरू करण्यात आलेल्या आहेत. तसेच आंतरजिल्हा
वाहतुकीमध्ये नागपूर, पुणे , औरंगाबाद, नांदेड, परभणी, आंबेजोगाई, माहूर, मांडवी,
लातुर, बीड, बुलढाण, चद्रपूर, नाशिक, जळगांव अशा इतरही फऱ्या सुरू करण्यात आलेल्या
आहेत. परंतु प्रतिसाद मिळत नसल्यामुळे पूर्विप्रमाणे वाहतुक पूर्ववत सुरू करणे
शक्य झालेले नाही . तसेच शाळा सुध्दा बंद आहे, फक्त इतर सोयी – सवलीतीचे उपन्न
सुरू आहेत. त्यामुळे रा.प. च्या उपन्नमध्ये सध्या तरी नियमितता आलेली नाही.
अमरावती विभागामध्ये सद्यस्थितीमध्ये दैनंदिन सरासरी
1076 फेऱ्या चालविल्या जात आहेत.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा