सोमवार, २९ डिसेंबर, २०२५
वीर बाल दिवसाच्या निमित्त सायन येथील गुरूद्वारा गुरू तेग बहादूर दरबार येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले
होते. यावेळी
मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी वीर शहीद साहिबजादे यांना विनम्र अभिवादन करून
त्यांच्या अद्वितीय शौर्याचे स्मरण केले. #शीख पंथीयांचे दहावे गुरू श्री गुरु
गोविंद सिंगजी यांचे सुपुत्र साहिबजादे बाबा जोरावर सिंग (वय ९ वर्षे) आणि
साहिबजादे बाबा फतेह सिंग (वय ७ वर्षे) यांच्या अद्वितीय शौर्य व बलिदानाच्या
स्मरणार्थ २६ डिसेंबर हा दिवस ‘वीर बाल दिवस’ म्हणून पाळला जातो. वीर बाल दिवसाच्या
निमित्ताने गुरूंनी दाखविलेल्या मानवतेच्या मार्गावर चालण्यासाठी आणि त्यांच्या
विचारांना आपल्या जीवनात अंगीकारण्यासाठी आपण स्वतःला कृतीतून संकल्पित केले
पाहिजे. साहिबजाद्यांच्या धैर्याने आणि बलिदानाने भारतीय इतिहासाला नवी दिशा दिली
असून, त्यांचे शौर्य सदैव पिढ्यान्पिढ्यांना प्रेरणा देत राहील, असे मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले. यावेळी गुरूद्वारा समितीच्या सदस्यांनी
किर्तन, कविता वाचन केले तसेच वीर शहीद साहिबजादे यांना आदरांजली अर्पण केली.
यावेळी आमदार प्रसाद लाड, आमदार तमिल सेल्वन, श्री गुरु तेग बहादूर यांच्या ३५०
व्या शहीदी समागम समितीचे राज्यस्तरीय समन्वयक रामेश्वर नाईक, पंजाबी साहित्य
अकादमीचे कार्याध्यक्ष बल मलकित सिंह, गुरुद्वारा समितीचे सदस्य दलजीत सिंग,
गुरुदेव सिंग, जसपाल सिंग सिद्धू, हॅपी सिंग, डॉ. अजयसिग राठोड यांच्यासह नागरिक
मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा