शनिवार, ३० जानेवारी, २०२१



विभागीय आयुक्त कार्यालयात
मौन पाळून हुतात्म्यांना आदरांजली

अमरावती, दि. ३० : देशाच्या स्वातंत्र्यासाठी हुतात्मे झालेल्यांच्या स्मरणार्थ आदर व्यक्त करण्यासाठी आज दरवर्षी संपूर्ण देशभर दोन मिनिटे मौन पाळून त्यांना आदरांजली वाहण्यात येते. त्यानुसार आज सकाळी ११ वाजता विभागीय आयुक्त कार्यालयात मौन पाळून हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यात आली.

यावेळी विभागीय आयुक्त पीयूष सिंह, सहायक आयुक्त विवेकानंद काळकर, तहसिलदार वैशाली पाथरे, नाझर श्री. पेठे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

*****

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा