जिल्ह्यात कलम 38 लागू
अमरावती, दि. 2 : जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी
पोलीस अधीक्षक, अमरावती (ग्रामीण) विशाल आनंद यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 38 अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी केला आहे.
हा प्रतिबंधात्मक आदेश
संपूर्ण अमरावती जिल्ह्यात, पोलीस
आयुक्तांचे परिक्षेत्र वगळून कायदा व सुव्यवस्था
अबाधित रहावी, याकरिता दि. 2 एप्रिल ते 16 एप्रिल 2026 पर्यंत लागू करण्यात आला आहे.
कोणीही सदर आदेशाचा भंग
केल्यास तो महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 136 अन्वये शिक्षेस पात्र राहील. या कलमांचा भंग करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही
पोलीस अधीक्षक, अमरावती (ग्रामीण) यांनी कळविले आहे.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा