इयत्ता 10 वी 12 वी विद्यार्थ्यांच्या
नाव नोंदणीस 10 सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ
अमरावती,
दि. 29 : इयत्त्या दहावी व बारावीच्या शैक्षणिकवर्ष मार्च 2019 च्या परीक्षेस
खाजगीरित्या प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांचे नाव नोंदणी अर्ज ऑनलाईन पध्दतीने
स्विकारण्याचा कालावधी दिनांक 30 जुलै 2018 ते दिनांक 25 ऑगस्ट 2018 पर्यंत
निश्चित करण्यात आला होता. परंतू या नाव नोंदणी अर्जास मुदतवाढ देण्यात येत असून
त्याचा कालावधी 10 सप्टेंबर पर्यंत करण्यात आला आहे.
दि.27
ऑगस्ट 2018 ते 11 सप्टेंबर 2018 विद्यार्थ्यांनी मूळ अर्ज, विहित शुल्क व मूळ
कागदपत्रे अर्जावर नमूद केलेल्या संपर्क केंद्र शाळेत किंवा कनिष्ठ
महाविद्यालयामध्ये जमा करावे. दिनांक 15 सप्टेंबर 2018 संपर्क केंद्र शाळा, कनिष्ठ
महाविद्यालयानी विद्यार्थ्यांचे अर्ज, विहित शुल्क, मूळ कागदपत्रे व यादी विभागीय
मंडळाकडे जमा करावे.
वाढीव
तारखांबाबत शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी नोंद घेवून तशा सूचना आपल्या स्तरावरुन
शिक्षक, पालक व विद्यार्थ्यांना देण्यात द्याव्या. तसेच कोणताही पात्र विद्यार्थी
यापासून वंचित राहणार याची दक्षता घ्यावी. असे विभागीय सचिव अमरावती विभागीय मंडळ,
अमरावती यांनी कळविले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा