बुधवार, १ ऑगस्ट, २०१८

माध्यमिक शालान्त प्रामणपत्र परीक्षेसाठी खाजगीरित्या प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज सादर करावे

वृत क्र. 142                                                                         दि. 1 ऑगस्ट, 2018
नविन परीक्षा केंद्राच्या मागणीचे प्रस्ताव
31 ऑगस्टपर्यंत सादर करावे
                      
अमरावती, दि. 1 :  माध्यमिक शालांत प्रमाणपत्र व उच्च माध्यमिक परीक्षा, फेब्रुवारी/मार्च-2019 करिता नविन परीक्षा केंद्र मागणीबाबत प्रस्ताव दिनांक 1 ऑगस्ट 2018 ते 31 ऑगस्ट 2018 या कालावधीत अर्ज विक्री व भरलेले अर्ज स्विकृत करण्यात येणार आहे. नविन प्रस्तावाच्या प्रपत्राची किंमत पाचशे रुपये असून दिनांक 31 ऑगस्ट 2018 पर्यंत प्रस्ताव मंडळास सादर करु न शकणाऱ्या शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांना दिनांक 1 सप्टेंबर 2018 ते 15 सप्टेंबर 2018 या कालावधीत शंभर रुपये प्रतिदिनी याप्रमाणे विलंब शुल्कासह अर्ज सादर करता येतील, या तारखेनंतर परीक्षा केंद्र मागणी अर्ज स्विकारल्या जाणार नाही, असे विभागीय सचिव, अमरावती विभागीय मंडळ यांनी कळविले आहे.
00000
वृत क्र. 143                                                                         दि. 1 ऑगस्ट, 2018                                                                                                                 
माध्यमिक शालान्त प्रामणपत्र परीक्षेसाठी खाजगीरित्या प्रविष्ट
होणाऱ्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज सादर करावे
                      
अमरावती, दि. 1 :  मार्च 2019 माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.10 वी) परीक्षेस खाजगीरित्या प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन नांव नोंदणी करीता अर्ज सादर करण्यासाठी तारीख निश्चितकरण्यात आल्या आहे. सोमवार दि. 30 जुलै, 2018 ते शनिवार दि. 25 ऑगस्ट 2018 विद्यार्थ्यांनी नावनोंदणी अर्ज ऑनलाईन भरावे. मंगळवार दि. 31 जुलै 2018 ते सोमवार दि. 27 ऑगस्ट 2018 विद्यार्थ्यांनी मूळ अर्ज, विहित शुल्क व मूळ कागदपत्रे अर्जावर नमूद केलेल्या संपर्क केंद्र शाळेत जमा करावे. शुक्रवार दि. 31 ऑगस्ट 2018 रोजी संपर्क केंद्र शाळांनी विद्यार्थ्यांचे अर्ज, विहित शुल्क, मूळ कागदपत्रे व यादी विभागीय मंडळाकडे जमा करावी.
खासगी विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी http://form17.mh-ssc.ac.in वेबसाईटचा वापर करावा. अर्ज भरण्यासाठीच्या सूचना संकेतस्थळावर मराठी/इंगजी माध्यमातून उपलब्ध आहेत त्या वाचून अर्ज भरावा.
            विद्यार्थ्यांनी अर्ज भरण्याकरीता 1. शाळा सोडल्याचा दाखला (मूळ प्रत), नसल्यास द्वितियप्रत व प्रतिज्ञापत्र 2. आधारकार्ड 3. स्वत:चा पासपोर्ट आकारातील फोटो स्वत:जवळ ठेवावा. ऑनलाईन अर्ज भरतांना सदर कागदपत्रे स्कॅन करुन अपलोड करावी. कागदपत्रे स्कॅन करण्यासाठी विद्यार्थ्यांनी स्कॅनर/मोबाईलद्वारे कागदपत्रांचे फोटो काढून ते अपलोड करावेत. विद्यार्थ्यांचा मोबाईला क्रमांक व ई-मेल आयडी पुढील संपर्कासाठी अनिवार्य आहे. संपूर्ण अर्ज भरुन झाल्यावर भरलेल्या अर्जाची प्रत विद्यार्थ्याला त्याने अर्जात नमूद केलेल्या ई-मेल वर पाठविली जाणार आहे. तसेच या संपूर्ण भरलेल्या अर्जाची प्रिंटआऊट, शुल्क पावती व हमीपत्र यासह दोन प्रतीत काढून घ्यावी. विद्यार्थ्यांनी अर्ज, विहित शुल्क व मूळ कागदपत्रे नावनोंदणी अर्जावर नमूद केलेल्या संपर्क शाळांमध्ये विहित मुदतीत जमा करावयाची आहेत. खाजगी विद्यार्थ्यांसाठी नावनोंदणी शुल्काचा तपशील दहावीकरीता एकहजार रुपये नोंदणी शुल्क व रु. 100 प्रक्रिया शुल्क (Processing fee) भरावे लागतील.
            खाजगी विद्यार्थ्यांसाठी असलेली माहिती पुस्तिका संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आली आहे. ऑनलाईन अर्ज भरतांना कोणतीही अडचण आल्यास कार्यालयीन वेळेत दूरध्वनी क्र. 020-25705208/25676405/25705271 वर संपर्क साधावा. पात्र विद्यार्थ्यांनी नावनोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतर त्यांनी परीक्षेची आवेदनपत्रे मंडळाने विहित केलेल्या कालावधीत परीक्षा शुल्कासह भरणे आवश्यक असल्याबाबतची सूचना विद्यार्थ्यांना संपर्क केंद्र शाळांमार्फत करुन द्यावी, असे संजय मा. यादगिरे, विभागीय सचिव, अमरावती विभागयी मंडळ यांनी कळविले आहे.
0000000
वृत क्र. 144                                                                        दि. 1 ऑगस्ट, 2018      
खरीप हंगामामध्ये
सोयाबीन पिकावर किडीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना

Ø  सोयाबीनवरील खोडमाशी, चक्रभुंगा व उंट अळींचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी
प्रमाणित औषधांची फवारणी करण्याचे कृषी विभागाव्दारे आवाहन

अमरावतीदि.1 :  सध्या अमरावती विभागातील सर्व जिल्ह्यांत सोयाबीन पिकावर खोडमाशी, चक्रभुंगा व उंटअळीचा प्रादुर्भाव दिसुन येत आहे. सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी शेतात जाऊन किडीचे सर्व्हेक्षण करुन त्वरीत उपाययोजना करणे गरजेचे आहे. खोडमाशी किडीमुळे सुरुवातीच्या रोपावस्थेत शेंड्याकडील तीन पाने पिवळी पडलेले दिसतात किंवा पाने वाळलेले किंवा सुकलेले दिसतात. तसेच चक्रभुंगा किडीमुळे सोयाबीन झाडाचा शेंडा किंवा एखादी फांदी सुरुवातीला सुकलेली किंवा झुकलेली दिसते व त्या फांदीवर, खोडावर किंवा देठावर दोन चक्रकाप आढळून येतात. उंटअळीच्या प्रादुर्भावामुळे पानावर प्रथम पांढुरके किंवा पिंवळे पातळ कागदासारखे चट्टे आढळून येतात. उंटअळीच्या प्रादुर्भावामुळे पानावर प्रथम पांढुरके किंवा पिवळे पातळ कागदासारखे चट्टे आढळून येतात व नंतर पानावर गोल अनेक छिद्रे आढळून येतात. जास्त प्रादुर्भाव झाल्यास किडी संपूर्ण पाने फस्त करते फक्त खोड आणि शिराच शिल्लक राहतात. खोडमाशीच्या प्रादुर्भावमुळे 33 टक्के, चक्रभुंगा किडीमुळे 29 ते 83 टक्के तर उंटअळीमुळे 50 टक्के उत्पादनात घट येऊ शकते. या किडी आढळून आल्यास पुढीलप्रमाणे उपाययोजना त्वरीत कराव्यात.
आपल्या शेतात फक्त खोडमाशीचा प्रादुर्भाव असेत तर इथिऑन 50 टक्के प्रवाही 30 मि.ली. किंवा ट्रायझोफॉस 40 टक्के प्रवाही 12.5 मि. ली. किंवा इन्डॉक्सीकार्ब 14.5 एस. सी 607 मि.ली. किंवा क्लोरॅनट्रॉनिलीप्रोल 18.5 टक्के एस. सी. 3 मि. ली. प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारावे.
फक्त चक्रभुंग्याचा प्रादुर्भाव असेल तर इथिऑन 50 टक्के प्रवाही 30 मि.ली. किंवा थायक्लोप्रिड 21.7 टक्के एस. सी 15 मि.ली. किंवा प्रोफेनोफॉस 50 टक्के प्रवाही 20 मि. ली. किंवा ट्रायझोफॉस 40 टक्के प्रवाही 12.5 मि. ली. किंवा क्लोरॅनट्रॉनिलीप्रोल 18.5 टक्के एस. सी. 3 मि. ली. प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारावे.
एकाच वेळी खोडमाशी, चक्रभुंगा व उंटअळी या तिन्ही किडीचा प्रादुर्भाव असेल तर क्लोरॅनट्रॉनिलीप्रोल 18.5 टक्के एस. सी. 3 मि. ली किंवा थायमिथोक्झाम 12.6 टक्के अधिक लॅम्बडा सायहॅलोथ्रिन 9.5 टक्के झेड सी. 2.5 मि. ली. प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारावे.
जर फक्त उंटअळीचा प्रादुर्भाव असेल तर प्रोफेनोफॉस 50 टक्के प्रवाही 20 मी. ली किंवा इन्डॉक्सीकार्ब 14.5 टक्के एस. सी. 6.7 मि. ली. किंवा क्लोरॅनट्रॉनिलीप्रोल 18.5 टक्के एस. सी. 3 मि. ली. फवारावे. जैविक किटकनाशक बॅसिलस थुनिन्जीएन्सीस कुरस्टाकी 15 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारावे.
सुरुवातीला पेरणीनंतर 20-25 दिवसांनी शक्य असल्यास व कमी प्रादुर्भाव असल्यास 5 टक्के निंबोळी अकांची फवारणी करावी. वरीलप्रमाणे प्रमाण हे साध्या फवारणी पंपाचे आहे. पॉवर स्प्रेअरने फवारणी करावयाची असल्यास औषधाचे प्रमाणे तिनपट करावे. विभागातील सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकावर किडीचा प्रादुर्भाव आढळून आल्यास उपरोक्त प्रमाणे उपाययोजना व औषधांची फवारणी करावी, असे आवाहन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे प्रादेशिक संशोधन केंद्राचे वरिष्ठ किटकशास्त्रज्ञ प्रमुख डॉ. अनिल ठाकरे आणि अमरावती विभागाचे विभागीय कृषी सहसंचालक सुभाष नागरे यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा