शुक्रवार, २३ ऑगस्ट, २०१९

इयत्ता 12 वी विद्यार्थ्यांनी गुणपडताळणीसाठी 4 सप्टेंबर पर्यंत अर्ज सादर करावे


इयत्ता 12 वी
विद्यार्थ्यांनी गुणपडताळणीसाठी 4 सप्टेंबर पर्यंत
अर्ज सादर करावे
अमरावती, दि. 23  : इयत्ता 12 वीच्या जुलै-ऑगस्ट 2019 मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेचा ऑनलाईन निकाल www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला आहे. या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांचे विषयनिहाय गुण उपलब्ध आहेत. या माहितीची प्रत विद्यार्थ्यांना घेता येईल. ज्या विद्यार्थ्यांना गुणाची पडताळणी करावयाची आहे त्यांनी ऑनलाईन निकाल जाहीर झाल्यानंतर विहित नमुन्यात विहित शुल्कासह सोमवार दि. 26 ऑगस्ट 2019 ते बुधवार दि. 4 सप्टेंबर 2019 पर्यंत संबंधित विभागीय मंडळाकडे अर्ज करावयाचा आहे. अर्जासोबत ऑनलाईन निकालाची प्रत/गुणपत्रिकेची छायाप्रत जोडणे अनिवार्य राहील.
फेब्रुवारी-मार्च 2020 मधील उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता 12 वी) परीक्षेस ज्या विद्यार्थ्यांना प्रविष्ठ व्हावयाचे आहे अशा पुनर्परिक्षार्थी विद्यार्थी, यापूर्वी नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी तसेच श्रेणीसुधार योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांची आवेदनपत्र ऑनलाईन पध्दतीने स्विकारायची असल्याने त्याच्या तारखा स्वतंत्रपणे कळविण्यात येतील.
परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांची संपादणूक सुधारण्यासाठी श्रेणी/गुणसुधार                (Class Improvement Scheme) योजनेअंतर्गत परीक्षेस पुन:श्च प्रविष्ट होण्याची संधी उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. त्यानुसार जुलै-ऑगस्ट 2019 च्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेस सर्व विषय घेऊन उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी तरतुदीच्या अधीन राहून पुढील सलगच्या दोन संधी उपलब्ध राहतील, असे डॉ. अशोक भोसले, सचिव, राज्यमंडळ, पुणे यांनी कळविले आहे.
00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा