बुधवार, ३१ डिसेंबर, २०२५

मुख्यमंत्री सचिवालय ( जनसंपर्क कक्ष) बुधवार, दि. ३१ डिसेंबर, २०२५ मंत्रिमंडळ निर्णय( एकूण - १) (महसूल विभाग)

अमरावतीच्या अंबादेवी संस्थानास चिखलदरा येथील महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची तीन एकर जमीन अमरावती जिल्ह्यातील मौजे चिखलदरा येथील श्री. अंबादेवी संस्थान, अमरावती यांना महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची ३ एकर ८ आर जमीन देण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. चिखलदरा येथील सुमारे साडे सात एकर जमीन १९७५ मध्ये महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाला पर्यटकांसाठी मुलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी देण्यात आली होती. पण ही जमीन वापराविना पडून होती. दरम्यान, अमरावतीच्या श्री अंबादेवी संस्थान यांनी चिखलदरा येथील देवी पॉईंट आणि विराट देवी देवस्थान यांच्या व्यवस्थापनाची जबाबदारी आहे. या संस्थानाने या दोन्ही देवस्थानच्या विकासासाठी शासनाकडे जमिनीची मागणी केली आहे. त्यानुसार पर्यटन विकास महामंडळाकडील सुमारे तीन एकर ८ आर जमीन शासन जमा करून घेऊन, ती श्री. अंबादेवी संस्थानास विनामुल्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ही जमीन मंदिर संस्थानाला भोगवटादार वर्ग – २ म्हणून मिळणार असून, जमीन केवळ धार्मिक प्रयोजनासाठी वापरता येणार आहे.

सोमवार, २९ डिसेंबर, २०२५

डॉ. पंजाबराव देशमुख यांना अभिवादन

अमरावती दि. २७ : भारताचे पहिले कृषिमंत्री शिक्षणमहर्षी डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त विभागीय आयुक्त कार्यालयात आज विशेष कार्य अधिकारी अतुल बुटे यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी नायब तहसीलदार मधुकर धुळे यांच्यासह अन्य अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. उपस्थितांनीही डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून विनम्र अभिवादन केले.

वीर बाल दिवसानिमित्त साहिबजादा जोरावर सिंग आणि साहिबजादा फतेह सिंग यांना अभिवादन

अमरावती, दि. २६ : वीर बाल दिवसानिमित्त विभागीय आयुक्त कार्यालयात आज गुरु गोविंदसिंग यांचे पुत्र साहिबजादा जोरावर सिंग आणि साहिबजादा फतेह सिंग यांच्या प्रतिमेस सहाय्यक आयुक्त वैशाली पाथरे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी तहसीलदार संतोष आठरे, नायब तहसीलदार संदीप टांक, मधुकर धुळे श्यामसुंदर देशमुख यांच्यासह अन्य अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. शिखांचे दहावे व अखेरचे गुरू असलेले गुरु गोविंदसिंग यांचे पुत्र साहिबजादा जोरावर सिंग आणि साहिबजादा फतेह सिंग यांनी दिलेल्या बलिदानाच्या सन्मानार्थ २६ डिसेंबर हा दिवस सन २०२२ पासून दरवर्षी वीर बाल दिवस म्हणून साजरा केला जातो. दि. २६ डिसेंबर, १७०४ रोजी पंजाबमधील सरहिंद येथे मुघल सैनिकांकडून साहिबजादा जोरावर सिंग आणि फतेह सिंग यांना कैद करण्यात आले होते. मुघल सैन्याने त्या दोघा बालकांना धर्म बदलण्यास भाग पाडले, तेव्हा त्या दोघाही बालकांनी त्यास स्पष्टपणे नकार दिला. त्यामुळे त्या दोघा वीर बालकांना एका भिंतीत जीवंत गाडण्यात येऊन ठार मारण्यात आले. त्या वेळी साहिबजादा जोरावर सिंग ९ तर फतेह सिंग ६ वर्षांचे होते. बाल वयातच या बालकांनी शिख संप्रदायाचा सन्मान व अस्मिता राखून आपले बलिदान दिले. त्यांच्या गौरवार्थ व त्यांनी केलेल्या समर्पणाच्या सन्मानार्थ दरवर्षी 26 डिसेंबर हा दिवस देशभर वीर बालदिन म्हणून साजरा करण्यात येतो.

अटल बिहारी वाजपेयी यांना अभिवादन

अमरावती, दि. 25 : माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त विभागीय आयुक्त कार्यालयात आज सहाय्यक आयुक्त वैशाली पाथरे यांच्या हस्ते त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी तहसीलदार संतोष आठरे, नायब तहसीलदार श्यामसुंदर देशमुख, संदीप संदीप टांक, मधुकर धुळे नाझर शरद लोणारे यांच्यासह अन्य अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. उपस्थितांनीही दिवंगत अटल बिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमेस पुष्प वाहून अभिवादन केले.

वीर बाल दिवसाच्या निमित्त सायन येथील गुरूद्वारा गुरू तेग बहादूर दरबार येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले

होते. यावेळी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी वीर शहीद साहिबजादे यांना विनम्र अभिवादन करून त्यांच्या अद्वितीय शौर्याचे स्मरण केले. #शीख पंथीयांचे दहावे गुरू श्री गुरु गोविंद सिंगजी यांचे सुपुत्र साहिबजादे बाबा जोरावर सिंग (वय ९ वर्षे) आणि साहिबजादे बाबा फतेह सिंग (वय ७ वर्षे) यांच्या अद्वितीय शौर्य व बलिदानाच्या स्मरणार्थ २६ डिसेंबर हा दिवस ‘वीर बाल दिवस’ म्हणून पाळला जातो. वीर बाल दिवसाच्या निमित्ताने गुरूंनी दाखविलेल्या मानवतेच्या मार्गावर चालण्यासाठी आणि त्यांच्या विचारांना आपल्या जीवनात अंगीकारण्यासाठी आपण स्वतःला कृतीतून संकल्पित केले पाहिजे. साहिबजाद्यांच्या धैर्याने आणि बलिदानाने भारतीय इतिहासाला नवी दिशा दिली असून, त्यांचे शौर्य सदैव पिढ्यान्‌पिढ्यांना प्रेरणा देत राहील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले. यावेळी गुरूद्वारा समितीच्या सदस्यांनी किर्तन, कविता वाचन केले तसेच वीर शहीद साहिबजादे यांना आदरांजली अर्पण केली. यावेळी आमदार प्रसाद लाड, आमदार तमिल सेल्वन, श्री गुरु तेग बहादूर यांच्या ३५० व्या शहीदी समागम समितीचे राज्यस्तरीय समन्वयक रामेश्वर नाईक, पंजाबी साहित्य अकादमीचे कार्याध्यक्ष बल मलकित सिंह, गुरुद्वारा समितीचे सदस्य दलजीत सिंग, गुरुदेव सिंग, जसपाल सिंग सिद्धू, हॅपी सिंग, डॉ. अजयसिग राठोड यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना 'डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख स्मृती पुरस्कार २०२५' देऊन सन्मानित करण्यात आले

अमरावती येथे भारताचे पहिले कृषिमंत्री, शिक्षणमहर्षी डॉ. #पंजाबरावदेशमुख यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना श्री शिवाजी शिक्षण संस्था, अमरावतीद्वारे 'डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख स्मृती पुरस्कार २०२५' देऊन
. मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी 'शिक्षणमहर्षी डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती पुरस्कार' प्रदान कार्यक्रमात श्री शिवाजी शिक्षण संस्था, अमरावतीच्या 'दैनंदिनी २०२६' आणि संस्थेचे मुखपत्र 'शिवसंस्था' या मासिकेचे विमोचन केले. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव, मंत्री डॉ. अशोक वुईके, राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर, पद्मभूषण डॉ. विजय भटकर व इतर मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अमरावती येथे 'सुजान सर्जिकल अँड कॅन्सर हॉस्पिटलचे' उद्घाटन

करण्यात आले. अमरावतीच्या गरजू रुग्णांकरिता 'सुजान सर्जिकल आणि कॅन्सर हॉस्पिटल' सुरू करण्यात आले असून, यामुळे कॅन्सरग्रस्त रुग्णांना दिलासा मिळणार आहे. कॅन्सर सारख्या आजाराचे योग्यवेळी निदान झाल्यास तो बरा होऊ शकतो. कॅन्सरचे योग्यवेळी निदान होऊन त्यावर योग्य उपचार व्हावेत यासाठी महाराष्ट्र शासनाद्वारे 'महाराष्ट्र शासन ग्रीड' उभे करण्यात येत आहे. ज्यात कॅन्सर बरा होण्यासाठी रुग्णांना लागणाऱ्या सर्व सेवा देण्यात येणार आहेत. या संपूर्ण सेवेत महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचा उपयोग करून सामान्यातल्या सामान्य नागरिकालाही कमी दरात किंवा मोफत उपचार देण्याचा प्रयत्न केला जाईल, असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. यावेळी राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, माजी खासदार नवनीत राणा व इतर मान्यवर उपस्थित होते.

विद्यापीठ तंत्रज्ञान संस्था (UATI) चे उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते पार पडले.

गडचिरोली जिल्ह्यातील अडपल्ली येथे गोंडवाना विद्यापीठ आणि लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड यांच्या सार्वजनिक-खाजगी भागीदारीतून (PPP) स्थापन करण्यात आलेल्या विद्यापीठ तंत्रज्ञान संस्था (UATI) चे उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते पार पडले. #गडचिरोली जिल्हा आता केवळ राज्याचा शेवटचा जिल्हा उरला नसून, तो महाराष्ट्राचे प्रगत 'प्रवेशद्वार' म्हणून ओळखला जाईल. जिल्ह्यातील खनिज संपत्ती आणि तरुणांचे कौशल्य यांच्या जोरावर येथे ३ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक येत असून, त्यातून सुमारे १ लाख रोजगाराच्या संधी निर्माण होतील, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. यावेळीराज्यमंत्री तथा गडचिरोलीचे सहपालकमंत्री ॲङ आशिष जयस्वाल, राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

शुक्रवार, २६ डिसेंबर, २०२५

वीर बाल दिवसानिमित्त साहिबजादा जोरावर सिंग आणि साहिबजादा फतेह सिंग यांना अभिवादन

अमरावती, दि. २६ : वीर बाल दिवसानिमित्त विभागीय आयुक्त कार्यालयात आज गुरु गोविंदसिंग यांचे पुत्र साहिबजादा जोरावर सिंग आणि साहिबजादा फतेह सिंग यांच्या प्रतिमेस सहाय्यक आयुक्त वैशाली पाथरे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी तहसीलदार संतोष आठरे, नायब तहसीलदार संदीप टांक, मधुकर धुळे श्यामसुंदर देशमुख यांच्यासह अन्य अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. शिखांचे दहावे व अखेरचे गुरू असलेले गुरु गोविंदसिंग यांचे पुत्र साहिबजादा जोरावर सिंग आणि साहिबजादा फतेह सिंग यांनी दिलेल्या बलिदानाच्या सन्मानार्थ २६ डिसेंबर हा दिवस सन २०२२ पासून दरवर्षी वीर बाल दिवस म्हणून साजरा केला जातो. दि. २६ डिसेंबर, १७०४ रोजी पंजाबमधील सरहिंद येथे मुघल सैनिकांकडून साहिबजादा जोरावर सिंग आणि फतेह सिंग यांना कैद करण्यात आले होते. मुघल सैन्याने त्या दोघा बालकांना धर्म बदलण्यास भाग पाडले, तेव्हा त्या दोघाही बालकांनी त्यास स्पष्टपणे नकार दिला. त्यामुळे त्या दोघा वीर बालकांना एका भिंतीत जीवंत गाडण्यात येऊन ठार मारण्यात आले. त्या वेळी साहिबजादा जोरावर सिंग ९ तर फतेह सिंग ६ वर्षांचे होते. बाल वयातच या बालकांनी शिख संप्रदायाचा सन्मान व अस्मिता राखून आपले बलिदान दिले. त्यांच्या गौरवार्थ व त्यांनी केलेल्या समर्पणाच्या सन्मानार्थ दरवर्षी २६ डिसेंबर हा दिवस देशभर वीर बालदिन म्हणून साजरा करण्यात येतो. ०००००

बुधवार, २४ डिसेंबर, २०२५

‘दिलखुलास’ कार्यक्रमात पोलीस उप आयुक्त पुरुषोत्तम कराड यांची मुलाखत

मुंबई, दि. 24 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या आकाशवाणीवरील प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमात ‘सोशल मीडियाचा जबाबदारीने वापर व सायबर सुरक्षा’ या महत्त्वाच्या विषयावर सायबर गुन्हे शाखेचे पोलीस उप आयुक्त पुरुषोत्तम कराड यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. आजच्या डिजिटल युगात सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला असून, त्याचबरोबर सायबर फसवणूक, ऑनलाईन गुन्हे, बनावट संदेश, आर्थिक फसवणूक, वैयक्तिक माहितीचा गैरवापर अशा प्रकारच्या घटनांमध्येही वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सोशल मीडियाचा कसा जबाबदारीने वापर करावा, कोणत्या खबरदाऱ्या घ्याव्यात, सायबर गुन्ह्यांना बळी पडू नये यासाठी काय उपाययोजना कराव्यात, याबाबत पोलीस उप आयुक्त पुरुषोत्तम कराड यांनी 'दिलखुलास' कार्यक्रमात दिलेल्या मुलाखतीत सविस्तर मार्गदर्शन केले आहे. ‘दिलखुलास’ कार्यक्रमातील ही मुलाखत गुरूवार, दि. 25, शुक्रवार दि. 26, शनिवार दि.27, सोमवार दि.29 आणि मंगळवार दि. 30 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून प्रसारित होणार आहे. तसेच ‘News on AIR’ या मोबाईल अॅपवरही ऐकण्यासाठी उपलब्ध असणार आहे. ही मुलाखत निवेदिका सुषमा जाधव यांनी घेतली आहे.

सोमवार, २२ डिसेंबर, २०२५

‘होमस्टे’ योजनेतून पर्यटकांना निवास सुविधा इच्छुकांनी होमस्टे करिता नोंदणी करण्याचे पर्यटन संचालनालयाकडून आवाहन

अमरावती दि.२२ : जिल्ह्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन संचालनालयाव्दारे ‘होमस्टे’ (Home Stay) योजना राबविण्यात येत आहे. या योजने अंतर्गत स्थानिक नागरिकांना त्यांच्या घरातील उपलब्ध खोल्या पर्यटकांसाठी निवासासाठी उपलब्ध करून देता येणार आहेत. जिल्ह्यातील इच्छुक घरमालकांनी शासनाने निर्धारित केलेल्या अटी व निकष पूर्ण करून होमस्टे नोंदणी करावी. नोंदणीकृत होमस्टेना पर्यटन विभागामार्फत आवश्यक मार्गदर्शन, प्रसिद्धी तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ देण्यात येणार आहे, अशी माहिती पर्यटन संचालनालयाचे विभागीय उपसंचालक विजय जाधव यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे दिली आहे. होमस्टेमुळे पर्यटकांना स्थानिक संस्कृती, परंपरा, खाद्यसंस्कृती व जीवनशैलीचा अनुभव मिळणार असून स्थानिक नागरिकांना अतिरिक्त उत्पन्नाचे साधन उपलब्ध होणार आहे. विशेषतः ग्रामीण व आदिवासी भागातील लोकांना याचा मोठा लाभ होणार आहे. पर्यटन विकासासोबतच स्थानिक रोजगारनिर्मिती, स्वयंपूर्णता व शाश्वत पर्यटनाला चालना देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. त्यामुळे अमरावती विभातील हॉटेल व्यावसायीक व नागरिकांनी या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन श्री. जाधव यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी कार्यालयाचे श्री. कमलेश नंदनवार (मो. क्र. ८९७५८४८९८७) आणि श्रीमती उज्ज्वला काळे (मो. क्र. ८३७९०५८०६०) यांच्याशी संपर्क साधावा, असेही आवाहन पर्यटन संचालनालयाव्दारे करण्यात आले आहे.

महाटीईटी-२०२५ परीक्षेची तात्पुरती उत्तरसूची जाहीर · २७ डिसेंबरपर्यंत ऑनलाईन आक्षेप नोंदवीता येणार · आक्षेप नोंदविण्यासाठी https://mahatet.in संकेतस्थळ

अमरावती दि. २२:- महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात आलेल्या महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHA-TET) २०२५ परीक्षेचे पेपर क्रमांक १ व २ ची अंतरिम (तात्पुरती) उत्तरसूची दि. १९ डिसेंबर रोजी परिषदेच्या https://mahatet.in अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात आली आहे, असे परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे. शासन निर्णय दि. २३ ऑगस्ट २०१३ अन्वये रविवार, दि. २३ नोव्हेंबर २०२५ रोजी ही परीक्षा राज्यभर पार पडली होती. या परीक्षेतील प्रश्नपत्रिकेतील कोणत्याही प्रश्नाबाबत किंवा पर्यायी उत्तराबाबत आक्षेप असल्यास उमेदवारांनी दि. १९ ते २७ डिसेंबर या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने आक्षेप नोंदवावे. आक्षेप नोंदवण्यासाठी उमेदवारांनी https://mahatet.in या अधिकृत संकेतस्थळावर लॉगिन करून “आक्षेप नोंदणी” या लिंकचा वापर करावा. टपालाने किंवा ईमेलद्वारे पाठविण्यात आलेल्या आक्षेपांचा कोणताही विचार केला जाणार नसल्याचे परीक्षा परिषदेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. विहित मुदतीत प्राप्त झालेल्या आक्षेपांचा विषयतज्ज्ञांच्या अभिप्रायानुसार विचार करून अंतिम उत्तरसूची यथावकाश प्रसिद्ध करण्यात येईल, असेही महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेद्वारे कळविण्यात आले आहे.

रविवार, २१ डिसेंबर, २०२५

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विश्वविजेत्या भारताच्या दृष्टिबाधित #महिला टी-20 #क्रिकेट संघातील खेळांडूचा सत्कार केला.

भारताच्या दृष्टिबाधित #महिला टी-20 #क्रिकेट संघाने जागतिक पातळीवर ऐतिहासिक कामगिरी करत अजिंक्यपद पटकावल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विश्वविजेत्या
महिला भारताचे नाव जागतिक पातळीवर उज्ज्वल केले असून तिरंग्याचा सन्मान वाढवला आहे. या खेळाडूंना त्यांच्या सरावात येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी व त्यांना आर्थिक सहाय्य, रोजगाराच्या संधी आणि आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासन सर्वतोपरी मदत करेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. तसेच खेळाडूंना सरावासाठी स्वतंत्र आणि कायमस्वरूपी मैदान व इतर सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत क्रीडा आयुक्तांमार्फत चर्चा करून योग्य कार्यवाही केली जाईल. कोणतीही आर्थिक किंवा कौटुंबिक अडचण खेळातील प्रगतीस अडथळा ठरू नये, यासाठी लागेल ती मदत करण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले. मुख्यमंत्री यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी झालेल्या या कार्यक्रमात क्रीडा व युवक कल्याण आयुक्त शीतल तेली उगले, संघाच्या कर्णधार दीपिका टी.सी., उपकर्णधार व महाराष्ट्राची खेळाडू गंगा कदम, क्रिकेट असोसिएशन फॉर द ब्लाईंड इन इंडियाचे चेअरमन के. जी. महंतेश, क्रीडा विभागाचे उपसचिव सुनील पांढरे, जिल्हा क्रीडा अधिकारी सुवर्णा बारटक्के यांच्यासह संघातील खेळाडू उपस्थित होते.

‘ज्वेल ऑफ एलआयटी अँड युथ आयकॉन’ पुरस्कार वितरण सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.

लक्ष्मीनारायण इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एल.आय.टी.) माजी विद्यार्थी संघटनेतर्फे आयोजित ‘उडान’ संमेलनात
शेतीची उत्पादकता व गुणवत्ता वाढविण्यासाठी मिशन नैसर्गिक शेती राबविण्याचे राज्य शासनाने ठरविले असून येत्या २ वर्षात २५ लाख हेक्टर जमीन #नैसर्गिकशेती खाली येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी केले. आज सर्वच क्षेत्रात #एआय चा वापर होत असून ती काळाची गरज आहे. एल.आय.टी. सारख्या संस्थानी मोठ्या प्रमाणात एआयचा स्वीकार करावा, या आवाहनासह जागतिक स्तरावरील स्पर्धेसाठी आपण विद्यार्थी घडवू शकू, असा विश्वास मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी व्यक्त केला. या सोहळ्यात डॉ. आर. एल. सोनोलिकर, अरुण दांडेकर यांना जीवन गौरव प्रदान करण्यात आला. तसेच लाईफ टाईम अचिव्हमेंट दीपक लव्हाळा यांना, ज्वेल ऑफ एलआयटी डॉ. सुगंधा गारवे, कीर्ती गणोरकर, आर.जी. कृष्णन, अमित सिन्हा, नीरा चंदना यांना, तर युथ आयकॉन पुरस्कार चिंतन शाह यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. कार्यक्रमास सत्यनारायण नूवाल आणि पद्मश्री डॉ. डी. के. यादव प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.

शुक्रवार, १९ डिसेंबर, २०२५

प्राचीन ज्ञान-परंपरेची आधुनिक तंत्रज्ञानाशी सांगड घालत भारताला ‘विश्वगुरू’ होण्याची क्षमता - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. १९ : प्राचीन भारत हा जगातील सर्वाधिक प्रगत आणि आर्थिक महासत्ता असणारा देश होता. भारतातील ज्ञान, परंपरा आणि संस्कृतीमुळे देश जगात आघाडीवर होता. या प्राचीन ज्ञानाची आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाशी प्रभावी सांगड घातल्यास भारत पुन्हा एकदा ‘विश्वगुरू’ होऊ शकतो, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. वांद्रे-कुर्ला संकुलातील ग्रँड हयात येथे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.यावेळी व्यासपीठावर के पी ग्लोबलचे अध्यक्ष राजेश शर्मा, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचे संस्थापक अध्यक्ष स्वामी विद्यानंद, जे एस डब्ल्यू ग्रूपचे अध्यक्ष सज्जन जिंदाल आयटी मंत्राचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक शैलेश त्रिवेदी उपस्थित होते. ‘इनव्हेशन, सेल्फ रिलायन्स अँड प्रोस्पेरिटी’ (शोध, स्वावलंबन आणि समृद्धी) या देशाच्या विकासदिशा ठरविणाऱ्या संकल्पनेवर या मंचावर मंथन होत असल्याचे सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, हिंदू ही केवळ धर्मव्यवस्था नसून जीवनपद्धती व विचारप्रणाली आहे. हजारो वर्षांपासून ही परंपरा जिवंत आहे. अनेक प्राचीन संस्कृती लुप्त झाल्या; मात्र सिंधू–हिंदू संस्कृती आजही टिकून आहे. पुराव्यांवर सिद्ध झालेले हे सांस्कृतिक सातत्य दहा हजार वर्षांपूर्वीपासून अस्तित्वात असल्याचे दर्शवते. भारत हा नवनिर्मितीचा मूळ स्रोत आहे. खगोलशास्त्र व भूगोलासारखी शास्त्रे प्राचीन काळात भारतात अत्यंत प्रगत होती. वेद आणि वेदपूर्व साहित्यामध्ये त्याची साक्ष आढळते. जगात आता पाचवी औद्योगिक क्रांती सुरू असून ही क्रांती डिजिटायजेशनमुळे होत आहे. तसेच एआय आणि डाटा या क्षेत्राला या क्रांतीमध्ये अनन्यसाधारण महत्व आहे. यासाठी लागणारे उत्पादन महत्वाचे आहे. उत्पादन क्षेत्र हे अर्थव्यवस्थेचे कणा आहे. इनोव्हेशनचे मूळ उत्पादनातच आहे आणि या क्रांतीचे नेतृत्व करण्याची क्षमता भारताकडे आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि डेटा क्षेत्रात भारत आघाडीवर असून २०३० पर्यंत जगातील सर्वाधिक डेव्हलपर्स भारतीय असतील, असे मायक्रोसॉफ्टचे प्रमुख सत्य नाडेला यांनीही नमूद केल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. एआयमुळे उद्योगांमध्ये आमूलाग्र बदल होत असून या इनोव्हेशनमध्ये नेतृत्व करण्याची क्षमता भारतात आहे. ‘आत्मनिर्भर भारत’ या प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या संकल्पनेचा उल्लेख करत मुख्यमंत्री म्हणाले की, १४० कोटी लोकसंख्येचा देश आत्मनिर्भर बनणे अत्यावश्यक आहे. स्वदेशी म्हणजे देशातच उत्पादन, भारतीय कंपन्यांमार्फत तंत्रज्ञानाचा विकास करण्यात येत आहे. चीनने जपानचे तंत्रज्ञान वापरले, त्याचे रिव्हर्स इंजिनिअरिंग केले. पण भारतात तंत्रज्ञान समजून घेऊन आत्मनिर्भर होण्याची क्षमता आहे. तंत्रज्ञानाला आज असलेले महत्व ओळखून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अनेक क्षेत्रात तंत्रज्ञान हस्तांतरणाची अट घातली आहे. श्री.फडणवीस म्हणाले, जगाचा चीनवरील विश्वास त्यांच्या विस्तारवादी धोरणांमुळे कमी झाला असताना भारताच्या नेतृत्वावर आणि संस्कृतीवर जागतिक विश्वास वाढत आहे. आफ्रिकेमध्ये विकासाच्या नव्या संधी असून, त्या संधींमध्ये जो देश सक्रिय सहभाग घेईल तोच जागतिक नेतृत्व करेल. भारत आणि आफ्रिकी देशांमधील संबंध दृढ असून अनेक आफ्रिकी देश प्रधानमंत्री नरेंद्र मोदींना आपला नेता मानतात. मुंबईत लवकरच ५४ आफ्रिकी देशांना होस्ट करणारी एक भव्य इमारत उभारली जाणार आहे. उद्योजकांनी आफ्रिकेकडे लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. आफ्रिकेत नैसर्गिक साधनसंपत्ती प्रचंड असून नव्या तंत्रज्ञानासाठी आवश्यक कच्चा माल उपलब्ध आहे. आफ्रिकेत उत्पादन सुरू झाल्यास जागतिक अर्थव्यवस्थेत आमूलाग्र बदल होईल आणि त्याचे नेतृत्व भारत करेल, असेही श्री. फडणवीस म्हणाले. पापुआ न्यू गिनीच्या शिष्टमंडळाने गॅस उत्खननासाठी भारताला निमंत्रण दिल्याचा उल्लेख करत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, ही सर्व संधी भारताच्या प्राचीन परंपरेतून आलेल्या जागतिक विचारांचे फलित आहे. विचारांच्या बळावर जग जिंकण्याची ही परंपरा आहे. हे सर्व जोडण्याचे काम वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमसारखे मंच करू शकतात. जागतिक व्यापारात २० टक्के वाटा मिळवण्याचे स्वप्नही या व्यापक दृष्टिकोनातून साकार होऊ शकते. दरम्यान, श्री सिमेंटच्या बांगर ग्रुपने राज्यातील चंद्रपूर येथे २,००० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यासाठीचे ‘इंटेंट लेटर’ मुख्यमंत्री फडणवीस यांना मंचावर सादर केले. ही गुंतवणूक म्हणजे राज्याच्या विकासावर दाखवलेला विश्वास आहे. स्वामी विद्यानंद म्हणाले की, या फोरमचा उद्देश देशाचा विकास हा आहे. देशातील प्रत्येक नागरिकाला आर्थिक सक्षम बनवणे म्हणजे खरा विकास आहे. यासाठी सर्वांनीच आर्थिक विकासात सहभागी होणे गरजेचे आहे. श्री. शर्मा म्हणाले की, जागतिक अर्थव्यवस्थेत भारत नक्कीच निर्णायक भूमिकेत असणार आहे. भारतात नवसंकल्पन मोठ्यावर असून निर्मिती क्षेत्रातही भारत आघाडी घेत आहे. श्री जिंदाल म्हणाले की, महाराष्ट्र हे देशातील सर्वाधिक प्रगत राज्य आहे डावोस येथील ३ लाख कोटींचे कंपनीचे सामंजस्य करार प्रत्यक्षात येत आहेत. त्याचे श्रेय मुख्यमंत्री फडणवीस यांना आहे. यावेळी देशभरातील विविध शहरातील उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गुरुवार, १८ डिसेंबर, २०२५

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियांतर्गत कांदा व लसून साठवणूक गृहासाठी अर्थसहाय्य * शेतकऱ्यांनी महाडीबीटीवर अर्ज करण्याचे आवाहन * कांदाचाळ/लसूण साठवणूक गृह उभारणीसाठी ५० टक्के अनुदान

अमरावती दि. १८ :- राज्यात कांदा पिकांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होत असून शेतकरी सर्वसाधारणपणे कांदा जमिनीवर पसरवून ठेवून किंवा स्थानिकरित्या तयार केलेल्या चाळीमध्ये कांद्याची साठवणूक करतात. त्यामुळे कांदा सडून मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. तसेच कांद्याची प्रत व टिकाऊपणा यावर विपरीत परिणाम होतो. शास्त्रशुध्द कांदाचाळ उभारणीमुळे कांद्याची योग्य गुणवत्ता राखली जाऊन शेतकऱ्यांना अधिक नफा मिळत असल्याने कांदाचाळ उभारणीकडे शेतकऱ्यांचा कल वाढत आहे. यामुळे एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत सन 2025-26 या आर्थिक वर्षामध्ये कमी खर्चाचे कांदाचाळ/लसूण साठवणूक गृह हा घटक राबविण्यात येत असून 5 ते 25 मे.टन, 25-500 मे.टन व 500-1000 मे.टन क्षमतेच्या कांदा चाळी/लसूण साठवणूक गृह उभारणीसाठी इच्छुक शेतकऱ्यांकडून प्रस्ताव मागविण्यात आले आहे, अशी माहिती महाराष्ट्र फलोत्पादन आणि औषधी वनस्पती मंडळाचे संचालक अशोक किरन्नळी यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे. कांदा पिकांचे साठवणूकीत होणारे नुकसान कमी करणे, कांदा पिकाची हंगामामध्ये आवक वाढून कांद्याचे भाव कोसळणे तसेच हंगामाव्यतिरिक्त कांद्याचा तुटवडा निर्माण होऊन भाव वाढणे अशा समस्येवर अंशत: नियंत्रण मिळविणे आदी योजनाचा उद्देश आहे. प्रकल्पखर्च व अनुज्ञेय अनुदार मर्यादा पुढीलप्रमाणे : या योजनेअंतर्गत सर्वसाधारण व अनुसूचित क्षेत्राकरीता ५ ते १००० मेट्रिक टन क्षमतेच्या कांदाचाळ / लसूण साठवणूक गृहासाठी अनुदान देण्यात येणार आहे. तसेच एकुण भांडवली खर्चाच्या ५० टक्के अनुदान प्रमाणे देय राहील. १) ५ ते २५ मे.टन क्षमतेच्या रु आठ हजार ग्राह्य प्रकल्प खर्चात कमाल चार हजार प्रति मे.टन अर्थसहाय्य दिले जाईल. २) २५ ते ५०० मे.टन क्षमतेच्या रु सात हजार ग्राह्य प्रकल्प खर्चात कमाल तिन हजार पाचशे प्रति मे.टन अर्थसहाय्य दिले जाईल. ३) ५०० ते १००० मे.टन क्षमतेच्या रु सहा हजार ग्राह्य प्रकल्प खर्चात कमाल तिन हजार प्रति मे.टन अर्थसहाय्य दिले जाईल. उपरोक्त सदर प्रकल्पाचा एकूण खर्च ३० लाखांपेक्षा अधिक झाल्यास बँक कर्ज घेणे अनिवार्य असून अनुदानाची रक्कम ही बँक कर्जाच्या परतफेडीच्या स्वरूपात देण्यात येणार आहे. लाभार्थी पात्रतेचे निकष पुढीलप्रमाणे :- शेतकऱ्यांनी योजनेअंतर्गत अर्ज करताना त्याच्या स्वत:च्या मालकीची जमीन असणे आवश्यक आहे, 7/12 वर कांदा पिकाची नोंद असणे आवश्यक आहे, शेतकऱ्याकडे कांदापिक असणे बंधनकारक आहे, सदर योजनेचा लाभ वैयक्तिक कांदा उत्पादक शेतकरी, शेतकऱ्यांचा गट, स्वयंसहायता गट (ज्यामध्ये कमीत कमी २५ सदस्य असतील) शेतकरी महिला गट, शेतकऱ्यांचे उत्पादक संघ नोंदणीकृत शेतीसंबंधी संस्था, शेतकऱ्यांच्या सहकारी संस्था, सहकारी पणन संघ यांना घेता येईल. अर्ज करण्याची पध्दत:- महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करण्यासाठी संकेतस्थळ: http://mahadbt.maharashtra.gov.in उपरोक्त योजनेच्या अधिक माहितीसाठी संबधित नजीकच्या कृषि कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन कृषि विभागाद्वारे करण्यात आले आहे.

महाडीबीटी पोर्टलवरील शिष्यवृत्ती योजनांचे प्रलंबित अर्जावर तत्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना

अमरावती दि.१८ :- राज्य शासनाच्या माहिती तंत्रज्ञान विभागामार्फत (महाआयटी) यांचेकडून विकसित करण्यात आलेल्या महाडीबीटी पोर्टलवर सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी सन २०१८-१९ या शैक्षणिक वर्षांपासून विविध मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येत आहे. सन २०१९-२० ते २०२४-२५ या शैक्षणिक वर्षातील अनुसूचित जाती प्रवर्गातील विविध मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजनांचे अर्ज मोठया प्रमाणात विद्यार्थी व महाविद्यालय स्तरावर प्रलंबित आहेत. त्यावर तात्काळ कार्यवाही करुन अर्ज सादर करण्याच्या सूचना समाज कल्याण विभागाच्या प्रादेशिक उपआयुक्त माया केदार यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे केल्या आहेत. महाडीबीटी पोर्टलद्वारे राबविण्यात येणाऱ्या विविध मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजनांचे शैक्षणिक वर्ष २०१९-२० ते २०२४-२५ या कालावधीतील विद्यार्थी व महाविद्यालय स्तरावर मोठया प्रमाणात अर्ज प्रलंबित आहेत. विविध स्तरावरील प्रलंबित असलेले शिष्यवृत्ती अर्ज विहित कालावधीत निकाली काढण्याबाबत शासन, आयुक्तालय, प्रादेशिक कार्यालय आणि जिल्हा कार्यालयामार्फत विद्यार्थी व महाविद्यालयांना अवगत करण्यात आलेले आहेत. तसेच जिल्हा कार्यालयाकडून संबंधित महाविद्यालयाचे प्राचार्य यांना वारंवार लेखी स्वरूपात कळविण्यात आलेले आहे. तसेच सोशल मिडियाचे व वृत्तपत्रांमधून सुद्धा जाहीर आवाहन करण्यात आले आहे. केंद्र शासनाने भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत सन २०१९-२० ते २०२४-२५ या कालावधीतील महाडीबीटी प्रणालीवरील विद्यार्थी व महाविद्यालय स्तरावर प्रलंबित असलेले अर्ज निकाली काढण्याकरिता सर्व राज्यांना दि.३१ ऑक्टोबर २०२५ पर्यंतची अंतिम मुदत दिलेली होती. तसेच सदरील मुदतवाढ दि.३० नोव्हेंबर, २०२५ पर्यंत वाढविण्यात आली होती. तरी सुद्धा विद्यार्थी व महाविद्यालय यांचे कडून प्रलंबित अर्जाबाबत कोणत्याही प्रकारची कार्यवाही करण्यात आली नाही. सन २०१९-२० ते २०२४-२५ या शैक्षणिक वर्षातील महाडीबीटी प्रणालीवर विविध मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजनांचे विद्यार्थी व महाविद्यालय स्तरावरील प्रलंबित असलेले अर्ज सन २०१८-१९ प्रमाणे Admin कडून Auto Reject करण्याची शक्यता नाकारता येत नाही. शैक्षणिक वर्ष सन २०१९-२० ते २०२४-२५ या कालावधीत महाडीबीटी प्रणालीवरील दि.१५ डिसेंबर, पर्यंत प्रलंबित अर्जाची जिल्हानिहाय स्थिती पुढीलप्रमाणे आहे. अमरावती जिल्ह्यात विद्यार्थी स्तरावर १२६९ तर महाविद्यालय स्तरावर १५६५ अर्ज प्रलंबित आहेत, अकोला जिल्ह्यात विद्यार्थी स्तरावर ११७० तर महाविद्यालय स्तरावर २४१३ अर्ज प्रलंबित आहेत, यवतमाळ जिल्ह्यात विद्यार्थी स्तरावर ४६८ तर महाविद्यालय स्तरावर १३८७ अर्ज प्रलंबित आहेत, बुलढाणा जिल्ह्यात विद्यार्थी स्तरावर ६५० तर महाविद्यालय स्तरावर १९०१ अर्ज प्रलंबित आहेत, वाशिम जिल्ह्यात विद्यार्थी स्तरावर ५९८ तर महाविद्यालय स्तरावर १६७१ अर्ज प्रलंबित आहेत.असे एकूण विभागातील मिळून सर्व जिल्ह्यातील विद्यार्थी स्तरावर ४१५५ तर महाविद्यालय स्तरावर ८९३७ अर्ज प्रलंबित आहेत. सन २०१९-२० ते २०२४-२५ या कालावधीतील महाडीबीटी प्रणालीवरील विद्यार्थी व महाविद्यालय स्तरावरील प्रलंबित असलेल्या अर्जावर संबंधितांकडून सत्वर कार्यवाही न झाल्यास व विद्यार्थी योजनेच्या लाभापासून वंचित राहिल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित विद्यार्थी व महाविद्यालयीन प्राचार्य यांची राहील असे प्रादेशिक उपायुक्त श्रीमती माया केदार यांनी सांगितले आहे.
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार- मुख्यमंत्री फडणवीस यांची आदरांजली
नवी दिल्ली, दि. 18 : जगप्रसिद्ध शिल्पकार महाराष्ट्रभूषण राम सुतार यांच्या पार्थिवावर नोएडा येथील वैकुंठ स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. महाराष्ट्र शासनाच्या वतीने राजशिष्टाचार व पणन मंत्री जयकुमार रावल यांनी पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहिली. तसेच केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनीही आदरांजली वाहिली. जगातील सर्वात उंच पुतळा असलेल्या 'स्टॅच्यू ऑफ युनिटी'चे शिल्पकार राम वंजी सुतार यांचे वृद्धापकाळाने नोएडा येथील निवासस्थानी वयाच्या 101 व्या वर्षी निधन झाले होते. दुपारी नोएडा येथील वैकुंठ भूमीत संपूर्ण शासकीय इतमामात दिवंगत सुतार यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार करण्यात आले. महाराष्ट्र शासनाच्या वतीने यावेळी पणन मंत्री जयकुमार रावल यांनी आदरांजली वाहिली. रावल म्हणाले, जागतिक कीर्तीचे महान शिल्पकार पद्मविभूषण राम सुतार यांनी ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’सह अनेक ऐतिहासिक शिल्पांच्या माध्यमातून भारताची ओळख जागतिक पातळीवर नेली. त्यांच्या निधनाने कला क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. हुबेहूब आणि जिवंतपणा हे त्यांच्या कलेचे वैशिष्ट्य होते. त्यांची शिल्पे ही त्यांच्या महान कार्याची नेहमी साक्ष देतील. यावेळी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले म्हणाले महाराष्ट्राचे सुपुत्र राम सुतार यांचे शिल्पकला क्षेत्रात मोठे योगदान आहे. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांसह अनेक मान्यवरांचे पुतळे त्यांनी बनवले. त्यांनी दिल्लीमध्ये राहून महाराष्ट्राचा नावलौकिक वाढविला. त्यांच्या कलाकृती अजरामर राहतील. त्यांचे पुत्र त्यांचा वारसा चालवतील असेही आठवले यांनी सांगितले. अंत्यसंस्कारापूर्वी दिवंगत सुतार यांचे पार्थिव त्यांच्या निवासस्थानी दर्शनासाठी ठेवण्यात आले होते. यावेळी महाराष्ट्र शासनाच्या निवासी आयुक्त व सचिव आर विमला, माहिती संचालक हेमराज बागुल, सहायक निवासी आयुक्त नितीन शेंडे यांनी महाराष्ट्र शासन सांस्कृतिक विभागाच्या वतीने श्रद्धांजली अर्पण केली. तसेच गौतम बुद्ध नगरच्या जिल्हाधिकारी मेधा रुपम यांनी उत्तर प्रदेश सरकारच्या वतीने श्रद्धांजली अर्पण केली. कला, सामाजिक, राजकीय क्षेत्रातील मान्यवरांसह दिवंगत सुतार यांच्या चाहत्यांनी त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांचे पुत्र अनिल सुतार यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील सदस्य उपस्थित होते. गेल्याच महिन्यात सुतार यांना 'महाराष्ट्र भूषण 2024' पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. हा पुरस्कार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी नोएडा येथे जाऊन त्यांच्या निवासस्थानी प्रदान केला होता. मुख्यमंत्री फडणवीस यांची भावपूर्ण श्रद्धांजली मुख्यमंत्री फडणवीस यांनी सुतार यांचे पुत्र अनिल सुतार यांना दूरध्वनी करून शोकसंवेदना व्यक्त केल्या. ते म्हणाले, काही दिवसांपूर्वीच 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार प्रदान करण्यासाठी आम्ही त्यांच्या घरी गेलो होतो. पुरस्कार स्वीकारताना त्यांनी 'महाराष्ट्र माझा' गीताच्या ओळी उच्चारल्या होत्या, तेव्हा आम्ही भारावून गेलो होतो. वयाच्या 100 व्या वर्षीही ते इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या कामात गुंतले होते. त्यांची शिल्पे शतकानुशतके जिवंत राहतील आणि प्रत्येक शिल्प पाहताना त्यांचेच स्मरण होईल. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.

बुधवार, १७ डिसेंबर, २०२५

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा युनेस्कोच्या मुख्यालयात उभारणे ही गौरवाची बाब -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

· युनेस्कोतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा अनावरणाबद्दल राजदूत विशाल शर्मानी घेतली मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट मुंबई, दि. १७ :- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा युनेस्कोच्या मुख्यालयात उभारणे ही गौरवाची, ऐतिहासिक आणि जागतिक स्तरावर महत्वाची घटना आहे. भारतीय संविधानाचे शिल्पकार, सामाजिक न्याय, समता, बंधुता आणि मानवाधिकारांचे जागतिक प्रवक्ते म्हणून त्यांची ओळख आहे. शिक्षण हे यशाकडे नेणारे साधन आहे हा बाबासाहेबांचा संदेश जगभर पोहोचविण्याच्या उदात्त हेतूने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा युनेस्कोला भेटस्वरूपात देण्यात आल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. युनेस्कोला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा भेटस्वरूपात अर्पण केल्याबद्दल युनेस्को, पॅरिस येथील भारताचे राजदूत व स्थायी प्रतिनिधी विशाल व्ही. शर्मा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंत्रालयात सदिच्छा भेट घेत आभार मानले. संयुक्त राष्ट्रसंघाच्या व्यासपीठावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारण्याची ही भारताच्या ८० वर्षांच्या सदस्यत्वातील पहिलीच घटना असल्याचे शर्मा यांनी नमूद केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने युनेस्कोमध्ये बाबासाहेबांच्या पुतळ्याचे अनावरण होणे ही अत्यंत महत्त्वपूर्ण व ऐतिहासिक बाब असून, या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचे अभिनंदन केले. केंद्र शासनाच्या वतीने शर्मा यांनी २६ नोव्हेंबर २०२५ रोजी संविधान दिनाच्या निमित्ताने युनेस्कोमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण केले. या ऐतिहासिक कार्यक्रमाला युनेस्कोचे महासंचालक, ५० हून अधिक देशांचे राजदूत तसेच युनेस्को सचिवालयाचे सदस्य उपस्थित होते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचे संदेश यावेळी वाचून दाखविण्यात आले होते, तर मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्हिडिओ संदेशाद्वारे कार्यक्रमास संबोधित केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, बाबासाहेबांचा समतेचा संदेश आणि शिक्षणाचे महत्व जगभरातील तरूणांपर्यंत पोहोचविण्याचा हा राज्य व केंद्र शासनाचा प्रयत्न होता. याचबरोबर, छत्रपती शिवाजी महाराजांचे ११ किल्ले (तामिळनाडूतील एक) असे देशातील १२ किल्ले युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट होणे ही राज्यासाठी अत्यंत गौरवास्पद बाब असून, हा नामांकन सोहळा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मदिनी शिवनेरी किल्ल्यावर भव्य स्वरूपात आयोजित करण्याचा शासनाचा मानस आहे.

महाराष्ट्राच्या व्यापार, आर्थिक, पायाभूत सुविधा आणि विकास क्षेत्रात सहभागी होण्याची संधी डच परराष्ट्र मंत्री डेव्हिड वील आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट

मुंबई, दिनांक १७:- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची डच परराष्ट्र मंत्री डेव्हिड वील यांनी भेट घेतली. 'वर्षा' मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी झालेल्या भेटीत उद्योग विभाग सचिव पी. अनबलगन, सचिव आणि राजशिष्टाचार विभागाचे प्रमुख डॉ. राजेश गवांदे, मुख्यमंत्र्यांचे गुंतवणूक व धोरण विषयक सल्लागार कौस्तुभ धवसे, महाराष्ट्र सागरी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप पी. उपस्थित होते. डच शिष्टमंडळात राजदूत मोरिसा जेरार्ड्स, वाणिज्य दूतावास जनरल नबिल तौआती उपस्थित होते. या भेटीत महाराष्ट्रातील विविध क्षेत्रांमध्ये उपलब्ध असलेल्या संधींबद्दल चर्चा केली. तसेच व्यापार, अर्थव्यवस्था, पायाभूत सुविधा आणि औद्योगिक विकास यावरही चर्चा झाली. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, "सरकार आंतरराष्ट्रीय दर्जाच्या तंत्रज्ञानाच्या वापराला पाठिंबा देत आहे. नेदरलँड्सच्या सहभागातून मत्स्यव्यवसायासारखे अनेक क्षेत्र विकसित केले जाऊ शकतात". परराष्ट्र मंत्री डेव्हिड वील यांनी प्रणाली आणि साहित्य, प्रगत यंत्रसामग्री, इलेक्ट्रॉनिक्स आणि साहित्यातील उच्च-तंत्रज्ञान आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांच्या संशोधन आणि विकासात डच योगदानाबद्दल माहिती दिली.

मंगळवार, १६ डिसेंबर, २०२५

आरोग्य सेवेत ‘एआय’ तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यात यावा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि.16 :- राज्यातील सार्वजनिक आरोग्य सेवा अधिक सक्षम, वेगवान आणि लोकाभिमुख करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय -AI) तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यात यावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. ‘वर्षा’ शासकीय निवासस्थानी पार पडलेल्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.बैठकीत ‘समग्र’ संस्थेच्या वतीने सार्वजनिक आरोग्य सेवा बळकटीकरणाबाबत सविस्तर सादरीकरण करण्यात आले. यावेळी सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर उपस्थित होते. मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले की, आधुनिक तंत्रज्ञानाचा योग्य वापर केल्यास आरोग्य सेवांची गुणवत्ता वाढेल, उपचार अधिक अचूक व वेळेत मिळतील आणि ग्रामीण तसेच दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सुविधा प्रभावीपणे पोहोचवता येतील. आजच्या डिजिटल युगात आरोग्य व्यवस्थेचे डिजिटायझेशन आणि एआय आधारित उपाययोजना अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आरोग्य संस्थांचे स्टार रेटिंग, आरोग्य सेवांचा समीक्षा अहवाल, आरोग्य हेल्पलाईन, आरोग्य कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण, तसेच सेवा गुणवत्तेचे नियमित रिव्ह्यू यांसारख्या उपक्रमांचा समावेश होता. या उपक्रमांमुळे नागरिकांचा आरोग्य सेवांवरील विश्वास अधिक दृढ होईल, असे श्री.फडणवीस यांनी नमूद केले. बैठकीदरम्यान ‘आपले गाव, आरोग्य संपन्न गाव’ योजना, पॉलिएटिव्ह केअर, सिकलसेल आजारावरील उपचार, वैद्यकीय अधिकाऱ्यांची भरती प्रक्रिया सुलभ करणे, वैद्यकीय अधिकाऱ्यांचे मानधन वाढवणे, तसेच राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे नियमित समावेशन जलद गतीने करणे याबाबत मागण्या मांडण्यात आल्या. याशिवाय आयुष संचालक, प्रशिक्षण संचालक आणि नर्सिंग क्षेत्रातील नवीन पदे निर्माण करण्याची आवश्यकताही उपस्थित अधिकाऱ्यांनी मांडली. या सर्व बाबींवर सकारात्मक प्रतिसाद देत मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी, राज्यातील आरोग्य सेवा अधिक मजबूत करण्यासाठी शासनाकडून आवश्यक ते सर्व सहकार्य दिले जाईल, अशी ग्वाही दिली. आरोग्य क्षेत्रातील मनुष्यबळ, पायाभूत सुविधा आणि तंत्रज्ञान यांचा समन्वय साधून दीर्घकालीन सुधारणा करण्यावर शासनाचा भर राहील, असे त्यांनी स्पष्ट केले. या बैठकीस सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव डॉ. निपुण विनायक, सचिव ई. रवींद्रन, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव धीरज कुमार, मुख्यमंत्री यांचे सचिव श्रीकर परदेशी, आरोग्य सेवा आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, आरोग्य संचालक डॉ. नितीन अंबाडेकर, समग्र संस्थेचे प्रतिनिधी गौरव गोयल तसेच सार्वजनिक आरोग्य व वैद्यकीय शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

सोमवार, १५ डिसेंबर, २०२५

छत्रपती संभाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे ‘श्री शंभूतीर्थ’ म्हणून लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्

इचलकरंजी, जि.कोल्हापूर #इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने शहरातील कॉ. के. एल. मलाबादे चौक सुशोभीकरण अंतर्गत उभारण्यात आलेल्
ते झाले. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज स्मारक समिती आणि इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने हा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला आहे. महानगरपालिकेसह येथील नागरिकांनी पुढाकार घेऊन लोकसहभागातून हा पुतळा उभारला आहे. यातील जनसहभाग महत्त्वाचा असून, हे एका अर्थाने जनतेचे स्मारक आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रेरणेने लोकांमध्ये तेज निर्माण होते. महाराजांचा इतिहास देदिप्यमान असून, तो प्रत्येकापर्यंत पोहोचला पाहिजे, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.

रविवार, १४ डिसेंबर, २०२५

2034 च्या फुटबॉल विश्वचषकासाठी 'प्रोजेक्ट महादेवा' मधून गुणवान खेळाडू मिळतील -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जागतिक फुटबॉलपट्टू लिओनेल मेस्सी यांच्या हस्ते प्रोजेक्ट महादेवा'चा शुभारंभ महाराष्ट्रातून निवडलेल्या 13 वर्षाखालील 60 बालफुटबॉलपटूंना विशेष प्रशिक्षण शिबिर व मार्गदर्शन मुंबई, दि.14: मिशन ऑलिम्पिक 2026 अंतर्गत महाराष्ट्रातून अधिकाधिक सुवर्णपदके मिळवणे आणि 2034 पर्यंत फुटबॉल विश्वचषकासाठी तयारीचे लक्ष्य ठेवून 'प्रोजेक्ट महादेवा' राबवण्यात येत आहे.या प्रोजेक्टमधून नक्कीच गुणवान खेळाडू मिळतीलअशी आशा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र शासनातर्फे 'प्रोजेक्ट महादेवा' या राज्यस्तरीय क्रीडा उपक्रमाचा शुभारंभ आज वानखेडे स्टेडियम येथे करण्यात आला. 'प्रोजेक्ट महादेवा' हा उपक्रम महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन (MITRA), व्हिलेज सोशल ट्रान्सफॉर्मेशन फाउंडेशन (VSTF), वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन (WIFA), सिडको (CIDCO) आणि महाराष्ट्र शासनाचा क्रीडा विभाग या विविध संस्थांच्या विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. जागतिक फुटबॉलपट्टू लिओनेल मेस्सी, अर्जेंटीनचे माजी खेळाडू लुईस सुआरेझ आणि रॉड्रिगो डिपॉल, क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे, खासदार प्रफुल्ल पटेल, भारतरत्न सचिन तेंडुलकर, भारतीय लोकप्रिय फुटबॉलपटू सुनील छेत्री, भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार राहुल भेके, महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन (मित्राचे)चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रविण परदेशी, श्रीमती अमृता देवेंद्र फडणवीस, गोट टूर प्रमोटर सत्तादूर दत्ता, टायगर श्रॉफ, अजय देवगण, कार्तिक आर्यन, दिनों मोरिया, जिंदाल ग्रुपच्या पार्थ जिंदल, वेदना जिंदल यांनी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, 'प्रोजेक्ट महादेवा' हा महाराष्ट्र शासनाचा महत्त्वाचा उपक्रम आहे, जो संपूर्ण राज्यात तरुण फुटबॉल मधील प्रतिभेचा (13 वर्षांखालील) शोध घेवून फुटबॉल मधील उच्च दर्जाचे खेळाडू घडविण्यासाठी सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत शिष्यवृत्ती, परदेशी प्रशिक्षकांकडून जागतिक दर्जाचे प्रशिक्षण आणि सर्वांगीण विकासाची संधी दिली जाणार आहे. निवडलेल्या 60 खेळाडूंची (30 मुले, 30 मुली) पाच वर्षांची संपूर्ण निवासी शिष्यवृत्ती मिळणार आहे. तसेच अव्वल खेळाडू नक्कीच फिफा विश्वचषक मध्ये खेळतील अशी आशा त्यांनी व्यक्त केली. प्रेक्षकांच्या पाठिंब्याशिवाय आपण मोठे होऊ शकत नाही: सचिन तेंडुलकर भारतरत्न सचिन तेंडुलकर म्हणाले की, जागतिक फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी आणि त्यांचे सहकारी भारतात आल्याबद्दल आणि तेही मुंबईत आल्याबद्दल सर्वांचे खूप खूप आभार मानतो.मुंबईकरांनी ज्या प्रकारे या तिघांचे स्वागत केले ते अत्यंत अविस्मरणीय आहे. मुंबई ही स्वप्नांची नगरी आहे आजचा क्षण हा अत्यंत अविस्मरणीय आहे. प्रेक्षकांच्या पाठिंब्याशिवाय आपण मोठे होऊ शकत नाही. आज मला वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सन 2011 च्या क्रिकेटच्या विश्वचषकाची आठवण झाली. आजचा क्षण हा सुवर्ण अक्षराने लिहिला जाईल. खेळामध्ये खेळाडूंना चिकाटी जिद्द अत्यंत महत्त्वाचे आहे लिओनेल मेस्सी जागतिक दर्जाचा खेळाडू असून त्याच्यामध्ये संवेदनशीलता त्याच प्रकारे त्यांनी या खेळाडूला दिलेल्या उत्तेजन अत्यंत महत्त्वाचे आहे याबद्दल मी मेसेज आभार मानतो आणि मेसीला व त्याच्या कुटुंबांना आरोग्यमय शुभेच्छा देतो. लिओनोल मेस्सी या नावाचा वानखेडे स्टेडियमवर जल्लोष जागतिक फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीने फुटबॉल प्रेमींना फुटबॉल प्रेक्षकांकडे भिरकवताच प्रेक्षकांनी लिओनोल मेस्सी या नावाचा जल्लोष केला. संपूर्ण मैदान मेस्सीच्या नावाने दुमदुमत होते. या वेळेला जागतिक फुटबॉलपटू लिओनल मेस्सीला सचिन तेंडुलकर यांच्या नावाची दहा नंबरची जर्सी सचिन तेंडुलकर यांनी भेट केली. जागतिक फुटबॉलपटू लिओनाल मेस्सीनेही सचिन तेंडुलकर याला फुटबॉल भेट दिला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जागतिक फुटबॉलपटू लिओनोल मेस्सी यांनी जर्सी भेट दिली. पार्थ जिंदाल, वेदना जिंदाल यांनी जिंदाल ग्रुपतर्फे व्हिलेज सोशल ट्रान्सफॉर्मेशन फाउंडेशन मार्फत 75 लाख रुपयांचा चेक प्रोजेक्ट महादेवाला दिला. महिंद्रा अँड महिंद्रा कंपनी तर्फे व्हिलेज सोशल ट्रान्सफॉर्मेशन फाउंडेशन मार्फत 99 लाख 99 हजार रुपयांचा धनादेश प्रोजेक्ट महादेवाला दिला. सक्षम आणि शाश्वत फुटबॉल विकास व्यवस्था उभी राहणार 'प्रोजेक्ट महादेवा' हा उपक्रम महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन (MITRA), व्हिलेज सोशल ट्रान्सफॉर्मेशन फाउंडेशन (VSTF), वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन (WIFA), सिडको (CIDCO) आणि महाराष्ट्र शासनाचा क्रीडा विभाग या विविध संस्थांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे धोरणात्मक दिशा, तळागाळातील सहभाग, व्यावसायिक फुटबॉल कौशल्य, पायाभूत सुविधा आणि प्रशासकीय पाठबळ मिळून राज्यात एक सक्षम आणि शाश्वत फुटबॉल विकास व्यवस्था उभी राहणार आहे. प्रोजेक्ट महादेवा हा महाराष्ट्र शासनाचा एक महत्त्वाचा उपक्रम प्रोजेक्ट महादेवा हा महाराष्ट्र शासनाचा एक महत्त्वाचा उपक्रम आहे, जो संपूर्ण राज्यात तरुण फुटबॉल प्रतिभेचा (13 वर्षांखालील) शोध घेण्यासाठी आणि त्यांना विकसित करण्यासाठी सुरू करण्यात आला आहे. या अंतर्गत शिष्यवृत्ती, परदेशी प्रशिक्षकांकडून जागतिक दर्जाचे प्रशिक्षण आणि सर्वांगीण विकासाची संधी दिली जाणार आहे. निवडलेल्या 60 खेळाडूंची (30 मुले, 30 मुली) पाच वर्षांसाठी संपूर्ण निवासी शिष्यवृत्ती मिळणार आहे.

शुक्रवार, १२ डिसेंबर, २०२५

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान शीर्षक गीताचे लोकार्पण

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानातून गावांच्या समृद्धीची दिशा मिळेल - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस •
नागपूर, दि. १२ : राज्यात मागील काही दिवसात झालेल्या पूर परिस्थितीमुळे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या अंमलबजावणीत अडथळा निर्माण झाला होता. मात्र आता नव्याने अभियानाला सुरुवात करण्यात आली असून या अभियानाच्या अंमलबजावणीतून गावांच्या समृद्धीची दिशा मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. विधान भवन येथील मंत्रिपरिषद सभागृहात मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान शीर्षक गीत लोकार्पण कार्यक्रम पार पडला. यावेळी दूरदृश्य प्रणालीद्वारे या कार्यक्रमात सहभागी झालेल्या सरपंच, ग्रामविकास अधिकारी, गटविकास अधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मार्गदर्शन केले. यावेळी ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, मागील दहा वर्षात राज्यामध्ये कुठल्याही अभियानाची यशस्वीता बघितली, तर त्यामध्ये लोकसहभाग अत्यंत महत्त्वाचा असल्याचे निदर्शनास येते. कुठलेही अभियान लोकसहभागाशिवाय यशस्वी होत नाही. जलयुक्त शिवार अभियान हे त्याचे मूर्तीमंत उदाहरण आहे. जलयुक्त शिवार अभियानामुळे जलसाक्षरता वाढून राज्य जलसंपन्न होण्यास मदत झाली. जलयुक्त शिवार अभियानाच्या अंमलबजावणीतून महाराष्ट्र ' रोल मॉडेल' म्हणून देशात पुढे आले. यासोबतच नरेगा ११ कलमी कार्यक्रम, मागेल त्याला शेततळे अभियान यशस्वीपणे राबविण्यात आले. गावाच्या सर्वांगीण विकासासाठी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान राबविण्यात येत आहे. लोकसहभागातून हे अभियान यशस्वी करावे. ग्रामपंचायत डिजिटल, स्वयं अर्थपूर्ण असाव्यात, तसेच गावांचा पर्यावरणपूरक विकास करण्यात यावा, यासाठी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान महत्त्वाचे ठरणार आहे. ग्रामसभांना या अभियानासाठी सहकार्य करणारे कलाकार उपस्थित राहणार आहेत, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. अभियानाच्या अंमलबजावणीतून गावांमध्ये समृद्धीची स्पर्धा निर्माण होईल. त्यामुळे सर्व ग्रामपंचायतींनी अभियानात सक्रिय सहभाग घेऊन अभियान यशस्वी करावे, असे आवाहनही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी केले. ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांनी अभियानाची पार्श्वभूमी सांगितली. ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाला अभिनेते भारत गणेशपुरे, संदीप पाठक, पृथ्वीक प्रताप, अभिनेत्री शिवाली परब, विभागाचे अधिकारी उपस्थित होते. थोडक्यात मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान.. ग्रामीण भागात स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून काम करणाऱ्या ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद यांच्या स्तरावर केंद्र, राज्य शासनाच्या सर्व योजना अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी स्पर्धा व्हावी, या स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या पंचायतराज संस्थांना प्रोत्साहन देऊन त्यांची कार्यक्षमता वाढावी, यासाठी तालुका, जिल्हा, महसूल विभाग व राज्य अशा चार स्तरांवर स्पर्धात्मक स्वरुपात सन 2025-26 या वर्षापासून “मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान” राबविण्‍यात येत आहे. ग्रामपंचायत सक्षम, सुशासनयुक्त, जलसमृद्ध, स्वच्छ व हरित गाव निर्माण करणे, मनरेगा व इतर योजनांशी अभिसरण, उपजिविका विकास व सामाजिक न्याय, लोकसहभाग व श्रमदान माध्यमातून लोकचळवळ हे या अभियानाचे मुख्य घटक आहेत. या अभियानांतर्गत विविध स्तरांवर पुरस्कार दिले जाणार आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला

सीईओ, ANSR, विक्रम आहुजा, ब्रुकफिल्डचे अंकुर गुप्ता यांच्यासोबत जिओ कन्व्हेशन सेंटर येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले. राज्यासाठी अनेक महत्त्वाच्या गुंतवणूक व तांत्रिक भागीदारी प्रकल्पाच्या अनुषंगाने यावेळी चर्चा करण्यात आली. महाराष्ट्राला GCC (जीसीसी) हब बनवण्याच्या दिशेने हा अतिशय महत्त्वाचा टप्पा असून ब्रुकफील्ड कंपनी मुंबईत सुमारे २० लाख चौरस फूट क्षेत्रावर आशियातील सर्वात मोठे Global Capability Center (GCC) अर्थात जागतिक क्षमता केंद्र उभारणार आहे. या प्रकल्पातून १५,००० थेट आणि ३०,००० अप्रत्यक्ष असे एकूण ४५,००० रोजगार निर्माण होणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले. राज्यातील प्रतिभा, पायाभूत सुविधा आणि उद्योगसुलभ वातावरणामुळे महाराष्ट्र जागतिक कॅपेबिलिटी सेंटरचे पसंतीचे ठिकाण ठरत आहे. नव्या जीसीसी धोरणामुळे मोठ्या प्रमाणात कौशल्याधारित रोजगारनिर्मिती आणि आर्थिक वृद्धी साधली जाईल. जागतिक लॉजिस्टिक्स क्षेत्रातील अग्रणी कंपनी FedEx देखील मुंबई–नवी मुंबई विमानतळ परिसरात आपल्या जीसीसी आणि इतर ऑपरेशन्ससाठी गुंतवणूक करण्यास उत्सुक आहे. मायक्रोसॉफ्टने आपल्या गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्राचा विचार करावा, याबाबत त्यांना विनंती केली असून सध्या देखील त्यांची सर्वात मोठी गुंतवणूक महाराष्ट्रामध्येच आहे. आगामी काळात मायक्रोसॉफ्ट मोठी गुंतवणूक करेल आणि महाराष्ट्राला कृत्रिम बुद्धिमत्तेचे केंद्र बनवण्यासाठी पुढाकार घेईल, असा विश्वासही मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी यावेळी केला. या ठिकाणी आयोजित मायक्रोसॉफ्ट एआय टूर (Microsoft AI Tour) कार्यक्रमात मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी सहभाग घेतला. सत्या नडेला यांनी महाराष्ट्र सरकारसोबत विकसित केलेल्या Crime AIOS प्लॅटफॉर्मचे विशेष प्रदर्शन या कार्यक्रमात केले. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने गुन्हे नियंत्रणात महाराष्ट्राने दिलेले मॉडेल देशभरासाठी दिशा देणारे असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

आशियातील सर्वात मोठे ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर महाराष्ट्रात उभारण्यात येणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

आशियातील सर्वात मोठे ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर महाराष्ट्रात उभारण्यात येणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एमएमआरडीए आणि ब्रुकफिल्ड कंपनी यांच्या संयुक्त नेतृत्वात प्रकल्प उभारणार मुंबई, दि.12: महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील प्रतिभा, पायाभूत सुविधा आणि व्यवसाय-अनुकूल वातावरण या तीन घटकांमुळे महाराष्ट्र ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटरसाठी अग्रगण्य ठरत आहे. यावर्षी जाहीर केलेले नवीन GCC धोरण राज्यात उच्च मूल्याच्या, कौशल्याधारित रोजगारनिर्मितीस प्रोत्साहन देईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितले. ब्रुकफिल्ड कंपनीने मुंबईतील पवई येथे 6 एकर जागेवर 20 लाख चौरस फूट भाडेतत्वावरील बांधकाम असलेला भव्य प्रकल्प उभारण्याची घोषणा केली आहे. या अंतर्गत बहुराष्ट्रीय बँकेचे आशियातील सर्वात मोठे ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर (GCC) स्थापन केले जाणार आहे. हा करार 20 वर्षांच्या कालावधीसाठी करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, या मोठ्या प्रकल्पांमुळे महाराष्ट्राच्या प्रगतीबाबत जागतिक स्तरावर विश्वास दृढ झाला आहे. आंतरराष्ट्रीय कंपन्यांच्या भविष्यातील गरजा पूर्ण करण्याबरोबरच, स्थिर आणि सक्षम वातावरण पुरवण्यास राज्य शासन तत्पर आहे. सदर प्रकल्प 2029 पर्यंत पूर्ण होणार असून, यामध्ये 1 अब्ज डॉलर्सपेक्षा अधिक गुंतवणूक अपेक्षित आहे तसेच 30,000 हून अधिक रोजगारनिर्मिती होणार आहे. हा प्रकल्प मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA) व ब्रुकफिल्ड यांच्या नेतृत्वाखाली भागीदार बी. एस. शर्मा यांच्या सहकार्याने राबविण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. मुख्यमंत्री म्हणाले की, ही उभारणी महाराष्ट्रातील गुंतवणूकदार-अनुकूल वातावरणाबाबत जागतिक कंपन्यांचा वाढता विश्वास अधोरेखित करणारी आहे. प्रकल्पासाठी 100 टक्के हरित उर्जेचा वापर करण्याचे उद्दिष्ट असून इमारत बाजारातील सर्वोत्तम शाश्वत बांधकाम मानकांनुसार उभारली जाणार आहे. यामुळे मुंबईचे ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर हब म्हणूनचे स्थान आणखी मजबूत होणार आहे. 2024 मध्ये ब्रुकफिल्डने पुण्यात एका मोठ्या वित्तीय सेवा कंपनीसाठी ‘बिल्ड-टू-सूट’ टॉवर उभारला होता. याच वर्षी MMRDA सोबत 12 अब्ज डॉलर्सच्या गुंतवणुकीचा सामंजस्य करार करण्यात आला. जून 2025 मध्ये कंपनीने बांद्रा-कुर्ला संकुलात 2.1 एकर जागा खरेदी केली आहे. ब्रुकफिल्डचे वरिष्ठ गुंतवणूक अधिकारी अंकुर गुप्ता म्हणाले , “आशिया खंडातील कार्यालय विकास क्षेत्रात नवा मापदंड ठरेल असा हा आयकॉनिक प्रकल्प आम्ही उभारत आहोत. मुंबईत करण्यात आलेली गुंतवणूक आता 4 अब्ज डॉलर्सपेक्षा अधिक झाली आहे. उच्च दर्जाची, शाश्वत आणि आधुनिक कार्यस्थळे निर्माण करण्यासाठी ब्रुकफिल्ड कटिबद्ध आहे.” ब्रुकफिल्ड ही भारतातील सर्वात मोठ्या कार्यालयीन मालक आणि ऑपरेटर कंपन्यांपैकी एक असून देशातील सात शहरांमध्ये सुमारे 55 दशलक्ष चौरस फूट क्षेत्राचे व्यवस्थापन करते. उच्च दर्जाच्या, ग्रेड-A प्रकल्पांची विकास व संचालन क्षमता कंपनीने सातत्याने सिद्ध केली आहे. पवईतील प्रस्तावित प्रकल्पाला उत्कृष्ट कनेक्टिव्हिटी, सामाजिक सुविधा व मोठ्या प्रमाणातील कुशल मनुष्यबळाचा लाभ मिळणार आहे. 0000

महाराष्ट्राला जीसीसी हब बनवण्याच्या दिशेने -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्राला जीसीसी हब बनवण्याच्या दिशेने महत्त्वाचा टप्पा मुंबईत येणार जगातील सर्वात मोठा GCC (जीसीसी) प्रोजेक्ट; ४५ हजार रोजगार निर्माण होणार मायक्रोसॉफ्टसोबत एआय सहकार्याची मोठी घोषणा
मुंबई, दि.12 - महाराष्ट्राला GCC (जीसीसी) हब बनवण्याच्या दिशेने हा अतिशय महत्त्वाचा टप्पा असून ब्रुकफील्ड कंपनी मुंबईत सुमारे 20 लाख चौरस फूट क्षेत्रावर आशियातील सर्वात मोठे Global Capability Center (GCC) अर्थात जागतिक क्षमता केंद्र उभारणार आहे. या प्रकल्पातून 15,000 थेट आणि 30,000 अप्रत्यक्ष असे एकूण 45,000 रोजगार निर्माण होणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. जिओ कन्व्हेशन सेंटर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला, सीईओ, ANSR , विक्रम आहुजा, ब्रुकफिल्डचे अंकुर गुप्ता यांच्यासोबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. राज्यासाठी अनेक महत्त्वाच्या गुंतवणूक व तांत्रिक भागीदारी प्रकल्पाच्या अनुषंगाने यावेळी चर्चा करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, राज्यातील प्रतिभा, पायाभूत सुविधा आणि उद्योगसुलभ वातावरणामुळे महाराष्ट्र जागतिक कॅपेबिलिटी सेंटरचे पसंतीचे ठिकाण ठरत आहे. नव्या GCC धोरणामुळे मोठ्या प्रमाणात कौशल्याधारित रोजगारनिर्मिती आणि आर्थिक वृद्धी साधली जाईल. जागतिक लॉजिस्टिक्स क्षेत्रातील अग्रणी कंपनी FedEx देखील मुंबई–नवी मुंबई विमानतळ परिसरात आपल्या GCC आणि इतर ऑपरेशन्ससाठी गुंतवणूक करण्यास उत्सुक आहे. मुख्यमंत्री म्हणाले की, मायक्रोसॉफ्टने आपल्या गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्राचा विचार करावा, याबाबत त्यांना विनंती केली असून सध्या देखील त्यांची सर्वात मोठी गुंतवणूक महाराष्ट्रामध्येच आहे. आगामी काळात मायक्रोसॉफ्ट मोठी गुंतवणूक करेल आणि महाराष्ट्राला कृत्रिम बुद्धिमत्तेचे केंद्र बनवण्यासाठी पुढाकार घेईल. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने गुन्हे नियंत्रणात महाराष्ट्राने दिलेले मॉडेल देशभरासाठी दिशा देणारे मुख्यमंत्री यांनी या ठिकाणी आयोजित Microsoft AI Tour कार्यक्रमात सहभाग घेतला. सत्या नडेला यांनी महाराष्ट्र सरकारसोबत विकसित केलेल्या Crime AIOS प्लॅटफॉर्मचे विशेष प्रदर्शन या कार्यक्रमात केले. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने गुन्हे नियंत्रणात महाराष्ट्राने दिलेले मॉडेल देशभरासाठी दिशा देणारे असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. सत्या नडेला यांच्या सोबत झालेल्या या बैठकीत आरोग्य, शिक्षण, कृषी आणि सरकारी सेवा वितरणासाठी AI Co-Pilots विकसित करण्यावर चर्चा झाली. मायक्रोसॉफ्टने भारतातील त्यांच्या $17 अब्जांच्या सर्वात मोठ्या गुंतवणुकीत महाराष्ट्राला प्राधान्य देण्याचे आश्वासन दिल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी स्पष्ट केले. महाराष्ट्राने विकसित केलेल्या मार्बल Marble प्लॅटफॉर्ममुळे सायबर आणि आर्थिक गुन्हे 3–4 महिन्यांच्या ऐवजी फक्त 24 तासांत शोधता येतात. ज्यामुळे लोकांचे पैसे वाचत आहेत आणि गुन्हेगारांना शोधणे अधिक जलद झाले आहे. यावेळी मुख्यमंत्री कार्यालयाच्या प्रधान सचिव अश्विनी भिडे, उद्योग विभागाचे सचिव डॉ.अनबलगन, यांच्यासह संबंधित मान्यवर उपस्थित होते. 0000