मंगळवार, १३ ऑगस्ट, २०१९

महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालयात प्रवेशासाठी 31 ऑगस्ट पर्यंत अर्ज सादर करावे


महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालयात प्रवेशासाठी
31 ऑगस्ट पर्यंत अर्ज सादर करावे
                                                  
अमरावती, दि.13: महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळामध्ये इयत्ता 5 वी व 8 वी साठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता ऑनलाईन पध्दतीने नावनोंदणी प्रवेश अर्ज दिनांक 13 ऑगस्ट 2019 पासून दिनांक 31 ऑगस्ट 2019 पर्यंत  स्विकारण्यात येणार आहेत. दिनांक 14 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर 2019 पर्यंत विद्यार्थ्यांनी मूळ अर्ज, शुल्क व मूळ कागदपत्रे अर्जावर नमूद केलेल्या संपर्क केंद्र शाळेमध्ये जमा करावे. दिनांक 6 सप्टेंबर पर्यंत संपर्क केंद्र शाळा ही यादी विभागीय मंडळाकडे सादर करतील. अधिक माहितीसाठी या  http://msbos.mh-ssc.ac.in संकेतस्थळाला भेट द्यावी असे डॉ. अशोक भोसले,सचिव महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळ, पुणे यांनी कळविले आहे.
****

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा