राजीव गांधी यांच्या
जयंतीनिमित्त
विभागीय आयुक्तांनी दिली
सद्भावना दिवस प्रतिज्ञा
अमरावती, दि. 20: माजी प्रधानमंत्री दिवंगत राजीव गांधी
यांच्या जयंतीनिमित्त विभागीय आयुक्त पियूष सिंह यांनी विभागीय आयुक्त कार्यालयात
अधिकारी व कर्मचाऱ्यांना ‘सद्भावना दिवस’ प्रतिज्ञा दिली.
जात, वंश, धर्म, प्रदेश किंवा भाषा विषयक भेद न करता भावनिक
ऐक्य आणि सामंजस्य यासाठी काम करण्याची, तसेच सर्व प्रकारचे मतभेद हिंसाचाराचा अवलंब
न करता संविधानिक मार्गानी सोडविण्याची प्रतिज्ञा विभागीय आयुक्तांनी उपस्थितांना
दिली.
यावेळी महसूल उपायुक्त गजेंद्र बावणे, पुरवठा उपायुक्त रमेश
मावस्कर, पुनर्वसन उपायुक्त प्रमोद देशमुख यांचेसह अन्य वरिष्ठ अधिकारी कर्मचारी
उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा