इयत्ता
10 वीच्या विद्यार्थ्यांनी गुण पडताळणी करीता
8
सप्टेंबर पर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करावे
अमरावती, दि. 1 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक
शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक,
लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत
इयत्ता 10 वीची परीक्षा दि. 17 जुलै ते 2 ऑगस्ट 2018 या कालावधीत आयोजित करण्यात
आली होती. परीक्षेचा निकाल 29 ऑगस्ट रोजी जाहीर झाला. ज्या विद्यार्थ्यांना गुणांची पडताळणी करावयाची
आहे त्यांनी ऑनलाईन निकाल जाहीर झाल्यानंतर विहित नमून्यात विहित शुल्कासह दि. 8
सप्टेंबर 2018 पर्यंत संबंधित विभागीय मंडळाकडे अर्ज करावयाचा आहे. अर्जासोबत
ऑनलाईन निकालाची प्रत/गुणपत्रिकेची छायाप्रत जोडणे अनिवार्य राहील.
ज्या विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकांची छायाप्रत प्राप्त करावयाची
आहे त्यांनी ऑनलाईन निकाल जाहीर झाल्यानंतर विहित नमून्यात, विहित शुल्कासह दि. 18
सप्टेंबर 2018 पर्यंत संबंधित विभागीय मंडळाकडे अर्ज करावयाचा आहे. अर्जासोबत
ऑनलाईन निकालाची प्रत/गुणपत्रिकेची छायाप्रत जोडणे अनिवार्य राहील. अर्जाचा नमूना
मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. जुलै-ऑगस्ट 2018 च्या परीक्षेमधील उत्तरपत्रिकांचे
पुनर्मूल्यांकन करण्यासाठी प्रथम उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे अनिवार्य असून
छायाप्रत मिळालाच्या दुसऱ्या दिवसापासून कार्यालयीन कामकाजाच्या पाच दिवसांत
पुनर्मूल्यांकनाच्या कार्यपध्दतीचा अवलंब करुन विहित नमुन्यात, विहित शुल्क भरुन
संबंधित विभागीय मंडळाकडे विद्यार्थ्यांना अर्ज करणे आवश्यक राहील. ज्या
विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकन करावयाचे असेल त्यांनी अधिक
माहितीसाठी संबंधित माध्यमिक शाळा/विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा.
मार्च 2019 मधील माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इयत्ता 10 वी)
परीक्षेस ज्या विद्यार्थ्यांना प्रविष्ट व्हावयाचे आहे अशा पुनर्परिक्षार्थी, नाव
नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी तसेच श्रेणीसुधार योजनेअंतर्गत
प्रविष्ट होणारे व अन्य विद्यार्थ्यांची आवेदनपत्र ऑनलाईन पध्दतीने स्विकारली
जातील. त्याच्या तारखा स्वतंत्रपणे कळविण्यात येतील असे डॉ. अशोक भोसले प्र. सचिव,
राजयमंडळ, पुणे यांनी कळविले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा