रविवार, २० मार्च, २०२२

ग्रामीण भागाच्या विकासकामांसाठी निधी कमी पडू देणार नाही - ॲड. यशोमती ठाकू

 

ग्रामीण भागाच्या विकासकामांसाठी निधी कमी पडू देणार नाही

                                                                       -        ॲड. यशोमती ठाकूर

तिवसा तालुक्यात  6 कोटी 50 लक्ष रुपये निधीतून

विविध विकासकामांचे भूमिपूजन










        अमरावती, दि.20 (विमाका) : जिल्ह्यातील ग्रामीण भाग औद्योगिकदृष्ट्या स्वयंपूर्ण व सक्षम व्हावा यासाठी बळकट व सुरक्षित रस्त्यांची निर्मिती करण्यात येत आहे. ग्रामीण भागातील नागरिकांसाठी दळणवळनासह इतर नागरी सुविधांच्या निर्मितीसाठी विकासनिधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी दिवानखेड येथे दिली.

आज तिवसा येथील दिवाणखेड, मार्डी, चेनुष्ठा, जहागिरपुर, बोर्डा, आखतवाडा, धामंत्री, उंबरखेड, तारखेड, मोझरी येथील रस्त्यांच्या कामाचे भूमिपूजन श्रीमती ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी त्या बोलत होत्या.

विकासकामांचे प्रस्ताव तात्काळ सादर करावे

दिवाणखेड येथे 11 लक्ष रुपयांच्या निधीतून स्थानिक रस्त्याच्या कामाचे, 20 लक्ष रुपयांच्या निधीतून मूलभूत सुविधा निधीअंतर्गत मार्डी-तिवसा येथील गणपती मंदिर ते पेट्रोल पंप कडे जाणाऱ्या रस्त्याचे काँक्रीटीकरणच्या कामाचे, स्थानिक रस्त्याच्या कामाचे व पारधी वस्ती ते बळीराम महाराज मंदिरापर्यंत करण्यात येणाऱ्या रस्त्याचे भूमिपूजन श्रीमती ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. येथे व्यायामशाळा,वाचनालय, दिवाणखेड-परसोडा रस्त्याचे खडीकरण, काँक्रीटीकरण, नाला खोलीकरण आदींच्या कामासाठीचे प्रस्ताव तात्काळ सादर करण्याचे निर्देश श्रीमती ठाकूर यांनी संबंधितांना दिले.

कुऱ्हा येथे 1 कोटी 10 लक्ष रुपयांच्या निधीतून विकासकामे

कुऱ्हा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या मुख्य इमारतीची दुरुस्ती, निवासस्थानाची दुरुस्ती, संरक्षक भिंतीची उभारणी, हरिजन वस्तीतील सौंदर्यीकरण, स्थानिक रस्त्याचे काँक्रीटीकरण, हनुमान मंदिर परिसरातील रस्त्याचे काँक्रीटीकरण आदी कामे 1 कोटी 10 लक्ष रुपयांच्या निधीतून करण्यात येत आहे. या कामांचे भूमिपूजन श्रीमती ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले.

चेनुष्ठा येथे 1 कोटी 55 लक्ष रुपयांच्या निधीतून विकासकामांचे भूमिपूजन

कुऱ्हा-चेनुष्ठा-बोर्डा येथे लहान पुलाचे बांधकाम, रस्ता काँक्रीटीकरण, रस्त्याची सुधारणेच्या 1 कोटी 55 लक्ष रुपयांच्या निधीतुन करण्यात येणाऱ्या कामाचे भूमिपूजन श्रीमती ठाकूर यांनी केले. पुलाची उंची योग्य असावी. पुलनिर्मितीचे काम गतीने पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी संबंधितांना दिले.

बोर्डा, आखतवाडा, उंबरखेड, मोझरी येथील रस्ता व पुलाच्या कामाचे भूमिपूजन

बोर्डा शिंदवाडी येथील 38 लक्ष रुपयांच्या  निधीतुन करण्यात येणाऱ्या कामाचे, आखतवाडा-धामंत्री रस्त्याचे 50 लक्ष रुपयांच्या निधीतुन मजबुतीकरण, उंबरखेड ते तारखेड रस्ता व नालीचे 36 लक्ष निधीतुन बांधकाम, दापोरी जावरा रस्ता व पुलाचे 1 कोटी 50 लक्ष निधीतुन बांधकाम व मोझरी ते शेंदूरजना बाजार रस्त्याचे मनरेगा अंतर्गत  मोझरी गावातील रस्त्याचे बांधकामाचे भूमिपूजन श्रीमती ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले.

जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाच्या  सभापती पूजा आमले, पंचायत समिती सभापती शिल्पा हांडे, तिवसा तहसीलदार वैभव फरतारे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता, जिल्हा परिषद बंधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता आदी उपस्थित होते.

000000

शुक्रवार, ११ मार्च, २०२२

विभागीय लोकशाही दिन सोमवारी

 

विभागीय लोकशाही दिन सोमवारी

 

अमरावती, दि. 11:- दर महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी विभागीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. त्याअनुषंगाने दि. 14 मार्च रोजी सकाळी 11 वाजता विभागीय आयुक्त कार्यालयातील सभागृहात लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. नागरिकांनी शासकीय विभागाशी निगडित आपल्या तक्रारी, गाऱ्हाणी इ. संदर्भातील प्रकरणे, निवेदन लेखी स्वरुपात सादर करावे. नागरिकांनी त्यांच्या तक्रारीं पोस्टाद्वारे, dcgamravati@gmail.com/dcg_amravati@rediffmail.com या संकेतस्थळावर किंवा व्यक्तीश: विभागीय आयुक्त

 कार्यालयात हजर  राहावे. तसेच उपस्थित राहणाऱ्या नागरिकांनी कोविड प्रतिबंधक उपायांचे पालन करावे असे  विभागीय उपआयुक्त संजय पवार यांनी कळविले आहे.

000000

 

 

गुरुवार, १० मार्च, २०२२

मत्स्यव्यवसाय विभागात कंत्राटी पद्धतीने पदभरती अर्जदारांनी 14 मार्च पर्यंत अर्ज सादर करावे/आदिवासी भागात सांस्कृतीक संकुल बांधण्याच्या योजनेकरीता 21 मार्च पर्यंत प्रस्ताव सादर करावे

 

                                   मत्स्यव्यवसाय विभागात कंत्राटी पद्धतीने पदभरती

अर्जदारांनी 14 मार्च पर्यंत अर्ज सादर करावे

अमरावती दि.:- मत्स्यव्यवसाय विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या सर्व योजनांच्या तसेच मत्स्यबीज उत्पादन, मत्स्योत्पादन, सर्वेक्षण इत्यादी बाबींसाठी प्रादेशिक व जिल्हा स्तरावरील माहितीचे संकलन करुन, संकलित केलेली माहिती ऑनलाईन उपलब्ध करण्याकरीता अमरावती विभागातील प्रादेशिक कार्यालयांतील मत्स्यव्यवसाय विभागामध्ये कंत्राटी पध्दतीने एकूण सहा डाटा एन्ट्री ऑपरेटर या  पदांची निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात भरती करण्यात येणार आहे. असे आयुक्त मत्स्यव्यवसाय यांनी कळविले आहे. या पदांचे नियुक्ती कार्यक्षेत्र अमरावती. अकोला, वाशिम, बुलडाणा व यवतमाळ या जिल्ह्यांसाठी राहील. उमेदवारांनी त्यांचे अर्ज प्रत्यक्ष कार्यालयात किंवा दिलेल्या ई-मेल द्वारे संबंधित जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय यांच्या कार्यालयात सादर करुन अर्जाची एक प्रत प्रादेशिक उपआयुक्त मत्स्यव्यवसाय, अमरावती विभाग कार्यालयास व ई मेलवर सादर करावी. दि. 14 मार्च 2022 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. अधिक माहितीसाठी 0721-2662801 या क्रमांकावर व pmmsy.rdcamravti@gmail.com  या मेल आयडीवर संपर्क साधावा असे प्रादेशिक उपआयुक्त मत्स्यव्यवसाय विजय शिखरे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

                                                                   0000000

वृत्त क्र. 93                                                                दिनांक: 10 मार्च 2022

आदिवासी भागात सांस्कृतीक संकुल बांधण्याच्या योजनेकरीता

21 मार्च पर्यंत प्रस्ताव सादर करावे

अमरावती दि. 10:- आदिवासी उपयोजना क्षेत्र, आदिवासी उपयोजना बाहेरील क्षेत्र व माडा- मिनीमाडा क्षेत्र यामध्ये आदिवासी बांधवाकरीता सांस्कृतीक संकुल बांधणे हि योजना राबविण्यात येत आहे.

             त्याअनुषंगाने आदिवासी उपयोजना क्षेत्रामधील चिखलदरा तालुक्यामधील व ओटीएसपी क्षेत्रामधील अंजनगाव सुर्जी, दर्यापूर, भातकूली, नांदगाव खंडेश्वर, धामणगाव रेल्वे, चांदूर रेल्वे, चांदूर बाजार, अचलपूर, अमरावती व तिवसा तालुक्यातील आदिवासी लोकसंख्या जादा प्रमाणात असलेल्या ग्रामपंचायतीकडून, नगरपालीकांकडून व नोंदणीकृत आदिवासी स्वयंसेवी पात्र संस्थांकडून शासन निर्देशाप्रमाणे आवश्यक त्या दस्तऐवजासह विहीत नमुन्यातील प्रस्ताव प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी  विकास प्रकल्प धारणी येथे 11 मार्च 2022 ते 21 मार्च 2022  पर्यत सादर करण्यात यावे. तसेच ज्या गावांमध्ये ठक्कर बाप्पा योजनेतर्गत आदिवासी भवन या पुर्वी बांधण्यात आले असेल अथवा सदयस्थीतीमध्ये प्रस्तावीत असेल अशा गावांमधील प्राप्त प्रस्तावांचा विचार अन्य गावांमधील प्रस्ताव निकषाप्रमाणे प्राप्त न झाल्यास दुय्यम स्तरावर करण्यात येईल.

                प्रस्तावाचे अनुषंगाने प्रस्तावाचा विहीत नमुना व आवश्यक कागदपत्रांची यादी प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प धारणी या कार्यालयामधून प्राप्त करुन घेण्यात यावे. अधिक संपर्क करीता दुरध्वनी क्र. 07226-224217 वर संपर्क करावा, असे आवाहन सहायक जिल्हाधिकारी तथा धारणीचे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी  वैभव वाघमारे यांनी केले आहे.

                                                         0000000

वृत्त क्र. 94                                                                दिनांक: 10 मार्च 2022

 

   लैंगिक छळ प्रतिबंध व निवारण कायद्याबाबत

जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यशाळा

 

              अमरावती दि 10: कामाच्या ठिकाणी महिलांचा होणारा लैंगिक छळ प्रतिबंध व निवारण कायदा व अंतर्गत तक्रार समितीच्या कामकाजाची कार्यपद्धती या विषयावरील कार्यशाळा जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून जिल्हाधिकारी कार्यालयातील बचतभवनात मंगळवारी झाली. त्यात महिला व बालक विशेष कक्षाच्या प्रादेशिक समन्वय अधिकारी प्रतिभा गजभिये यांनी मार्गदर्शन केले.

अपर जिल्हाधिकारी रामदास सिद्धभट्टी हे कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी होते. निवासी उपजिल्हाधिकारी आशिष बिजवल, राज्य उत्पादन शुल्कच्या अधिक्षक श्रीमती अहेर, तहसिलदार वैशाली पाथरे, प्रज्ञा महांडुळे, निकिता जावरकर, जिल्हा नप प्रशासन अधिकारी गीता वंजारी, जिल्हा कोषागार अधिकारी शिल्पा पवार, नायब तहसिलदार व्ही. आर. उगले, श्रीमती खंडोकर, विधी अधिकारी नरेंद्र बोहरा आदी उपस्थित होते.

 

कामाच्या ठिकाणी स्त्रियांची लैंगिक किंवा कुठलीही छळवणूक होत असेल तर कार्यालयांतर्गत तक्रार निवारण समितीच्या माध्यमातुन तक्रारीचे निवारण होणे आवश्यक आहे. प्रत्येक कार्यरत महिलेने या समितीची कार्यपद्धती समजून घेणे गरजेचे आहे, असे श्रीमती गजभिये यांनी यावेळी सांगितले.  

 

कामाच्या ठिकाणी महिलांना येणाऱ्या अडचणींचे निराकरण करण्यासाठी कार्यालयांतर्गत समिती स्थापित असणे आवश्यक आहे. तसा कायद्याचा उद्देश आहे. त्यानुसार प्रत्येक आस्थापनेमध्ये अंतर्गत तक्रार समिती गठित असावी. अंतर्गत तक्रार निवारण समितीची कार्यप्रणाली, समस्या सोडविण्याची पद्धती याबाबत श्रीमती गजभिये यांनी यावेळी मार्गदर्शन केले. माधुरी सगणे यांनी सूत्रसंचालन केले.

जिल्ह्यातील अंतर्गत तक्रार निवारण समितीचे अध्यक्ष, सदस्य व जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

                                                                 0000

बुधवार, ९ मार्च, २०२२

 

                           राजर्षी शाहु महाराज शिष्यवृत्तीचा लाभ घेण्यासाठी

                              विद्यार्थ्यांनी 11 मार्च पर्यंत अर्ज सादर करावे

अमरावती दि.8:- अनूसुचित जातीच्या (नैवबौध्दंसहीत) विद्यार्थ्यांनी देशातील उच्च शिक्षण घेण्यासाठी राजर्षी शाहु महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती योजना राज्याच्या सामाजिक न्याय विभागाकडून राबविली जाते. या योजनेसाठी सन 2021-22 या वर्षाकरिता अर्ज सादर करण्याचे आवाहन समाज कल्याण विभागाचे आयुकत डॉ. प्रशांत नारनवरे यांनी केले आहे.

               राज्यातील अनूसुचित जातीच्या नवबौध्द विद्यार्थ्यांसह 100 विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ दिला जात आहे. पात्र विद्यार्थ्यांस संबंधित विद्यापिठ , संस्थेने अभ्यासक्रमासाठी ठरवून दिलेले पुर्ण शिक्षण शुल्क, नोंदणी फी, जिमखाना, ग्रंथालय, संगणक, तसेच वसतिगृह व भोजन शुल्क इत्यादी शुल्क रक्कम विद्यार्थ्यांच्या आधार संलंग्न बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. पदवी अभ्यासक्रमासाठी इयत्ता 12 वीत किमान 55 टक्के गुण असणे आवश्यक आहे. तर पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांने पदवीत किमान 55 टक्के गुण मिळविणे आवश्यक आहे. तसेच कुटूंबाचे वार्षिक उत्पन्न मर्यादा 6 लाख आहे. या शिष्यवृत्ती करिता निवड झालेल्या विद्यार्थ्यांस भारत सरकार शिष्यवृत्ती लाभ मिळणार नाही. या अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षाला शिकत असला पाहीजे. तथापि पुढील वर्षाचे विद्यार्थी अर्ज करु शकतात. परंतु त्यांच्या विचार प्रथम वर्षाचे विद्यार्थी न मिळाल्यास करण्यात येईल.

               या योजनेचा लाभ घेण्याबाबत अधिक माहिती, जाहीरात, अर्ज व नियमावली शासनाच्या www.maharashtra.gov.in  या संकेस्थळावर जलद दुवे रोजगार या मथळ्याखाली प्रसिध्द झालेली आहे. संकेतस्थळावरुन अर्ज डाऊनलोड करुन परिपुर्ण अर्ज आवश्यक त्या कागदपत्रासह दि. 11 मार्च 2022 रोजी सांयकाळी 6.15 वाजेपर्यत swceda.nationalscholar@gmail.com  या ईमेल वर पाठवावे. अर्जाची प्रत समाज कल्याण आयुक्तालय, 3 चर्च रोड पुणे – 411001 येथे सादर करण्यात यावी, असे समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे पुणे यांनी व प्रादेशिक समाज कल्याण उपआयुक्त सुनील वारे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

 

0000


                           बारावीच्या परीक्षेतील एकाच दिवशी येणाऱ्या

               दोन विषयांची परीक्षा विद्यार्थी 5 व 6 एप्रिलला देऊ शकतील

अमरावती दि. 9:-  इयत्ता बारावीची परीक्षा दिनांक 4 मार्च पासुन सुरु झाली असुन वेळापत्रकाप्रमाणे माहिती तंत्रज्ञान विषयाची ऑनलाईन परीक्षा दिनांक 31 मार्च, 01 व 4 एप्रिल 2022 रोजी सकाळी साडेदहा ते दुपारी दिड आणि दुपारी तीन ते सहा याप्रमाणे सकाळच्या व दुपारच्या सत्रात प्रत्येकी 3 तास या कालावधीची राहील. तसेच इयत्ता बारावीची सामान्यज्ञान या विषयाची ऑनलाईन परीक्षा दि. 1, 4 व 5 एप्रिल 2022 रोजी सकाळी साडेदहा ते दुपारी एक व दुपारी तीन ते दुपारी साडेपाच याप्रमाणे सकाळाच्या व दुपारच्या सत्रात प्रत्येकी 2 तास 30 मिनिटे या कालावधीची राहील हे मंडळाकडून कळविण्यात आले आहे.

              इयत्ता बारावीच्या परीक्षेच्या वेळापत्रकातील अंशत: बदलानुसार शनिवार दि. 5 मार्च 2022 रोजी होणाऱ्या  प्रथम व द्वितीय सत्रातील भाषा विषयाच्या परीक्षा मंगळवार दि. 5 एप्रिल 2022 रोजी  आयोजित करण्यात आलेल्या आहेत. मूळ वेळापत्रकानुसार इयत्ता 12 वी माहिती तंत्रज्ञान (आय. टी.) या विषयाची ऑनलाईन परीक्षा दि. 31 मार्च 2022 आणि 1 व 4 एप्रिल 2022 या कालावधीमध्ये सकाळ व दुपार सत्रात आयोजित करण्यात आलेली आहे. आणि दि. 5 एप्रिल 2022 रोजी पुर्नपरीक्षेची संधी उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. काही विद्यार्थ्यांनी भाषा विषय आणि माहिती तंत्रज्ञान विषय एकत्रित घेतले असल्यास त्यांना अडचण निर्माण होऊ नये यासाठी दिनांक 5 व 6 एप्रिल रोजी पुर्नपरीक्षेची संधी उपलब्ध करुन देण्यात येत आहे. असे अमरावती विभागीय मंडळाचे सचिव उल्हास नरड यांनी कळविले आहे.

0000000

             दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षेच्या आदल्या दिवशी पर्यंत आवेदनपत्र भरण्याची सुविधा

                        विद्यार्थी 14 मार्च पर्यंत ऑनलाईन आवेदन सादर करु शकतील

 

            अमरावती दि. 9: राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत मार्च - एप्रिल 2022 मध्ये इयत्ता दहावी ची परीक्षा दिनांक 15 मार्च ते 4 एप्रिल 2022 या कालावधीत आयोजित करण्यात आलेली आहेत.

या परीक्षेसाठी आवेदनपत्र भरणाऱ्या विद्यार्थ्यांना विलंब शुल्क आकारण्यात येऊ नये. विलंब शुल्क माफ करण्यात यावे तसेच विद्यार्थ्याना परीक्षेच्या आदल्या दिवशीपर्यत ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात यावी असे कळविण्यात आले आहे. त्यानुसार सर्व संबंधित घटकांना विभागीय मंळामार्फत अवगत करण्याबाबत कार्यवाही करण्यात आलेली आहे.

                  इयत्ता दहावीची परीक्षा दिनांक 15 मार्च  पासून सुरु होत असल्याने या परीक्षेचे आवेदनपत्र नियमित शुल्कासह ऑनलाईन पध्दतीने दि. 14 मार्च 2022  रोजी सकाळी 11 वाजेपर्यत भरण्याची सुविधा उपलब्ध राहील, त्यानंतर आवेदनपत्र भरणेसाठी संकेतस्थळ बंद करण्यात येणार आहे. मार्च - एप्रिल 2022 मध्ये इयत्ता दहावी परीक्षेस प्रविष्ट होण्यासाठी खाजगी विद्यार्थी म्हणून नाव नोंदणीसाठी अर्ज केलेल्या परंतू प्रस्तावामध्ये त्रुटी असणाऱ्या विद्यार्थ्यांनी दि 10 मार्च 2022 पर्यत त्रुटीची पुर्तता करुन दि. 12 मार्च 2022 पर्यत नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त करुन घ्यावे व दिलेल्या मुदतीत परीक्षेचे आवेदनपत्र भरावे. असे अमरावती विभागीय मंडळाचे सचिव उल्हास नरड यांनी कळविले आहे.

0000000

 

शुक्रवार, ४ मार्च, २०२२

राज्य मुक्त विद्यालय मंडळाच्या इयत्ता पाचवी व आठवीत प्रवेशासाठी 31 मार्च पर्यंत मुदतवाढ

 

राज्य मुक्त विद्यालय मंडळाच्या

इयत्ता पाचवी व आठवीत प्रवेशासाठी 31 मार्च पर्यंत मुदतवाढ

अमरावती दि.04 (विमाका):- महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळामध्ये इयत्ता पाचवी व आठवीसाठी नव्याने प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता ऑनलाईन पध्दतीने नाव नोंदणी प्रवेश अर्ज दिनांक 1 फेब्रुवारी 2022 ते 28 फेब्रुवारी या कालावधी निश्चित करण्यात आल होता. सदर कालावधी संपुष्टात आला आहे. परंतु या ऑनलाईन नावनोंदणी प्रवेश अर्ज भरण्यास व कागदपत्रे स्विकारण्यास मुदतवाढ देण्यात येत आहे.

 विद्यार्थ्यांना ऑनलाईन नावनोंदणी अर्ज दिनांक 1 मार्च  ते 31 मार्च 2022 पर्यंत सादर करता येतील. विद्यार्थ्यांनी मूळ अर्ज, विहित शुल्क व मूळ कागदपत्रे अर्जावर नमुद केलेल्या संपर्क केंद्र दि. 2 मार्च  ते दि. 4 एप्रिल 2022 पर्यत शाळेमध्ये जमा करावे. संपर्क केंद्र शाळांनी विद्यार्थ्यांचे अर्ज विहित शुल्क, मुळ कागदपत्रे व यादी विभागीय मंडळात दि. 7 एप्रिल पर्यंत जमा करावी.

मुक्त विद्यालय मंडळाच्या इयत्ता पाचवी आणि इयत्ता आठवीसाठी प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांनी http://msbos.mh-ssc.ac.in संकेतस्थळाचा वापर करावा, असे  अमरावती विभागीय मंडळाचे सचिव उल्हास नरड यांनी कळविले आहे.  

0000000

इयत्ता अकरावी व बारावीकरीता सुधारीत विषय योजना व मुल्यमापन योजना

 

इयत्ता अकरावी व बारावीकरीता

सुधारीत विषय योजना व मुल्यमापन योजना

अमरावती दि.4 (विमाका) : कनिष्ठ महाविद्यालयातील विविध घटकांच्या मागणी नुसार विज्ञान शाखेसाठी ग्रुप सी मधुन वगळण्यात आलेल्या शिक्षणशास्त्र विषयांस प्रविष्ठ विद्यार्थ्यांना सन 2022 च्या बारावीच्या परिक्षेस संधी देण्याबाबत व ग्रुप बी व ग्रुप सी मधून घ्यावयाच्या वैकल्पिक विषयांच्या संख्येच्या मर्यादांच्या फेरविचार करण्यात आला असुन त्यात सुधारणा करण्यात आल्या आहेत.

विषययोजनेत कला शाखेसाठी शिक्षणशास्त्र हा विषय ग्रुप सी मध्येच समाविष्ट असेल. कला व वाणिज्य शाखांसाठी आठ विषयांची निवड करताना ग्रुप ए मधील चार विषय पूर्वीप्रमाणे अनिवार्य असतील. उर्वरित चार वैकल्पिक विषयांची निवड करताना ग्रुप बी मधून किमान दोन विषय निवडावे लागतील आणि उर्वरित दोन विषयांसाठी ग्रुप बी मधून शून्य, एक किंवा दोन आणि ग्रुप सी मधून शून्य, एक किंवा दोन या मर्यादेत ग्रुप बी आणि सी मधून एकूण दोन विषयांची निवड करता येईल.

विज्ञान शाखेसाठी

विज्ञान शाखेसाठी शिक्षणशास्त्र हा विषय ग्रुप सी मधून वगळण्यात आलेला आहे. परंतु ज्या विद्यार्थ्यांनी पूर्वीच्या विषय योजनेनुसार विषयांची निवड केलेली आहे त्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये म्हणून विज्ञान शाखेसाठी ग्रुप सी मधून वगळण्यात आलेल्या शिक्षणशास्त्र विषयास प्रविष्ट विद्यार्थ्यांना सन 2020 च्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता बारावी परीक्षेस बसण्याची एकमेव संधी देण्यात येत आहे. तथापि परीक्षेमध्ये शिक्षणशास्त्र विषयात विद्यार्थी उत्तीर्ण झाल्यास त्या विद्यार्थ्यांना पूर्वीच्या विषययोजनेनुसार तोच विषय घऊन परीक्षेस प्रविष्ट होता येईल.

शैक्षणिक वर्ष सन 2021-22 पासून इयत्ता 11 वी व शैक्षणिक वर्ष सन 2022-23 पासून इयत्ता बारावीसाठी अशी सवलत देय असणार नाही. असे राज्य मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी कळविले आहे.

000000

बारावी परीक्षेच्या वेळापत्रकात बदल

 

बारावी परीक्षेच्या वेळापत्रकात बदल

अमरावती दि.4 (विमाका): राज्य शिक्षण मंडळामार्फत मार्च-एप्रिल 2022 मध्ये घेण्यात येणाऱ्या इयत्ता  बारावीची  परीक्षा दि. 4 मार्च ते 30 मार्च 2022 या कालावधीत आयोजित करण्यात आलेली आहे. त्यानुसार या परीक्षेचे वेळापत्रक मंडळाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले असून उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना देण्यात आलेले आहे. परीक्षेच्या या वेळापत्रकात अंशत बदल करण्यात आला असल्याचे राज्य मंडळाकडून कळविण्यात आले आहे.

बारावीच्या सर्वसाधारण व द्विलक्षी  (General & Biofocal) आणि व्यावसायिक (M.C.V.C) परीक्षा दि. 5 मार्च व दि. 7 मार्च  रोजी आयोजित करण्यात आली होती. परंतु अपरिहार्य तांत्रिक कारणास्तव या विषयांच्या परीक्षा नियोजित तारखांऐवजी अनुक्रमे दि. 5 एप्रिल व  दि. 7 एप्रिल 2022 रोजी घेण्यात येणार आहे.

इयत्ता बारावीच्या लेखी परीक्षा व अन्य परीक्षेच्या उर्वरित वेळापत्रकात इतर कोणताही बदल नाही. त्याचप्रमाणे इयत्ता दहावीच्या वेळापत्रकात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. वेळापत्रकातील अंशत: बदलाची सर्व संबंधीत उच्च माध्यमिक शाळा/ कनिष्ठ महाविद्यालयांचे मुख्याध्यापक/प्राचार्य, विद्यार्थी, पालक व अन्य संबंधित घटकांनी नोंद घ्यावी, असे राज्य मंडळाचे सचिव डॉ.अशोक भोसले यांनी कळविले आहे.

0000000

 

गुरुवार, ३ मार्च, २०२२

इयत्ता बारावी व इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी राज्यमंडळस्तरावर समुपदेशकांची नियुक्ती

 

इयत्ता बारावी व इयत्ता दहावीच्या

विद्यार्थ्यांसाठी राज्यमंडळस्तरावर समुपदेशकांची नियुक्ती

अमरावती दि.3 (विमाका):  इयत्ता बारावीची मार्च-एप्रिल २०२२ मध्ये घेण्यात येणाऱ्या लेखी परीक्षा दिनांक 4 मार्च ते 7 मार्च 2022 व दहावी लेखी परीक्षा दि. 15 मार्च ते 4 एप्रिल 2022 या कालावधीन पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या विभागीय मंडळामार्फत आयोजित करण्यात आली आहे.

परीक्षेच्या काळात अनेक विद्यार्थी नकारात्मक विचाराने किंवा परीक्षेच्या भितीने मानसिक दडपणाखाली असतात. अशा विद्यार्थ्यांना नैराश्यातून बाहेर काढण्यास मदत करण्यासाठी ऑनलाईन समुपदेशन करण्याकरीता राज्यमंडळ स्तरावरून समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचे भ्रमणध्वनी क्रमांक पुढीलप्रमाणे आहेत.

१) ८४३२५९२३५८ २) ७२४९००५२६० ३) ७३८७४००९७० ४) ९३०७५६७३३० ५) ८९७५४७८२४७

६) ७८२२०९४२६१ ७) ९५७९1५९१०६ ८) ९९२३०४२२६८ 9)  ७४९८११९१५६ १०)८९५६९६६१५२

वरीलप्रमाणे भ्रमणध्वनी क्रमांक दिलेले समुपदेशक परीक्षा कालावधीत सकाळी ८ ते रात्री ८  या कालावधीत विद्यार्थ्यांना भ्रमणध्वनीव्दारे निशुल्क आवश्यक ते समुपदेशन करतील. मात्र विद्यार्थी, पालक यांनी परीक्षा केंद्र, बैठक व्यवस्था व प्रश्नपत्रिकेसंबधित प्रश्न इत्यादींबाबत समुपदेशकांना विचारणा करू नये असे राज्यमंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी कळविले आहे.

0000000

चित्रकला क्षेत्रात प्राविण्य मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना सवलतीचे गुण देण्याबाबत

 

चित्रकला क्षेत्रात प्राविण्य मिळविणाऱ्या

विद्यार्थ्यांना सवलतीचे गुण देण्याबाबत

अमरावती दि.03 (विमाका) : इयत्ता दहावी परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांना शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या निर्णयानुसार शास्त्रीय कला, चित्रकला क्षेत्रात प्राविण्य मिळविणाऱ्या व लोककला प्रकारामध्ये सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना सवलतीचे अतिरिक्त गुण देण्याबाबतची सुधारित कार्यपध्दती विहित करण्यात आलेली आहे. यानुसार विद्यार्थ्यांनर एलिमेंटरी परीक्षा उत्तीर्ण असल्याशिवाय इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड परीक्षेचे गुण मिळणार नाही, असे कळविण्यात आले आहे.

कोविड विषाणूच्या प्रादुर्भावामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे सन २०२१-२२ या वर्षी इयत्ता दहावीच्या परीक्षेला बसणाऱ्या ज्या विद्यार्थ्यांना सन २०२०-२1 या वर्षी एलिमेंटरी ड्रॉईंग ग्रेड परीक्षेला बसता आले नाही, अशा विद्यार्थ्यांनी सन २०२१-२२ मध्ये केवळ इंटरमिजीएट डॉईंग ग्रेड परीक्षेमध्ये प्राप्त केलेल्या श्रेणीच्या आधारे, त्यांना सन २०21-22 या वर्षापुरते सवलतीचे गुण देण्यास मान्यता देण्यात येत आहे असे कळविण्यात आले आहे. हा निर्णय फक्त सन २०21-22 या शैक्षणिक वर्षापुरताच लागू राहील. असे राज्यमंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी कळविले आहे.

0000000


बुधवार, २ मार्च, २०२२

शहरात स्वच्छतेची कामे नियोजनपूर्वक व सातत्याने राबवा, राज्‍यमंत्री बच्‍चूभाऊ कडू यांनी घेतला महापालीका कामांचा आढावा

 

                  शहरात स्वच्छतेची कामे नियोजनपूर्वक व सातत्याने राबवा

राज्‍यमंत्री बच्‍चूभाऊ कडू यांनी घेतला महापालीका कामांचा आढावा

अमरावती, दि. 2 (विमाका) :  शहरात सार्वजनिक स्‍थळे व परिसराची स्वच्छता प्राधान्याने करण्यात यावी. कचरामुक्त परिसराचे महत्त्व पटवुन देण्यासाठी जनजागृती करण्यात यावी. शासकीय रुग्णालये व सार्वजनिक परिसर पुर्णपणे कचरामुक्‍त करावा. संपुर्ण शहरात खुल्या जागेत जंतुनाशक फवारणी करण्यात यावी. स्‍वच्‍छतेसंदर्भात जबाबदार सेवांचे आवश्‍यक सर्व संपर्क क्रमांक नागरिकांपर्यंत पोहचविण्‍याची व्‍यवस्‍था करावी. स्वच्छतेबाबतचा नियोजनबध्‍द आराखडा तयार करावा. सफाई कामगारांना आवश्यक ती साधने उपलब्‍ध करुन देण्‍यात यावी असे निर्देश राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांनी दिले.

महानगरपालिकेतील सभागृहात आज विविध विषयाचा आढावा घेण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. बैठकीला महानगरपालिका आयुक्‍त डॉ.प्रवीण आष्‍टीकर, विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

पात्र लाभार्थ्यांना  तात्काळ घरकुल देण्यात यावे

        या बैठकीत प्रधानमंत्री आवास योजना व रमाई आवास योजनेअंतर्गत घरकुल योजनेचा आढावा घेण्यात आला. पात्र लाभार्थ्‍यांच्या प्रस्तावावर तात्‍काळ कार्यवाही करुन त्यांना घरकुलाचा लाभ देण्‍याबाबत श्री. कडू यांनी संबंधितांना निर्देश दिले.

                दिव्यांगांचे बचत गट तयार करण्यात यावे

दिव्‍यांगांचे सर्वेक्षण करुन त्यांना प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया पुर्ण करण्यात यावी. दिव्‍यांगाच्या मानधनात आवश्यक ती वाढ करण्यात यावी. दिव्यांग व्यक्तींच्या माध्यमातुन तयार करण्यात येणाऱ्या उत्पादनांची सहजरित्या विक्री व्हावी व त्यांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी दिव्‍यांगांचे बचत गट तयार करण्यात यावे असे निर्देश त्यांनी दिले. सुरक्षा रक्षकाचे देयक नियमितपणे अदा करण्‍यात यावे. महिला बाल कल्‍याण विभागाच्‍यावतीने राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचे प्रशिक्षण कार्यक्रम राबवून त्याबाबत गरजू महिलांनी सहभागी होण्याबाबत  ‍जनजागृती करण्‍यात यावी असे श्री. कडू यांनी यावेळी सांगितले.

        महानगरपालिका क्षेत्रात आरोग्‍य व्‍यवस्‍था सुदृढ करावी. महानगरपालिकेचे  अद्ययावत उपकरणांनी सुसज्ज असलेले रुग्णालय निर्मिती करण्याबाबत प्रस्ताव तयार करावा. गणू लेआऊट मधील हॉकर्स झोन बाबत स्‍थानिकांशी चर्चा करुनच निर्णय घ्‍यावा, असे निर्देश श्री. कडू यांनी संबंधितांना यावेळी दिले.

00000