सोमवार, १६ मार्च, २०२६

पाणी फाउंडेशनच्या सहकार्याने पाणीदार महाराष्ट्राचा संकल्प -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 




पाणी फाउंडेशनच्या सहकार्याने पाणीदार महाराष्ट्राचा संकल्प

-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

मुंबईदि. १६ : पाणी फाउंडेशनने महाराष्ट्राच्या जलसंधारण क्षेत्रात भरीव कामगिरी केली आहे. या फाउंडेशनने राज्य शासनाच्या समवेत राज्याला बसणाऱ्या दुष्काळाची तीव्रता

कमी करण्यात मदत केली.यापुढेही पाणी फाउंडेशनच्या सहकार्याने पाणीदार महाराष्ट्राचा संकल्प करूयाअसे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

मंत्रालयात आयोजित बैठकीत पाणी फाउंडेशनच्या जलसंधारण कामाच्याबाबत सादरीकरण करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री बोलत होते.

बैठकीस कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव विकासचंद्र रस्तोगीग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवलेनानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचे संचालक परिमल सिंगपाणी फाउंडेशनचे संस्थापक आमिर खानकिरण रावपाणी फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित भटकळतसेच अमित चंद्राविलास शिंदे आदी उपस्थित होते. दूरदृश्य संवाद  प्रणालीद्वारे कृषी विद्यापीठांचे कुलगुरूकृषी विभागाचे अधिकारी सहभागी झाले होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणालेहवामान विषयक संशोधन करणाऱ्या विविध संस्थांनी यावर्षी एल निनोचा प्रभाव जाणवणार असल्याचे मत केले आहे त्यामुळे राज्यात ८० टक्के पाऊस होईलअसे गृहीत धरून जलसंधारणाच्या कामांचे नियोजन करावे. पाणी फाउंडेशनच्या मागील कामाचा अनुभव बघता त्यांच्या माध्यमातून यावर्षीही शेतकरीग्रामस्थ जलसाक्षर होतील.

पाण्याचे महत्व ओळखून फाउंडेशन काम करत आहे. या कामासाठी संबंधित शासकीय यंत्रणांनी फाउंडेशनला मदत करावी. त्यासाठी पूरक यंत्रणा सज्ज ठेवावी. फाउंडेशन राज्यात करीत असलेल्या जलसंधारणाच्या कामांमध्ये मृद व जलसंधारण विभागाचाही समावेश करावा. पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून होत असलेल्या कामाचा दर्जा चांगला राखण्यासाठीत्यांच्या मागणीनुसार नियंत्रण आणि पडताळणी यंत्रणेची आवश्यकता आहे.  यासाठी कृषी सहाय्यक तसेच ग्रामविकास विभागाच्या उमेद अभियानामधील कर्मचाऱ्यांचा समावेश असलेली व्यवस्था उभारण्यात यावीअशा सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.

बैठकीत पाणी फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित भटकळ यांनी सादरीकरण केले. यावेळी संस्थापक आमिर खानकिरण रावअमित चंद्रा यांनीही जलसंधारणाची कामे प्रभावी होण्यासाठी मते व्यक्त केली. फाउंडेशनने राज्यामध्ये स्वयंसेवक तत्त्वावर १३ हजार १२१ शासकीय अधिकाऱ्याचे मार्गदर्शक म्हणून प्रशिक्षणासाठी नोंदणी केली आहे. तसेच फार्मर कप निवासी प्रशिक्षणासाठी १६ हजार २६० शेतकरी सहभागी झाले आहेत. यामध्ये ५७.५६ टक्के महिला शेतकरी आहेत तसेच ११ हजार ९५ निमंत्रकांनी नोंदणी केली आहे.

0000

@devendra_fadnavis

https://x.com/Dev_Fadnavis

https://x.com/CMOMaharashtra

#DevendraFadnavis

#CMOMaharashtra

 

https://ddamravati.blogspot.com/

https://www.facebook.com/ddamravati/

https://www.instagram.com/ddiamravati/?hl=en

https://x.com/InfoDivAmravati

 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा