श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांचे कार्य संपूर्ण
मानवतेच्या इतिहासातील एक गौरवशाली पान
- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, 'हिंद की चादर'
म्हणून ओळखले जाणारे, मानवतेचे रक्षक आणि महान
त्यागी श्री गुरु तेग बहादुर साहीबजी यांचा त्याग मानवतेच्या इतिहासातील गौरवपूर्ण
पर्व आहे. श्री गुरु तेग बहादुर साहिबजींचे बलिदान हे केवळ इतिहास नाही, तर ते संपूर्ण मानवतेच्या इतिहासातील एक गौरवशाली पान आहे. संस्कृती,
परंपरेच रक्षण करण्यासाठी श्री गुरु तेग बहादुर साहीबजी यांनी
प्राणांची आहुती दिली. त्यांचे कार्य अतूट श्रद्धा आणि अतूट धैर्याचे उदाहरण आहे.
श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्याकडे शस्त्रे
नव्हती, पण त्यांच्याकडे सत्य आणि करुणेची ताकद होती. त्यांनी अन्यायाविरुद्ध आवाज
उठवून गोरगरिबांना न्याय मिळवून दिला. सच्चा धर्म तोच, जो दुसऱ्याच्या
धर्माचा आदर करतो आणि रक्षण करतो, असेही श्री.शिंदे यांनी
यावेळी सांगितले.
महाराष्ट्र आणि पंजाबच्या ऐतिहासिक संबंधांवर
प्रकाश टाकत नांदेड ही गुरु गोविंद सिंहजींची कर्मभूमी आहे, तर संत नामदेव
महाराजांनी भागवत धर्माची पताका पंजाबमध्ये फडकवली असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ
शिंदे यांनी सांगितले.
श्री गुरु तेग बहादुर साहिबजींचे विचार जनमानसात
पोहोचवण्यासाठी राज्य शासनाने पुढाकार घेतला असल्याचे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी
सांगितले. आम्ही राज्यभरात डिजिटल रथांच्या माध्यमातून या महान बलिदानाची गाथा
घराघरात पोहोचवित आहोत. सिख, सिकलकर, बंजारा , लबाना, सिंधी, मोहयाल, वाल्मीकी, उदासीन आणि भगत नामदेव (वारकरी) संप्रदाय
या सर्व समाजांना एका सूत्रात बांधून श्री गुरु तेग बहादुर साहिबाजी यांचे कार्य व
विचार पुढील पिढीपर्यंत पोहचविण्याचा मानस उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी
व्यक्त केला.

.jpeg)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा