शुक्रवार, २३ ऑगस्ट, २०२४

राज्यातील शेतकरी बांधवांनी परळी वैजनाथ राज्यस्तरीय कृषी महोत्सवास भेट द्यावी





राज्यातील
 शेतकरी बांधवांनी परळी वैजनाथ

राज्यस्तरीय कृषी महोत्सवास भेट द्यावी

     

अमरावती, दि. 23 : बदलत्या परिस्थितीत शेतक-यांना उत्पादन वाढीसाठी प्रोत्साहन देण्यास अनन्यसाधार महत्व आहेप्रयोशील व प्रतीशील शेतक-यांचे माध्यमातून शेतक-यांना आपआपसातील विचारांची  देवाणघेवाण करण्यास व्यासपीठ उपलब्ध करुन दिल्यास त्यांच्यातील आत्मविश्वास वृध्दींत होऊ शकतोआधुनिक कृषि तंत्रज्ञानाचा शाश्वत पध्दतीने अवलंब केल्यास शेतकरी आर्थिकदृष्ट्या उन्नत होऊन जागतिक पातळीवरील स्पर्धाक्षम वातावरणात आपले स्थान सिध्द करु शकतीलयाकरीता कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनाखाली  21 ऑगस्ट ते 25 ऑगस्ट या कालावधीत मौजे परळी वै. जि. बीड  येथे राज्यस्तरीय कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेले आहे.

या  कार्यक्रमाचे उद्घाटनप्रसंगी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय कृषी मंत्री                   शिवराजसिंहजी चौहान (मंत्री, कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, संजय बनसोडे, (मंत्री, क्रीडा व युवक कल्याण बंदरे) यांच्या शुभहस्ते होणार आहे. याशिवाय इतर संसद सदस्य, विधान परिषद सदस्य, विधानसभा सदस्य व विविध विभागांचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

राज्यातील शेतकऱ्यांची शाश्वत प्रगती व्हावीकृषि विषयक विकसीत तंत्रज्ञान शेतक-यांपर्यंत पोहोचावेशासकीय योजनांची माहिती शेतक-यापर्यंत  पोहोचावीशेतकरी ते ग्राहक थेट विक्री श्रृंखला विकसीत व्हावी व शेतमालाला चांगला बाजार भाव मिळावा तसेच शेतकरी व वरिष्ठ कृषी शास्त्रज्ञ यांच्यामध्ये थेट संवाद व्हावा म्हणून या प्रदर्शनात 400 पेक्षा जास्त दालने लावण्यात येणार आहेत. तसेच परिसंवाद, राज्यातील सर्व कृषी विद्यापीठाची दालने, विविध संशोधन केंद्र, कृषी विज्ञान केंद्रप्रक्रिया उद्योग यांचे विशेष सादरीकरण होणार आहे. सदरील पाच दिवसाच्या कालावधीमध्ये पौष्टीक तृणधान्य महोत्सवसेंद्रीय शेती दालनखरेदीदार विक्रेता संमेलनपशू प्रदर्शनड्रोनद्वारे फवारणी प्रात्यक्षिकरानभाजी महोत्सवधान्य व इतर शेतीमाल प्रदर्शन व विक्रीशेती निगडीत औजारे खरेदी विक्री दालन व कृषि उत्पादनेस्वयं सहाय्य महिला बचत गट निर्मित वस्तू /पदार्थ विक्री भव्य प्रदर्शन आयोजित करण्यात येणार आहे. महोत्सवात पाच लाखापेक्षा जास्त शेतकरी भेट देतील असे नियोजन करण्यात आलेले आहे.

मानवी आरोग्यामध्ये सकस अन्नाचे अनन्य साधारण महत्व आहे. सकस अन्नामध्ये विविध भाज्यांचा समावेश असतोरानातील म्हणजेच जंगलातील तसेच शेतशिवारातील नैसर्गिकरित्या उगवल्या जाणाऱ्या रानभाज्याफळभाज्याकंदभाज्यांमध्ये विविध प्रकारचे शरिराला आवश्यक असणारे पौष्ठिक अन्नघटक व औषधी गुणधर्म असताततसेच सदर रानभाज्या नैसर्गिकरित्या येत असल्यामुळे त्यावर रासायनिक किटकनाशक/बुरशीनाशक फवारणी करण्यात येत नाही. त्यामुळे पुर्णपणे नैसर्गिक असल्याने या संपत्तीचा योग्य वापर करणे आवश्यक आहे. त्यांचे आरोग्य विषयक महत्व व माहिती जास्तीत जास्त ग्रामिण तसेच शहरीभागातील नागरिकांना होणेसाठी व विक्री व्यवस्था करुन रानभाज्यांच्या विक्रीतून शेतकऱ्यांनाही काही आर्थिक फायदा होणेसाठी लोकांमध्ये याबाबत जनजागृती करणेसाठी रानभाज्यांचे प्रदर्शन देखील या कृषी महोत्सवामध्ये आयोजित करण्यात आले आहे.






या महोत्सवात कृषी संलग्न विभागांचाही सक्रिय सहभाग असणार आहे.तरी 
राज्यातील जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी कृषी महोत्सवास भेट देऊन लाभ घेण्याचे आवाहन कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी राज्यातील शेतकरी बांधवाना केले आहे.

000000 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा