आज इयत्ता 12 वी
पुरवणी परीक्षेचा निकाल
अमरावती, दि. 23 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या
पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय
मंडळामार्फत माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. 10) वरीक्षा दिनांक 17 जुलै, 2018 ते
04 ऑगस्ट, 2018 या कालावधीत आयोजित करण्यात आली होती. सदर परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात
येत असून निकालाची कार्यपध्दती व त्याच्या कार्यवाहीचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या
नऊ विभागीय मंडळामार्फत जुलै-ऑगस्ट 2018 मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र
(इ. 10 वी) परीक्षेचा ऑनलाईन निकाल www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर शुक्रवार दि.
24 ऑगस्ट, 2018 रोजी दुपारी 1.00 वाजता जाहीर करण्यात येत आहे. या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांचे
विषयनिहाय गुण उपलब्ध होतील व सदर माहितीची प्रत (प्रिंट आऊट) घेता येईल.
ज्या विद्यार्थ्यांना गुणांची पडताळणी करावयाची आहे त्यांनी
ऑनलाईन निकाल जाहीर झाल्यांनतर विहित नमून्यात विहित शुल्कासह सोमवार, दि. 27 ऑगस्ट,
2018 ते बुधवार दि. 5 सप्टेंबर, 2018 पर्यंत संबंधित विभागीय मंडळाकडे अर्ज करावयाचा
आहे. अर्जासोबत ऑनलाईन निकालाची प्रत/गुणपत्रिकेची छायाप्रत जोडणे अनिवार्य राहील.
ज्या विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकांची छायाप्रत प्राप्त करावयाची
आहे त्यांनी ऑनलाईन निकाल जाहीर झाल्यानंतर विहित नमून्यात विहित शुल्कासह सोमवार दि.
27 ऑगस्ट, 2018 ते शनिवार दि. 15 सप्टेंबर, 2018 पर्यंत संबंधित विभागीय मंडळाकडे अर्ज
करावयाचा आहे. अर्जासोबत ऑनलाईन निकालाची प्रत/गुणपत्रिकेची छायाप्रत जोडणे अनिवार्य
राहील.
जुलै-ऑगस्ट 2018 च्या
परीक्षेमधील उत्तरपत्रिकांचे पुनर्मूल्यांकन करण्यासाठी प्रथम उत्तरपत्रिकेची छायाप्रत
घेणे अनिवार्य असून छायाप्रत मिळाल्याच्या दुसऱ्या दिवसापासून पाच दिवसांत पुनर्मूल्यांकनाच्या
कार्यपध्दतीचा अवलंब करुन विहित नमुन्यात विहित शुल्क भरुन संबंधित विभागीय मंडळाकडे
विद्यार्थ्यांना अर्ज करणे आवश्यक राहील. ज्या विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकन
करावयाचे असेल त्यांनी अधिक माहितीसाठी संबंधित विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा.
फेब्रुवारी-मार्च 2019 मधील उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयता.
12 वी) परीक्षेस ज्या विद्यार्थ्यांना प्रविष्ठ व्हावयाचे आहे अशा पुनर्परीक्षार्थी
विद्यार्थी, नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी तसेच श्रेणीसुधार
योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांची आवेदनपत्र ऑनलाईन पध्दतीने स्विकारायची असल्याने त्याच्या
तारखा स्वतंत्रपणे कळविण्यात येतील.
परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांची संपादक
सुधारण्यासाठी श्रेणी/गुणसुधार (Class Improvement Scheme) योजनेअंतर्गत परीक्षेस पुन:श्च
प्रविष्ठ होण्याची संधी सन 2018 पासून लागू करण्यात आली आहे. त्यानुसार जुलै-ऑगस्ट
2018 च्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेस सर्व विषय घेऊन उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी
तरतुदीच्या अधीन देय संधी उपलब्द राहील, असे डॉ. अशोक भोसले, प्र. सचिव, राज्यमंडळ
पुणे यांनी कळविले आहे.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा