'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना'2026 :
- ५०
हजार रुपयांची मर्यादा रद्द: पूर्वी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी
कर्जमुक्ती योजनेचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांसाठी असलेली ५० हजार रुपयांची
लाभाची मर्यादा आता पूर्णपणे रद्द करण्यात आली आहे. अशा सर्व पात्र
शेतकऱ्यांना आता २ लाख रुपयांपर्यंत कर्जमुक्तीचा पूर्ण लाभ मिळेल.
- नियमित
कर्जफेड करणाऱ्यांना दिलासा: नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी २०२६-२७
मध्ये नवीन कर्ज घेऊन ते वेळेत परतफेड करण्याची अट रद्द करण्यात आली आहे.
- २
लाखांवरील थकबाकीदारांना लाभ: ज्या शेतकऱ्यांचे थकीत कर्ज २ लाख रुपयांपेक्षा
जास्त आहे, त्यांना पूर्वी या योजनेतून वंचित राहावे लागत होते. आता नव्या
सुधारणेनुसार, कर्ज कितीही असले तरी त्यातील २ लाख रुपयांपर्यंतची रक्कम
शासन माफ करणार आहे.
- व्यापक
व्याप्ती आणि पारदर्शकता: राष्ट्रीयीकृत बँका, व्यापारी बँका, खासगी बँका
आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांकडून (DCCB) मिळणाऱ्या माहितीच्या आधारे
पारदर्शक पद्धतीने लाभार्थ्यांची यादी तयार केली जात आहे.
- अपेक्षित
लाभार्थी आणि निधी: या योजनेद्वारे राज्यातील सुमारे ५६ लाख शेतकऱ्यांना ३६ हजार ५८५
कोटी रुपयांचा लाभ मिळणार असून, नवीन सुधारणांमुळे या संख्येत आणखी वाढ
होणार आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा