बुधवार, २६ सप्टेंबर, २०१८


गटांच्या प्रादेशिक परिषद निवडीसाठी
प्रस्ताव आंमंत्रित
अमरावती, दि. 26 :  राष्ट्रीय शाश्र्वत शेती अभियानांतर्गत परंपरागत कृषी विकास योजना ( सेंद्रिय शेती) अंतर्गत सन 2018-19 करिता अमरावती जिल्ह्यात नविन 5 गटांसाठी प्रादेशिक  परिषदेची निवड करण्याकरिता दि. 30 सप्टेंबर 2018 पर्यत पात्र संस्थानी प्रस्ताव सादर करावे, असे आवाहन प्रकल्प संचालक, आत्मा कार्यालय, अमरावतीच्या वतीने करण्यात येत आहे.
राष्ट्रीय शाश्र्वत शेती अभियानांतर्गत परंपारिक शेतीमध्ये आधूनिक विज्ञान व तंज्ञज्ञानाचा वापर करुन शाश्र्वत सेंद्रिय शेतीचे मॉडेल मुल्यवृध्दी  धर्तीवर विकसीत करणे तसेच दीर्घकालीन मातीची सुपिकता वाढविणे, साधनसामुग्री संवर्धन सुनिश्चित करणे आणि रसायनांचा वापर न करता जैविक अभिक्रियाद्वारे घेतलेल्या सुरक्षित आणि निरेागी अन्नाचा पुरवठा करणे इ. विविध उपक्रम राबविले जातात.
सन 2018-19 करीता जिल्ह्यात नविन 5 गटांसाठी प्रादेशीक परिषदेची निवड केली जाणार आहे. यासाठी पात्र संस्थेकडून प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. या संस्थेकडे तांत्रिक, विपणन व प्रशिक्षण क्षेत्रातील तज्ञ असणे आवश्यक आहे. कमीत कमी 10 स्थानिक गटांसाठी काम करण्याची क्षमता तसेच एकूण 500 शेतकऱ्याची यादी जोडणे अनिवार्य आहे. योजनेच्या लाभासाठी कायदेशिरित्या नोंदणीकृत,आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेली आणि तीन वर्षाचा लेखापरिक्षण अहवाल असलेली संस्था अधिकृत राहील. कोणत्याही संघटनेच्या व शासनाच्या काळ्या यादीत सदर संस्थेचे नाव नसावे. त्यासाठी स्वयंघोषणा पत्र आवश्यक आहे. सेंद्रिय शेतीमध्ये पीजीएस-इंडिया/थर्ड पार्टी प्रमाणपत्राचा ( टीपीसी) पुरेसा (कमीत कमी 5 वर्ष ) अनुभव असल्याचे प्रमाणपत्र तसेच पुरावा देणे बंधनकारक राहील. सदर संस्थेचे स्थायी कार्यालय आणि पुरेसा कर्मचारी ( पीजीएस-इंडिया कार्यक्रम चालू करण्यासाठी प्रस्तावित) असल्याबाबतचा पुरावा देणे बंधनकारक राहील. स्वत:चे मुख्यालय व्यतिरिक्त इतर कोणत्याही ठिकाणी काम करावयाचे असल्यास/प्रस्तावित केल्यास त्या ठिकाणच्या शाखा कार्यालयाचा संपूर्ण पत्ता व अनुषंगिक माहिती देणे आवश्यक राहील. ऑनलाईन पक्रियेसाठी ( जसे संगणक, प्रिन्टर,इंटरनेट सुविधा इ.) पुरेशी मुलभूत सुविधा असणे आवश्यक राहील. याशिवाय अन्य सोयीसुविधा व अटी पुर्ण करणाऱ्या संस्थेने प्रादेशिक परिषदेसाठी प्रकल्प संचालक, आत्मा कार्यालय, अमरावती येथे दि. 30 सप्टेंबर 2018 पर्यंत अर्ज सादर करावे.
असे प्रकल्प संचालक कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा ( आत्मा),अमरावती  यांनी कळविले आहे.


*****

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा