मंगळवार, ३० एप्रिल, २०१९

दिव्यांग विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी अर्ज सादर करावे


दिव्यांग विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी अर्ज सादर करावे

अमरावती, दि. 30 :  सन 2019- 20 या शैक्षणिक वर्षाकरिता शासकीय बहुउदेशिय समिश्र अपंग केंद्र वाशिम येथे अंध, मुकबधिर व अस्थीवंग या प्रवर्गातील 6 ते 16 वर्ष या वयोगटातील अपंग लाभार्थ्याना प्रवेश देणे सुरु आहे.
प्रवेशा साठी अर्ज वाटप सुरु झाले असून प्रवेश अर्जासोबत दिव्यांग बालकाचे तीन पासपोर्ट साईस फोटो, अपंगत्वाचा दाखला, जन्मतारखेचा दाखला अथवा शाळा सोडल्याच्या दाखल्याची झेरॉक्स प्रत, पालकाच्या मागील वर्षाचे उत्पन्नाचा दाखला आणि रहिवासी प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
संस्थेत भोजन, निवास, शैक्षणिक साहित्य, शालेय गणवेश, वैद्यकीय उपचार इत्यादी मोफत पुरविल्या जातील तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वागीण  विकासाकरीता येथे तज्ञ शिक्षकवृंद असतील. प्रवेशाकरीता शासकीय बहुउदेशिय संमिश्र अपंग केंद्र जुनी जिल्हा परिषद इमारत अकोला नाका, वाशिम येथे 899062957 या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा असे शासकीय बहुउदेशिय संमिश्र अपंग केंद्र वाशिम यांनी कळविले आहे.
****

शनिवार, १३ एप्रिल, २०१९

विभागीय आयुक्त कार्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन




विभागीय आयुक्त कार्यालयात
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन
                          
          अमरावती दि.14-  भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 128 व्या जयंतीनिमित्त विभागीय आयुक्त कार्यालयात विभागीय आयुक्त पियूष सिंह यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
              याप्रसंगी महसूल उपायुक्त गजेंद्र बावणे, पुनर्वसन उपायुक्त प्रमोद देशमुख, तहसीलदार वैशाली पाथरे यांचेसह अधिकारी-कर्मचारी आदी उपस्थित होते. उपस्थितांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.

विभागीय माहिती कार्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन





विभागीय माहिती कार्यालयात
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन
                          
          अमरावती दि.14-  भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 128 व्या जयंतीनिमित्त विभागीय माहिती कार्यालयात उपसंचालक (माहिती) राधाकृष्ण मुळी यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
              याप्रसंगी  कार्यालयातील कर्मचारी श्री. विजय राऊत, श्रीमती पल्लवी धारव, मनीष झिमटे, विश्वनाथ धुमाळ, रुपेश सवाई, कोमल भगत, विजय आठवले यांचेसह सर्व कर्मचारीवृंद आदी उपस्थित होते. उपस्थितांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.
00000000000


सोमवार, ८ एप्रिल, २०१९

मतदानाचा हक्क बजावण्यासाठी कामगारांना सुटी


वृत्त क्र.82                                                                                                         दिनांक : 8  एप्रिल 2019


मतदानाचा हक्क बजावण्यासाठी कामगारांना सुटी

अमरावती, दि. 8 :  अमरावती  लोकसभा मतदार संघात 18 एप्रिल रोजी मतदान होत असून या दिवशी खाजगी आस्थापनांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना सुटी द्यावी असे सहाय्यक कामगार आयुक्तांनी कळवले आहे.
या बाबत प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात त्यांनी म्हटले आहे की अमरावती लोकसभा क्षेत्रातील दुकाने व आस्थापना , निवासी हॉटेल, खाद्यगृहे, अन्नगृहे, नाट्यगृहे, व्यापार, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना तसेच माहिती तंत्रज्ञान कंपन्या, शॉपींग सेंन्टर, मॉल्स, रिटेलर्स इत्यादी आस्थापना मध्ये कार्यरत मतदारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी (अत्यावश्यक सेवा देणाऱ्या दुकाने व आस्थापना वगळून) सर्व आस्थापना सकाळी 7.00 ते संध्याकाळी 6.00 या वेळेत बंद ठेवण्यात येतील, तसेच त्यादिवशी बंद राहिलेल्या दुकाने, आस्थापनेमधील कर्मचाऱ्यांच्या वेतनातून कोणत्याही प्रकारे कपात करण्यात येणार नाही.
अपवादात्मक परिस्थितीत पूर्ण दिवस सुटी देणे शक्य नसेल तर, कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुटी ऐवजी केवळ 2 ते 3 तासाची सवलत देता येईल. असे सहाय्यक कामगार आयुक्त, अमरावती यांनी कळविले आहे.
****

शुक्रवार, ५ एप्रिल, २०१९

एप्रिल आणि मे महिन्यात विभागीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येणार नाही


सुधारीत


वृत्त क्र.81                                                                                                         दिनांक : 5  एप्रिल 2019


एप्रिल आणि मे महिन्यात विभागीय लोकशाही दिनाचे
आयोजन करण्यात येणार नाही

अमरावती, दि. 5  :  सार्वत्रिक लोकसभा निवडणूक 2019 साठी आदर्श आचारसंहिता लागू झाल्यामुळे एप्रिल व मे महिन्यात विभागीय लोकशाही दिनाचे आयोजन होणार नसून जुन- 2019 मध्येच विभागीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येणार आहे. असे उपआयुक्त (सा.प्र) अमरावती विभाग, अमरावती यांनी कळविले आहे.
****

आचारसंहितेच्या कालावधीमध्ये विभागीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येणार नाही


वृत्त क्र.81                                                                                                         दिनांक : 5  एप्रिल 2019


आचारसंहितेच्या कालावधीमध्ये विभागीय लोकशाही दिनाचे
आयोजन करण्यात येणार नाही

अमरावती, दि. 5  :  सार्वत्रिक लोकसभा निवडणूक -2019 साठी आदर्श आचार संहिता लागू करण्यात आलेली असून निवडणूकीच्या कार्यक्रम घोषीत करण्यात आलेला आहे. ज्या ज्या क्षेत्रामध्ये निवडणूकीकरीता आचारसंहिता लागू करण्यात आलेली आहे. अशा ठिकाणी त्या स्तरावरील लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येवू नये. असे निर्देश निवडणूक आयोगाने दिले आहेत.
सार्वत्रिक लोकसभा निवडणूक 2019 साठी आदर्श आचारसंहिता लागू झाल्यामुळे एप्रिल - 2019 व मे- 2019 चे होणारे विभागीय लोकशाही दिनाचे आयोजन होणार नसून जुन- 2019 मध्येच विभागीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येणार आहे. असे उपआयुक्त (सा.प्र) अमरावती विभाग, अमरावती यांनी कळविले आहे.
****

अनुसूचति जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रमाणपत्र पडताळणी विशेष मोहिम व तपासणी




वृत्त क्र.80                                                                                                         दिनांक : 5  एप्रिल 2019



अनुसूचति जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रमाणपत्र
पडताळणी विशेष मोहिम व तपासणी

अमरावती, दि. 5  :  सन 2019-20 या शैक्षणिक वर्षामध्ये अनुसूचित जमातीच्या राखीव जागेवर व्यवसायिक अभ्यासक्रमासाठी वैद्यकीय, अभियांत्रिकी, पशुवैद्यकीय, कृषी,डी.टी.एड, बी.एड,व अन्य व्यावसायिक अभ्यासक्रम जेथे आयुक्त, समावेश सामाईक प्रवेश परीक्षा मुंबई (CET) यांचेद्वारे प्रवेश पात्रता ठरविण्यात येत असलेल्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विशेष मेहिम राबवून तपासणी करण्यात येत आहे.
सन 2019-20 शैक्षणिक वर्षांमध्ये अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना इ.10 वी 12 वी नंतर वैद्यकीय अभियांत्रिकी, पशुवैद्यकीय, कृषी, डी.टी.एड, बी.एड, अन्य व्यावसायिक पदविका /पदवी अभ्यासक्रमाकरिता तसेच इतर अभ्यासक्रमाकरीता प्रवेश घेतांना अनुसूचित जमाती वैद्यता प्रमाणपत्राची आवश्यकता असते. वैधता प्रमाणपत्राच्या आधारावर अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना सवलती मिळू शकतात. राज्यात नुकत्याच झालेल्या इ. 10 वी व 12 वी परीक्षेचा निकाल यथाशिघ्र लागणार आहे. निकाल लागल्यानंतर अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांची विविध अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी धावपळ सुरु होईल. परिणामी आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या अंतर्गत अनुसूचित जमाती प्रमाणपत्र पडताळणी समित्यांकडे ( पूणे, नाशिक, नागपूर, ठाणे, औरंगाबाद, अमरावती, नंदूरबार व गडचिरोली) मोठ्या प्रमाणात  शैक्षणिक  प्रयोजनासाठी अर्ज  प्राप्त  होत  आहेत.
या मोहिमेंतर्गत अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना e-tribe पोर्टलवर https:www.etribevalidity. mahaonline.gov.in ऑनलाईन  अर्ज केल्यानंतर  प्राधान्याने  गुणवत्तेच्या  आधारे वैधता  प्रमाणपत्र  देण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आलेली  आहे. या  संदर्भात  अमरावती समितीच्या  पोलीस दक्षता पथकाला देखील गृह व  शालेय चौकशीची कागदपत्रांची पडताळणी करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. सहआयुक्त तथा उपाध्यक्ष, अनुसूचित  जमाती  प्रमाणपत्र  तपासणी  समिती,  अमरावती  येथे Helpline No. 0721-2550991  सुरु करण्यात आलेली असून सकाळी 10.00 ते सांय 7.00 या कालावधीत अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना दूरध्वनीवरुन वैधता प्रमाणपत्राबाबत मार्गदर्शन करण्यात येईल. समितीमार्फत अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी विशेष कक्षामार्फत आवश्यक ती माहिती पुरविण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
अनुसूचित जमाती प्रमाणपत्र पडताळणी समितीचे ठिकाण अमरावती असून  पत्ता शासकीय विश्रामगृहाजवळ, राज्य माहिती आयुक्त यांचे कार्यालयासमोर, सना बिल्डींग, जूना बायपास रोड चपराशीपुरा, अमरावती -444602,असून दुरध्वनी क्रमांक 0721-2550991 व ई मेल आयडी tcscamr.mah@ nic.in  आहे त्याच प्रमाणे कार्यक्षेत्र अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलडाणा, वाशीम  हे आहे.  असे उपसंचालक तथा सदस्य सचिव, अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती अमरावती  यांनी कळविले आहे.

*****

बुधवार, ३ एप्रिल, २०१९

अनाधिकृत बोगस व बेकायदेशीर HT BT बियाणे विक्री बाबत सतर्कता बाळगावी


वृत्त क्र.79                                                                                                        दिनांक : 3  एप्रिल 2019

अनाधिकृत बोगस व बेकायदेशीर HT BT बियाणे
विक्री बाबत सतर्कता बाळगावी

अमरावती, दि. 3  :  लवकरच खरीप हंगामाची सुरुवात होत असून बी-बियाणे, रासायनिक खते, किटकनाशके इत्यादी निविष्ठा बाजारत उपलब्ध होत आहे. आपल्या जिल्ह्यात खरीप हंगामामध्ये कापूस पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात होते. येता खरीप हंगामात कापूस बियाण्याची खरेदी असतांना सतर्क असण्याची गरज आहे. गेल्या 2-3 वर्षामध्ये तणाचा होणारा त्रास, मजुरांची उपलब्धता व वाढती मजुरी असे वेगवेगळ्या अडचणी कापूस पिकामध्ये निर्माण झाल्या. याच गोष्टीचा गैर फायदा घेऊन राउुंड अप बी टी/एच टी बी टी/ बी जी-3 तणावरची बी टी विडगार्ड प्रकारच्या कापूस बियाणेची खाजगी व्यक्तीमार्फत गावपातळीवर घरपोच विक्री होत असल्याची शक्यता नाकारता येत नाही. हे बियाणे अनाधिकृत असून, अशा बियाण्याच्या विक्रीला केंद्र शासनाच्या जनुकीय तंत्रज्ञान समितीने (GEAC) प्रतिबंध घातलेला आहे.अशा अनाधिकृत,  बोगस व बेकायदेशीर बियाण्याचा पाकीटावर कोणत्याही प्रकारचे तंत्रज्ञान, वाण याचा उल्लेख नसतो व पाकीटावर मालाच्या गुणवत्तेचे विवरण दिलेले नसते. हे अनाधिकृत, बोगस व बेकायदेशीर बियाणे अवाजवी दराने विकुन व कोणत्याही प्रकारची पावती किंवा बिल न दिल्याने शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणूक होऊ शकते. अशा बोगस व बेकायदेशीर बियाण्याची भैतिक व जनुकीय शुध्दता माहिती नसते तसेच किड व रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अशा बियाण्याचा वापरामुळे कापूस उत्पादनावर परिणाम होऊन आपल्या शेतीचे तसेच पर्यावरणाचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. अनाधिकृत मार्गाने खरेदी केलेले जनुकीय बियाणे पर्यावरण कायद्यातंगर्त कायदेशीर कार्यवाहीस पात्र ठरत असल्याने अशा बियाण्याची लागवड शेतकरी बंधुसाठी पुढे कायदेशीर समस्या सुध्दा निर्माण करु शकते याची जाणीव ठेऊन कृषी निविष्ठांची खरेदी डोळसपणे अधिकृत मार्गानेच करण्याची दक्षता तमाम शेतकरी बंधु भगीनींनी घ्यावी.
आज बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात सरकार मान्य बोलगार्ड व बोलगार्ड -2 तंत्रज्ञान युक्त बियाण्यामध्ये उपलब्ध होणार आहे. त्यामुळे शेतकरी बंधुंना विनंती करण्यात येते की कृषी विभागाच्या आदेशानुसार  शासन मान्य परवानाधारक विक्रेत्याकडूनच कापासाच्या अधिकृत बियाण्साची खरेदी करावी. जर एखादी व्यक्ती, कृषी सेवा केंद्र धारक बोगस व बेकादेशीर, शासन मान्यता नसलेल्या कापूस बियाण्याची विक्री करत असल्याचे आपल्या निदर्शनास आल्यास त्याबाबत नजिकच्या तालुका कृषी कार्यालयात, कृषी विभाग, जिल्हा परिषद किंवा टोल फ्री क्रमांक 1800 233 4000 वर तक्रार करण्यात यावी.
कृषी विभाग, महाराष्ट्र बियाणे खरेदीचे निर्देश दिले आहेत. बियाणे पाकीटावर सरकार मान्य चिन्ह असल्याची खात्री करुन घ्यावी, बियाणे पाकीटावर सरकार मान्य बोलगार्ड व बोलगार्ड -2 चे चिन्ह सोबत दोन उभ्या गुलाबी रेषा तपासून घ्याव्या, बियाणे पाकीटावर कापसाच्या वाणाचे नाव, नंबर, बॅच नंबर व अंतीम मुदत तापासून घ्यावी, बियाण्याचे पाकीट सिलबंद, मोहरबंद असल्याची खात्री करुनच खरेदी करावे, घेतलेल्या कापसाच्या बियाण्याला विकण्यासाठी कोणकोणत्या राज्यात परवानगी आहे  हे तपासून घ्यावे, विकत घेतलेल्या कापूस बियाण्याच्या पकीटाचे पक्के बिल न चुकता घ्यावे.
आपल्या तक्रारीविषयी माहिती प्रत्यक्ष दुरध्वनी इ-मेल ,टोल फ्री क्रमांक, एस.एम. एस इत्यादीद्वारे देवून शासनाच्या गतीमान गुणनियंत्रण अभियानात सहभागी व्हावे. असे आवाहन विभागीय कृषी सहसंचालक, अमरावती  विभाग, अमरावती यांनी केले आहे.
****

वृत्त क्र.78                                                                                                        दिनांक : 3  एप्रिल 2019


नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा

        अमरावती, दि. 3  : अमरावती शहरातील अमरावती चांदूररेल्वे रा.मा.297 चे कॉक्रीट रोड बांधकाम रेल्वे स्टेशन ते अंधविद्यालयापर्यत टप्प्याटप्प्यामध्ये  प्रगतीत होत आहे.  सद्यस्थितीत मालटेकडी ते शाम नगर जाणाऱ्या पोच रस्त्याचे कॉक्रीटीकरण करावयाचे आहे. हा रस्ता वाहतुकीकरिता 30 मार्च 2019 ते 29 एप्रिल 2019 पर्यंत  बंद तशी या विभागास पोलीस विभगाकडून परवानगी प्राप्त आहे. नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा असे कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग अमरावती यांनी कळविले आहे